शाश्वत सुरक्षिततेची जाणीव झाल्यास झाडे मैत्री करतात; संवाद साधतात : दीपक जोशी

Date:

पुणे : झाड तोडले जात असताना त्यालाही प्रचंड वेदना होतात. ते आक्रोश करते, किंचाळतेही. झाडाला शाश्वत सुरक्षिततेची जाणीव करून दिल्यास ते आपल्याशी मैत्री करते, संवाद साधते, अशा भावना नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांनी व्यक्त केल्या. झाडे कधीही फसवत नाहीत, ती मतलबी नसतात तर कायम आधारस्तंभच असतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
वृक्षांना भावभावना असतात त्या जाणून पाच हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणारे तसेच भारतातले पहिले संस्कारित वृक्षांचे नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांचा संवाद, पुणे, भावार्थ आणि अक्षरसेवा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योतिष विद्यावाचस्पती आरती घाटपांडे यांच्या हस्ते ‌‘वृक्षसखा पुरस्कार‌’ देऊन आज गौरव करण्यात आला. त्या व्ोळी सत्काराला उत्तर देताना जोशी बोलत होते. आयुर्वेदाचार्य डॉ. वेदिका साधले यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षरसेवाच्या विनिता पिंपळखरे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, भावार्थच्या कीर्ती जोशी मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोथरूड येथील भावार्थ पुस्तक दालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपक जोशी म्हणाले, गुरूंच्या आदेशानुसार नक्षत्र वनाच्या निर्मिती कार्यास प्रारंभ केला. त्यांनी मला वनस्पतींशी संवाद साधण्याचे तंत्र शिकविले. वनस्पतींनीही मला खूप शिकविले, सतत मार्गदर्शन केले. झाडे एकमेकांशीही संवाद साधतात. मला झाडांशी बोलायला आवडते. प्रत्येक झाडाचा स्वभाव सुंदरच आहे, तो कळण्यासाठी त्याच्याशी दोस्ती होणे आवश्यक आहे. झाडांमध्ये जातीयवाद नाही, मोठे झाड कायमच लहान झाडाची काळजी घेते. अनेक झाडांना संगीत आवडते, असे सांगताना नक्षत्र वनात एका सुहृदांनी माऊथ ऑर्गनवर गाणे वाजविल्यावर बकुळीचे झाड कसे डोलू लागले याचा अनुभवही त्यांनी सांगितला. चैत्य वन, बोधी वन, नक्षत्र वन, शांती वन, गणेशमंत्र वन, पसायदान वन, देवराई आदी वनांची निर्मिती झाडांवरील प्रेमातून झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आरती घाटपांडे म्हणाल्या, वृक्षांवर संस्कार, माया करून, संवाद साधत नक्षत्र वनाची निर्मिती करणारे दीपक जोशी फक्त वृक्षसखाच नाही तर वृक्षांचा प्राणसखा आहेत. प्रत्येक वृक्षाबद्दलचे त्यांचे ज्ञान अगाध आहे. नक्षत्रांचा अभ्यास करताना जोशी यांचे नक्षत्र वृक्षांचे ज्ञान अनुभवायला मिळाले. नक्षत्र वृक्षांच्या सान्निध्यात राहणे हे आपल्याला पोषक ठरू शकते, त्यांच्यातून येणारी स्पंदने पूरक ठरतात.
सुरुवातीस विनिता पिंपळखरे यांनी पुरस्कारच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना वृक्षांनाही भावभावना असतात, वृक्षांवर अफाट प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची जाणीव ठेवावी या उद्देशाने पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
डॉ. वेदिका साधले म्हणाल्या, दीपक जोशी यांनी निर्माण केलेले नक्षत्रवन संस्कारित आहे. ते वनस्पती संगोपनाचे, त्यांच्या पालन-पोषणाचे कार्य निस्पृहपणे करत आहेत. आयुर्वेद अभ्यासकांना त्यांच्या ज्ञानाचा, नक्षत्र वनाचा नक्कीच उपयोग होईल. समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी जोशी यांचे काम मोलाचे ठरणार आहे.
सन्मापत्राचे लेखन वलय मुळगुंद यांचे होते तर वाचन कीर्ती जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मेधा गोखले यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी!

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

~ लाँच ऑफर: शून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~ पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे. आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील. एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल. या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे -ऐतिहासिक वारसा...