पुणे-सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे . त्यासोबतच मोदी सरकार गेली १० वर्षे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे, असं म्हणत शरद पवारांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे (SunetraPawar), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अमोल कोल्हे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मोठ शक्तीप्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला. या सभेला पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील महाविकास आघाडीचे सगळे स्थानिक नेते उपस्थित होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी 2014 सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोल चे भाव 71 रुपये दिले. मोदी म्हणाले पन्नास दिवसांत पेट्रोलचे भाव कमी करतो . आज 3 हजार 650 दिवस झाले, आज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले, 410 रुपयांवरून कमी करणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरुण मुलांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन लाख रोजगार देणार होते, उलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा. त्यामुळं जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय घेतला पाहिजेतिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पृथ्वीराज चव्हाण,जयंत पाटील, मोहन जोशी,रमेश बागवेसुषमा अंधारे, प्रशांत जगताप, होळकरांचे वंशज, सचिन आहिर आणि मविआचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तिन्ही उमेदवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि मतदानाचं आवाहन केलं.बारामतीतील विकास मीच केलाय, म्हणणाऱ्या अजित पवारांना कार्य अहवाल पाठवणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे . ….तर, मी शारदाबाई पवारांची नात असल्याचे सांगत दादा-वहिनींना टोलाही सुळे यांनी लगावला.मी दहा वर्षे निधी आणला नाही,असे ते म्हणु लागलेत, त्यांना माझा कार्य अहवाल मी चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. तो अहवाल मराठीतही आहे, असा टोलाही अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाचं मतदान करतील. तसेच, मला म्हणतात हे रडत बसतील. पण, लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी,रडणारी नाही. मला लढायला शिकवलं आहे, लढणारी आहेअशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दादा वहिनींना टोला लगावला.मी नशिबवान आहे, मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती द्यायची आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली. आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हाती मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.मोदी भारताची अर्थ व्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, असं म्हणतात. मात्र, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होती, तशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, विकसित भारत हे स्वप्न 2047 पर्यंत शक्य नाही. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली आहेत. मोदी फक्त गोलगोल फिरवतात. मात्र, विकासाची व्याख्या सांगत नाहीत. मोदी फक्त फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहे, आपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जातील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.