पुणे–मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. काही काळ ते यशस्वी झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आज आधुनिक युग आहे. अभिमन्यू कडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. आपल्या थोर पुरुषांकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यामुळे चक्रव्यूह भेदून बाहेर कसे यायचे हे माहीत असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह भेदला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आज असलेले खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. पण जे काही बोललो ते अर्धे बोललो आहे.योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धे बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
अर्धसत्य च सांगितले..पूर्ण सत्य सांगितल्यावर …?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ माध्यमांनी काढले. त्यामुळे मी काय बोललो ते शांतपणे बसून ऐका. त्याची एक एक कडी तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेसच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, मी काय बोललो ते बघा, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या तर दुसऱ्या पुराव्याची तुम्हाला गरज भासणार नाही. पण मी अजून अर्धचं बोललो आहे. योग्य वेळ आली की उरलेलं अर्ध देखील मी बोलणार आहे.
गिरीश बापट आमचे नेते आहेत. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे.
या निवडणुकीवर त्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहेत. त्यांनी या निवडणुकीसंदर्भात मला काही टिप्स दिल्या आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश बापट आमचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी यापूर्वी अनेकदा मी आलो होतो. आजही त्यांची भेट घेतली आहे. मागील वेळेस पेक्षा यावेळेस त्यांची प्रकृती चांगली आहे आणि याचा मला जास्त आनंद आहे. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे. या निवडणुकीत संदर्भात त्यांनी मला आज काही सूचना दिल्या आहेत.भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट यांचे कुटुंबीय या निवडणुकीच्या कामासाठी लागले आहेत. प्रकृती बरी नसतानाही कसबा निवडणूकीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल असा आत्मविश्वास देखील फडणवीस यांनी बोलून दाखवला.