Home Blog Page 500

ट्रान्सस्टेडिया विश्वविद्यालय – 2025 च्या प्रवेशासाठी अर्ज मागवले

अहमदाबाद – नवोन्मेष, उद्योग एकत्रीकरण आणि प्रवाही शिक्षण या पायावर उभी असलेली
एक आधुनिक शिक्षणसंस्था ट्रान्सस्टेडिया युनिव्हर्सिटी (TSU), ही 2025 च्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागवत आहे.
सुरक्षित भविष्य देणारे अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेसह, TSU उद्याच्या नेत्यांची, निर्मात्यांची आणि
विचारकांची तयारी करत आहे.
पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत, TSU चे प्रशिक्षण अनुभवात्मक शिक्षणाशी निकटतेने जोडलेले आहे. शिक्षण
उद्योगातील IBM, NSE अकादमी, IITRAM आणि BISAG यासारख्या नेत्यांच्या सहकार्याने अभ्यासक्रम ठरवला
जातो. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळते, क्षेत्रान्वेषण कार्यशाळांमध्ये
उपस्थित राहण्याची संधी मिळते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते.
टीएसयू तीन स्वतंत्र विभागांमध्ये कार्यरत आहे – व्यवस्थापन, संगणक विज्ञान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्रीडाभ्यास

  • याअंतर्गत खेळ व्यवस्थापनात बीबीए, बी.कॉम, बी.एस्सी, खेळ आणि इव्हेंट व्यवस्थापनात एम.एस्सी, बीसीए
    आणि IBM च्या सहकार्याने संगणक विज्ञानात बी.एस्सी प्रमाणपत्रे ऑफर करतात. योग आणि आरोग्य तसेच
    आतिथ्य व्यवस्थापन (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट) अभ्यासक्रमातील त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आणखी
    व्यावसायिक संधी प्रदान करतात.
    TSU मध्ये, शिक्षण वर्गाच्या बाहेरच शिकवले जाते. विद्यार्थ्यांना वास्तविक जगाचा अनुभव मिळतो जो त्यांना सतत
    विकसित होत असलेल्या जागतिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी तयार करतो.
    ‘आमचे लक्ष्य म्हणजे एक अशी इकोसिस्टीम तयार करणे जिथे शिक्षण हा एक खोल अनुभव असेल, वातावरण
    उत्साही असेल, आणि परिणाम परिवर्तनशील असतील,’ असे उदित शेठ, संस्थापक आणि अध्यक्ष, ट्रान्सस्टेडिया
    यूनिव्हर्सिटी म्हणाले. ‘TSU मध्ये, विद्यार्थ्यांना केवळ डिग्री मिळत नाही – ते स्वप्ने बांधतात आणि आयुष्यभराचा
    उद्देश शोधतात.’
    जागतिक दर्जाचे शिक्षक, शैक्षणिक सहकार्य, स्मार्ट शैक्षणिक साहित्य, नवकल्पना प्रयोगशाळा, मीडिया स्टुडिओ, उच्च
    कार्यप्रदर्शनाच्या क्रीडा सुविधांचे आणि सहकारी कार्य स्थळांचे समावेश करणाऱ्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी
    पाठबळ मिळालेले, TSU एक अद्वितीय कॅम्पस अनुभव प्रदान करते.
    शैक्षणिक ज्ञानाच्या पलीकडे, TSU मधील विद्यार्थ्यांचे जीवन आकर्षक, समृद्ध, आणि विस्मयकारक असावे याची
    रचना करण्यात आलेली आहे. क्लब आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपासून ते कल्याण उपक्रम आणि जागतिक संपर्कापर्यंत,
    विद्यार्थी एक अशी यात्रा सुरू करतात ज्याचे शैक्षणिक, सामाजिक, आणि भावनिक प्रतिध्वनी आयुष्यभर कानात
    घुमतात.
    2025 च्या वर्गासाठी अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कार्यक्रमांसाठी आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
  • अधिक माहितीसाठी आण प्रवेशासाठी भेट द्या: www.tsuniv.edu.in
  • प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी संपर्क: +91-7069060029 / admissions@tsuniv.edu.in

कॅमेरुन देशाच्या महिलेचे आई बनण्याचे स्वप्न होणार साकार:सह्याद्रि रुग्णालयाच्या मॉमस्टोरीची मदत

गर्भाशय काढण्याऐवजी गर्भाशयाची पुनर्रचना करण्याची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे, — सह्याद्रि रुग्णालयातील डॉक्टरांना आफ्रिकेच्या कॅमेरुन देशातील ३६ वर्षीय महिलेवर यशस्वी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत तिचे गर्भाशय वाचवण्यात यश आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मातृत्वसुखासाठी आसुसलेल्या या महिलेच्या गर्भारपणातील मोठा अडथळा दूर सरला आहे.

कॅमेरुन देशाची रहिवासी असलेली ग्लॅडीस ही व्यवसायाने शिक्षिका आहे. त्यांची पहिली गर्भधारणाही फार गुंतागुतीची होती. पहिल्या गर्भपातानंतर तिला जीवघेण्या परीस्थितीला सामोरे जावे लागले. पहिल्या गर्भधारणेदरम्यान त्यांची परिस्थिती खूपच नाजूक होती आणि गर्भाची पिशवी पाच वेळा साफ करावी लागली आणि त्यामुळे त्यांची गर्भाशयाच्या आतील पडद्याची म्हणजेच एंडोमेट्रियम ची जाडी खूपच कमी झाली.

