अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान- सुनील देवधर

Date:

लोकतंत्र सेनानी संघ, पुणे तर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
पुणे – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक मोठे नेते नव्हते, तर आपल्या ध्येय धोरणांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देणारे राष्ट्रपुरुष होते. आज देशाची जी सर्व क्षेत्रांमध्ये विलक्षण घोडदौड सुरू आहे, त्याचा पाया अटल बिहारी वाजपेयी यांनी घातला. अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

लोकतंत्र सेनानी संघ पुणे तर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली पर कार्यक्रमाचे कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी संस्थेचे प्रमुख विलास पाठक, सुधीर बोडस, अनुपमा लिमये, मुरलीधर घळसासी, अनिता बिरजे आदी यावेळी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, देश स्वतंत्र करण्यासाठी कारागृहामध्ये गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच देशांमध्ये लोकशाही टिकावी, यासाठी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेले सैनिकही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही टिकून आहे. अशा लोकशाही सैनिकांचे स्मरण राहावे आणि त्यांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदीप रावत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन एक आदर्श आहे. त्यांचे जीवन आणि विचार आजच्या तरुणांपर्यंत विविध मार्गाने पोहोचले पाहिजे. मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे गैरमार्गाला लागलेले तरुण अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि जीवन विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

महासचिव मुरलीधर घळसासी यांनी प्रदीप रावत व सुनिल देवधर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा, त्यांनी समाजासाठी  व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर परिचय करून दिला.

सुधीर बोडस म्हणाले, आणिबाणीच्या काळामध्ये जेव्हा देशांमध्ये लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकशाहीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अनेक लोकशाही सैनिकांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्या सैनिकांचे सध्या काय प्रश्न आहेत? हे सुद्धा जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकतंत्र सेनानी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या, माजी नजरसेविका अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनिता बिरजे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणारपुणे- पुणे महानगरपालिका पथ...

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...