मुंबई
लालबागमधील म्हाडाच्या बदानी बोहरी इमारतीतील अतिरिक्त गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मूळ करार रद्द करण्यात यश आले. रहिवाशांची गृहनिर्माण संस्था होण्यास अडचणी निर्माण झाल्याने रहिवाश्यांनी केलेले उपोषण आ. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने मागे घेण्यात आले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लालबागमधील म्हाडाच्या बदानी बोहरी इमारतीतील अतिरिक्त गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक रहिवाशांवर अन्याय झाला होता. म्हाडाने ६ मार्च २०२३ रोजी नवीन श्री. यशोमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित या इमारतीतील ६४ गाळे संक्रमण शिबिर म्हणून देण्याचा ठराव परस्पर मंजूर केला. या ठरावाला रहिवाशी विरोध करत असून देखील प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ठाकरे सरकारचा हा तुघलकी निर्णय रद्द करण्याची मागणी रहिवाशांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात रहिवाशांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या अनेक तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरले जात आहे. शिंदे – फडणवीस सरकार मुंबईकरांच्या पाठीशी असून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायमच लढा दिला जाईल असे आश्वासन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिले.