Home Blog Page 654

महापारेषणच्या २२० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग;१.४२ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा ३५ मिनिटे खंडित

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५:महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-कांदळगाव अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनमध्ये सोमवारी (दि. १७) किरकोळ बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या १४ उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी सकाळी ११.५० ते १२.२५ पर्यंत महावितरणच्या १ लाख ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून ३५ मिनिटांमध्ये वीजवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीत आज सकाळी ११.५० वाजता किरकोळ बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या मुळशीमधील भरे उपकेंद्र तसेच हिंजवडी परिसरातील १३ उपकेद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे मुळशी, भुगाव, भुकूम, पिरंगुट, पौड, माले, मुठा खोरे, मारूंजी, जांभे, नेरे आदी भागातील सुमारे ९७ हजार वीजग्राहकांचा आणि हिंजवडी परिसरातील २०० उच्चदाब ग्राहकांसह ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित केल्यानंतर दुपारी १२.२५ वाजता सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत झाला.

सुजलॉनला 9 महिन्यांत ऑयस्टर रिन्यूएबलकडून दुसऱ्यांदा ऑर्डर

201.6 मेगावॅटच्या या नव्या ऑर्डरसह, सुजलॉनची एकूण ऑर्डर बुकिंग सर्वाधिक 5.7 गिगावॅटपर्यंत पोहोचली.

पुणे: सुजलॉन ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा समाधान प्रदाता समूह आहे. कंपनीला ऑयस्टर रिन्यूएबल्सकडून 201.6 मेगावॅटची पुनरावृत्ती ऑर्डर मिळाली आहे, ज्यामुळे भारताच्या वारा ऊर्जाक्षेत्रातील त्यांचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. या नव्या करारासह सुजलॉन आणि ऑयस्टर रिन्यूएबल्स यांची भागीदारी केवळ नऊ महिन्यांत मध्य प्रदेशात 283.5 मेगावॅटपर्यंत वाढली आहे, ज्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील. यासोबतच, भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत सुजलॉनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पुनरुज्जीवन होते. ही ऑर्डर वाणिज्यिक आणि औद्योगिक (C&I) ग्राहकांमध्ये वारा ऊर्जा उपाययोजनांची वाढती मागणी दर्शविते, जे आता सुजलॉनच्या एकूण ऑर्डर बुकमधील 59% वाटा झाला आहे.

ही ऑर्डर मध्य प्रदेशात पूर्ण केली जाणार आहे. करारांतर्गत, सुजलॉन 64 अत्याधुनिक S144 वारा टर्बाइन जनरेटर (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरवेल, ज्यांची प्रत्येकी स्थापित क्षमता 3.15 मेगावॅट असेल.सुजलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश टांटी म्हणाले: “आमच्यासोबत प्रकल्प कार्यान्वित केल्यानंतर, ऑयस्टरने आता आम्हाला पूर्ण EPC ऑर्डर देऊन विश्वास दाखविला आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सुजलॉनची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे. अधिकाधिक ग्राहक आमच्याकडे वळत आहेत, कारण आम्ही केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर जमिनीच्या खरेदीपासून प्रकल्पाच्या

अखंड अंमलबजावणीपर्यंत आणि जागतिक दर्जाच्या देखभाल व व्यवस्थापन सेवांपर्यंत संपूर्ण साखळीमध्ये पारंगत आहोत. सुजलॉनमध्ये आम्ही केवळ प्रकल्प निर्माण करत नाही, तर एक स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करतो.”

सुजलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चलासानी म्हणाले, “मध्य प्रदेश हा पवन ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे आणि या राज्याच्या नवीकरणीय ऊर्जा प्रवासात योगदान देताना आम्हाला अभिमान वाटतो. ही यंदाच्या वर्षातील आमची पाचवी पुनरावृत्ती ऑर्डर आहे, जी ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर आमचा भर दर्शविते आणि सातत्यपूर्ण वाढीस मदत करते, तसेच नवोन्मेषी आणि विश्वासार्ह पवन ऊर्जा उपायांद्वारे टिकाऊ भविष्य घडविण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

ऑयस्टर रिन्यूएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भाटिया म्हणाले, “आमच्या मागील भागीदारीच्या यशावर आधारित, आम्ही पुन्हा एकदा सुजलॉनसोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत, जेणेकरून भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सामूहिक दृष्टिकोनाला गती मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, हा प्रकल्प 24×7 ऊर्जा पुरवठा करण्याच्या आमच्या दृष्टिकोनातील पुढील पाऊल आहे. भारताच्या 2030 पर्यंत 500 GW नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्टाप्रति योगदान देण्यासाठी, अशा भागीदारी शोधत राहण्याचा आमचा मानस आहे. आपल्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेला पुढे नेऊन, ऑयस्टर रिन्यूएबल्स वाजवी दरात नवीकरणीय ऊर्जा समाधान उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

