” अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “

Date:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या  बुधवार दि.  १ फेब्रुवारी रोजी  २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील  विविध घटकांपासून राजकारणी,  विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष भाववाढ किंवा चलनवाढीने ग्रासलेले होते आणि आता २०२३ मध्ये  मंदीसदृश्य परिस्थिती  अनुभवावी लागेल असा  अंदाज व्यक्त केला आहे. ही मंदी जागतिक पातळीवर राहण्याची शक्यता असून ती उथळ, तात्पुरती किंवा दीर्घ कालीन परंतु खोलवर जाणवणारी असेल किंवा नसेल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये भाव वाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढीचे  अस्त्र वापरले त्यामुळे गेल्या दोन दोन महिन्यांमध्ये तरी भाव वाढ अपेक्षेप्रमाणे आटोक्यात किंवा नियंत्रणात राहिली आहे. त्याचप्रमाणे चालू खात्यावरील तूटही कमी होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.खरंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देशातील सद्यस्थितीबाबत जास्त ममता असणे स्वाभाविक आहे. नजीकच्या काळामध्ये फारशी व्याजदर वाढ टाळून एकूण अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करण्यावर रिझर्व बँकेचा भर  राहील.  महागाईचा दर सहा वरून चार टक्क्यांपर्यंत खाली आणणे हे जरी उद्दिष्ट गाठले गेलेले नसले तरी  देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा आणखी चांगला कसा राहील याकडे मध्यवर्ती बँकेला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात रिझर्व बँकेने देशातली अर्थव्यवस्था  रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले.यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकत्रित करण्यासाठी ही सर्व जबाबदारी ही केवळ रिझर्व बँकेची नसून केंद्र सरकारवर म्हणजे पर्यायाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आहे. या अंदाजपत्रकात त्यावरच भर देण्याची अपेक्षा आहे. मोदी सरकार समोर या वर्षात नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षात लोकसभेची निवडणूक उभी ठाकलेली असली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा “लोकानुनयी ” अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही अशी अर्थतज्ज्ञांची अपेक्षा आहे. जनतेच्या हातात पैसा खुळखुळावा म्हणून आर्थिक सवलतींचा मारा केला जाऊ नये किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी आर्थिक सवलतींची खैरात केली जाऊ नये अशी अर्थतज्ञांची अपेक्षा आहे. जगातील अनेक देश भारताकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्ट्या पाहत .  आपल्या शेजारील चीनची सध्याची आर्थिक स्थिती व तेथील गुंतवणुकीची भूराजकीय जोखीम लक्षात घेऊन भारताकडे सर्व देश आशेने पाहत आहेत. यामुळेच मोदी सरकारने त्यांचे पूर्णपणे लक्ष देशातील सर्व पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे प्रगतीशील डिजिटल भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीगोष्टींवर भर देणे नितांत गरजेचे आहे. मोदी सरकारने  अंमलात आणलेल्या उत्पादकतेशी निगडित आर्थिक सहाय्य योजनेचा विस्तार मोठ्या, मध्यम व छोट्या कंपन्यांच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने करण्याची गरज आहे.विविध उद्योग क्षेत्रांसाठी ही योजना लागू केली पाहिजे.  जगातील विविध गुंतवणूकदार किंवा देशांना भारताकडे आकर्षित करण्यासाठीआर्थिक स्थैर्य व धोरणांबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस  जी-२०  देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला लाभली. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात आर्थिक विकासाचा दर किमान साडेसहा ते सात टक्के ठेवणे हे निर्मला सीतारामन यांच्या पुढचे मोठे आवाहन आहे. यामध्ये त्यांना यशस्वी होण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे की ती म्हणजे केंद्र सरकारने पुढील वर्षांमध्ये विकासावर मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करण्याची गरज आहे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षात केंद्र व राज्यांची वित्तीय तूट 10 टक्क्यांच्या घरात गेलेली आहे . ती कमी करणे हे गरजेचे आहे. जनतेसाठी आर्थिक सवलतींची लयलूट करणे थांबवले पाहिजे. ज्याला सध्या रेवडी संस्कृती म्हणतात ती संस्कृती निश्चित कमी केली पाहिजे किंवा बंद केली तर सर्वात चांगली गोष्ट होऊ शकेल. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये होणारा सरकारचा आर्थिक सवलती म्हणजे सबसिडींवरचा वाढता खर्च अर्थव्यवस्थेला मारक ठरत आहे.  त्यामुळेच विविध आर्थिक सवलतींचा आढावा करून त्याची फेररचना करण्याची गरज आहे. भारत हा आजही कृषीप्रधान देश आहे. देशातील काम करणाऱ्या वर्गापैकी 46% एवढे जनता कृषी क्षेत्रामध्ये अडकलेली आहे.  सध्याची स्थिती लक्षात घेता एवढ्या मोठ्या कामगारांना सामावून घेण्याची  कृषी क्षेत्राची क्षमता नाही.  त्यामुळे त्यांना बिगर शेती क्षेत्रामध्ये म्हणजे उत्पादन, सेवा क्षेत्राकडे वळवले पाहिजे.  त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून  कौशल्य  निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आजही ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती खूप खालच्या दर्जाचे काम करीत आहे. ग्रामीण व शक्तीतरुणांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य निर्माण करण्यातही आपण कमी पडत आहोत. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारक्षम करणे किंवा नवनवीन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे. शहरांमध्ये सध्या काही संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतात परंतु समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे. देशातील बांधकाम क्षेत्र किंवा पायाभूत सुविधा क्षेत्र असो त्यांना आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञांची आज भारतामध्ये  वानवा आहे अगदी इलेक्ट्रिशियन पासून प्लंबर, पेंटर हे कारागि  कौशल्यपूर्णरित्या निर्माण केले पाहिजेत. त्यांची सध्या संख्या अपुरी आहे. या बाबतीत चीनचे उदाहरण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे जेव्हा ग्रामीण भागातील शेती किफायतशीर ठरत नव्हती तेव्हा त्यांनी वीस कोटींपेक्षा जास्त कामगार दुसऱ्या क्षेत्रांकडे जाणीवपूर्वक वळवले. त्यात नवीन शहरांची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली आणि मनुष्यबळाचा फार चांगला वापर देश हितासाठी केला. भारताच्या तुलनेत चीनची जवळजवळ निम्मी लोकसंख्या  शेती उद्योगात आहे. तरीही चीनचे कृषी उत्पादन  भारतापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. यापासून आपण बोध घेण्याची गरज आहे त्यांच्याकडे लोकांवर आर्थिक सवलतींची खैरात केली जात नाही. आज भारतात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली ८० कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेखाली मोफत अन्नधान्य वाटप केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो तांदूळ किंवा गहू दिला जातो. यासाठी केंद्र सरकारचे  दोन लाख कोटी रुपये खर्च होतात. करोनाच्या काळात यापेक्षा जास्त अन्नधान्य वाटप केले गेले.  शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी आर्थिक सवलत  सुद्धा दोन लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. पंतप्रधान किसान योजनेसाठी आणखी 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. याशिवाय वेगवेगळ्या आर्थिक सवलतींची खैरात शेतकऱ्यांवरील सवलती पाच लाख कोटींच्या घरात जातात. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याशिवाय देशातील उद्योग क्षेत्रांना उत्पादनाशी निगडित दिल्या जाणाऱ्या आर्थिक सवलतींचा वाटाही मोठा आहे,. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन  “रेवडी” संस्कृतीला योग्य प्रमाणात आळा घालतील अशी अपेक्षा आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठीचे राजकारण नेहमीच अर्थव्यवस्थेला मारक ठरते. त्यात बदल करण्याची गरज आहे.
.
देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची गरज आहे किंवा कसे याची गंभीर तपासणी करण्याची वेळ आलेली आहे.  गोरगरिबांना अन्नसुरक्षा कायद्याखाली मोफत धान्य वाटप करणे गैर नाही मात्र  त्या नावाखाली जे गरजू नाहीत त्यांनाही या मोफत अन्न वाटपाचा लाभ होतो किंवा कसे हे पाहणे पाहिजे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता जवळजवळ दोन तृतीयांश जनतेला अन्नधान्य सुरक्षा द्यावी लागते म्हणजे एक तृतीयांश लोकही स्वतःसाठी अन्नधान्य कमवू शकत नाहीत. गेल्या 75 वर्षातल्या सर्व सरकारचे अपयश मानावे लागेल. दोन लाख कोटी अन्नधान्य सवलत देताना त्यात काही बचत करता येईल का याचा विचार केला गेला पाहिजे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गेल्या तीन वर्षाच्या अंदाजपत्रकात फार काही करता आलेले नव्हते २०२०-२१ मध्ये अंदाजपत्रक संसदेत सादर झाल्यानंतरलगेचच काही दिवसात देशभर लोक डाऊन जाहीर करण्यात आला होता. २०२१-२२ या वर्षात करुणाची दुसरी लाट आली,. २०२२-२३ मध्ये रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद. यामुळे गेल्या तिन्ही वर्षांमध्ये अर्थसंकल्पातील अंदाज महसूल, जमा खर्च याचा काही ताळमेळ साधता आला नव्हता. अर्थात जागतिक पातळीवरील ही परिस्थिती आपल्याला अनुकूल नव्हती. तरीसुद्धा मोदी सरकारने देशातील वाढती बेरोजगारी, अन्नधान्य उत्पादन , दारिद्र्यरेषेखालील जनता, शिक्षणातील त्रुटी किंवा कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी याचा सांगोपांग विचार करून नवीन आर्थिक धोरणांची आखणी केली पाहिजे. केवळ लोकप्रियतेसाठी सवलती न देता अर्थव्यवस्था अधीक सुदृढ , सक्षम करण्यासाठी कडक व खंबीर निर्णय घेतले पाहिजेत. दुर्देवाने आज ती शक्यता कमी वाटते.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणेस्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)*

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...