पुणे- देशातील अघोषित हुकमशाही, दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई आहे , त्यामुळे हि निवडणूक महतवाची आहे , वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्याबद्दल आभारी आहे असे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सर्वाच्च न्यायालय आयकर विभाग, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर तसेच निवडणुकीची प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . ही बाब नागरिकांसाठी वेदनादायी व चिंताजनक आहे . आणीबाणी देशात लागू नाही परंतु तशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात समाजात सुरु आहे . ही बाब लाेकशाही देशासाठी घातक विषय आहे . दडपशाहीच्या दिशेने पाऊले टाकली जातात का? अशी सातत्याने काळजी सरकार घेत असलेल्या काही निर्णयातून होत आहे. देशाचे संविधानासाठी ही चिंताजनक बाब असून त्याच्या विराेधात आमची लढाई आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे .सुळे म्हणाल्या, बारामती लाेकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सदर पक्ष व पक्षाचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांची आभारी आहे . महाविकास आघाडी मधील पक्षात अद्याप राज्यातील उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे . देशातील हुकमशाही, दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई आहे . त्यामुळे राज्याच्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई अाहे, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहे .शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ईव्हीवर निवडणुक घेण्याएेवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्याची मागणी केली याबाबत सुळे म्हणाल्या,काेणतीही निवडणुक ही पारदर्शक झाली पाहिजे, काेणती दडपशाही, दमदाटी न करता निवडणुक प्रक्रिया पार पडणे महत्वाचे आहे . जे मतदारराजाच्या मनात अाहे तशाप्रकारे निवडणुक झाली पाहिजे. सर्वाच्च न्यायालयाने देशाचे हित पाहिले नेहमी पाहिलेले आहे . देशात काॅपी करुन पास हाेण्यात काय मजा आहे . मेहनत करुन देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येत नाही. काॅपी करुन पास हाेण्यासाठी आम्ही राजकारणात येत नाही. समाजात सातत्याने अस्वस्थता दिसत आहे . लाेकांना सतत धमक्या येत आहे ही चुकीची बाब आहे .