पुणे – व्यवस्थे विरुद्ध लिखान करणारा पत्रकार म्हणजे तो देशद्रोही अशा स्वरूपाच्या वर्गवार्या गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारीतेत तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. पत्रकारीतेच्या अशा वर्गवार्या करणे हे लोकशाहीच्या दृष्टीने लांछनास्पद आहे. पत्रकारांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडली पाहिजे. जेव्हा पत्रकार सामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्या पत्रकाराचा व्यवस्थेशी संघर्ष हा अटळ असतो. मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ काढता कामा नये, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार वरूणराज भिडे मित्र मंडळातर्पेâ अनंत बागाईतकर आणि डॉ. डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे-पाटील, अरूण म्हेत्रे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी बागाईतकर बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार उल्हासदादा पवार, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्षाचे) प्रवक्ते अंकुश काकडे, निवड समितीचे सत्यजित जोशी, शैलेश गुजर, सुर्यकांत पाठक आदी यावेळी उपस्थित होते.
बागाईतकर म्हणाले, व्यवस्थेच्या बाजूने लिखान केल्यास तुम्ही पत्रकार, विरोधात लिखान केल्यास पत्रकारांवर विविध प्रकारचे शिक्के मारले जात आहेत. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकला जात आहे. कौतुक करणे हे पत्रकाराचे काम नाही हे लक्षात घेतले पाहिजे. समाजात घडणार्या गोष्टींचे बारकावे शोधून सत्यपरिस्थिती समाजापुढे मांडणे म्हणजे पत्रकारीता आहे. वस्तूनिष्ठ आणि अचूक असलेली बातमी कोणीही दाबू किंवा नाकारू शकत नाही. त्यामुळे बातमी लिहिताना ती वस्तूनिष्ठ आणि सोप्या शब्दांत असेल याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे. पत्रकार जेव्हा सामान्यांचे प्रश्न मांडतो तेव्हा त्याचा व्यावस्थेशी संघर्ष हा अटळ आहे. मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ न काढता, दबावाला बळी न पडता सामान्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे आव्हान पत्रकारांपुढे उभे ठाकले आहे. मात्र, काही वेळा वस्तूनिष्ठता आणि अचूकपणाचा अभाव पत्रकारीतेत दिसतो. त्यामुळे तंत्रज्ञानाला वस्तूनिष्ठता आणि अचूकतेची जोड देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
डॉ. पाटील म्हणाले, सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता वाढत असून, त्यातून समाजात गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे पत्रकारीतेपुढे खर्या अर्थाने आव्हाने उभी ठाकली आहेत. पत्रकारांनी या आव्हानांचा सामना करताना संयम बाळगून वस्तूनिष्ठ गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या पाहिजे.
उल्हासदादा पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत पत्रकारांपुढील आव्हाने वाढत आहेत. तंत्रज्ञानाच्या काळात वस्तुनिष्ठ पत्रकारीता करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, पत्रकार समर्थपणे ही आव्हाने पेलतील.
यावेळी समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे-पाटील, अरूण म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.