त्यानंतरच्या गर्भारपणात दुस-या तिमाहीत तिने आपले मूल परत एकदा गमावले. या गर्भपातानंतर गर्भातील बाळाची वार म्हणजेच प्लेसेंटाचा एक भाग गर्भाशयातच राहिला. वैद्यकीयय भाषेत या स्थितीला रिटेन्ड प्लेसेंटा असे म्हणतात. ही वार राहिल्याने महिलेला फारच रक्तस्त्राव झाला, ज्याला ‘गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव’ असे संबोधले जाते. पहिल्या गर्भधारणेमध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे या महिलेच्या दुस-या गर्भधारणेतही समस्या निर्माण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कॅमेरुन येथे उपचारादरम्यान तिच्या गर्भाशयात गर्भनाळेचा एक भाग आतच राहिला होता. तो काढून टाकण्यासाठी डॉक्टरांनी तीनदा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी तीव्र रक्तस्त्राव झाला आणि तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले. या शस्त्रक्रियांदरम्यान ती गंभीर अवस्थेत होती आणि त्यामुळे तिला एकूण तब्बल २२ वेळा रक्त चढवावे लागले. सततच्या दोन गर्भपातांमुळे ग्लॅडीस यांना प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिला गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला. भारतात सह्याद्रि रुग्णालयात येण्याआधी, मध्यपूर्व देश, फ्रान्स आणि आफ्रिकेतील अनेक डॉक्टरांनीही तिला गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही तर भारतात दिल्ली आणि इतर अनेक शहरांतील काही रुग्णालयांमध्येही तिला गर्भाशय काढण्याचाच सल्ला देण्यात आला होता.

परंतु मातृत्वाला आसुसलेल्या ग्लॅडीस यांनी गर्भाशय काढून टाकण्याच्या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला. आपली प्रजननक्षमता जपण्यासाठी त्यांनी पुढचे उपचार भारतात घेण्याचे ठरवले. पुण्यातील सह्याद्रि रुग्णालयाच्या शिवाजीनगर येथील मॉमस्टोरी विभागाच्या प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ विभागाच्या संचालिका डॉ. सुप्रिया पुराणिक यांच्याशी सल्लामसलत केली. डॉ. सुप्रिया पुराणिक यांचा स्त्रीरोगविषयातील गुंतागुंतीची आव्हानात्मक प्रकरणे हाताळण्यात प्रसिद्ध आहेत. चर्चेअंती डॉ. पुराणिक आणि त्यांच्या टीमने हे आव्हान घेण्याचे ठरवले आणि १९ एप्रिल रोजी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये खालील प्रक्रियांचा समावेश होता.

० लॅपारोटॉमी आणि अधेसिओलिसिस (आतड्यांचे गुंता सोडवणे) – पोटाच्या आतील भागातील तसेच वेगवेगळ्या अवयवांमधील समस्यांच्या निराकरण्यासाठी लॅपोरोटॉमी आणि अधेसिओलिसिस ही शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिला रुग्णाच्या शरीराच्या आतील जखमा किंवा गाठी काढून टाकल्या.

० बायलॅटरल इंटर्नल इलियाक अँड यूटेरीन आर्टरी लीगेशन – ही एक अशी प्रक्रिया होती ज्यामध्ये गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बांधल्या गेल्या, जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव कमी करता येईल. या पद्धतीमुळे रक्तस्त्राव लक्षणीयरीत्या कमी झाला.

० हिस्टरोटॉमी – गर्भाशयात अडकलेले ऊतक काढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यात गर्भाशयाला छेद देण्यात आला. परिणामी, महिलेच्या शरीरात संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत झाली.

० मायोमेक्टॉमी – गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली.

भविष्यात गर्भधारणा झाल्यानंतर यशस्वी प्रसूतीनंतर निरोगी बाळ जन्माला यावे, आणि गर्भाशयाच्या कमजोरीमुळे होणा-या भविष्यातील गर्भपातांना टाळता यावे यासाठी डॉक्टरांनी रुग्णाच्या गर्भाशयाच्या मुखाला सर्जिकल टाके घातले. यावेळी महिलेच्या गर्भाशयाचे पुनर्रचनाही करण्यात आले. या शस्रक्रियेमुळे महिलेला इतर महिलांप्रमाणे सामान्य गर्भाशय मिळाले. यासह, गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे शारिरीक घटकही पुनस्थापित झाले.

डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी सांगितले, ‘‘ही केस माझ्या करिअरमधील एक आव्हानात्मक केस होती. यापूर्वी रुग्णाच्या अनेक शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. शरीरातील रक्तवाहिन्यांची विचित्र जुळवणीगर्भाशयातील आतल्या बाजूला असलेली प्लेसेंटा अक्रेटा त्यामुळे होणार अनियंत्रित रक्तस्त्राव – या सगळ्यामुळे गर्भाशयाला मोठे नुकसान होण्याची भीती होती. तरीही ग्लॅडीसला मातृसुख देण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी होतो. आताग्लॅडीस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असूनत्यांची तब्येत स्थिर आहे. मातृत्वसुख अनुभवता येणार असल्याने त्यांनी सह्याद्रिच्या डॉक्टरांना धन्यवाद दिले. सर्व कठिण परिस्थितीवर मात करत प्रत्येक महिलेचे आई बनण्याचे स्वप्न आम्हांला मॉमस्टोरीतून पूर्ण करायचे आहे. आमच्यासाठी ही घटना मेडिकल केसपेक्षाही जास्त महत्त्वाची होती. धैर्यजिद्द आणि जगाला नवी आशा देण्याची ही कथा आहे,’’ या शब्दांत डॉ. पुराणिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारत आणि थायलंडमध्ये हरित हायड्रोजन उपाययोजनांचा वेग वाढवण्यासाठी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडची आंतरराष्ट्रीय क्लीन-टेक सहयोगीसोबत भागीदारी

नवी दिल्ली – तेल आणि वायू, ऊर्जा आणि प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष प्रक्रिया पाइपिंग सोल्यूशन्स पुरवणारी भारतातील आघाडीची कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडने (DDEL) शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी International Clean-Tech Partner सोबत एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या सहयोगाद्वारे DDEL हरित हायड्रोजन क्षेत्रात प्रवेश करत असून भारत आणि थायलंडमध्ये मॉड्युलर हायड्रोजन उत्पादन प्रणालींच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे.

