Home Blog Page 64

आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

पुणे :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली आहे. त्यांना वर्ग-२ पदाचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. या निर्णयामुळे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे म्हणले जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आसावरी यांच्यासाठी शासकीय नोकरीची मागणी होत होती. त्या उच्चशिक्षित असून प्रशासनात काम करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती.

मध्यंतरी अद्याप नोकरी मिळाली नाही म्हणून जगदाळे कुटुंबाने सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनंतरच या प्रस्तावाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

आसावरी जगदाळे यांनी सुरुवातीला उच्च पदाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण प्रशासकीय नियम आणि पात्रतेच्या चौकटीत राहूनच त्यांना वर्ग-२ पद देण्यात आले आहे. त्यामुळे “विशेष प्रकरण” असले तरी नियमांमध्ये बदल झाला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आता आसावरी जगदाळे लवकरच आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. ही नियुक्ती एकीकडे मदतीचा हात म्हणून पाहिली जात असली, तरी दुसरीकडे प्रशासनातील नियम आणि संवेदनशीलतेचा समतोल कसा राखला जातो, याचाही हा एक महत्त्वाचा नमुना ठरत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनवरुन आसावरी यांना शुभेच्छा

दरम्यान, आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र देत असताना अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसावरी जगदाळे यांचे अभिनंदन केले. काही तांत्रिक कारणास्तव नियुक्ती रखडली होती. पण आपण एकाच दिवसात सर्व नियोजन केल्यानंतर विषय मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी आसावरीच्या आईंना सांगितलं. यावेळी आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.

“नमस्कार दादा, आज तुम्ही जास्त फॉलोअप घेतल्यामुळे माझ्या मुलीचं काम झालं आहे. खूप खूप धन्यवाद. माझी आता कुठलीही तक्रार नाही. मी आता खूप आनंदी आहे. तुमच्यामुळे हे सर्व झालं”, अशा शब्दांत आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर आसावरी जगदाळे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवर आभार मानले.

भाजपचे दोन अर्ज बाद;8 स्वीकृत नगरसेवकांची निवड,त्याच उमेदवारांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया


पुणे
अर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत म्हणून भाजपच्या स्वीकृत सदस्यपदासाठीचे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी
१८) दहाऐवजी आठ सदस्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे असे अर्ज बाद झालेल्या भाजपच्या सदस्यांची नावे आहेत.

महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय पक्षांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार यामध्ये भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि काँग्रेसच्या एक सदस्याची वर्णी लागणार होती.

भाजपने नीलेश कोंढाळकर, रवींद्र साळेगावकर, राजेंद्र काकडे, विश्‍वास ननावरे, उदय लेले, प्रियांका शेडगे आणि जयप्रकाश राजपुरोहीत या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्तांकडे अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत शेंडगे आणि राजपुरोहीत यांनी अर्जासोबत धर्मदाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद झाले.

दरम्यान, बुधवारी सर्वसाधारण सभेत शेंडगे आणि राजपुरोहीत वगळता उर्वरित पाचही सदस्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दत्तात्रेय धनकवडे आणि राकेश कामठे, तर काँग्रेसतर्फे सुनील शिंदे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

स्मार्ट सिटीवर दोन संचालक, तर सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी कंपनीवर संचालक नेमण्याचा विषय होता. काँग्रेसतर्फे विशाल मलके, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरसेविका अनिता इंगळे यांना संधी देण्यात आली.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीत निवडणुका लढल्या असून, एकत्रितच गटनोंदणी केली. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वीकृत नगरसेवक होऊ शकले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्मार्ट सिटी कंपनीवर ‘शरदचंद्र पवार पक्षा’ला संधी दिली.

दहापैकी आठजणांची नियुक्ती झाल्याने उर्वरित दोन जागांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत ही नियुक्ती होणार आहे.

यासाठी नव्याने अर्ज सादर करावे लागणार असल्याचे नगरसचिव योगिता भोसले यांनी सांगितले.

पीएमपीच्या संचालकपदी अजय खेेडेकर

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात नगरसेवकांपैकी एकाची नियुक्ती करण्यात येते. संख्याबळाच्या आधारे हे पद सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपकडे जाते. भाजपतर्फे नगरसेवक अजय खेडेकर यांची संचालकपदावर नियुक्ती केली. खेडेकर हे शुक्रवार पेठ घोरपडी पेठ प्रभागातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

अर्ज बाद , पण उमेदवार बदलणार नाही

भाजप सदस्यांची अर्जासोबतची कागदपत्रे वेळेत सादर झाली नसल्याने अर्ज बाद झाले. पुन्हा निवडीवेळी या उमेदवारांचे अर्ज भरले जातील. तसेच, याच दोन्ही उमेदवारांना संधी दिली जाणार असून, पुढील मुख्यसभेत त्यांची नियुक्ती होईल. तांत्रिक बाबीमुळे त्यांची निवड झाली नाही.

  • धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शाश्वत विकास ध्येये आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलन: मुंबईत उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्र तर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

मुंबई, १८ मार्च २०२६: शाश्वत विकास उद्दिष्ट(SDG) गाठण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी साधन सामग्री , तंत्रज्ञान व त्यासाठी पुरेसा निधी देणे ही काळाची गरज आहे, असा सूर स्त्री आधार केंद्र आणि विधान परिषद उपसभापती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. ‘शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन: सक्षमीकरणाचे मार्ग’ या विषयावर आयोजित या चर्चेत देश-विदेशातील कायदेतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

  • डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद तथा स्त्री आधार केंद्र अध्यक्षा): महिलांवरील हिंसाचाराच्या विविध स्वरूपांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक कायदेशीर सुधारणा आणि न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आगामी वाटचालीची (Way Forward) दिशा स्पष्ट केली.त्यात विविध कार्यप्रणाली छोट्या , विशाल स्तरावर न्याय तथा विकास विषयक कार्यप्रणाली तयार करणे गरजेचे आहे.
  • डॉ. डी. पुरंदेश्वरी (खासदार, राजमहेंद्री): महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वोत्तम अर्थसंकल्पीय पद्धती आणि ‘निर्भया’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी प्रकाश टाकला.
  • श्रीमती सुरमा पाधी (अध्यक्षा, ओडिसा विधानसभा): महिलांच्या दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि हिंसाचारापासून संरक्षणाचे अधिकार अधिक बळकट करण्यासाठी कायद्याची भूमिका त्यांनी मांडली.
  • डॉ. पॅम राजपूत (ज्येष्ठ विदुषी, दिल्ली): ‘सिडॉ’ (CEDAW) कराराच्या संदर्भात पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भेदभावमुक्त व्यवस्था विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
  • श्रीमती रेणुका फडके (लंडन): आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित सामुदायिक जागांद्वारे महिला सक्षमीकरण कसे साधता येईल, यावर त्यांनी जागतिक दृष्टीकोन मांडला.
  • स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षितता, समानता आणि न्यायासाठी भारतात अनेक कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल उपलब्ध आहेत. या कायद्यांची आणि निकालांची माहिती घेऊन महिलांनी आपले हक्क जपावेत आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्यावी असे त्यांनी प्रतिपादन केले .
  • श्री दत्तात्रय कराळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक): पोलीस आणि शासकीय यंत्रणेला लिंगाधारित हिंसाचार व मानवी हक्कांचे प्रशिक्षण देण्याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले.
  • श्री राहूल मोरे (उपायुक्त, महिला व बालविकास विभाग): लिंगसमभाव विचारधारा, विविधता आणि महिलांच्या ओळखीचे रक्षण या विषयावर त्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.
  • क्षेत्रीय कार्यकर्ता अनुभव: पुण्याच्या श्रीमती अंजू वाघमारे आणि श्रीमती लहानु आबनावे यांनी ग्रामीण पातळीवरील आपले प्रत्यक्ष कामाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती अपर्णा पाठक यांनी केली. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती मुग्धा केसकर यांनी केले.

महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना विकासाच्या प्रक्रियेत ‘नेतृत्व’ देणारी शक्ती म्हणून पाहणे आवश्यक आहे, असे सर्वसंमत निष्कर्ष या परिषदेत समोर आले.

एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, विखे-पाटलांचे भविष्य पाहणारा अशोक खरात बलात्कार प्रकरणी गजाआड

नाशिक – कॅप्टन अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. त्याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. अशोक खरात हा स्वयंघोषित ज्योतिष असून राजकीय नेते, सेलिब्रिटी हे त्यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येत असतात. या भोंदू बाबाने एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी देखील अशोक खरात या भोंदू बाबाचा संपर्क असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ हस्तगत करण्यात आले.कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या संस्थेच्या ट्रस्टमध्येही रुपाली चाकणकर यांचा समावेश आहे. यामुळे राज्य महिला आयोगाच्या छत्रछायेखाली हे सर्व सुरु असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ असल्याची बतावणी करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्याच्या मिरगाव येथील मंदिरात भेट दिली आहे. रुपाली चाकणकर या तर त्याच्या मंदिर ट्रस्टमध्ये संचालक आहेत.
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.
हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे यात घेतली जातात अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत.

