मुंबई-आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले, त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.शंभुराज देसाई म्हणाले की, जर मॅचफिक्सिंग असती तर 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावे. शरद पवार यांनी त्यांना बुस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू. आमचे शिवसंकल्प अभियान सुरू आहे. 14 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळावे घेणार आहोत.
दरम्यान पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची, हे अध्यक्षांनी सांगितल. आम्ही 54 पैकी 40 आमदार शिंदेंसोबत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही. आम्ही नैसर्गित युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छा विरोधात सरकारमध्ये सहभागी झालो.
शंभुराज देसाई म्हणाले की, सरकार स्थापन करताना 2 ते 3 हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो.ते ज्या मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडाला आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, तर मग मतदारसंघातील कामे घेऊन का येता? रोहित नैराश्येतून असे बोलत आहे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी रोहित पवारांवर केली आहे. एकीकडे मतदार संघातील काम घेऊन यायचे आणि बाहेर राजकीय टीका करायची. राष्ट्रवादीबाबतही असाच निर्णय येईल ही धाकधूक रोहित यांच्या मनात आहे त्यामुळे नैराश्यातून ते बोलते आहेत.