मुंबई- खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचंय, मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करुन लढाई लढू नका”, असं थेट आव्हानाच राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना दिलं.
“ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली, त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. कारण काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपचं कुणीच आलं नव्हतं. त्या एकट्याच तिथे आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी असताना आव्हाडसाहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दी असताना एवढ्या समोर का थांबलात असं आव्हाड संबंधित महिलेला म्हणत आहेत. बरं हे सगळं मुख्यमंत्र्यांपासून १५ फुटांवर घडतंय… एखादा गुन्हा दाखल करताना त्या गुन्ह्याला काही गाईडलाइन्स असतात. आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो? असा सवाल करतानाच मर्द असाल तर सत्ताधाऱ्यांनी कामातून उत्तर द्यावं. बाईला पुढे करुन लढाई लढू नये”, अशा शब्दात ऋता आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.