नव्याने करण्यात आलेल्या सामंजस्य करार (MoU) अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हरित हायड्रोजन उत्पादन प्रणाली प्रकल्पांची संकल्पना, निविदा आणि अंमलबजावणी करतील. या भागीदारीमध्ये इलेक्ट्रोलायझर्स, सेपरेटर्स आणि हायड्रोजन शुद्धीकरण प्रणाली यांसारख्या हायड्रोजन तंत्रज्ञानातील International Clean-Tech Partner चे जागतिक पातळीवरील अग्रणी  नेतृत्व आणि DDEL ची 99.9999% शुद्धतेच्या अतिशय शुद्ध हायड्रोजन शुद्धीकरण प्रणाली तयार करण्याची ताकद यांचा समावेश असेल. याला प्रकल्प अंमलबजावणी, विपणन कौशल्य आणि दीर्घकालीन ग्राहक नेटवर्क यांची जोड दिली जाईल.

डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्ण ललित बंसल म्हणाले, “ही भागीदारी म्हणजे आमच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक निर्णायक टप्पा आहे. International Clean-Tech Partner चे सिद्धहस्त तंत्रज्ञान आणि DDEL च्या अंमलबजावणीतील कौशल्यासह, भारत व थायलंडच्या हरित हायड्रोजन उद्दिष्टांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती साधू शकू असा आमचा विश्वास आहे. हायड्रोजन हे जागतिक डीकार्बोनायझेशनचे प्रमुख साधन होणार असून, अशा द्रष्ट्या आणि सक्षम भागीदारासोबत मार्गक्रमण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”

International Clean-Tech Partner कंपनीला पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा प्रणालीतील उत्कृष्टतेची परंपरा लाभलेली असून प्रगत हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, फ्ल्यू गॅस क्लीनिंग सिस्टम्स आणि अल्ट्रा-लो इमिशन टेक्नॉलॉजीजसह जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. अनेक देशांमध्ये असलेले कंपनीचे प्रकल्प उच्च कार्यक्षमतेसह पर्यावरणपूरक शाश्वत परिणाम साधतात.

त्याच वेळी, DDEL ने अलीकडेच M/s Molsieve Designs Limited मधील बहुतांश हिस्सा विकत घेतल्याने आपला ग्रीन एनर्जी पोर्टफोलिओ भरीव बळकट केला आहे. ही कंपनी 22 वर्षांहून अधिक काळ 99.9999% शुद्धतेची हायड्रोजन शुद्धता प्रणाली तयार करण्याच्या अनुभवासह कार्यरत आहे. या अधिग्रहणामुळे DDEL ची स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक आणि उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सामंजस्य करारामधील मुख्य मुद्दे:

·         International Clean-Tech Partner कंटेनराइज्ड व मॉड्युलर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांसाठी तांत्रिक सहाय्य, कोअर सिस्टीम्स व सबसिस्टीम्सचा पुरवठा तसेच डिजिटल मॉडेल, कागदपत्रे आणि संयुक्त ब्रँडिंग उपक्रमांमध्ये सहकार्य करेल.

·         DDEL स्थानिक विपणन, निविदांमध्ये सहभाग, प्रकल्प अंमलबजावणी, कायदेशीर मंजुरी प्राप्त करणे आणि भारत व थायलंडमधील दीर्घकालीन विक्रीनंतर सेवासुविधा य यांची जबाबदारी सांभाळेल.

भागीदारीचे थोडक्यात फायदे:

Ø  या सहयोगामुळे दोन्ही कंपन्यांना जलद वाढणाऱ्या क्षेत्रात स्पर्धात्मक अग्रक्रम मिळेल. याचे कारण हायड्रोजन आधारित पायाभूत सुविधा प्रभावीपणे विस्तारण्यासाठी जागतिक तांत्रिक सखोलता आणि स्थानिक अंमलबजावणी क्षमता यांचा संगम फार थोड्या कंपन्यांकडे आहे.

Ø  भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी संलग्नता:

हा सहयोग भारत सरकारच्या “भारताला ग्रीन हायड्रोजन व त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या उत्पादन, वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या” दृष्टीकोनाशी थेट सुसंगत आहे. भारतात आणि इतरत्र ग्रीन हायड्रोजन प्रकल्प पुढे नेऊन, DDEL देशाच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे लक्ष्य गाठण्यास हातभार लावत आहे, त्याचप्रमाणे जीवाश्म इंधनांवरील परावलंबन कमी करत अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात डीकार्बोनायझेशन घडवून आणत आहे.

ही भागीदारी भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि थायलंडच्या अक्षय ऊर्जा रोडमॅपशी पूर्णपणे सुसंगत असून, DDEL च्या शाश्वत पायाभूत सुविधांबाबतच्या बांधिलकीस आणि स्वच्छ, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील जागतिक परिवर्तनास बळकटी देते.

ही भागीदारी दीर्घकालीन भागधारक मूल्य निर्माण करेल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात DDEL ला एक महत्त्वाची कंपनी म्हणून स्थापित करेल असा संचालक मंडळाचा विश्वास आहे. 

नवीन प्रभाग रचनेला हायकोर्टात आव्हान:कोर्टाची राज्य निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

छत्रपती संभाजीनगर-सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक नवीन प्रभाग रचनेसह होणार आहे. पण औशाच्या माजी नगराध्यक्षांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्याचे औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचनेसंबंधी गत 10 तारखेला जारी केलेल्या आदेशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 8 जुलै 2022 रोजी स्थगित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती नीतीन सांबरे व न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात कोर्टाने राज्य निवडणूक आयोगासह महायुती सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणी आता 19 जून रोजी सुनावणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने 14 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागास एक पत्र दिले. त्यात राज्यातील प्रलंबित नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपंचायत व महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले. यात यापूर्वीच निवडणूक जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतींचाही समावेश होता. त्यानंतर राज्य सरकारने 10 जून 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्ते अफसर शेख यांनी सरकारच्या या आदेशांवर आक्षेप घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मे 2022 च्या आदेशांनुसार राज्य सरकारचे नवीन प्रभाग रचनेचे आदेश रद्दबातल ठरतात. एकदा निवडणूक जाहीर झाली की त्यात कोणतेही बदल करता येत नाहीत. विशेषतः राज्य निवडणूक आयोग व राज्य शासनाने नंतर घेतलेले विविध निर्णय व अधिसूचनाही प्रभावी होत नाहीत, अशी बाब शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कोर्टाने राज्य निवडणूक आयोग व सरकारला नोटीस बजावली.