सुट्ट्यांच्या दिवशीही दस्तनोंदणी कार्यालये सुरू राहणार

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

२६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या दिवशी सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर यांच्या अधिपत्याखालील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ ते १५ ही सर्व कार्यालये नियमित शासकीय कामकाजासाठी कार्यरत राहतील.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत असल्याने गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई शहरचे सह जिल्हा निबंधक भरत गरुड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

“मैं वापस आऊंगा”  12 जून ला चित्रपटगृहांमध्ये

टीझर रिलीज झाल्यापासून “मैं वापस आऊंगा” हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे आणि इम्तियाज अली यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथनशैलीची झलक प्रेक्षकांना देत आहे। समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतागुंतीचे आणि सखोल महिला पात्र निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे इम्तियाज अली यांच्या कामाची ओळख त्यांच्या नायिकांच्या गाभ्याशी जोडलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे आहे।

या चित्रपटाद्वारे शर्वरी त्या विश्वात पाऊल ठेवत आहे, आणि तिच्या अभिनयाने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे। हा सहयोग तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। टीझरभोवती वाढत असलेल्या चर्चांदरम्यान शर्वरीने इम्तियाज अलींसोबत काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्या विश्वाचा भाग होण्याचे महत्त्व याबद्दल सांगितले।

शर्वरी म्हणाली,“माझ्या मते, इम्तियाज अली यांच्या चित्रपटातील नायिका होणे म्हणजे अशा जागेत प्रवेश करणे, जिथे पात्र आणि तुमच्या स्वतःच्या मनामधील सीमा अतिशय सुंदरपणे विरघळू लागतात। इम्तियाज सरांनी आपल्याला अनेक वर्षांपासून आवडणाऱ्या अप्रतिम नायिका दिल्या आहेत।

‘मी परत येईन’मध्ये त्यांच्या प्रमुख अभिनेत्री म्हणून निवडले जाणे हे माझ्यासाठी खरोखर स्वप्न साकार झाल्यासारखे आहे। आलिया, दीपिका, करीना, अनुष्का यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या सोबत काम केले असताना त्यांनी मला त्यांच्या दृष्टीकोनातील नायिका म्हणून पाहिले, ही माझ्या कामाची आणि सिनेमाबद्दलच्या माझ्या आवडीची मोठी दखल आहे।”

ती पुढे म्हणाली,“त्यांच्या महिला पात्रे केवळ कथेतले भाग नसतात — तीच कथा असतात। ‘जब वी मेट’मधील गीत ढिल्लोंचा विचार केला तर तिच्यात एक मोकळेपणाची आनंदी वृत्ती आणि निडरपणा आहे, पण जीवन योजना प्रमाणे न चालल्यास एक शांत ताकदही दिसते।

‘तमाशा’मधील तारा महेश्वरी — तिच्यात प्रचंड भावनिक खोली, प्रेम आणि धैर्य आहे, जी दुसऱ्याच्या तुटलेल्या भावनांना सांभाळताना स्वतःच्या सत्याशीही प्रामाणिक राहते।

‘हायवे’मध्ये आलिया भट्टने साकारलेली वीरा ही खूपच रॉ, बेधडक आणि मनाला भिडणारी आहे। एका सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलीपासून स्वतःच्या भीती आणि जखमांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे दाखवला आहे।

या सर्व पात्रांनी मला प्रेरणा दिली आहे आणि इम्तियाज अली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हा अविश्वसनीय अनुभव आहे, कारण मला वाटते की यामुळे मी एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगली व्यक्तीही झाले आहे।”

शेवटी ती म्हणाली “त्यांच्या वारशाचा भाग होणे हे नम्र करणारे आणि अत्यंत वैयक्तिक अनुभव आहे। हे एखाद्या चौकटीत बसण्याबद्दल नाही, तर त्या चौकटीतून बाहेर पडण्याबद्दल आहे।

हे तुम्हाला कधी कधी अस्वस्थ करणाऱ्या भावनांसोबत — शांतता, विरोधाभास, अपूर्ण इच्छा — यांच्यासोबत राहायला शिकवते।

आणि असे करताना तुम्ही फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही विकसित होता। माझ्यासाठी हे एखाद्या अतिशय खास आणि वैयक्तिक जगात विश्वासाने प्रवेश करण्यासारखे आहे — जिथे भावना सोप्या किंवा सजवलेल्या नसतात, तर खऱ्या अर्थाने अनुभवल्या जातात।

यामुळे तुमच्या कामाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, कारण मग ते परफेक्ट अभिनय करण्याबद्दल नसून प्रामाणिकपणे त्या क्षणात जगण्याबद्दल असते। मला वाटते अशी कथा सांगण्याची पद्धत तुमच्यासोबत राहते… ती तुमचे निर्णय, तुमचा आवाज आणि पुढे तुम्ही कोणत्या प्रकारच्या कथा सांगू इच्छिता, हे ठरवते।”