‘परंपरा‌’ मैफलीत गुरू-शिष्यांचे बहारदार सादरीकरण

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित कार्यक्रमात गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित
पुणे : पखवाजचे धीरगंभीर बोल आणि बासरीच्या समधुर स्वरांनी ‌‘परंपरा‌’ या विशेष उपक्रमाअंतर्गत आयोजित सांगीतिक मैफलीत गुरू-शिष्यांनी रंग भरले. एकाच मंचावर गुरुंसह शिष्यांच्या वादनातून भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरेची महती अधोरेखित झाली.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘परंपरा‌’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची मैफल कोथरूडमधील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या शारदा रंगमंचावर आयोजित करण्यात आली होती.
‌‘परंपरा‌’ या मैफलीची सुरुवात सुखद मुंडे आणि त्यांचे शिष्य कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे यांनी केली. मत्तताल, आदिताल ऐकवून पखवाज वादनाचे वैशिष्ट्य असलेली ‌‘गदी गण नागे तिट‌’ ही रचना ऐकविताना पखवाज जणू शब्दरूपी संवाद साधत असल्याची अनुभूती रसिकांना आली. पखवाज वादनातून सादर केलेली शिवस्तुती रसिकांना विशेष भावली. पखवाज वादनात प्रसिद्ध असलेले कुदोह सिंग आणि नाना पानसे घराण्यांचे वैशिष्ट्य असलेले विविध प्रकार वादनातून सादर करण्यात आले. मुख्यत्वे करून धृपद गायकीच्या साथीसाठी प्रसिद्ध असलेले पखवाज वादन ऐकविताना आलाप आणि जोड यांसाठी वाजविला जाणारा ‌‘झाला‌’ रसिकांना विशेष भावला. चक्रदार तोडा त्यातील फर्माईशी प्रकार तसेच गिनती प्रकार अत्यंत प्रभावीपणे सादर करून वादकांनी रसिकांना प्रभावित केले. कलाकारांना संतोष घंटे यांनी संवादिनीची सुमधुर साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते यांचे बासरीवादन झाले. त्यांनी सरस्वती रागाची वैशिष्ट्ये उलगडून दाखविताना माधुर्यपूर्ण वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रागविस्तार दर्शविताना पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यांनी सुरेल साथ करत गुरू-शिष्य परंपरेतून मिळालेल्या ज्ञानाचे दर्शन घडविले. मैफलीची सांगता मैहर घराण्यातील बाबा अल्लाउद्दिन खाँ यांनी रचलेला राग ‌‘माज खमाज‌’ ऐकवून केली. महेशराज साळुंके यांनी केलेली तबलासाथ समर्पक ठरली.
‌‘परंपरा‌’ मैफलीच्या सुरुवातीस ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या संस्थापिका चेतना कडले, संचालक प्रकाश गुरव यांच्यासह कलाकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार प्रकाश गुरव आणि चेतना कडले यांनी केला. सूत्रसंचालन, कलाकारांचा परिचय आणि आभार प्रदर्शन रश्मी वाठारे यांनी केले.

‘अमेरिकन अल्बम‌’च्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त कलाकार-तंत्रज्ञांचा गौरव

रसिकमोहिनीतर्फे रंगभूमी सेवक संघाला आर्थिक मदत
पुणे : रसिकमोहिनी आणि फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या ‌‘अमेरिकन अल्बम‌’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगानिमित्त नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. तसेच पडद्यामागील कलाकारांच्या रंगभूमी सेवक संघाला रसिकमोहिनीतर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी, माधवी महाजनी, नाटकाचे लेखक राजन मोहाडिकर, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, व्यवस्थापक समीर हंपी, धनंजय गाडगीळ, सुरेंद्र गोखले, सिद्धार्थ देसाई, मोहनदास प्रभू, झरीन ईराणी, डॉ. सतिश देसाई, सुरेश धर्मावत तसेच नाटकाच्या निर्मात्या, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, अभिनेते दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, चिन्मय पाटसकर, अमृता पटवर्धन उपस्थित होते. ‌‘अमेरिकन अल्बम‌’ या नाटकाचे अनेक प्रयोग बघणारे मुंबईतील रसिक श्रीकृष्ण कुलकर्णी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. गश्मीर महाजनी यांनी नाटकाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‌‘अमेरिकन अल्बम‌’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली. रसिकमोहिनी आर्टस्‌‍ निर्मित ‌‘सूर शोधताना‌’ हा लघुपट या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला.
रसिकमोहिनी संस्थेच्या वाटचालीत रंगभूमी सेवक संघाचा मोलाचा वाटा आहे. रसिकमोहिनी संस्थेची निर्मिती असलेल्या प्रत्येक नाटकाची पडद्यामागील बाजू रंगभूमी सेवक संघ उत्तमरित्या सांभाळत आहे. पुण्यातील पडद्यामागील कलाकारांसाठीही रंगभूमी सेवक संघाचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे कार्य बघून संस्थेस मदत देण्यात येत असल्याचे भाग्यश्री देसाई यांनी या प्रसंगी सांगितले. मदतीचा धनादेश सुरेंद्र गोखले, अरुण पोमण, महेंद्र कांबळे यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

दिल्लीत भूकंप

0

नवी दिल्ली- सीएसआयआरचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामनचर्ला म्हणाले , “दिल्लीला सकाळी 5.30 च्या सुमारास आलेला भूकंप हा एक सौम्य भूकंप होता. भूकंप क्षेत्रानुसार, दिल्ली झोन ​​4 मध्ये आहे. हा एक सौम्य भूकंप होता. बहुतेक लोकांना तो जाणवला, पण जे मोकळ्या मैदानात होते त्यांना ते जाणवले नसेल.”

दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की; “दिल्ली व आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सर्वांनी शांत राहण्याचे व सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे, तसेच संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मी करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”

APEDA/अपेडा कडून ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबाची पहिली समुद्रमार्गे वाहतूक सुलभ करण्यात सहकार्य

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात APEDA, अ‍ॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.

ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांच्या निर्यातीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाला डाळिंबांच्या निर्यातीसाठी एक कार्य योजना व मानक कार्यपद्धती (SOP) वर स्वाक्षरी करण्यात आली. APEDA व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटनेने (NPPO) यशस्वी बाजारपेठ प्रवेश सुविधा दिल्यानंतर, जुलै 2024 मध्ये पहिली हवाई वाहतूक करण्यात आली. हवाई वाहतुकीमुळे बाजारपेठेतील मागणीचे मूल्यांकन करण्यास मदत झाली, जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने समुद्री शिपमेंट कशी करता येईल, याचा पाठपुरावा करण्यात आला.

महाराष्ट्रातील सोलापूर भागातून आणलेल्या 5.7 मेट्रिक टन (MT) डाळिंबांसह, पहिली समुद्री मालवाहतूक 6  डिसेंबर 2024 रोजी भारतातून निघाली आणि 13 जानेवारी 2025 रोजी सिडनीला पोहोचली. या डाळिंबाची वाहतूक 1,900 बॉक्समध्ये/डब्यांमध्ये पॅक करण्यात आली होती, प्रत्येक डब्यात 3 किलो उच्च दर्जाची फळे होती. भगवा जातीचे 1872 बॉक्स (6.56 टन) वाहून नेणारी आणखी एक व्यावसायिक समुद्री शिपमेंट 6 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे पोहोचली.

मोठ्या प्रमाणात समुद्री शिपमेंटच्या वापरामुळे स्पर्धात्मक किंमत खात्रीशीर झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला व शाश्वत व्यापार संधी निर्माण झाल्या. दोन्ही शिपमेंट्स ANARNET मध्ये एकत्रित करण्यात आल्या. ही भारताची ट्रेसेबिलिटी सिस्टम आहे, ज्यामुळे पारदर्शकता खात्रीची झाली व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला.

ही यशस्वी निर्यात केवळ जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्याच्या भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकत नाही तर, भारतीय शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले करून लक्षणीय व्यवसाय प्रोत्साहन देते.

डाळिंबाची खेप पोचल्यावर, सिडनी, ब्रिस्बेन व मेलबर्नमध्ये त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जोरदार मागणीमुळे आधीच अतिरिक्त शिपमेंटसाठी तात्काळ मागण्या नोंदविण्यात आल्या आहेत. यातून भारत व ऑस्ट्रेलियामधील फायदेशीर तसेच शाश्वत व्यापार संबंधांची वाढती क्षमता दिसून येते आहे. मालवाहतुकीची वेळ ऑस्ट्रेलियाच्या उत्पादन नसलेल्या हंगामाशी धोरणात्मकरित्या जुळवून घेण्यात आली होती, जेणेकरून भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठेतील संधी जास्तीतजास्त असतील याची खात्री झाली.

APEDA चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी, “भारताचा कृषी निर्यातीचा लँडस्केप अभूतपूर्व वेगाने वाढत आहे, ताज्या फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे 29% वाढ होत आहे’’, यावर भर दिला.

केवळ डाळिंबात (निर्यातीत) 20% वाढ झाली आहे, जी या सेगमेन्टची अफाट क्षमता दर्शवते. ऑस्ट्रेलियाला प्रीमियम डाळिंबाची यशस्वी निर्यात ही भारताची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे ताजे उत्पादन पुरवण्याची क्षमता दर्शवते. ANARNET सारख्या प्रगत ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे, आम्ही खात्री करतो की, भारतीय कृषी उत्पादने सर्वोच्च जागतिक मानकांची पूर्तता करतात, जेणेकरून जगभरातील ग्राहकांचा विश्वास वाढतो.”

अभिषेक देव यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात व सुलभ करण्यात अपेडाच्या भूमिकेवर भर देत म्हटले की, “आम्ही नवीन व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विस्तार करून भारतीय शेतकरी तसेच कृषी-उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही यशोगाथा भविष्यात पुढील सहकार्य व निर्यातीचे प्रमाण वाढवण्याचा मार्ग मोकळा करते.”

सप्टेंबरमध्ये पुढील निर्यात हंगाम सुरू होत असल्याने, अ‍ॅग्रोस्टारचे आयएनआय फार्म्स, के. बी. एक्सपोर्ट्स व इतर प्रमुख कंपन्या या यशाला कायम ठेवण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांचा सतत पुरवठा होईल. या विकासामुळे कृषी निर्यातीत जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधोरेखित होते व ऑस्ट्रेलियासोबत द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत होतात.

अपेडा ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे जी कृषी व प्रक्रिया केलेले अन्न निर्यात सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ANARNET सारख्या ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे बाजारपेठ विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार व निर्यात प्रोत्साहन देऊन APEDA भारतीय शेतकरी तसेच कृषी व्यवसायांना पाठिंबा देऊ करते. ताजी फळे, भाज्या, बासमती तांदूळ व प्रक्रिया केलेले अन्न यांचा समावेश असलेल्या भारताची कृषी निर्यात सतत वाढत आहे, ज्यामुळे जागतिक कृषी-व्यापार क्षेत्रात देशाचे स्थान बळकट होत आहे.

शहरी भागातील वसाहतींचे राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्या उद्‌घाटन 

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्या मध्य प्रदेशमध्ये रायसेन येथे शहरी भागातील वसाहतींचे राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण करण्यासंदर्भातील भारतातील 26 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमधील (UTs) 152 शहरी स्थानिक संस्थांमधील (ULBs) प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागाने हा पथदर्शी कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री, डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, डॉ. मोहन यादव, मध्य प्रदेशचे महसूल मंत्री  करण सिंह वर्मा, पंचायती राज व ग्रामीण विकास मंत्री प्रल्हादसिंग पटेल, मत्स्यव्यवसाय व मच्छिमार कल्याण तसेच  रायसेन, मध्य प्रदेशचे प्रभारी मंत्री नारायण सिंह पवार, सांचीचे आमदार प्रभू राम चौधरी, भारत सरकारच्या भूसंपदा विभागाचे सचिव मनोज जोशी, भारत सरकार व मध्य प्रदेश राज्य सरकारचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात ड्रोन उड्डाण, मानक कार्यप्रणाली (SoP) पुस्तिकेचे अनावरण, नक्षा कार्यक्रमावरील व्हिडिओ व फ्लायर, पाणलोट यात्रेला ध्वजवंदन, पाणलोट यात्रा उपक्रमाच्या व्हिडिओचे सादरीकरण व पाणलोट यात्रा गीत वाजवले जाणार आहे.

जमिनीच्या स्वामित्वाविषये अचूक व विश्वासार्ह दस्तऐवज सुनिश्चित करण्यासाठी शहरी भागात जमिनीच्या नोंदी  करणे तसेचअद्ययावत करणे, हे ‘नक्षा’ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम नागरिकांना सक्षम करेल, राहणीमानात सुधारणा करेल, शहरी भागासाठी अधिक नियोजन केले जाईल व जमिनीशी संबंधित वाद कमी करेल. मालमत्तेची नोंद  झाल्याने माहिती तंत्रज्ञान-आधारित प्रणालीमुळे प्रशासनासाठीही पारदर्शकता, कार्यक्षमता व शाश्वत विकासाला समर्थन मिळेल.

भारतीय सर्वेक्षण विभाग, NAKSHA कार्यक्रमाचा तांत्रिक भागीदार असून आवश्यक हवाई सर्वेक्षण करण्यासाठी व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना तृतीय पक्ष विक्रेत्यांमार्फत भौमितीयदृष्ट्या सुधारित प्रतिमा प्रदान करण्याची जबाबदार या विभागावर आहे. मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाद्वारे  (MPSEDC) आरंभापासून  अंतिम टप्प्यापर्यन्तचे वेब-जी आय एस प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहे व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सेवा मंडळाद्वारे (NICSI) साठवणूक सुविधा प्रदान केल्या जातील. राज्ये व केंद्रशासित प्रदेश सरकार भौमितीयदृष्ट्या सुधारित प्रतिमा  वापरून प्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच या प्रतिमांचे प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या गोष्टींशी तुलना करेल; सरते शेवटी शहरी व अर्ध-शहरी जमिनीच्या नोंदींचे अंतिम प्रकाशन केले जाईल.

