पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले . दलित पँथरच्यावतीने पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉल मध्ये पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती अभिवादन सभेत ते बोलत होते . या अभिवादन सभेस दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे , नगरसेविका लता राजगुरु , दादासाहेब सोनवणे , सुरेश केदारे , बाळासाहेब पडवळ , अमित जावळे , भीमराव जाधव , सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
आमदार भाई जगताप यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी शोषित पिढीत व कामगार चळवळीसाठी मोठा सामाजिक लढा दिला . त्यांनी पँथर्सचा दरारा निर्माण केला होता . त्या माध्यमातून त्यांनी दलित , कामगार चळवळीला न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्यांची कार्याची महती या समाजात टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचे आंबवडे येथील स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , दलित पँथरची स्थापन नामदेव ढसाळ यांनी संघर्षातून झाली आहे . देशातल्या गोरगरीब , कष्टकरी जनता व दलित बांधवाना न्याय देण्याचे काम नामदेव ढसाळ यांनीदलित पँथरच्या चळवळीतून केले . समाजातील तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला . त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा पँथर्सच्या भूमिकेतून काम करू लागला . त्यातुन समाजाला न्याय मिळवून देऊ लागला .
यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले . परंतु आताचे राज्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायला निघाले आहेत , परंतु दलित पँथर हे कदापिही होऊ देणार नाही . दलित पँथर समाजातील लोकांना त्यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतच राहिल.
या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व अभिवादन सभेचे प्रास्ताविक दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार दलित पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी मानले .