Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुलगा वंशाचा दिवा असे काही नाही:मुली चांगला वंशाचा दिवा लावतात असा काहींना अनुभव, अजित पवारांचा टोला

Date:

कर्जत-कुटुंब नियोजनाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला हाणला. भविष्यातील आव्हाने पाहता सर्वांनी 1 किंवा 2 अपत्यावर थांबावे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. त्याच्या समारोपीय भाषणात अजित पवारांनी कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर आपले मत मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांना टोला हाणला. काळाची गरज ओळखून सर्वांनी एक किंवा दोन मुलांवर थांबले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. दोन्ही मुली झाल्या तरी चांगलेच आहे. मुली वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीने लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत जगात भारतात सर्वाधिक तरुणवर्ग आहे. पण आणखी 20 वर्षांनी आपला आकडा 160 कोटींवर जाईल. यात काही हयगय होणार नाही. आपण तिथपर्यंत पोहोचूच. त्यावेळी हाच भारत जगातील सर्वात वृद्ध देश होईल. त्यामुळे आपण भविष्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.पुढच्या पीढीच्या भवितव्यासाठी आपल्याला एक किंवा दोन अपत्यांवर थांबले पाहिजे. यासाठी कायदा करण्याची गरज असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. कोणत्याही जातीने, पंथाने, धर्माने किंवा देव अथवा अल्लाहने एवढी पैदास करा म्हणून सांगितले नाही. एक-दोन अपत्यांवर थांबले नाही प्यायलाही पाणी मिळणार नाही. घरांचीही व्यवस्था करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी समान नागरी कायद्यावर विचार केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मागसवर्गात काही गैरसमज आहेत. या कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागेल असे त्यांना वाटते. पण तुमचे आरक्षण कुणीही काढू शकत नाही. कुणीही राज्यकर्ते आले तरी ते बदलणार नाही. त्यामुळे समान नागरी कायद्याचा मुद्दा जनतेने मनावर घेतला पाहिजे. राजकीय पक्षांनीही या प्रकरणी भूमिका घेतली पाहिजे. कुणाच्या मनात काही शंका कुशंकाी असतील तर त्यावर चर्चेने तोडगा काढला जाईल. पण पुढच्या पीढीच्या भविष्यावर आजच विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणी वेगवेगळे मतप्रवाह असले पाहिजे. पण त्यावर चर्चा झालीच पाहिजे, असे अजित पवार यावेळी समान नागरी कायद्याचे समर्थन करताना म्हणाले.कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर यापूर्वी आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी एक 5 कलमी कार्यक्रम आणला होता. पण त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्याचा अतिरेक झाला. त्यामुळे त्याची किंमत आगामी निवडणुकीत इंदिरा गांधी यांना मोजावी लागली. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ द्यायचा नाही. त्यावर चर्चा करून तोडगा काढायचा. त्यामुळे कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावर सर्वांनी विचार करावा, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहलगाम हल्ल्यावर CM ओमर म्हणाले- सुरक्षा माझी जबाबदारी होती,माझ्याकडे शब्द नाहीत, मी माफी कशी मागू?

श्रीनगर-सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली...

खंडाळकर संगीत अकादमीतर्फे ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन

पुणे : अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला...

उच्च न्यायालयाने इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्या विरोधातील एफआईआर फेटाळला.

तक्रार ‘कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग’ असल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याच्या विरोधात ' फौजदारी अवमान'...