चित्रपट “मैं वापस आऊंगा” हा 12 जून 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे।

पुण्याच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात १७लाख चौ. फुटांचा मोठा‘अ’दर्जाचा प्रकल्प…

पुणे, १८ मार्च २०२६ : अवांते स्पेसेस लिमिटेड या किर्लोस्कर उद्योगसमुहातील कंपनीने आज पुण्याच्या ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये १७ लाख चौ. फूट क्षेत्रफळाचा उच्च दर्जाचा व्यावसायिक प्रकल्प उभारीत असल्याची घोषणा आज केली. या प्रकल्पाचे नाव ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ असे असेल. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात कंपनीच्या विस्तारासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यातील व्यावसायिक परिसराचा भविष्यातील विकास घडवण्याच्या उद्देशाला कंपनीच्या या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळणार आहे.

हा प्रकल्प मोठ्या व्यावसायिक कॅम्पसच्या स्वरूपात विकसित केला जात आहे. कंपनीने जागेची निवडही धोरणात्मक पद्धतीने केली असून, देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मध्यवर्ती ठिकाणी उत्तम कार्यालयीन सुविधा मिळाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पातून कंपनीला सुमारे २०० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे.

तीन बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि त्यावर २० मजले (३बी+जी+२०) अशी या प्रकल्पाची रचना आहे. प्रत्येक मजल्यावर साधारण ८५,००० ते ९५,००० चौ. फूट इतकी भाड्याने देता येणारी जागा उपलब्ध असेल. तसेच, एकाच मजल्याचे चार भाग करता येतील. यामध्ये प्रत्येक भाग १३,००० ते ३०,००० चौ. फूट इतका असेल. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार जागा घेण्याची लवचिकता मिळेल.

प्रकल्पाभोवती भरपूर हिरवळ असणार असल्यामुळे आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक वातावरण यांचा चांगला समतोल मिळेल. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी), आयटी, बीएफएसआय, अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, तसेच को-वर्किंग आणि फ्लेक्सिबल स्पेस देणाऱ्या संस्थांसाठी आणि दीर्घकाळासाठी जागा शोधणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी हा प्रकल्प योग्य ठरेल. प्रकल्प २०२७च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पुण्याच्या मध्यभागी असलेल्या या ‘अवांते बिझनेस पार्क’ला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र बोगद्यामुळे, तसेच कर्वे रस्ता, कॅनॉल रस्ता आणि नव्याने बांधलेल्या डीपी रोडमार्गे येथे ये-जा करणे सोपे होईल. या प्रकल्पात सुमारे एक लाख चौ. फूट क्षेत्रात खाद्यपदार्थ व रिटेल या सुविधा असतील. यामध्ये ‘फूड कोर्ट’चाही समावेश आहे. याशिवाय बहुपयोगी प्रशिक्षण कक्ष, सामायिक बैठक कक्ष, व्यायामशाळा, पाळणाघर आणि क्लिनिक यांसारख्या सुविधा दिल्या जातील. प्रकल्पात मोकळी हिरवी जागा, झाडा-झुडपांची जागा आणि ‘ओपन एअर अॅम्फीथिएटर’ही असेल. त्यामुळे कामासाठी एक संपूर्ण, आरामदायी आणि उत्पादक वातावरण तयार होईल. त्यातून कर्मचाऱ्यांचे समाधान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढेल.

या प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरकता लक्षात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प ‘आयजीबीसी प्लॅटिनम’ आणि ‘यूएसजीबीसी प्लॅटिनम’ या दर्जांसाठी प्री-सर्टिफाइड असून, ‘वेल प्रमाणपत्र’ मिळवण्याचे लक्ष्य त्यात ठेवण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी याबाबतची कंपनीची बांधिलकी दिसून येते. ऊर्जा कार्यक्षम अशी सेंट्रलाइज्ड एचव्हीएसी प्रणाली, उष्णता कमी राहील व नैसर्गिक प्रकाश जास्त मिळेल अशा पद्धतीने केलेले साधे फ्लोअर डिझाइन, उत्तम इनडोअर-आउटडोअर वातावरण आणि मोठ्या प्रमाणात हिरवी मोकळी जागा अशी या प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे परिसरातील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना ‘अवांते स्पेसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पोरायथ म्हणाले, “अवांते स्पेसेसच्या वाढीच्या प्रवासात ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठ्या शहरांमध्ये जागतिक कंपन्या आणि जीसीसी यांच्याकडून मोठ्या ऑफिस स्पेसची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन, उच्च दर्जाची आणि पर्यावरणाची जबाबदारी जपणारी व्यावसायिक पायाभूत सुविधा उभारण्याची ही मोठी संधी आम्ही घेतली. पुण्यातील आमच्या पहिल्या प्रकल्प वन अवांते या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही हा पुढील प्रकल्प विकसित करीत आहोत. आमचे हे प्रकल्प किर्लोस्कर समुहाच्या मूल्यांशी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत असतील. तसेच, परिसरातील भरपूर हिरवळ जपून, संतुलित आणि शाश्वत वातावरण तयार करण्यावरही आमचा भर असेल.”

