महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे राज्यातील ८ हजार कर्मचारी संपावर
पुण्यातील ५०० कर्मचाऱ्यांचा सहभाग ,कामकाज ठप्प
पुणे :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनात समाविष्ट करावे ,कर्मचाऱ्यांचे वेतन -भत्ते शासनामार्फत देण्यात यावेत या मागणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी महासंघाच्या राज्यातील ८ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे अस्त्र उचलले आहे . पुण्यातील ५०० अधिकारी ,कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१५ च्या नागपूर अधिवेशनात या मागण्यांवर ३ महिन्यात कार्यवाही करू ,असे आश्वासन दिले होते ,१४ महिन्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप ६ मार्चपासून सुरु करण्यात आल्याने प्राधिकरणाचे कामकाज ठप्प झाले आहे .
मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे ,तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे . पुण्यातील लष्कर भागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि घोषणाबाजी केली .
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष समिती ,कर्मचारी महासंघ ,महाराष्ट्र पाणी पुरवठा जलनिःस्सारण अभियंता संघटना यांचे प्रतिनिधी ,पदाधिकारी सहभागी झाले आहेत . बी डी यमगर (मुख्य अभियंता ),एन एन भोई (कार्यकारी अभियंता ),वैशाली आवटे (कार्यकारी अभियंता ),बी पी पिंगळे ,एन पी कुलकर्णी ,तसेच महासंघाचे अध्यक्ष एड . आर .बी .शरमाळे ,कार्याध्यक्ष बबलू म्हेत्रे ,खजिनदार सोमा दाते ,सरचिटणीस आर . व्ही . जाधव ,सलीम शेख ,संजय केळकर ,दीपक म्हस्के ,अग्निहोत्री इत्यादी पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले