भाजपने घेतली नाही म्हणून अखेर न्यायालयाने गावे महापलिकेत दिली – बाबुराव चांदेरे
गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राजकीय म्हणणे निव्वळ राजकारण – दिपाली धुमाळ आणि पृथ्वीराज सुतार
पुणे- गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करू पण या गावांबरोबर आता धरणातून पुण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात देखील वाढ केली पाहिजे अशी मागणी करत विकास साठी शासन रक्कम देईलच अशी आशा हि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांनी गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राजकीय असणे असे म्हणणे म्हणजेच राजकारण करणे ठरेल . या गावांचा बकाल पणा दूर करून तेथील नागरिकांना सुविधा द्यायच्या असतील तर हि गावे महापालिकेत समाविष्ट करणेच संयुक्तीक ठरेल असे ते म्हणाले….