मुंबई-
आजचा महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भरउन्हात ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लाेकांचा बळी गेला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदवावा. अशी मागणी ट्वीट करत अतुल लाेंढे, काँग्रेस प्रवक्ता यांनी केली आहे .
दुसऱ्या ट्वीट मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांना लाखोंची गर्दी व्हायची पण त्यांनी कधी आलेल्या लोकांना त्रास होऊ दिला नाही, भर उन्हात दुपारी कार्यक्रम घेतले नाहीत. ‘बाळासाहेबांचे विचार’ म्हणजे भाषणातील परवलीचा शब्द नव्हे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना इम्प्रेस करण्यासाठी गरीब-सामान्य श्री सदस्यांचे बळी दिलेयत. शिंदे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला पाहिजे. असे लोंढे यांनी म्हटले आहे