पुणे –वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अलका चौकात आज, सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सरकारने नुसत्या पोकळ घोषणा न करता वाढीव वीज बिल तातडीने रद्द करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा मनसे यापुढे आक्रमकपणे सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.
मनसेचे प्रल्हाद गवळी, प्रशांत मते, राहुल गवळी, विक्रांत अमराळे, वसंत खुटवड, सुनील कदम, अभिषेक थिटे, राकेश क्षीरसागर, धनंजय दळवी, रोहन उभे, मनोज ठोकळ, उदय गडकरी, आकाश धोत्रे, शेखर बाळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर आलेल्या लॉक डाउन मुळे सर्वसामान्यांना हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जात असताना ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे . वीज बिले आहेत कि खंडण्या ? असा जाब विचारून मनसे , पुणे शहर ने गेल्या आठवड्याभरापासून महावितरण व ऊर्जा मंत्र्यांविरोधात या विरोधात मोहीम उघडली आहे.
रोजगार धंद्यांची वानवा आणि आखडते उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन च्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत अशी लेखी मागणी मनसे तर्फे या पूर्वीच .मुख्यमंत्री , ऊर्जा मंत्री व महावितरण चे मुख्य अभियंता यांकडे केली आहे . आणि सदर निर्णय होईपर्यंत महावितरण ने नागरिकांमागे वसुलीचा तगादा लावून त्यांच्या मीटर ला हाथ लावला तर म न से आपल्या पद्धतीने त्यांचा सामना करेल असाही इशारा देण्यात आला आहे.