महापौर निवडीआधी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव:शिवसेना नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट; मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर

Date:

शिंदेंकडून अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतची सत्ता-समीकरणं अधिकच तापली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं चित्र समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, याच दिवशी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही, तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाहीत. निवडणूक निकालांनंतर झालेल्या पराभवामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याचा परिणाम थेट प्रशासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी, यामुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर अखेर 25 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. नऊ वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. 227 जागांच्या सभागृहात भाजपने एकट्याने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे एकूण 118 जागांसह महायुतीने बहुमताचा 114 चा आकडा पार केला असून, आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीकडून हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर एक महत्त्वाचा आणि चर्चेचा निर्णय घेतला आहे. बीएमसीमध्ये महापौर निवड होईपर्यंत शिंदे गटातील तसेच महायुतीतील सर्व विजयी नगरसेवकांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी पाचतारांकित हॉटेलचा पर्याय निवडण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. सत्तास्थापनेपर्यंत नगरसेवकांची सुरक्षा आणि एकजूट अबाधित ठेवण्यासाठी हा ‘सिक्युरिटी प्लॅन’ आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सुरू झालेल्या फोडाफोडीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महापौर निवडीपूर्वी राजकीय खेळी आणि दबावतंत्र वापरले जाण्याची शक्यता गृहीत धरूनच शिंदेंनी हा विशेष प्लॅन आखल्याचं बोललं जात आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि कोणत्याही प्रकारची राजकीय उलथापालथ टाळणे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन हॉटेल’ हा शब्द आता मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, बीएमसीच्या अंतिम निकालांकडे पाहिल्यास महायुतीचा विजय स्पष्टपणे दिसतो. भाजप आणि शिंदे शिवसेनेने मिळून 118 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मिळून 72 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या, मनसेला सहा जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. 1997 पासून सलग 25 वर्षे बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या अविभाजित शिवसेनेचा हा मोठा राजकीय पराभव मानला जात आहे.

इतर पक्षांचाही या निवडणुकीत उल्लेखनीय सहभाग राहिला. काँग्रेसने 24 जागा जिंकल्या, तर एआयएमआयएमने आठ जागांवर विजय मिळवला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या, तर समाजवादी पक्षाला दोन जागांवर यश आलं. विशेष म्हणजे, नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले. एकूणच निकाल पाहता मुंबईतील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलल्याचं स्पष्ट होत आहे.

या निवडणुकीत मराठी आणि अमराठी मतदारांमधील मतदानाचा कलही ठळकपणे समोर आला. मराठीबहुल भागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तुलनेने चांगली साथ मिळाली, तर अमराठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केल्याचं निकालातून दिसून आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर मराठीच असावा, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी निवडणूकपूर्व काळात घेतली होती. सुरुवातीला भाजपकडून महापौर हिंदू असावा, अशी भूमिका मांडली जात होती, मात्र नंतर भाजपला मुंबईचा महापौर मराठीच असेल, असं स्पष्ट करावं लागलं. आता महायुतीचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने 90 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 29 जागांवर विजय मिळवत शिंदे गटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. भाजपनंतर शिंदे गटाचा स्ट्राईक रेटही लक्षणीय राहिला आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचा नैसर्गिक दावा असला, तरी शिंदे गटही आपली भूमिका ठामपणे मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेत्यांकडून महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही चर्चेत आणला जात असून, याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...