सुप्रीम कोर्टाने गत महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे व यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किंवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व जिल्हा परिषदांची लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे कोर्टाने म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेणे हे लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदांपर्यंत सर्वच प्रतिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे. हे अत्यंत गंभीर आहे, असेही कोर्ट या प्रकरणी म्हणाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे महाराष्ट्रातील विविध महापालिकांच्या निवडणुकांना आता गती मिळाली आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिकांचे कार्यकाळ संपल्याने प्रशासकांच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. पण आता कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका टाळणे अशक्य झाले आहे. परिणामी, राज्य सरकारवर मोठा राजकीय व न्यायिक दबाव निर्माण झाला आहे.

कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा : शमा भाटे

पुणे : कलाकाराने कलेतून आनंद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत कलाकाराने कलेला पूरक रंगभूषा, वेशभूषा, तांत्रिक बाबी, रंगमंच व्यवस्थापन, प्रकाश योजना यांचा अर्थार्जनासाठी सहाय्यक म्हणून विचार करण्यास हकरत नाही, परंतु हे करत असताना स्वत:च्या रियाजाकडे दुर्लक्ष करता कामा नये. यासाठी वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कथक नृत्यगुरू शमा भाटे यांनी केले.

‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ विषयावरील चर्चासत्राचे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे आज (दि. 13) बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले होते. यात ‌‘नृत्य कला आणि करियर‌’ या विषयावर नृत्यगुरू शमा भाटे, भरतनाट्यम नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक प्रा. शारंगधर साठे आणि भारती विद्यापीठातील नृत्यविभाग प्रमुख देविका बोरकर यांनी संवाद साधला.

स्मिता महाजन म्हणाल्या, आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या कलेच्या क्षेत्राकडे ओढा वाढताना दिसत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे योग्य मूल्यमापन, सर्वसमावेशक अभ्यासक्रम, वर्गीकरण याविषयी विचार होत आहेत. आज ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, संगीत, शरीरशास्त्र, संवाद कौशल्य यांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कलाकाराने सर्जनशील असण्याबरोबरच स्वयंप्रेरणेने नवनिर्मिती करणे गरजेचे असून स्वआनंदासाठी कला शिकावी व शिकवावी.

आसाममधील सत्रिय नृत्यकलेविषयी अवगत करून देविका बोरठाकूर म्हणाल्या, सत्रिय हा कलाप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. त्या पुढे म्हणाल्या, कलाकाराच्या सादरीकरणातून रसिक नेहमी शाश्वत शांतीची अपेक्षा करीत असतो, जी देण्यासाठी आम्ही कलाकार कटिबद्ध राहतो.

एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे मोहम्मद आरिफ खान यांची डेप्युटी सीईओ म्हणून नियुक्ती

मुंबई; 13 जून 2025: भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने श्री. मोहम्मद आरिफ खान यांची डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

श्री. मोहम्मद आरिफ खान हे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उल्लेखनीय सेवा केलेले एक अनुभवी बँकिंग व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील विविध धोरणात्मक आणि कार्यकारी विभागांमध्ये समृद्ध अनुभव आणि नेतृत्वगुण आहेत.

श्री. मोहम्मद आरिफ खान यांनी 2000 मध्ये एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर रिटेल बँकिंग, स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग युनिट (STU), कोअर बँकिंग सोल्युशन (CBS) अंमलबजावणी व प्रशिक्षण प्रकल्पांसह अनेक महत्त्वाच्या अग्रणी भूमिका पार पाडल्या आहेत. सध्या ते एसबीआयच्या तिरुवनंतपुरम येथील स्थानिक मुख्यालयात जनरल मॅनेजर, नेटवर्क-I म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व कार्यप्रणाली उपक्रमांचे नेतृत्व केले.

नियुक्तीबाबत बोलताना एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवीन चंद्र झा म्हणाले, “श्री मोहम्मद आरिफ खान यांचे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या नेतृत्व संघात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विविध बँकिंग कार्यप्रणालीतील त्यांचा सखोल अनुभव, उत्कृष्ट धोरणात्मक कौशल्ये व व्यवसायातील खोल समज कंपनीला उच्च शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. नाविन्यपूर्णता, ग्राहक मूल्य वृद्धी याला आम्ही चालना देत असताना आणि सर्वसाधारण विमा उद्योगातील आमचे स्थान बळकट करण्याच्या प्रवासात त्यांच्या सोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

आपल्या नियुक्तीबाबत बोलताना श्री मोहम्मद आरिफ खान म्हणाले, “एसबीआय जनरल इन्शुरन्स कुटुंबाचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतातील जनरल इन्शुरन्स क्षेत्रामध्ये परिवर्तनात्मक विकासाची प्रचंड क्षमता आहे आणि त्या वाटचालीचे नेतृत्व करण्याची संधी एसबीआय जनरलकडे आहे असे मला वाटते. उत्तम ग्राहक अनुभव तयार करण्यासाठी, लाभदायक वाढीची पूर्तता करण्यासाठी, सतत बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याकरता  आणि वंचित बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझा भर आपले ग्राहक, समभागधारक आणि आपण सेवा देत असलेल्या समुदायांसाठी अर्थपूर्ण मूल्य निर्माण करण्यावर असेल.”

श्री आरिफ खान हे गणित विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असून ते सर्टिफाइड इन्फर्मेशन सिस्टिम्स ऑडिटर (ISACA, USA) आहेत. त्यांनी अ‍ॅडव्हान्स्ड वेल्थ मॅनेजमेंट (IIBF) मध्ये PGDFA आणि रिस्क मॅनेजमेंट अँड अॅफीलीएट ऑफ रिस्क मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे RMAI सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. त्यांची ही नियुक्ती एसबीआय जनरलच्या नेतृत्व संघाला बळकटी देण्याच्या व आपल्या मौल्यवान ग्राहकांसाठी उत्कृष्ट विमा उत्पादने व सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार: हणमंतराव गायकवाड

‘आयसीएआय’तर्फे सनदी लेखापालांसाठी आयोजित ‘नवोन्मेष २०२५’, दोन दिवसीय विभागीय परिषदेचे उद्घाटन

पुणे: “सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे शिल्पकार आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. केवळ कर सल्लागार म्हणूनच नव्हे, तर धोरणात्मक सल्लागार, संशोधक आणि विश्वासार्हता निर्माण करणारे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी ‘बीव्हीजी’ची यशोगाथा सांगत उपस्थितांना प्रेरित करत त्याग व समर्पण भावनेचे महत्व विशद केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, ‘आयसीएआय’ पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवोन्मेष २०२५’, या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेटमध्ये आयोजित सोहळ्यात ‘डब्ल्यूआयआरसी’ व परिषदेचे चेअरमन सीए केतन सैया, उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, खजिनदार सीए फेनील शाह, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे, सीए विजेंद्र जैन, सीए राकेश शहा, ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, ‘विकासा’ चेअरपर्सन सीए प्रज्ञा बंब, व्यवस्थापन समिती सदस्य सीए ऋषिकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकर, पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, ‘विकासा’ चेअरपर्सन सीए धीरज बलदोटा, व्यवस्थापन समिती सदस्य सीए सचिन ढेरंगे व सीए शैलेश बोरे यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. सनदी लेखापाल व्यावसायिकांसाठी करसुधारणा, वित्तीय तयारी, ऑडिट यंत्रणा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ‘भारतीय उत्पन्न कर व्यवस्थेतील बदलते परिदृश्य’, ‘स्टॅच्युटरी ऑडिटपासून फॉरेन्सिक ऑडिटकडे बदलत्या जबाबदाऱ्या’, ‘व्यावसायिक ब्रँडिंग – प्रॅक्टिशनर ते थॉट लीडर’, ‘एआय ऑटोमेशन व सीए क्षेत्रातील बदल’, ‘जीएसटीतील महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम’, ‘आयपीओ रेडिनेस व भांडवली बाजाराचे भविष्य’ व ‘स्टार्टअप फिनान्सिंग: २०२५ मध्ये सीएंना आवश्यक माहिती’ या विषयावर तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे झाली.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, “देशात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि विकासाच्या मूलभूत गोष्टी रुजविण्याचे काम सीए करत असतात. खर्चाची बचत, उद्योगांत वाढ व नफा मिळवून देण्यात सीए योगदान देतात. त्यांच्या सूक्ष्म व धोरणात्मक नियोजनातून कोणत्याही उद्योगाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. प्रत्येक भारतीयाचे आर्थिक आरोग्य सांभाळणाऱ्या सनदी लेखापालांचे कौतुक वाटते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रणालींमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. सनदी लेखापालांनी स्वतःला अद्ययावत ठेवून हे नवे बदल समजून घ्यायला हवेत.”

“स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन भारत विकास प्रतिष्ठान सुरु केले. त्यातूनच पुढे भारत विकास ग्रुपची निर्मिती झाली. आठ लोकांपासून सुरु केलेला हाऊसकिपींगचा हा व्यवसाय देशव्यापी झाला आहे. राष्ट्रपती भवन, संसद, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान कार्यालय यासह अन्य प्रमुख सरकारी संस्था, जगप्रसिद्ध मंदिरे, विमानतळ अशा महत्वाच्या ठिकाणी ‘बीव्हीजी’ हाऊसकिपींग सेवा पुरवत आहे. शेतकऱ्यांसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही काम करत आहोत. हे काम करताना सेवाभावी वृत्ती जपली आहे. त्यामुळे आत्मिक समाधान खूप मिळते,” असे गायकवाड यांनी नमूद केले.

सीए केतन सैय्या म्हणाले, “आपला व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणारा आहे. त्यामुळे सतत नवनव्या गोष्टी आत्मसात करून आर्थिक प्रगती कशी साधता येईल, याचा विचार केला पाहिजे. सनदी लेखापालांना चांगले व्यासपीठ व सेवा मिळाव्यात, यासाठी संस्थेकडून न्यायसेतू, भाग्योदय, निर्यात सेवा, चाणक्यनीती, टेकएज, सप्तर्षी यांसारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. व्यापक विचार, नव्या संधी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी अशा स्वरूपाच्या परिषदा महत्वाच्या ठरतात.”

सीए गायत्री मनोहर, अंतरा मिणियार व माही जोशी यांच्या मोहक नृत्य गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीए सचिन मिणियार दोन दिवसीय परिषदेचे महत्व विशद केले. सीए वैभव मोदी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके व पिंपरी चिंचवड ‘विकासा’ शाखेचे चेअरपर्सन सीए धीरज बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

गणपती मंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारी यांचा सन्मान

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

पुणे : कसबा गणपतीचे विशिष्ट पद्धतीने शेंदूर लेपन करणारे गुरुजी…भाविकांना संस्कृतसह इंग्रजी भाषेत मंत्राचे अर्थ सांगणारे मंडई गणपतीचे गुरुजी…वेळेचे काटेकोर पालन करीत पहाटेपासून श्रद्धेने भगवंताची उपासना करणारे दगडूशेठ गणपतीचे गुरुजी….केवळ विधी पार न पाडता भक्ती, धर्मशास्त्र आणि वैदिक परंपरेचा समन्वय साधत  पिढ्यानपिढ्या श्रद्धेने भगवंताची सेवा करणाऱ्या गुरुजींचा सन्मान सोहळा श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे करण्यात आला.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपती मंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात हा सन्मान सोहळा झाला. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, अभिनेत्री वाळके, मयूर दिवेकर, चकोर सुबंध, साई डोंगरे, प्रतिक इप्ते, किरण चौहान,सागर पेद्दी, उपस्थित होते. तुळशीबाग गणपतीची प्रतिमा सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते.

