नवी दिल्ली, 3 मे 2023
भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील, औषधनिर्माण विभागाने शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील , निरीक्षक आणि संवाद भागीदारांची, ‘ सहकार्य’ या विषयावरील बैठक, 2 मे 2023 रोजी आयोजित केली होती. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी, औषधनिर्माण विभागाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार अवधेश कुमार चौधरी होते. परिषदेदरम्यान खालील तज्ञांनी अतिशय तपशीलवार आणि दर्जेदार सादरीकरणे केली:
- कोलकात्याच्या राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक, प्रा. व्ही. रविचंदीरण आणि भारतीय औषधनिर्माण सहकार्य संघटनेचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार डॉ. श्रीधर नारायणन, यांनी या विषयावर ” उष्णकटिबंधीय प्रदेशातील दुर्लक्षित आजार आणि दुर्मिळ रोगांच्या संदर्भात उपचार पद्धती विकसित करुन त्यांची उपलब्धता व्यापक करणे, तसेच उत्पादन दुर्मिळ अनुवांशिक रोगांसाठी नवीन उपचार पद्धतींवर संशोधन.
- वैज्ञानिक तसेच, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मधील साथीचे आजार आणि संसर्गजन्य विभागप्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता, या विषयावर “संसर्गजन्य रोगांसाठी नवीन निदानतंत्र विकसित करणे आणि प्रमाणीकरण करणे” या विषयावर सादरीकरण.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ मनीषा श्रीधर आणि डॉ. मधुर गुप्ता तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या डॉ. कलावाणी गणेशन, यांचे, ‘ निदान तंत्र आणि उपचार पद्धती यावर नव्या मंचावरील तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रमाणीकरण” या विषयावर सादरीकरण.
फाउंडेशन फॉर इनोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टिक्स (FIND)च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्टा फर्नांडेझ सुआरेझ, आणि भारतीय निदानशास्त्र विषयक उत्पादक संघटनेचे भास्कर मल्लाडी,यांनी ‘प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर अवस्थेतील दुर्मिळ रोगांसह रोगांच्या चाचणीसाठी किफायतशीर निदान पॅनेल/किट्सचा विकास” या विषयावर सादरीकरण केले.
इंडिया स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप्सचे प्रमुख सल्लागार डॉ. वाय.के. गुप्ता, आणि यान फेरीस यांनी “API साठी हरित तंत्रज्ञान आणि प्रक्रिया कार्यक्षमता” या विषयावर चर्चा केली.
जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकारी परिषदेचे प्रतिनिधी, आणि तांत्रिक विभागाचे प्रमुख तसेच महाव्यवस्थापक डॉ.पी.के.एस. सरमा, यांनी “प्रयोगशाळा ते बाजारपेठ यात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी” या विषयावर सादरीकरण केले.
ह्या सादरीकरणांची अनेकांनी प्रशंसा केली आणि शांघाय सहकार्य संघटनेतील काही सदस्यांनी त्यांच्या देशात या क्षेत्रात सध्या काय अद्ययावत स्थिती आहे याची माहिती दिली आणि भारतासोबत सहकार्यातून कुठे काम करण्यास वाव आहे, हे ही सांगितले. कोविड 19 आणि आरोग्य क्षेत्रातील, इतर आपत्कालीन संकटांमुळे सर्वच देशांना विविध संशोधन आणि विकास क्षेत्रात परस्पर सहकार्याचे महत्त्व समजले आहे. यात, लस, उपचारपद्धती आणि निदान अशा क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच भारत आज या उत्पादनांचे महत्वाचे केंद्र ठरला आहे. सर्व सार्वजनिक आजारांच्या काळात विविध देशांना मदत करण्यात भारत कायमच आघाडीवर राहिला असून पुढेही असेच सहकार्य कायम राहील.
या परिषदेमुळे, भारतातील विविध विभागात सुरु असलेल्या अत्याधुनिक कामांची सखोल आणि विस्तृत माहिती मांडता आली. तसेच, या संशोधन कार्याचा, शांघाय सहकार्य संघटनेतील इतर सदस्य देशांना कसा लाभ मिळू शकेल, यावरही चर्चा झाली.