या प्रकल्पासाठी दीर्घकालीन भाडेपट्ट्याचे, म्हणजे लिजिंगचे धोरण अवलंबले जाणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात उच्च दर्जाच्या ऑफिस सुविधा शोधणाऱ्या मोठ्या आणि संस्थात्मक कंपन्यांवर याकरीता विशेष लक्ष दिले जाईल. प्रकल्पाच्या बांधकामाच्या काळात आणि तो सुरू झाल्यानंतरच्या कामकाजाच्या काळात मिळून सुमारे १५ हजार जणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ या प्रकल्पामुळे ‘अवांते स्पेसेस’ची प्रीमियम कमर्शियल रिअल इस्टेट क्षेत्रातील पकड अधिक मजबूत होईल. तसेच, मोठ्या प्रमाणावर वाढवता येणारे, पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीच्या कंपनीच्या धोरणाला आणखी बळ मिळेल.

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्याचे अभिवादन

पुणे, दि.१८: स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसील बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या.तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत माहिती घेवून ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या श्रीमती पवार यांनी सूचना दिल्या. .

१० स्विकृत सदस्य बिनविरोध पण… दोघांचा पत्ता कट होणार काय ? रंगली चर्चा

0

पुणे: महापालिकेच्या दहा जागांसाठीच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड आज बुधवारी मुख्य सभेत होणार आहे, राजकीय पक्षांनी आपापल्या बलानुसार दहा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यामुळे ही निवड बिनविरोध आणि सुलभतेने होईल असे चित्र असताना दोन उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने ते छाननीत बाद झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या मुख्य सभेत दहाऐवजी केवळ आठच जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे.मात्र, या निवडीत आठच नगरसेवक निवडले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही निवड मुख्य सभेत होणार असताना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडून दहा सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुख्य सभेत आयत्यावेळी हा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याची चर्चा आहे.
पक्षीय बलाबलानुसार महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज ९ मार्च रोजी सादर केले होती. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज आयुक्तांना सादर केले होते. त्यानुसार, आयुक्तांकडून या अर्जाच्या छाननीसाठी स्वतंत्र समितीही नेमण्यात आली होती. या समितीकडून मंगळवारी अखेरपर्यंत या अर्जाची छाननी सुरू होती. महापालिका अधिनियमानुसार, सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नजीकच्या पहिल्या मुख्य सभेत या सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
त्यामुळे, प्रशासनाकडून जे आठ अर्ज पात्र झाले आहेत. त्यांचीच नावे मुख्य सभेत सादर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेले ते दोन उमेदवार कोण याची चर्चा रंगते आहे. नेमके खरे खोटे मात्र मुख्य सभेत हा विषय येईल तेवहच स्पष्ट होणार आहे.

भाजप चे स्विकृत सदस्य उमेदवार
प्रियंका शेंडगे
जयप्रकाश पुरोहित रवी साळवेकर विश्वास ननावरे उदय लेले राजेंद्र काकडे नीलेश कोंढाळकर

राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता धनकवडे राकेश कामठे आणि काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे

मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावरील महात्मा फुले चौकात 120 कोटीचा उड्डाणपूल: वाहतूक कोंडी फोडणार-भिमाले

पुणे, : मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावरील महात्मा फुले चौक येथे उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मगरपट्टा ते खराडी मार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.स्थायी समिति अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली ते म्हणाले,’मगरपट्टा ते खराडी या मार्गावर मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या वरून मेट्रो लाइन जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाची सुमारे १२० कोटी ११ रुपये किमतीच्या निविदेचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता. याशिवाय, विविध कामांसाठी ९ कोटी ४२ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या ठिकाणी वाहने व मेट्रो यासाठी दुमजली हा उड्डाणपूल असणार आहे. मेट्रो प्रशासनाशी चर्चा करून काम केले जाणार आहे. पुलाच्या पायाच्या पातळीतील बदल, छताच्या क्षेत्रफळातील बदल तसेच शासनाच्या जीएसटी धोरणातील बदल यानुसारही देयकांमध्ये आवश्यक ते समायोजन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
मुख्य पुलाची लांबी ७९६ मीटर
उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ८० मीटर असून मुख्य पुलाची लांबी ७६९ मीटर इतकी आहे. खराडी बाजूस १३६ मीटर, तर मुंढवा बाजूस १४८ मीटर लांबीचे पोच रस्ते असार आहे. १६ मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल असून वाहतुकीसाठी स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणार आहे. या उड्डाणपुलासाठी एकूण ३६ पिअर्स उभारण्यात येणार असून त्यापैकी २८ पिअर्स रस्त्यावर, तर आठ पिअर्स हे नदीपात्रात असतील. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित केला असून पावसाळ्याचा कालावधी त्यातून वगळला आहे.

इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना दुर्घटना, 6 लोक जिवंत जळाले, 3 जण भाजले

इंदूर- बंगाली चौकाजवळच्या एका कॉलनीत बुधवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका घरात इलेक्ट्रिक कार चार्जिंग करत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्यात 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला.प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक तपासानुसार, पुगलिया कुटुंबाच्या घराबाहेर रात्री उशिरा इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावली होती. पहाटे 4 वाजताच्या सुमारास चार्जिंग पॉइंटमध्ये शॉर्ट सर्किट झाले, ज्यामुळे कारने पेट घेतला. ही आग वेगाने घराकडे पसरली आणि तेथे ठेवलेल्या 15 गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली.

आग लागताच घरात ठेवलेल्या सिलिंडरमध्ये स्फोट सुरू झाले. बघता बघता 4 गॅस सिलिंडर एकापाठोपाठ एक फुटले, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोट इतका जोरदार होता की घराचा एक भाग कोसळला आणि आत झोपलेल्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

पुगलिया कुटुंबाकडे एक कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यामुळे अनेक नातेवाईकही घरी थांबले होते. या अपघातात आतापर्यंत 6 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 3 लोक गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात यांचा मृत्यू झाला

विजय सेठिया (65 वर्षे)
छोटू सेठिया (22 वर्षे)
सुमन (60 वर्षे)
मनोज (65 वर्षे)
सिमरन (30 वर्षे)
राशि सेठिया (12 वर्षे)
हे 3 लोक जखमी झाले

सौरभ पुगलिया (30 वर्षे)
आशिष (30 वर्षे)
हर्षित पुगलिया (25 वर्षे)
बातमी सतत अपडेट केली जात आहे…

उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; परशुराम वाडेकरांचा गजब दावा

पुणे:महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण कधी कधी काही बैठकांना महापौरांच्या शेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही.अशी गजब खदखद उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान वाडेकर देखील उपमहापौर पद मिळाल्यावर सिनिअर कार्यकर्त्यांना देखील विचारत नसल्याची चर्चा झडते आहे.जे लोक आज मान-सन्मानाची अपेक्षा करत आहेत, त्यांनी कधी सामान्य, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तो सन्मान दिला आहे का? लहान कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते किंवा अगदी वरिष्ठ कार्यकर्त्यांनाही योग्य मान दिला गेला का? असे ही सवाल केले जात आहेत.
दरम्यान, वाडेकर यांनी असेही म्हटले आहे की,शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नाही.उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र आता त्या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार महापालिकेचे उपमहापौर वाडेकर यांनी केली. वाडेकर यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या निमित्ताने उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही, असेही वाडेकर यांनी सांगितले.

महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांसाठी उपमहापौरपद सोडले असले तरी या पदासाठी असलेला सन्मान मात्र भाजपकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौर यांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून होते. महापौर कार्यालयातील संबधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगत महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते. मात्र त्यानंतरही पुन्हा तशाच पद्धतीचे प्रकार घडत असल्याचे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

12,000 हून अधिक छापे टाकण्यात आले ; 15,000 हून अधिक एलपीजी सिलिंडर्स केले जप्त

भीतीपोटी बुकिंग करणे टाळण्याचे आणि एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन

एलपीजी इंधनवाहू जहाज ‘शिवालिक’ काल भारतात पोहोचले ; ‘नंदा देवी’ आज पोहोचले , माल उतरवण्याचे काम सुरू

अर्मेनियामध्ये गेलेले सुमारे 130 भारतीय यात्रेकरू आज पोहोचणे अपेक्षित

नवी दिल्ली, 17 मार्च 2026

पश्चिम आशियातील घडामोडींबाबत आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. बदलत्या परिस्थितीबद्दल अद्ययावत माहिती देण्यासाठी अशा पत्रकार परिषदा नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांनी इंधन पुरवठा, सागरी कारवाया, या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यासंबंधी प्रयत्नांविषयी अद्ययावत माहिती दिली.

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, देशातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती आणि पेट्रोलियम उत्पादने तसेच एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली .

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

कच्चे तेल आणि रिफायनरी

देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या सर्वोच्च क्षमतेने कार्यरत असून, कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर असून, या दोन्ही इंधनांची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयात करण्याची गरज नाही.

किरकोळ विक्री केंद्रे

देशातील कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रांवर इंधन तुटवडा असल्याची माहिती नाही, असे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सगळीकडे सुरळीत सुरू आहे.

देशात सगळीकडे, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असून नागरिकांनी, घाबरून जात, घाईघाईने पेट्रोल डिझेल खरेदी करु नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

नैसर्गिक वायू

प्राधान्य क्षेत्रांना, संरक्षित गॅस पुरवठा अव्याहतपणे सुरू असून, यात, पीएनजी आणि सीएनजीच्या 100 टक्के पुरवठ्याचा समावेश आहे. तर, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होणारा पुरवठा सुमारे 80 टक्क्यांवर नियंत्रित केला जात आहे.

शहरी भागांमधील व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, आणि हॉटेल्स, उपहारगृहे, रुग्णालये आणि वसतिगृहे देखील, अधिकृत शहर गॅस वितरण कंपन्यांच्या डिलर कडून पीएनजी जोडण्या मिळवू शकतात.

आयजीएल, एमजीएल, गेल गॅस आणि बीपीसीएल यांसारख्या सीजीडी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक पीएनजी जोडणीसाठी प्रोत्साहन देत आहेत.

सरकार, सीजीडी जाळ्याचा विस्तार करत असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सीजीडी पाइपलाइन टाकण्यासाठी प्रलंबित अर्जांना मंजुरी देण्याची व तांत्रिक परवानगी देण्याची,रस्ते दुरुस्ती आणि परवानगी शुल्क माफ करण्याची, कामकाजाच्या अटी शिथिल करण्याची आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे.

असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

· आयव्हीआरएस, एसएमएस, व्हॉट्सअॅप, मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करता येईल.

· नागरिकांनी भीतीपोटी एलपीजी नोंदणी टाळावी, डिजिटल पद्धतींचा वापर करावा आणि एलपीजी वितरकांकडे अनावश्यक भेट देऊ नये, असे आवाहन आहे.

· ग्राहकांना पीएनजी आणि इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन कूकटॉप्स यासारख्या पर्यायी इंधनांचा वापर करायला आणि ऊर्जेची बचत करायला प्रोत्साहन दिले जात आहे.

· नागरिकांनी अचूक माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहावे, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आहे.

सागरी सुरक्षा आणि नौवहन ऑपरेशन्स

प्राधिकरणाने ट्रान्सशिपमेंट कंटेनर्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 90,000 चौरस मीटर इतक्या अतिरिक्त साठवणुकीच्या जागेचाही समावेश आहे.

·जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बाहेर कंटेनर पडून असल्याचे वृत्त निराधार आहे. सामान्य लॉजिस्टिक्स कामकाजाचा भाग म्हणून कंटेनर सध्या फ्रेट स्टेशन्स, गोदामे किंवा कारखान्यांच्या आवारात आहेत. 

·जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील कोंडी कमी होत असून नाशवंत माल असलेल्या कंटेनर्सची संख्या दोन हजारांवरून एक हजार इतकी कमी झाली आहे.

·जहाजे सलालाह आणि खोर फक्कनसारख्या बंदरांकडे रवाना झाली आहेत; तसेच, सुमारे 200 कंटेनर्स घेऊन जाणारे आणखी एक जहाज आज निघणार आहे. अडकून पडलेल्या कंटेनर्सची संख्या पुढील 24 ते 48 तासांत आणखी कमी होऊन, सुमारे 600 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

·पश्चिम आशियातील सातत्याने बदलणारी स्थिती पाहता बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, जलवाहतूक, बंदरांचे संचालन, भारतीय खलाशांची सुरक्षितता आणि जलवाहतुकीद्वारे होणाऱ्या व्यापाराचे सातत्य यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

16 मार्च 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील विविध विमानतळांवरून भारतात 55 उड्डाणे झाली आहेत, तर आज सुमारे 70 उड्डाणे अपेक्षित आहेत. प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रकासंबंधीच्या माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, तसेच ते मदतीसाठी भारतीय दूतावासासोबतही संपर्क साधू शकतात असा सल्ला जारी केला गेला आहे. 

सौदी अरेबिया आणि ओमानमधून भारतातील विविध ठिकाणांसाठी उड्डाणे सुरू आहेत.