अण्णा थोरात म्हणाले, पौरोहित्य करणारे गुरुजी हे मनापासून त्यांचे काम करत असतात. परदेशातून अनेक लोक दर्शनासाठी येतात. पुजेला बसतात. यावेळी गुरुजी संस्कृतमधून मंत्रोच्चार करत असताना त्याचा अर्थ इंग्रजीत देखील सांगतात, जेणेकरुन आपण काय पुजा करतोय, कशासाठी करतोय हे परदेशी लोकांना देखील कळेल. आपले वेद संस्कृतीचा प्रचार यामाध्यमातून गुरुजी करत असतात.

महेश सुर्यवंशी म्हणाले, आपण भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरात जातो. त्या मंदिराचे वातावरण प्रसन्न ठेऊन त्याची व्यवस्था अतिशय चोखपणे गुरुजी सांभाळत असतात. वेगवेगळ्या देवाच्या उपासना वेगवेगळ्या असतात त्यांची शास्त्रशुद्धपणे पूजा अर्चा गुरुजी करतात. त्यांच्यामुळेच धर्म टिकून राहतो. रमेश भागवत, श्रीकांत शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.

समाज कल्याण विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी

पुणे : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वर्गीकरण करून तो अन्यत्र वळवण्याचा प्रकार सातत्याने केला जात असल्याचे आरोप सर्व स्तरातून होत आहेत. या संदर्भामध्ये सत्यस्थिती लोकांना समजावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थ मंत्रालयाद्वारे मागील पाच वर्षांमध्ये अर्थ विभागाने सामाजिक न्याय विभागाला दिलेल्या निधीबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी लेखी निवेदनाद्वारे अजित पवार यांच्याकडे केली आहे

समाज कल्याण विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी तसेच यापूर्वी मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेसाठी वापरण्यात आल्याचे गंभीर आरोप विरोधी पक्षांसह अनेक आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने केला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यावर अद्याप पर्यंत सविस्तर उत्तर अर्थ मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली नाही, त्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे.  राज्य विधिमंडळाच्या 30 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपर्यंत ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी डंबाळे यांनी केली आहे

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारावेत, याबाबतचे निवेदन यापूर्वीच सर्वपक्षीय आमदारांना रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने पाठवण्यात आले असल्याचेही डंबळ यांनी कळविले आहे.  या अधिवेशन कालावधीमध्ये या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी मुंबई येथे अनुसूचित जाती प्रवर्गाचे व अनुसूचित जमाती  प्रवर्गाचे हित पाहू इच्छिणाऱ्या आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये समाजाच्या वतीने ही मागणी त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचीही डंबाळे  यांनी सांगितले

तसेच आपल्या पत्राचा सकारात्मक विचार करून अजित पवार हे विहित वेळेत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करतील अशी अपेक्षा व्यक्त करत जर ती प्रसिद्ध झाली नाही तर आंबेडकरी चळवळ आंदोलनाच्या भूमिकेत राहील, असा स्पष्ट इशारा डंबाळे यांनी दिला आहे.

ज्या देशात कलेला स्थान नाही त्या देशात दहशतवाद फोफावतो : तालयोगी पंडित सुरेश तळवलकर

तीन दिवसीय ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ उपक्रमाचे उद्घाटन

‌‘कला आणि करिअर‌’विषयी तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

पुणे : कला म्हणजे उर्जा निर्मिती आहे. ती सूक्ष्म, संवेदनशील असून तिच्यापर्यंत जाण्यासाठी कलाकाराकडे समर्पण भाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. कलेतील मूल्ये शिकवली जात नाही तर ती संस्कारित केली जातात. शास्त्र समजावले जाते, विद्या दिली जाते, तंत्र शिकविले जाते तर कला-सौंदर्य संस्कारित केले जाते. कला आत्मसात करण्यासाठी भावना शुद्ध हवी. ज्या देशात कलेला स्थान नाही तेथे दहशतवाद फोफावताना दिसतो, अशी मार्मिक टिप्पणी तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी केली. आजच्या काळातही गुरू-शिप्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आज (दि. 13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पंडित सुरेश तळवलकर बोलत होते.

नृत्यगुरू सुचेता चापेकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक, प्रा. शारंगधर साठे, निकिता मोघे मंचावर होते. पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांची उपस्थिती होती. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.

कला ही कागदावर मांडता येत नाही ती गुरू-शिष्य तसेच मौखिक परंपरेतूनच प्रवाहीत होते, असे सांगून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर पुढे म्हणाले, ही परंपरा जपल्यास कलाकार घडण्यास मदत होते आणि यातूनच पुढील पिढी कलेच्या क्षेत्राकडे वळते. आताचा काळ संगीत क्षेत्रासाठी उत्तम आहे. संगीत आणि नृत्य या कला वेगळ्या होऊ शकत नाही. स्वत:त रमणे हा कलेचा स्थायीभाव असतो. कला शिकताना आणि शिकविताना विचारांची बैठक महत्त्वाची असून ही आनंदासाठी करण्याची गोष्ट आहे.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, कलेच्या क्षेत्रात पारंगतता येण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे याचा आनंद आहे. या क्षेत्रात कौशल्यासह त्यातील बारकावे जाणून घेतल्यास कलेची जोपासना करणे सोपे जाते. कला क्षेत्रात परिपूर्णता आणि अचूकता महत्त्वाची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील करिअरविषयक विविध क्षेत्रे खुली होणार आहेत.

नृत्यगुरू सुचेता चापेकर म्हणाल्या, नृत्य कलेमध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य या सर्व कलांचे अस्तित्व आहे. तसेच शरीरशास्त्र, तंत्रज्ञान, रंगमंचाचा वापर, प्रकाशयोजना, ध्वनी योजना या तांत्रिक गोष्टी देखील नृत्य कलेशी संबंधित आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून कला आणि त्याच्याशी निगडित तंत्रांविषयी विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होईल. कलेशी संलग्न विषयांचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी तंत्रशिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातील शिक्षणाची आज आवश्यकता असून त्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे सांगितले.

