केजरीवाल यांच्या अटकेनंतर वाढता असंतोष
नवी दिल्ली:केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले. केजरीवालच तुरुंगातून सरकार चालवणार. येथे केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानेही सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर काही वेळातच आम आदमी पार्टीतर्फे आतिशी यांनी ही प्रतिक्रिया दिली असून आता केजरीवाल कारागृहातून आपलं कर्तव्य बजावतील, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, ईडीने केलेल्या या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्ही आज रात्रीच सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे, असंही आतिशी यांनी स्पष्ट केलं आहे.
हे एक राजकीय षडयंत्र असून या प्रकरणात 500हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता तरीही दोन वर्षांत त्यांना एक रुपयाही हस्तगत करता आलेला नाही, अशी टीकाही आतिशी यांनी केली आहे.
अटक करून केजरीवाल यांना ED मुख्यालयात नेण्यात आले. ईडीच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यालयाभोवती निमलष्करी दलाच्या चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांचे 100 हून अधिक कर्मचारीही उपस्थित आहेत.
देशभरातून या अटकेवरून असंतोष व्यक्त होत आहे
प्रियंका गांधी शरद पवार सुप्रिया सुळे आणि अनेक नेत्यांनी यावरुन मोदींना लक्ष्य केले आहे