पुणे- सत्ता आणि सत्तेचा मोह,माणसाला सारे काही विसरवितो,कळस डौलाने डोलतो आणि दूर दूरवरून चमकून दिसतो तेव्हा जर त्याला आपल्या तळाशी असलेल्या पायाचे विस्मरण झाले आणि गर्व चढला तर.आणि हाच पाया कमकुवत झाला तर …? पण निष्ठावंत असलेला पाया कधी कमकुवत न होता निष्ठेच्या यातना सहन करत राहतो अगदी तसेच पर्त्येक क्षेत्रात तसे होते जसे सध्या राजकीय क्षेत्रात देखील घडते आहे,पुण्याच्या भाजपा मध्ये तर बापट होते तोपर्यंत त्यांची चापट बसत परंतु आता तेही उरले नाहीत आता निष्ठेला..जन पळभर म्हणतील..हाय हाय..हे लक्षात घेऊन सारे सहन करावे लागेल.अगदी अशीच भावना आता माजी आमदार मेधा कुलकर्णीची भडभडून आली आहे.. आणि सोशल मिडीयातून व्यक्त देखील झाली आहे.उद्या होणाऱ्या चांदणी चौकाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने हा बांध फुटला आहे..चांदणी चौकाचा विषय त्यांनीच उपस्थित करून फडणवीस आणि गडकरी यांच्याकडे नेला होता,राष्ट्रीय पदावर असूनही मेधा यांना मध्यंतरी मोदी – शहा यांच्या कार्यक्रम समयी पासेस सुधा डावलेले होते..महापालिकेतील पदाधिकारी यांनी सुरु केलेल्या या भेदभावाच्या राजकारणाने कसबा तर हातातून गेलाच पण त्यानंतरही या पक्षाला जाग आलेली दिसत नाही हेच आता मेधा कुलकर्णी यांच्या पोस्ट वरून म्हणावे लागेल..नेमके मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात वाचा….
“असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे “माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही..पण आता दुःख मावत नाही मनात..वाटले बोलावे तुमच्याशी.चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे.पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता.आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते..माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले.ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते.मी राष्ट्रीय पदावर असून,विनंती करूनही मला दिला नाही.साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे.त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.देशापुढील आव्हाने,त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.