१३०० किलोमीटरच्या राइडला गुजरातचे अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई मोहनलाल देसाई यांनी दाखवला हिरवा झेंडा
· रॅलीचा समारोप २८ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्लीत होईल
पुणे: जावा-येझदी मोटरसायकल्सला ‘दांडी से दिल्ली’ मोटरसायकल रॅली मध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) बरोबर भागीदारी केल्याचा अभिमान आहे. ही मोटारसायकल रॅली म्हणजे एनसीसी संचालनालय गुजरातने त्यांच्या ‘पचत्तर वर्ष’ (७५ वर्षे) साजरे करण्याच्या सोहळ्याचा एक उपक्रम आहे. १३०० किलोमीटरच्या राइडला गुजरातचे अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई मोहनलाल देसाई यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी 2023 रोजी दांडी येथे हिरवा झेंडा दाखवला.
‘मीठ काढणारे’ ते ‘सॉफ्टवेअर बनवणारे’ असा झालेला भारताचा प्रवास दर्शविण्यासाठी २५ एनसीसी कॅडेट्सची टीम नॅशनल सॉल्ट सत्याग्रह मेमोरियल (NSSM), दांडी येथे बनवलेले मिठाचे भांडे आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स (BISAG) ने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रामची एक सीडी घेऊन जाईल. २८ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पंतप्रधानांच्या एनसीसी डे रॅलीमध्ये भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे या दोन्ही विशेष गोष्टी सुपूर्द केल्या जातील.
या प्रसंगाच्या स्मरणार्थ जावा-येझदी मोटरसायकल्सने खाकी आणि ग्रे या मर्यादित आवृत्तीतील प्रत्येकी एक मोटारसायकल अशा दोन जावा मोटारसायकली एनसीसी संचालनालयाला सादर केल्या आहेत. सशस्त्र दलातील जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी जावा खाकी सादर करण्यात आली होती. याशिवाय २५ जावा-येझदी मोटारसायकली कॅडेट्स त्यांच्या या प्रवासात चालवतील.
रॅलीमध्ये रायडर्स नवी दिल्लीत राइडचा समारोप करण्यापूर्वी वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, अजमेर, जयपूर आणि अलवर यांसारख्या शहरांमधून प्रवास करतील. या शहरांमधील जावा येझदी डीलरशिपमध्ये सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे रायडर्स पिटस्टॉप घेतील आणि या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना नावाजण्यात येईल.
सशस्त्र दलांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी ही भागीदारी जावा येझदी मोटरसायकलच्या #ForeverHeroes उपक्रमांतर्गत आहे. देशाला सुरक्षित, शांत आणि समृद्ध ठेवण्यास मदत करणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच कंपनी मूल्यसंस्कृती विकसित करत आहे. २०१९ मध्ये, कंपनीने सशस्त्र दलातील कर्मचारी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता या उपक्रमाची औपचारिक घोषणा केली. तेव्हापासून कंपनीने कारगिल विजय दिवस, स्वर्णिम विजय वर्ष आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांसारख्या ऐतिहासिक आणि विजयी टप्पे दर्शविणाऱ्या राइड्समध्ये योगदान आणि समर्थनाद्वारे आपला पाठिंबा सुरू ठेवला आहे.
आपल्या दैनंदिन कामकाजातही कंपनी आपल्या नेटवर्कद्वारे आणि इतर योग्य प्रसंगी सशस्त्र दल देशासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल आदर निर्माण करण्यात मदत करण्यासाठी सशस्त्र दलाच्या कर्मचार्यांसह आपले कर्मचारी आणि ग्राहकांच्या परस्परसंवादाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत आहे.