मुंबई- आजचा पेपर झालाकी लगेचच उद्याच्या पेपरची घाई , आता हि चिंता विद्यार्थ्यांना करावी लागणार नाही असे दिसते आहे , कारण दहावीच्या परीक्षेच्या दोन पेपरांमध्ये १ दिवसाची सुट्टी हवी , म्हणजेच दहावी परीक्षेचे पेपर दिवसा आड व्हावेत अशी आमदार कपिल पाटील यांची मागणी मान्य झाली आहे . श्री पाटील यांनी या संदर्भात दहावीच्या २०१७ मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक करताना याची दक्षता घ्यावी अशी विनंती शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या कडे केली होती .२० मार्च ते २३ मार्च २०१७ मध्ये सलग पेपर रोज होणार आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि प्रत्येक पेपर नंतर एक सुट्टी हवी अशी सूचना केली होती . यानुसार शिक्षण आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना काळ यासंदर्भात लेखी आदेश पाठविले आहेत . यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून तत्काळ वास्तुनिस्थ अभिप्राय कळवावा असे या आदेशान्वये धीरजकुमार यांनी म्हटले आहे .
दरम्यान दिवसा आड पेपर या पद्धतीमुळे विद्यार्थी सहज सुलभ पद्धतीने पेपर देवू शकणार आहेत . जेणे करून त्यांना अवधी या मुळे मिळणार आहे .