अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान- सुनील देवधर

Date:

लोकतंत्र सेनानी संघ, पुणे तर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
पुणे – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक मोठे नेते नव्हते, तर आपल्या ध्येय धोरणांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देणारे राष्ट्रपुरुष होते. आज देशाची जी सर्व क्षेत्रांमध्ये विलक्षण घोडदौड सुरू आहे, त्याचा पाया अटल बिहारी वाजपेयी यांनी घातला. अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

लोकतंत्र सेनानी संघ पुणे तर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली पर कार्यक्रमाचे कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी संस्थेचे प्रमुख विलास पाठक, सुधीर बोडस, अनुपमा लिमये, मुरलीधर घळसासी, अनिता बिरजे आदी यावेळी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, देश स्वतंत्र करण्यासाठी कारागृहामध्ये गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच देशांमध्ये लोकशाही टिकावी, यासाठी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेले सैनिकही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही टिकून आहे. अशा लोकशाही सैनिकांचे स्मरण राहावे आणि त्यांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदीप रावत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन एक आदर्श आहे. त्यांचे जीवन आणि विचार आजच्या तरुणांपर्यंत विविध मार्गाने पोहोचले पाहिजे. मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे गैरमार्गाला लागलेले तरुण अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि जीवन विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

महासचिव मुरलीधर घळसासी यांनी प्रदीप रावत व सुनिल देवधर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा, त्यांनी समाजासाठी  व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर परिचय करून दिला.

सुधीर बोडस म्हणाले, आणिबाणीच्या काळामध्ये जेव्हा देशांमध्ये लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकशाहीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अनेक लोकशाही सैनिकांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्या सैनिकांचे सध्या काय प्रश्न आहेत? हे सुद्धा जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकतंत्र सेनानी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या, माजी नजरसेविका अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनिता बिरजे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...