मुंबई-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपात एक टक्का पण तथ्य असल्यास मी राजकीय व सामाजिक जीवनातून संन्यास घेईन. तथ्य नसल्याच नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कुटुंबाची माफी मागावी, असे प्रतिपादन मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केले.
नवाब मलिक महाष्ट्रातील जनतेची दिशाभुल करण्या करता प्रशासकीय अधिकारी तसेच नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर जे आरोप केले आहेत खुप निंदनीय असुन त्यात तत्थ्य नाही. महाराष्ट्रातील १० करोड जनतेला देवेंद्र यांच्या वर आणि त्यांच्या कुटुंबावर खुप विश्वास व अभिमान आहे. महाराष्ट्र भ्रष्ट्राचार व अत्याचाराने झोडपला गेला आहे याकडे दुर्लक्ष करून मंत्री नवाब मलिक दुसऱ्यावर आरोप करण्यात आपला वेळ घालवत असल्याचा आरोप मंगल जी यांनी केला.