Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

”निर्मला सीतारामण यांनी चार जातींचा उल्लेख केला, त्यांचं अभिनंदन, दहा वर्षांनंतर त्यांच्या लक्षात आलं ”- म्हणाले उद्धव ठाकरे 

Date:

रायगडःउद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला आहे. मी अर्थमंत्र्यांचे आभार मानतो की शेवटचा का होईना पण त्यांनी जड अंतःकरणाने अर्थसंकल्प सादर केला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, गरीब या चार वर्गांचा उल्लेख करुन त्यावर सरकार काम करत असल्याचं सांगितलं.ते पेणमध्ये बोलत होते.ठाकरे पुढे म्हणाले, मी मोबाईलवर ऑनलाईन हायलाईट्स बघितल्या आहेत. त्यात सीतारामण म्हणाल्या यांनी देशात चार जातींसाठी काम करणार असल्याचं म्हटलं. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं हे धाडस केलंय.ठाकरे म्हणाले, अरे धाडस काय? कारण निवडणुका आल्यानंतर का होईना हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सुटाबुटातल्या मित्रांचा नसून तरुण, शेतकरी, गरीब आणि महिलांचा आहे.. दहा वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात आलं आहे.’महिलांकडे लक्ष देत आहात तर मणिपूरमध्ये का जात नाहीत. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना तुम्ही सोडलं होतं. तिला न्याय द्या. आज तुम्हाला देशातल्या महिला दिसत आहेत, कारण निवडणुका आल्या आहेत.”उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारचं हे सगळं थोतांड आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी-तिपटीने गॅसचे भाव वाढवतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...