कतारची हवाई हद्द अंशतः खुली असून, 16 मार्च 2026 रोजी भारतात 3 उड्डाणे झाली, तर आज 3 उड्डाणे होण्याची अपेक्षा आहे.

कुवेतची हवाई हद्द 28 फेब्रुवारी 2026 पासून बंद आहे. जजीरा एअरवेजची विशेष बिगर-नियोजित उड्डाणे सौदी अरेबियातील अल कैसुमाह विमानतळावरून भारतात येण्याची अपेक्षा आहे.

बहरीन आणि इराक मधील हवाई हद्द अजूनही बंद असून, तिथल्या भारतीय नागरिकांकरता सौदी अरेबियामार्गे प्रवास करण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध आहे.

13 मार्च 2026 रोजी सोहार येथे झालेल्या घटनेत प्राण गमावलेल्या दोन भारतीय नागरिकांचे पार्थिव जयपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकार याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

जखमी भारतीय नागरिकांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्याकरता भारतीय दूतावास रुग्णालयाचे अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या संपर्कात असून, त्यापैकी कोणीही गंभीर जखमी नाही.

सुखरूप सुटका गेलेल्या कर्मचारी पथकामधील 15 भारतीय सदस्यांना बसरा इथल्या भारताच्या दूतावासातर्फे मदत पुरवली जात असून, सध्या ते एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यांना लवकर मायदेशी परतता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी भारतीय दूतावास इराकी प्राधिकरणांसोबत समन्वय साधत आहे.

अलीकडील घटनांमध्ये पाच भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. ओमानमधील दोन भारतीय नागरिकांचे पार्थिव आज मायदेशी आणले गेले आहे.

बेपत्ता व्यक्तीबाबत तसेच, उर्वरित नागरिकांचे पार्थिव आवश्यक औपचारिक कार्यवाही करून लवकर मायदेशी परत आणता यावे यासाठी ओमान, इराक आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावास संबंधित प्राधिकरणांच्या संपर्कात आहेत.

त्या त्या वेळच्या घडामोडींवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेऊन आहे, तसेच संबंधित मंत्रालये आणि संस्थांमध्ये काटेकोर समन्वय राखला जात आहे. यासोबतच प्रमुख क्षेत्र आणि राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिली.

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आता ‘एक खिडकी’ योजना – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि.१७ : उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आता महसूल विभाग, महानगरपालिका आणि भूम‍ि अभिलेख विभागाची संयुक्त ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्क्रियता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ  म्हणाल्या की, यांनी २००५ पासूनच्या धोरणांचा आणि सद्यस्थितीचा आढावा मांडला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर  शहरातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात शासनाच्या  २००६ च्या अधिनियामातंर्गत  जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले होते. बांधकामे नियमित करण्याबाबत त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे २२,०१३ अर्जांपैकी १५,५८७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे फेटाळले गेले होते आणि केवळ १३८ जणांना ‘डी’ फॉर्म (नियमितीकरणाचे प्रमाणपत्र) मिळू शकले होते. त्यानंतर २०१९ मध्ये हे अधिकार आयुक्तांकडे अधिकार सोपवण्यात आले. मात्र, कोरोना काळ आणि रेडिरेकनरच्या जाचक दरांमुळे या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहून १४ मार्च २०२४ रोजी सरकारने नियमांत सुधारणा केली. आता रेडिरेकनरच्या केवळ १० टक्के शुल्क भरून बांधकामे नियमित करण्याची तरतूद केली. सुधारित धोरणानुसार सुमारे १ लाख ८० हजार मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त ४४५ प्रस्तावांपैकी १३ जणांना ‘डी’ फॉर्म देण्यात आले आहेत, तर ३५९ प्रस्तावांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने त्यांना पूर्ततेसाठी वेळ देण्यात आला आहे नियमितीकरणाच्या प्रक्रियेत त्रुटी असल्यास त्या तपासल्या जातील आणि आवश्यक सुधारणा केल्या जातील. मात्र, जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत

पुणे/ मुंबई (दि १७ ) : महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार असून, समाजाप्रती असलेली औषध व्यवसायिकांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हेमंत रासने, अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, खजिनदार श्री. वैजनाथ जागुष्टे, श्री. हुकुमराज मेहता, श्री. सुनीलजी छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी समन्वय केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव श्री. अनिल बेलकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ही राज्यातील १,२५,००० औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. संघटनेने आपल्या सभासदांकरिता कार्य करित असतांना नेहमीच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवलेली आहे. देशावर अथवा राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अथवा कोरोना सारख्या विषाणुचा प्रादुर्भाव असेल अशा प्रत्येक वेळी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.