पुणे- राज्य सरकारचा खरोखर २३ गावांच्या विकासाचाच हेतू असेल तर केवळ गावांचा समावेश महापालिकेत झाला अशी पोकळ घोषणा न करता या गावांच्या विकासासाठी १० हजार कोटी देऊन गावांचा जरूर महापालिकेत समावेश करावा असे मत येथे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भांडा फोड करण्याचा यत्न आपल्या वक्तव्यातून केला आहे .गावांचा समावेश जरूर महापालिकेत व्हावा पण महापालिकेत आज ना उद्या जाणार म्हणून या गावांचा बकालपणा करण्यास अनेकांनी हाथभार लावीत गावांचे वाट्टोळे करून ठेवले आहे .आता हे सारे निस्तरायचे असेल सारे स्वच्छ करून खरोखर येथील नागरिकांचा दुवा घ्यायचा असेल तर आपला राजकीय हेतू त्वरित बाजूला करून १० हजार कोटी रुपये गावांच्या विकासासासाठी द्यावेत आणि गावांचा समावेश करावा असेगणेश बिडकर यांनी म्हटले आहे.