धाराशिव –शासनाने पाझर तलाव व साठवण तलावासाठी संपादीत केलेल्या जमीनाचा मोबदल्याचे चेक काढून देण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील एका दैनिकाच्या संपादकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली आहे. या जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन, तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26 लाख 56 हजार 017 रुपये व 4 लाख 31 हजार 798 रुपयांचे दोन चेक काढुन देण्याकरिता 2 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली.
याबाबत वृद्ध शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली असता अनिरुद्ध कावळे आणि बाबासाहेब अंधारे यांनी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे ),
पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड
पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे,
विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांच्या पथकाने केली.