सुरुवातीस प्रास्ताविकात प्रसाद मिरासदार यांनी ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित ‌‘कला आणि करिअर‌’ या उपक्रमाची माहिती विशद केली. शारंगधर साठे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुनील महाजन यांनी मानले.

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव… ‘झेप’ उपक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात संपन्न !

पुणे : पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासमवेत द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे श्री. रोहित शिंदे आणि श्री. विजय कोल्हटकर, ममता बाल सदनचे अध्यक्ष श्री. दिपक गायकवाड, तसेच द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विनय सपकाळ हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माईच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा मा. ममता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी ‘झेप’ उपक्रमाच्या उद्देशांवर प्रकाश टाकत सांगितले की, “ही केवळ उपक्रमाची सांगता नसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा एक टप्पा आहे.

नारंग सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “अनाथ मुलांना ते अनाथ असल्याची जाणीव न होऊ देता, त्यांना कुटुंबवत प्रेम, योग्य शिक्षण आणि सुविधा देणे हेच आदरणीय माई आणि आदरणीय आदर पूनावाला सर यांचे ध्येय आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी ही संस्था जवळून पाहत असून तिचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे”
मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, या प्रसंगी नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी यंदा पासून दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी रु. ५०००/- ची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दिनेश शेटे, पाहुण्यांचा परिचय श्री. प्रताप चिंचोले, तर आभार प्रदर्शन सौ. पद्मा शिंदे यांनी केले.

‘झेप’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आणि कलेच्या विविध अंगाचा विकास साधत त्यांच्यातील सुप्त गुणांना नवी दिशा दिली आहे. हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, याची खात्री आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने शनिशिंगणापूर देवस्थानने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना दिला नारळ

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे देवस्थानने या भगव्या संघटनांच्या दबावामुळे ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे.मंत्री नीतेश राणे यांनीही हकालपट्टीची मागणी केली होती.नीतेश राणे यांच्या या भूमिकेमुळे शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरील दबाव वाढला होता. त्यामुळे त्यांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून या वादातून स्वतःची सुटका करून घेतली, असा आरोप केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विख्यात असणाऱ्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी गत 21 मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेत या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी 14 जून रोजी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले, पण त्याचवेळी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची नियुक्ती मंदिराच्या मुख्य चौथऱ्यावर किंवा गर्भगृहात करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.

हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत. यातील काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते. पण या प्रकरणी देवस्थानवरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकूण 167 जणांना कामावरून कमी केले. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारीच हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणताही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसला तर हे लोक त्याला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही, असे ते म्हणाले होते.

इराणचा इस्रायलवर 100 ड्रोनने प्रत्युत्तराचा हल्ला: सकाळी इराणचे 4 आण्विक, 2 लष्करी स्थळ उद्ध्वस्त

इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून इराणने १०० हून अधिक ड्रोन डागले आहेत. इस्रायल संरक्षण दलांनी म्हटले आहे की हे ड्रोन पुढील १ ते २ तासांत इस्रायलपर्यंत पोहोचू शकतात.सध्या हे ड्रोन इराक आणि जॉर्डनच्या हवाई हद्दीत आहे. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये सायरन वाजू लागले आहेत.टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, आयडीएफने इशारा दिला आहे की इराण लवकरच एक मोठा क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो.

आज सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने तेहरानभोवती असलेल्या किमान ६ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या ६ पैकी ४ ठिकाणी आण्विक तळदेखील आहेत.राणच्या सरकारी माध्यमांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर हुसेन सलामी इस्रायली हल्ल्यात मारले गेल्याची पुष्टी केली आहे.अल-जझीराच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणचे दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ, मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फरदून अब्बासी यांचाही मृत्यू झाला.या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी, इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि काही वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायली सैन्याने आयआरजीसीच्या एरोस्पेस फोर्स चीफला मारल्याचा दावा केला आहे. आयडीएफने सांगितले की शुक्रवारी रात्री इस्रायली लढाऊ विमानांनी हल्ला केला ज्यामध्ये हाजीजादेह व्यतिरिक्त आणखी दोन वरिष्ठ एरोस्पेस अधिकारी मारले गेले. तथापि, इराणने अद्याप त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी म्हणाले की, आमचे सैन्य इस्रायलला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलने त्यांच्या लष्करी आणि अणु प्रतिष्ठानांवर केलेला हल्ला ‘युद्धाची घोषणा’ आहे. मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या घटनेबाबत संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिले आहे.
ट्रम्प यांनी इराणला अणु करार करण्यास सांगितले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या अणुकार्यक्रमावर करार करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की इराणकडे इस्रायलशी संघर्ष थांबवण्यासाठी अजूनही वेळ आहे. ते म्हणाले- “मी इराणला करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या, परंतु इराणने तसे केले नाही. काहीही शिल्लक राहण्यापूर्वी इराणने करार करावा.”

मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

मुंबईदि. १३ जून २०२५:                                                                         

मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखूर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणला वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केली आहे.

मुंबईत सध्या बेस्ट ही सार्वजनिक कंपनी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व टाटा पॉवर मुंबई या दोन खासगी कंपन्या वीज पुरवठा करतात. त्यांना समांतर परवाना देऊन महावितरणला मुंबईतही वीज पुरवठा करण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका कंपनीने केली आहे. महावितरण सध्या मुंबई शहर व उपनगरातील वर उल्लेख केलेले क्षेत्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण करते. मुंबई शहरातील मुलुंड व भांडूप या दोन उपनगरात महावितरण वीज पुरवठा करते.

विद्युत कायदा २००३ च्या कलम १४ व १५ च्या आधारे तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नियम, २००६ आणि विद्युत वितरण परवाना नियम २००५ च्या आधारे महावितरणने ही याचिका दाखल केली आहे.

