उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा
उद्धव ठाकरेंचे घणाघाती भाषण
मुंबई- उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंधे मांडतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. बाळासाहेबांचा एक फोन गेला की, दिल्ली चळा चळा कापायची मात्र आता दिल्लीचा एक फोन आला की दाढी थरथरायला लागते. शिंदे आजपर्यंत आपल्या मुलाची आणि पालघरची जागा घोषित करू शकले नाहीत.ज्याचा घोटाळा मोठा त्याचा मान मोठा अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये सुरु आहे. भाजपत सगळे उपरे येत आहेत. मिंधे उपरे, पवार साहेबांकडून आलेले उपरे आहेत.भाजपला गाडायचं असेल तर आत्ताच गाडा, कारण आता हे नम्र आहेत. त्यांना गाडण्याची हीच योग्य वेळ आहे. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने ते देशात फिरत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार. शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणतात. मग ही काय तुमची पदवी आहे का जी नकली आहे.भारतीय जनता पक्ष हा भाXखाऊ जनता पक्ष आहे. भेकड म्हणण्यामागे काहीतरी कारण आहे. आता यापुढे कोण गद्दार गुजरातला जाणार हे मी पाहतो. त्याासाठीच मी पालघरला आलोय. माझ्या वडिलांना तुम्ही चोरण्याचा प्रयत्न केला. भगव्याच्या बरोबरीनेच आज कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय.भाजपला गाडायचं असेल तर आत्ताच गाडा, कारण आता हे नम्र आहेत. त्यांना गाडण्याची हीच योग्य वेळ आहे. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने ते देशात फिरत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार. शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणतात. मग ही काय तुमची पदवी आहे का जी नकली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंधे मांडतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. बाळासाहेबांचा एक फोन गेला की, दिल्ली विचार करायची. मात्र आता दिल्लीचा एक फोन आला की दाढी थरथरायला लागते. शिंदे आजपर्यंत आपल्या मुलाची आणि पालघरची जागा घोषित करू शकले नाहीत.ज्याचा घोटाळा मोठा त्याचा मान मोठा अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये सुरु आहे. भाजपत सगळे उपरे येत आहेत. मिंधे उपरे, पवार साहेबांकडून आलेले उपरे आहेत.
जो यांना देईल साथ,त्यांचाच करतील हे घात… हा भाजपचा स्लोगन आहे. ज्यांचा आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याआधी प्रचार केला. तेच आज आम्हाला नकली म्हणत आहेत. आज अमित शहांच्या गाडीत खरे कार्यकर्ते किती आहेत आणि स्टेपनी किती आहेत. ते सांगा.उद्धव ठाकरे म्हणाले- निवडणुकीच्या तोंडावर येतील आणि सांगतील भाई और बहनो मेरा पालघर से बहोत पुराना रिश्ता है. पण हे फक्त सांगून चालणार नाही. तर ते नाते तुम्हाला जपावे पण लागतील. तसेच, वाढवण बंदर कोणासाठी केलं जात आहे, असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. मोदींचा परिवार म्हणजे सुटाबुटातली लोक आहेत.
निवडणुकीत दोष आणि आरोप करण्यापेक्षा जनतेत या आणि मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो. मोदींनी त्यांच्या दहा वर्षात काय केलं ते सांगावं. मोदींना त्यांच्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा हे माझं आव्हान आहे. देशाचे शत्रू संपवण्यासाठी निवडून दिलं. पण तुम्ही देशातील शत्रू संपवण्यासाठी निघाले आहेत.
अमोल कीर्तिकर यांचं नाव जाहीर होताच ईडीची कारवाई
अमोल कीर्तिकर यांनी कोरोना काळात खिचडी घोटाळा केला असा आरोप लावता. नाव जाहीर होताच त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्याच्यामागे ईडी लावली जात आहे. हीच तुमची लोकशाही आहे का. पीएम केअर फंडाचा घोटाळा झाला. त्याची चौकशी कधी होणार, असा सवालही त्यांनी केला.पीएम केअर फंड म्हणजे प्रभाकर मोरे फंड आहे का? महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे यांचा केला उल्लेखही ठाकरेंनी यावेळी पीएम केअर फंडातील घोटाळ्याबाबत बोलतांना केला.तुम्हाला देशात मोदी सरकार पाहिजे की भाजप सरकार पाहिजे. कारण ते देशात मोदी सरकार अशी जाहिरात करतात. जे देशाच्या सरकारला आपलं नाव लावतात. ते उद्या देशाला आपलं नाव लावतील मग तेव्हा काय करणार… जेव्हा तुम्ही पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हाल तेव्हा तुम्ही कुठेही हे नाव लावा. पण या देशाला तुमचे नाव लावा.अबकी बार भाजपला तडीपार करून टाका. ईव्हीएममध्ये घोळ न करता एकदा आमनेसामने येऊन जनतेचा निकाल होऊन जाऊ द्या. असा थेट इशारा ठाकरे यांनी मोदींना दिला आहे.