प्रायोगिक तत्वावर राबवल्या जाणाऱ्या नक्षा या उपक्रमासाठी अंदाजे 194 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी केंद्र सरकार निधी प्रदान कारण आहे.

तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई – आरोग्य प्रमुखांचा इशारा

पुणे-– जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. असा इशारा आरोग्य प्रमुख डॉक्टर निना बोराडे यांनी दिला आहे.

जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी कार्यालयाचे कामकाज हे पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील जन्म-मृत्यू विभागाकडून विकेंद्रीकरण पद्धतीने करण्यात येते. तथापि विभागांकडील कामकाजाबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अलीकडच्या काळात काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गैर प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कामकाज हे क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त संगणक ऑपरेटर, अप्रुव्हल क्लार्क व विवाह नोंदणी क्लार्क यांच्यामार्फत करण्यात येते. अप्रुव्हल क्लार्क हे उपनिबंधक यांची मान्यता न घेता परस्पर दुरुस्ती करणे, जन्म-मृत्युच्या नोंदी करणे इ. तसेच काही अप्रुव्हल क्लार्क त्यांना देण्यात आलेला अप्रूव्हल आयडी व ओटीपी हा संगणक ऑपरेटर यांना देत असून त्यांचेकडून जन्म-मृत्यूचे कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही संगणक ऑपरेटर कागदपत्रे न तपासता जन्म-मृत्युच्या नोंदी व जन्म-मृत्यू दाखल्यांमध्ये दुरुस्ती व इतर बदल करत असले बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

ही बाब अंत्यत गंभीर आहे. जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांची आहे. याबाबत वारंवार सूचना देऊन देखील कामकाजामध्ये सुधारणा झाल्याची दिसून येत नाही. तसेच या कामकाजावर आपले कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

सर्व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे की, आहे की आपले अधिनस्त जन्म- मृत्यू व विवाह नोंदणीचे कामकाज करणाऱ्या संगणक ऑपरेटर, अप्रुव्हल क्लार्क व विवाह नोंदणी क्लार्क यांना जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीचे कामकाज नियमानुसार व विहित वेळेत विनाविलंब करणेबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचा दैनंदिन आढावा व अहवाल घेण्यात यावा. यापुढे जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.

पाच देशांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

0

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात कंबोडिया, मालदीव, सोमालिया, क्युबा आणि नेपाळच्या राजदूत/उच्चायुक्तांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. अधिकारपत्रे सादर करणाऱ्यांची नावे:

1. कंबोडियाच्या राजदूत रथ मेनी

2. मालदीवच्या उच्चायुक्त ऐशाथ अझीमा

3. सोमालियाचे राजदूत डॉ. अब्दुल्लाही मोहम्मद ओडोवा

4. क्युबा चे राजदूत जुआन कार्लोस मार्सन अगुइलेरा

5. नेपाळचे राजदूत डॉ. शंकर प्रसाद शर्मा

भोर येथील विक्रम गायकवाडची हत्या ऑनरकीलींगची घटना- उद्या भोरमध्ये आंबेडकरी चळवळीकडून निषेध मूक मोर्चाचे आयोजन

पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याची 8 फेब्रुवारी रोजी झालेली हत्या ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे करण्यात आल्याने सदर प्रकार हा ऑनर किलिंगचा असून त्या दृष्टीने तपास होवुन सर्व संबंधितांना अटक व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. तसेच याच मुद्दावर मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भोर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मूक मोर्चाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहीतीही यावेळी पत्रकार परिषदेद्वारे संबंधित नेत्यांनी दिली.

विक्रम गायकवाड या तरुणाने लगतच्या गावातील सवर्ण समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. सदर आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्याने विवाह मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटूंबीयांनी केला होता तसेच मुलीला व विक्रमला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विक्रमचे कुटुंबीयांनी हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडे वियक्त केली होती परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले व दुसर्याच दिवशी हता करण्यात आल्याने या प्रकरणी पोलिसांची भुमिका संशयास्पद वाटत आहे.

या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर सुद्धा पोलीस तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे पोलीस उपाधीक्षक भोर यांच्याशी झालेल्या चर्चेतून शिष्टमंडळाला जाणवल्याने निषेध मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येत असून या मोर्चात हजारो लोक सहभागी होणार आहेत.

धम्मभूमी भोर येथून सुरू होणारा हा मोर्चा संपूर्णतः मूक मोर्चा असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ याची निषेध सभा घेवुन सांगता होणार आहे व यावेळी प्रतिनिधी स्वरूपामध्ये भाषणे होऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार व इतर अधिकार्यांना देण्यात येणार आहे.

विक्रम गायकवाड हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार असून सदर मागणीच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे.

