पुणे -शिक्षणाशिवाय आयुष्य घडत नाही…हे सत्य कायम स्मरणात ठेवून ज्ञानाचा वटवृक्ष बहरावा. या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे शाळेचा पहिला दिवस ‘स्कुल चले हम’ या घोषणांनी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.हसतमुखाने स्वागत करणारे विदुषक आणि कॅटबरीची भेट यामुळे विद्यार्थीवर्गांचे चेहरे फुलले होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅटबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागुल आणि शिक्षक वृदांने जंगी स्वागत केले. यावेळी तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास उपस्थित राहत त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले.
या प्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व ही मुले देशाचे भविष्य आहेत. देश महासत्ता होण्यासाठी मुलांना आत्ताच दर्जेदार व मोफत शिक्षण काळाची गरज आहे आणि सर्वच शाळात विद्यार्थी पटसंख्या वाढणेही महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी ज्या विद्यार्थ्यांची वर्गातील वर्षभराची उपस्थिती शंभर टक्के असेल, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत मोफत ‘महाबळेश्वर सहलीचा आनंद’ ही योजनाही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी यावेळी जाहीर केली.
याप्रसंगी प्रशाकीय अधिकारी डॉ मीनाक्षी राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, शाळेचे मुख्याध्यापक जांबुवंत मसळकर, प्रभारी मुख्याध्यापक अश्विनी ताटे आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक निखिल सानप, सतीश सुरुडे, दीपाली गोळे,नेहा रोकडे,प्राची सर्जेराव,अस्मा सय्यद आणि शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.