पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर यावर माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणालेत कि , ‘राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे. पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या धमक्यांची चिंता मी करत नाही ,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तसंच ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असंही पवार म्हणाले.
पवार यांच्या विषयी होणार्या वक्तव्यांमुळे आणि आज सोशल मिडिया तून आलेल्या धमकी मुले राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर सत्ताधारी गोटातूनही या टीकेला प्रत्युत्तर देत आमच्या सरकारमध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्था सक्षम असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या धमकीबद्दल आता स्वत: शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.