सदर मोर्चा मध्ये संविधान वादी व दलित अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात येत असल्याचे अवाहन रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यावेळी पीडीत कुटूबींयातील फिर्यादी विठ्ठल गायकवाड , मोर्चाचे आयोजक प्रविण ओव्हाळ, विनोद गायकवाड , बाळासाहेब अडसुळ आदि उपस्थित होते.

फ्लॅटमध्ये आढळल्या तब्बल 350 मांजरी:रेबीज लसीकरण, नसबंदी न केलेल्या मांजरींमुळे अख्खी सोसायटी त्रस्त

पुणे-हडपसर भागातील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोसायटीतील सी-901 या 3 BHK फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या बहिणींनी 350 मांजरी पाळल्याची बाब समोर आली आहे. सदर सभासदाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी का पाळल्या? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोसायटीतील रहिवाशी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हडपसर पोलिस आणि पुणे जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटधारकांनी सुरुवातीला सहकार्य करण्यास नकार दिला, मात्र दोन तासांच्या विनंतीनंतर त्यांनी दरवाजा उघडला. तपासणीदरम्यान 3 बीएचके फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्या, त्यापैकी काही गर्भवती तर काहींना पिल्लेही होती.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या माहितीनुसार, या मांजरींचे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाही. एकाही मांजरीचे रेबीज लसीकरण किंवा नसबंदी करण्यात आलेली नाही. फ्लॅटमध्ये मांजरांच्या विष्ठेमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. काही मांजरींना दुखापतही झाल्याचे आढळून आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटधारकांना पुढील 48 तासांत सर्व मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची योग्य देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाने सोसायटीतील इतर रहिवाशांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.दुसरीकडे, सोसायटीतील इतर फ्लॅट धारकांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी हे मांजर मोठा गोंगाट करतात. विशेषतः त्यांच्या वास्तव्यामुळे सोसायटीत उग्र दर्पही पसरला आहे.

रहिवाशांनी 2020 मध्येच या प्रकरणी पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. या मांजरांमुळे काही आजार पसरण्याची भीती असल्यामुळे या प्रकरणी त्वरित योग्य ती कारवाई करा, अशी विनंती रहिवाशी यासंबंधी पालिका प्रशासनाला केली आहे.

महावितरणचे नवीन लोहगाव शाखा कार्यालय कार्यान्वित

धानोरी, लोहगाव शाखा कार्यालयांमुळे ६९ हजारांवर वीजग्राहकांना दर्जेदार सेवा

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५:महावितरणच्या नगररोड विभाग अंतर्गत धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन लोहगाव शाखा कार्यालयाची व नवीन १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन वास्तुसह लोहगाव शाखा कार्यालय मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.

वाढत्या नागरीकरणामुळे महावितरणकडून धानोरी व लोहगावसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू झाले असून या दोन्ही कार्यालयांमुळे व वाढलेल्या तांत्रिक मनुष्यबळामुळे सुमारे ६९ हजार वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे.

नगररोड विभागाच्या विश्रांतवाडी उपविभागातील धानोरी, लोहगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी धानोरी शाखा कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव महावितरण मुख्यालयास सादर केला होता. त्यास मुख्यालयाने मान्यता दिली. त्याप्रमाणे धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. यात २८ हजार ७०० वीजग्राहकांसाठी नवीन लोहगाव शाखा कार्यालयासह १ सहायक अभियंता, १ कार्यालयीन सहायक, २ प्रधान तंत्रज्ञ, ६ वरिष्ठ तंत्रज्ञ आणि ८ तंत्रज्ञ अशी १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

महावितरणच्या जागेतच उभारलेल्या लोहगाव शाखा कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सारंगधर केणेकर, सहायक अभियंता श्री. राहुल बेंद्रे व जनमित्रांची उपस्थिती होती. यावेळी श्री. पवार यांनी सर्वांशी संवाद साधला व वीजग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देण्याची सूचना केली.

आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांशी लढण्यासाठी मास्टर्स इन फायनान्शियल्स अँड इकॉनॉमिक क्राइम्स प्रोग्रॅमविषयी मुंबईत संवादी सत्राचे आयोजन

मुंबई,  – आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी लक्षणीय पाऊल उचलत राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी (RRU) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) यांनी एकत्रितपणे मास्टर्स इन फायनान्शियल्स अँड इकॉनॉमिक क्राइम्सविषयी (MFEC) जागरूकता निर्माण करण्यासाठी संवादी सत्राचे आयोजन केले होते. नुकतेच पार पडलेले हे सत्र बीकेसीमुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते.

