पुण्याला पहिली डिजिटली स्मार्ट सिटी बनवूया-केंद्रीय मंत्री पियूष गोएल

Date:

पुणे. :- पुणेकरांनी या शहराला पहिली डिजिटली स्मार्ट सिटी बनवावे. देशामध्ये डिजिटल क्रांती आणण्याची सुरूवात येथून व्हावी आणि पुणे हे पहिली कॅशलेस शहर करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा, कोळसा, नवीन व पुनर्नवीकरणीय खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियूष गोयल  यांनी रविवारी केले. सर्वात स्मार्ट सिटी होण्याची क्षमता पुण्यात असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

श्री. गोयल हे पुणे आयएनसी कॉन्क्लेव्हच्या डिमॉनेटायजेशन टू रिमॉनेटायजेशन या कार्यक्रमात बोलत होते.  गोयल गंगा ग्रुपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टीव्ही १८च्या व्यवस्थापकीय संपादिका शिरीन भान यांनी श्री. गोयल यांची मुलाखत घेतली आणि निश्चलनीकरणाचा निर्णय, त्याचे परिणाम आणि खासकरून कॉर्पोरेट जगतावरील परिणाम याबाबत त्यांना बोलते केले. पुण्यातील उद्योगविश्वातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यात अतुल चोरडिया, कृष्णकुमार गोएल, सुधीर दरोडे, कुमार गेरा, प्रवीण अगरवाल यांचा मुख्यत्वे समावेश होता. क्रेडाई, एमसीसीआयए, फिक्की, फ्लू यांसहित सर्व व्यावसायिक संघटनांनी तसेच युवकांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता.

 

 

पुण्यात येण्यास आपल्याला नेहमीच आनंद होतो कारण येथे अत्यंत बुद्धिमान लोकांशी चर्चा होते, अशी सुरूवात करून श्री.  गोयल म्हणाले,  “निश्चलनीकरण हा शब्द या संदर्भात योग्य नाही तर अधिक मूल्याच्या नोटा रद्द करणे, हाच शब्द योग्य आहे. हा ऐनवेळी घेतलेला किंवा अचानक असा निर्णय नव्हता. दीर्घकाळापासून नियोजन करून हा निर्णय घेतला, असे मला वाटते. अगदी मोजक्या लोकांना त्याची माहिती होती आणि येथे उपस्थित असलेल्यांना जेवढा धक्का बसला तेवढाच मलाही त्याने धक्का बसला. ही अत्यंत ऐतिहासिक कृती असल्यामुळे आम्ही सगळेच रोमांचित झालो होतो.”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या अचानक निर्णयाच्या वेळेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, की संसदेचे अधिवेशन तोंडावर होते आणि त्यानंतर काही निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होणार होती. एक आठवड्याचा वेळ देण्याच्या विरोधकांच्या मागणीची खिल्ली उडवताना ते म्हणाले, की देशाला हा निर्णय आवडला आहे मात्र काही नेते नाराज आहेत कारण त्यांना खोलवर जखम झाली आहे. निश्चलनीकरणाला संघटीत लूट म्हणणाऱ्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही त्यांनी टीका केली. “राष्ट्रकुल स्पर्धा किती संघटीत होत्या, १.७० लाख कोटी रुपये २जी घोटाळ्यात आणि १.८६ कोटी रुपये कोळसा घोटाळ्यात गेले ते किती संघटीत होते, हे सर्वांना माहीत आहे,” असे ते म्हणाले.

 

या पावलामागची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, “निश्चलनीकरण म्हणजे केवळ नोटा बदलणे नाही – तर काळ्या पैशावर हल्ला करणे होय. इमानदार का सम्मान और चोर का अपमान हा आमचा सिद्धांत आहे. सवयी बदलण्याची ही गोष्ट आहे. रु. ५००० आणि रु. १०००० च्या नोटा आणण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारने स्वीकृत केला नाही. खोट्या नोटा आणि दहशतवाद्यांना निधी पुरवठाही आम्हाला संपवायचे आहेत. लोकांना आश्चर्याचा धक्का देणे आणि नोटा साठवणाऱ्यांना धडकी भरविणे, हा त्यातला हेतू आहे. बँकेतून देण्यात आलेल्या १००० रुपयांच्या नोटांपैकी केवळ अर्ध्या आणि ५०० रुपयांच्या नोटांपैकी केवळ एक तृतीयांश नोटा परत व्यवस्थेत येतात, असे आरबीआयला आढळले होते. हा पैसा कुठेतरी साठवून ठेवण्यात आला असेल. या पावलातून जमा करण्यात आलेला पैसा गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला जाईल.”

“हे पाऊल हे भारताला कॅशलेस बनविण्याच्या दिशेने उचलण्यात आले आहे. पूर्वीसारखा पैसा साठविणे लोकांना धोक्याचे वाटेल म्हणून यामुळे भ्रष्टाचार कमी होईल. डिजिटल बँकिंग हेच भविष्य असून त्यामुळे आर्थिक सर्वसमावेशकता येईल. लोक करचुकवेगिरी करतात ते आवड म्हणून नाही तर ते त्यांना भाग पडते म्हणून. बँकांमध्ये अधिकाधिक पैसा आल्यामुळे आणि चलनवाढ कमी झाल्यामुळे व्याजदर कमी होतील आणि परवडणारी घरे उपलब्ध होतील.  भारतातील गरीब लोकांचे कल्याण हेच आमचे पहिले प्राधान्य आहे,” असे ते म्हणाले.

 

प्राप्तिकर बंद करण्याची कल्पना त्यांनी पूर्णपणे खोडून काढली तसेच असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगून ते म्हणाले, “आपण काय करत आहोत, हे पंतप्रधान मोदी यांना माहीत आहे. आणखी अनेक बाबी होणार आहेत. येणाऱ्या पैशांचा सदुपयोग करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. उद्योग आणि व्यवसायांना यातून लगेच फायदा मिळणार नाही, मात्र त्यांनी दीर्घकाळात लाभ होईल.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोएल म्हणाले, “पुणे ही स्मार्ट सिटी आहे आणि ती तशीच राहील. आम्हा सजग नागरिकांना या महान कार्यात सहभागी होण्याचा अत्यंत आनंद आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...