शाश्वत विकासासाठी संशोधनामक शिक्षण गरजेचे – डॉ. रविकुमार चिटणीस
पुणे : “केवळ प्रसिद्धीसाठी संशोधनाचा वापर करण्याऐवजी ज्ञानधारित समाज निर्माण करण्यासाठी संशोधन असावे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर संशोधनात्मक शिक्षण देणे गरजेचे गरजेचे आहे. अनेक विद्यापीठांच्या पहिल्या दोनशे मानांकनामध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसले, तरी आपण मागे आहोत, असे मानायचे कारण नाही. नजीकच्या काळात भारत जागतिक महासत्ता होईल. नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांची परंपरा लक्षात घेता शिक्षणातील सुधारणांमुळे जागतिक स्तरावर भारताला नेतृत्व करण्यास वाव आहे,” असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. रविकुमार चिटणीस यांनी केले.
सरस्वती मंदीर संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टसने आयोजित केलेल्या ‘नवीन शैक्षणिक धोरण (अंतिम मसुदा) अंमलबजावणी व आव्हाने’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात डॉ. चिटणीस बोलत होते. यावेळी डॉ. पी. एन. शेंडे, शिक्षणतज्ञ अनिरूद्ध देशपांडे, डॉ. नलिनी गुजराथी, डॉ. मनोहर चासकर, डॉ. ए. पी. कुलकर्णी, प्रा. विनायक आंबेकर, कौन्सिल मंडळातील सदस्य विकास काकतकर, समन्वयक प्रा. विनय बोडस, डॉ. दिपक बेड़े, प्रा. श्याम कांबळे, प्रा. मंजूषा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
चर्चासत्रास राज्यभरातील अनेक महाविद्यालयातून उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. विविध महाविद्यालयातून ३० पेक्षा जास्त प्राचार्य आणि फैकल्टी मेंबर्स, सिनेट मेंबर्स मान्यवर उपस्थित होते. या चर्चा सत्रामध्ये इतरही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. शिक्षण तज्ञ अनिरूद्ध देशपांडे यांनी संपूर्ण शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. यामध्ये शिक्षणाचे स्तर आणि त्याचा वयोगट, भारतातील गळतीचा दर तर उच्च शिक्षणातील येऊ घातलेले स्तंभ कसे असणार आहेत.
डॉ. नलिनी गुजराथी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व अभियांत्रिकी विदया शाखेचे डीन डॉ. मनोहर चासकर यांनीही विचार व्यक्त केले. संयोजन डॉ. ए पी. कुलकर्णी यांनी केले. सरस्वती मदिर संस्थेचे चेअरमन प्रा. विनायक आंबेकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या स्थापनेची भूमिका सांगितली. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कौन्सिल मंडळातील सदस्य विकास काकतकर होते. स्वागत प्राचार्य डॉ. पी एन शेंडे यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. विनय बोडस यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार डॉ. दिपक बेड़े, प्रा. श्याम कांबळे, प्रा. मंजूषा जोशी यांनी केले.