अभ्यासक्रमाचा आढावा

MFEC ची रचना आर्थिक गुन्हेगारीमुळे निर्माण होत असलेली आव्हाने सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामध्ये कायदा, वित्त, तंत्रज्ञान आणि धोरणे अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे व्यावसायिकांना आर्थिक गुन्हेगारीशी लढण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवून सक्षम केले जाते. नोकरदार व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेला हा एक वर्षाचा अभ्यासक्रम हायब्रीड पद्धतीने घेतला जाणार आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

या कार्यक्रमात महत्त्वाच्या आर्थिक भागधारकांच्या सहभागाला चालना देण्यात आली. यावेळी डॉ. बिमल पटेल, RRU चे उपकुलगुरू, श्री. रोहित जैन, कार्यकारी संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, श्री. व्ही एस सुंदरसन, कार्यकारी संचालक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडी, डॉ. नीरज गुप्ता, प्रमुख SoF&M, IICA, उद्योगक्षेत्रातील इतर नामवंतांनी देश तसेच जागतिक आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमातून या अभ्यासक्रमाचे रेग्युलेटरी एजन्सीज, कायदा– सुव्यवस्था क्षेत्रातील घटक आणि आर्थिक संस्थांमध्ये सहकार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेवेगवेगळे परिसंवाद, सादरीकरण, भागधारकांसह संवाद यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची अतिशय गरज असल्याकडे लक्ष वेधण्यात आलेत्यातूनच सुरक्षित व लवचिक आर्थिक यंत्रणा तयार होईल यावर एकमत झाले.

जागरूकता निर्माण करण्यातील भूमिका

या अभ्यासक्रमाच्या संवादी सत्रादरम्यान आर्थिक गुन्हेगारीचा राष्ट्रीय आणि जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नियम पालन, नियामक चौकट आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती यांविषयी माहितीचे वाटप करून MFEC ने पैशांची मनी लॉन्ड्रिंग, सायबर फसवणूक आणि कॉर्पोरेट गैरव्यवहारांसारख्या विविध प्रकाराच्या गुन्हेगारीशी लढा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या उपक्रमाद्वारे तज्ज्ञांच्या नव्या वर्गाला प्रशिक्षिण देण्यासाठी RRU आणि IICA बांधील आहेत. हे तज्ज्ञ या महत्त्वाच्या समस्यांविषयी सार्वजनिक व संस्थात्मक जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिकांना विविध टुल्ससह सक्षम केले जाईल, शिवाय आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित धोके कसे कमी करायचे हे सांगण्यात येईल.

भागधारकांमधील संवाद कायदा सुव्यवस्था यंत्रणा, नियामक मंडळे आणि आर्थिक संस्थांमधील भागिदारी वाढवण्यासाठी, त्यांच्यात सहकार्याला व ज्ञानाच्या देवाणघेवाणीस चालना देण्याच्या उद्दिष्टाने तयार करण्यात आला आहे.

धोरण आणि उद्दिष्टे

२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतात लवचिक आणि दमदार आर्थिक यंत्रणा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्याशिवाय सरकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांचा कौशल्य विकास करून त्यांना आर्थिक गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी नेतृत्व स्थानांसह सक्षम करण्याचे ध्येय आहे.

जागतिक दृष्टीकोन

या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय नियमावलीचा समावेश करण्यात आला असून FATF, INTERPOL सारख्या जागतिक संस्थां तसेच एशिया- पॅसिफिक ग्रुपसह सहकार्यावर सीमेपार आर्थिक गुन्हेगारी प्रभावीपणे हाताळण्यासाठी भर देण्यात आला आहे. सुरक्षित आणि समृद्ध आर्थिक भविष्य घडवण्यासाठी या प्रोग्रॅममध्ये आर्थिक भागधारकांमधील सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

आपण वेगाने गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीकडे जात आहोत आणि MFEC सारखे उपक्रम संस्थांमध्ये सचोटी व नियमपालनाची संस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हा प्रोग्रॅम आपली अर्थव्यवस्था आर्थिक गुन्हेगारीच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणारा आहे.

राष्ट्रीय रक्षा युनिर्व्हसिटीमध्ये सुरू करण्यात आलेला मास्टर्स प्रोग्रॅम इन फायनान्शियल अँड इकॉनॉमिक क्राइम्स आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. भावी व्यावसायिकांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करत RRU ने भारताची आर्थिक गुन्हेगारीला लढा देण्याची क्षमता बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.

शिवजयंती सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना

शिवजयंती महोत्सव समिती, पुणे आयोजित विश्वातील सर्वांत मोठा सोहळा 
पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दर वर्षी प्रमाणे शिवजयंतीला बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” या भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा सलग १३ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.  
या मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा अमोल झेंडे. पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, संजय जगताप, तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित रहाणार आहेत.

समितीच्या जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत ह्या मानाच्या मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, धारदेवास महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी होणार आहेत. 

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी “महाराणी ताराराणी शौर्य पथक” मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग पथक सहभागी होणार आहे.    

सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, समीर जाधवराव, गोपी पवार, किरण देसाई, प्रवीणभैय्या गायकवाड, मंगेश शिळीमकर, मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १४ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १४ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड मानवंदना देणार आहेत. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूणार्कृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून सलग १४ व्या वर्षी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुपच्यावतीने आयोजित ‘तरंग’ कार्यक्रम जल्लोषात संपन्न

संगीतकार अजय – अतुलने केले पोलिस कुटुंबियांना मंत्रमुग्ध

पुणे :
संगीतकार अजय- अतुल यांच्या जोडीने एकापेक्षा एक बहादार मराठी- हिंदी गाणी सादर करत पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना अक्षरश मंत्रमुग्ध करून टाकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह हिंदी- मराठी सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती, 70 हून अधिक संगीत गायक आणि वाद्यक, फटाक्याची मोहक अतिषबाजी, उपस्थितांनी गाण्यांवर दरलेला ठेका यामुळे पहिल्याच ‘तरंग’ कार्यक्रमाने पोलिसांची मने जिंकली.
पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना कुटुंबियासोबत उत्सव साजरा करता यावा यासाठी पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पोलिस कुंटुंबियासांठी गायक व संगीतकार अजय- अतुल यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्यासह अनेक राजकिय नेते मं़डळी, कलाकार उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंड झालेल्या या ‘तरंग’ कार्यक्रमाची सुरवात शर्वरी जेमनीस यांच्या गणेश वंदननेनी झाली. अभिनेत्री मेघना एरंडे यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमातील आवाज काढून उपस्थित बाल-चमुंची मने जिंकली. त्यानंतर अजय- अतुल यांच्या प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला सुरवात झाली. नटरंग, मल्हारवारी, वाट देसु देघा देवा, मलहिसमा चॉद हे तु.., आई गोंधळाला ये.. सैराटमधील याड लागल ग याड लागल.., भलतच झालय आज.., चंद्रा.., फॅन्ड्रीमधील जीव झाला वेडा पिसा, डॉल्बी वाल्या बोलवाओ माझ्या डिजेला अशी मराठी- हिंदी एकापेक्षा एक सरस गाणी अजय-अतुल यांनी आणि त्यांच्यासह कलाकारांनी सादर करून उपस्थितांना अक्षरश वेड लावले.. सैराटमधील झिंग झिंग झिंग़ांट या गाण्याने तर उपस्थितांनी तर अक्षरश मैदान डोक्यावर घेतले. देवा श्री गणेशा या गाण्याने संगीत मोहत्सवाची सांगता झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना दाद दिली. यावेळी फटाक्यांच्या अतिशबाजी आणि विदयुत रोषणाईने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

  • उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिसांना सन्मान
    ‘तरंग’ कार्यक्रमात शहर पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचाही फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एक सराफ पेढीतून चोरलेले तब्बल 17 तोळे सोने पुणे पोलिसांनी परत मिळवून न्यायालयीन प्रक्रिया करून अवघ्या तीन महिन्याच्या आत परत मिळविले. या कार्यक्रमातच ते सराफाला परत करण्यात आले.
  • मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरंग’ कार्यक्रमाचे कौतुक करताना पोलिसांना चांगल्या वातावरणात जगता आले तर ते चांगले काम करू शकतील. पोलिसांच्या कुंटुंब कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यात येत असून त्यांच्या आरोग्य सुविधा व घरांचा प्रश्न निकाली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी तरंग 2025 कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
  • पुनीत बालन यांच्या विशेष सत्कार
    पुणे पोलिसांच्या कुटुंबियांसाठी पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून ‘तरंग’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्याने पुणे पोलिसांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनीत बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
  • हिंदी-मराठी सिने कलाकार, खेळांडुची हजेरी

अभिनेता बोमन इराणी, नागराज मंजुळे, अजिक्य देव, पुष्कर जोग, सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, पुजा चोप्रा, स्मिता गोंदकर, दिप्ती देवी, मेघा धाडे, तन्मय जका, केदार जाधव, राहुल त्रिपाटी, ऋतुजा भोसले, प्रीत झांगीयाणी, माध्यव अभ्यंकर ,असे कलाकार यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षभरात लोकसभा – विधान सभा निवडणूक असो की अन्य कायदा व्यवस्था अथवा गुन्हेगारीला आळा घालणे असो ही परिस्थिती अत्यंत मेहनतीने आणि यशस्वीरित्या हाताळले आहे. पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या मनोरंजनसाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी अजय- अतुल यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
– अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त.

—————————
समाजातील विविध घटकांसाठी नेहमची काम करत असतो. मात्र आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जे नेहमची तत्पर असतात त्यांना कुटुंबियासमवेत ना उत्सव साजरा करत येत ना कुठे निवांत वेळ घालविता येत नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबियासाठी आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा हा विचार मांडला. मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यास तत्काळ होकार दिला. हा तरंग कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः खुप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मला दिले याबद्दल मी पुणे पोलिसांचा आभारी आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन.