पुणे-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल अनेक ठिकाणी भाजपा च्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.मोदी – शहा या जोडगळी च्या नेतृत्वाखाली लोकसभा जिंकणे सहज शक्य आहे पण यावेळी गेल्या टर्म मध्ये महापालिका सत्तेत पद उपभोगलेल्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातलगांना उमेदवारी दिली तर कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनुरावृत्ती झाल्या शिवाय राहणार नाही असे मत भाजपा मध्ये ४० वर्षाहून अधिक काळ निव्वळ कार्यकर्ते म्हणून घालविलेल्या अनेकांनी व्यक्त केले आहे.निमित्त होते काल विविध असलेल्या भाजपच्या कार्यक्रमांचे.सर्व जुन्या जाणत्यांना अपराधी मानणे,त्यांना वेगळी वागणूक देणे असे प्रकार पक्षातील नव्या पिढीने सुरु केल्याने हे पक्षाला घातक असल्याचे सर्वांचे मत आहे.पुणे लोकसभेची पोट निवडणूक न घेणे, कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील रुंदीकरण आणि अन्य टेंडर च्या इस्टीमेट रकमांमध्ये ५० कोटीचा घोळ करणे, महापालिकेतील भरती मध्ये कामगारांची आर्थिक पिळवणूक करणे, टेंडर घोटाळे,इस्टीमेट घोटाळे,टीडीआर घोटाळे,बेकायदा बांधकामे,कोरोना काळातील घोटाळे अशा विविध मार्गावर महापलिकेत सत्ता असताना केलेला कारभार कुस्त्यांचे फड,आणि पुरस्कारांचे मेळावे भरवून पुसला जाणार नाही सामान्य माणसाच्या रोटी कपडा मकान या मुलभूत हक्कांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा निर्माण केल्या कि त्यावरच गदा आणल्या यावर एक चर्चा सत्र भाजपांतर्गत विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांन मध्ये भरविले तर कसब्याच्या पराभवाची कारणे मीमांसा लक्षात येईल आणि लोकसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते काय याचीही कल्पना येईल असे मत व्यक्त झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.