मुंबई- भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने मुलुंड (पूर्व) येथील बैगनवाडी, शिवाजीनगर, चित्ता कॅम्प, गोवंडी तसेच कुर्ला येथील सुमारे साडेसात हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकेने हे काम पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला दिले असून त्या कामासाठी ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, त्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन हजार कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
सोमैय्या यांनी या तक्रारीत महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यावरही आरोप केले आहेत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नेमके काय म्हटले आहे ते पहा …