माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण

Date:

बारामती, दि. 28: साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.

जनतेला गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांचे स्मरण करून राज्यशासन काम करत आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम नेहमीच होणे गरजेचे असून माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 1984 साली उभारलेल्या या पुतळ्याचे नूतनीकरण करून घेतली आहे.

ते पुढे म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींना अधिकचे महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांवर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कृषी पंपांना वीजबील माफी, लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींसाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची सवलतीची सुमारे बाराशे कोटी रुपयांची रक्कम जिल्हा सहकारी बँकांना देण्यात आली असून त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुधाच्या अनुदानाची रक्कम दुग्ध संस्थांपर्यंत पोहोविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यावर्षी ऊस पीकासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) आधुनिक तंत्रज्ञान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने आणले असून त्याचा ऊस उत्पादनवाढीसाठी तसेच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी मोठा फायदा होणार आहे. हे पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आवश्यकतेनुसार पुढील पुरवणी मागण्यांमध्ये अधिकची तरतूद करण्यात येईल. एआय तंत्रज्ञान सोयाबीन, कापूस, केळी, फळबागा आदींसाठीही वापरण्यात येईल, असेही म्हणाले.

लवकरच पुण्यात ॲग्री हॅकेथॉन भरविण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, नवोद्योग (स्टार्टअप्स), कृषी तज्ज्ञ, शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसंबंधी समस्या सोडविण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्य्‍ाशासन करणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, खर्च कसा कमी होईल यासाठी नवकल्पक संशोधकांना चालना मिळण्यासाठी या हॅकेथॉनचा उपयोग होणार असून येत्या जूनपर्यंत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आदींवर संशोधन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनविण्याचा मानस आहे.

राज्यशासन साखर कारखान्यांना आणि त्या माध्यमातून उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काम करत असून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मोलॅसिसवरील २८ टक्के उत्पादन व सेवा कर (जीएसटी) ५ टक्क्यावर आणला गेला आहे. राज्यशासनाच्या पाठपुराव्यामुळे कारखान्यांवर आकारण्यात आलेला सुमारे २० वर्षापासूनचा आयकर केंद्र शासनाने माफ केल्यामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्यांचे इथेनॉल, सहवीज निर्मिती प्रकल्पांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

माळेगाव कारखान्याने उच्च दराची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन करुन श्री. पवार पुढे म्हणाले. कारखान्याने २०२२-२३ मध्ये प्रतीक्विंटल ३ हजार ४११ रुपये, २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी राज्यात विक्रमी ३ हजार ६३६ रुपये दर दिला आहे. माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकचा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामासाठी राज्यशासनाने ४६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कऱ्हा-नीरा उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास निधी देण्यात आला असून त्या कामाला सुरूवात झाली आहे. कारखान्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

साखर कारखान्यांनी कारखान्यातून निघणाऱ्या खराब रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्लँट उभारावेत व ते पाणी आसपासच्या शेतीसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीच्या अनुषंगाने त्रिपक्षीय समितीला बैठकीबाबत सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात ॲड. केशवराव जगताप म्हणाले, यावर्षी ११ लाख २१ हजार मे. टन ऊस गाळप करुन ११ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले असून इथेनॉल तसेच सहवीज निर्मितीही चांगल्या प्रकारे केली आहे. चालू गळीत हंगामात ३ हजार १३२ रुपये दर दिला असून खोडकी आणि दिवाळीतही पुढील बिले देण्यात येतील. कारखान्याच्या सुमारे ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी एकरी १०० टनाच्या वर उत्पादन घेतले आहे असे त्यांनी सांगितले.

व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण पाटील यांनी स्वागत केले.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विश्वासराव आटोळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड. रवींद्र माने, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन संजय कोकरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...