जरांगे यांची तब्बेत बिघडली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील 5 दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई– मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यांनी मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा केवळ जागेवरून हलून दाखवावे. त्यानंतर आम्ही त्यांनाी असली मराठ्यांची ताकद दाखवू, असे ते म्हणालेत. मनोज जरांगे यांनी आता मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर कडवट हल्ला चढवला आहे. नारायण राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. या मध्ये त्यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !’