इकडे पण तिकडे पण असे करू नका – जे माझ्यासोबत आले त्यांना मी दमदाटी केली का? प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो–नरेंद्र मोदी यांच्याइतके कणखर दुसरे नेतृत्व नाही.
बारामती-मी 60 वर्षाचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारलं असे विधान करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या, असे अजित पवार म्हणाले. बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या (अजित गट) कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.
अजित दादा पुढे बोलताना म्हणाले की, मी मागेही सांगितले आहे की काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरु होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मी त्यांना काय दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार या प्रसंगी बोलताना म्हणाले की, आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी कोणाचं एकू नका असेही अजित पवार म्हणाले. इतके वर्ष बाकीच्यांचं खूप एकल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला असं काही करुन दाखवतो असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आत्तापर्यंत वरिष्ठांनी सांगेल तसेच काम करत आलो. 1967 ला बारामतीमधून नवीन नेतृत्व (शरद पवार) 17000 मतांनी निवडून आले. 1972 ला 34,000 ने निवडून आले. 1978 साली 18000 ने निवडून आले. नंतर 1980 साली 25000 निवडून आले. त्यानंतर 1985 ला 18000 आले. 1987 नंतर ती जागा 1 लाख मतांनी निवडून येऊ लागल्याचे अजित पवार म्हणाले. मलाही खासदार म्हणून साडेतीन लाखांनी तुम्ही निवडून दिल्याचे अजित पवार म्हणाले.
तुम्ही मला आजपर्यंत भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. इकडं पण तिकडं पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे त्यांनी यावं असे अजित पवार म्हणाले. मी जे काही करेल त्या बारामतीकरांच्या हिताच्याच घेईल. देशपातळीवर नरेंद्र मोदी यांच्याइतके कणखर दुसरे नेतृत्व नाही.