महावितरण ही जगातील सर्वात मोठ्या वीज कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सध्या ३ कोटी १७ लाख वीज ग्राहकांना सेवा देते. कंपनीकडे ४२३० वीज उपकेंद्रे, सुमारे २५ हजार उच्च दाब फीडर्स, ९ लाख ६० हजार वितरण ट्रान्सफॉर्मर्स, ११ किलोव्होल्टच्या ३.६४ लाख किलोमीटर लांबीच्या वाहिन्या, ३३ किलो व्होल्टच्या ५१,७७१ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या असे प्रचंड वीज वितरण जाळे आहे. महावितरण राज्यातील ४५७ शहरांना आणि ४१,९२८ खेड्यांना वीज पुरवठा करते. मुंबईची सध्याची विजेची गरज ४ हजार मेगावॅट आहे तर महावितरण सध्या राज्यात दररोज २६ हजार मेगावॅट वीज पुरवठा करत आहे.

विद्युत कायदा २००३ अंमलात आल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार आधीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे (एमएसईबी) चे तीन कंपन्यांत विभाजन करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण २००५ मध्ये अस्तित्वात आली. एमएसईबी आणि महावितरण असा कंपनीला गेल्या सुमारे ७० वर्षांचा महाराष्ट्राला वीज पुरवठा करण्याचा अनुभव आहे.

कोस्टल मार्ग आणि मेट्रो जाळ्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्यामुळे निवासी रिअल इस्टेट क्षेत्रासह औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्राचा मोठा विस्तार होत आहे. डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात वीज लागते आणि अशी अनेक सेंटर्स मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात विकसित करण्यात येत आहेत. या खेरीज सेवा क्षेत्रातील अनेक व्यवसायांचा विस्तार होत आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्याची गरज भासणार आहे.

महावितरणने रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅननुसार राज्याची सध्याची ४२ हजार मेगावॅटची विजेची क्षमता आगामी पाच वर्षात ८१ हजार मेगावॅटवर नेण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. यामध्ये हरित ऊर्जेवर भर दिला असून कंपनीला किफायतशीर दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे महावितरणने प्रथमच आपल्या ग्राहकांसाठी वीजदरात कपातीचा प्रस्ताव आयोगासमोर सादर केला आहे.

रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅनमुळे राज्याची विजेची गरज भागवून मुंबईतही वीज पुरवठा करण्याइतकी पुरेशी वीज महावितरणकडे उपलब्ध असेल. महाराष्ट्रासोबत मुंबईकरांनाही हरित आणि स्वस्त विजेचा लाभ होण्यासाठी महावितरणने आपल्याला मुंबईतही वीज वितरणाचा परवाना देण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपातसमाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही- मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई, दि. १२ : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते. मतदारयादीत नावांची भर घालणे किंवा वगळणे याबाबत काही अतिशयोक्त दावे करण्यात आले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने, काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये, विधानसभा निवडणुकांपूर्वी, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आले आणि एक लाखाच्या आसपास असलेल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रारूप व अंतिम मतदार यादींच्या (सॉफ्ट आणि हार्ड कॉपी) प्रती सर्व मान्यताप्राप्त पक्षांना प्रदान करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील मतदारसंख्येच्या वाढीबाबत लेखातील माहिती दिशाभूल करणारी आहे. वास्तविक माहिती पुढीलप्रमाणे आहे :
• २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान १.३९ कोटी नावांची भर पडली, तर १.०७ कोटी नावांची वजाबाकी झाली. त्यामुळे एकूण निव्वळ वाढ ३२.२५ लाख मतदारांची झाली.
• २०२४ लोकसभा ते २०२४ विधानसभा निवडणुका या काळात ४८.८२ लाख नवीन नावे जोडली गेली, आणि ८ लाख वगळली गेली. त्यामुळे निव्वळ वाढ ४०.८१ लाख इतकी होती. त्यात १८ ते २९ वयोगटातील २६ लाखांहून अधिक नवमतदार होते.
• एकूण भर (Gross Addition) ही २०१९ ते लोकसभा २०२४ मध्ये १.३९ कोटी, आणि लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ मध्ये ४८.८२ लाख इतकी होती.

मतदारांची संख्या प्रक्षेपित प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक का आहे यासंदर्भातही स्पष्टीकरण आवश्यक असून कोणतेही आकडेवारीचे साधन हे केवळ सांख्यिकीय अंदाजासाठी असते. मतदार नोंदणी ही प्रत्यक्ष फॉर्म्स, क्षेत्रीय पडताळणी, आणि कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार निर्णय घेऊन केली जाते. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असते आणि सर्व मान्यताप्राप्त पक्षांशी यामध्ये सातत्याने समन्वय साधला जातो.

मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करताना प्रत्येक राजकीय पक्षाने बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमलेले असतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रात २८,४२१ बीएलए नियुक्त केले होते. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत या एजंटांकडून किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांकडून कोणतीही गंभीर तक्रार प्राप्त झालेली नाही. ही बाब निवडणुकीनंतरच उपस्थित केली गेली आहे.

मतदार याद्यांचे वाटप :
मतदार यादी दरवर्षी सहभागात्मक पद्धतीने पुनरिक्षणाद्वारे अद्ययावत केली जाते. या प्रक्रियेत प्रारूप आणि अंतिम स्वरूपातील यादी सर्व मान्यताप्राप्त पक्षांना विनामूल्य दिली जाते. हीच प्रक्रिया २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही राबवण्यात आली होती आणि यादी पक्षांना देण्यात आली होती.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली संपूर्ण मतदारयादी आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम ३३ नुसार कोणतीही व्यक्ती, संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज करून निर्धारित शुल्क भरून मतदारयादीची प्रत मिळवू शकतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (INC) नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरही अशाच स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. त्या उत्तराची प्रत आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
(खाली लिंक दिली आहे) https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzPKLkuiExxOKadAHYzWQYgrziMWVM9RdSa49qKKjiLLCWX%2FdIawdRjv6WA2GoknYcyLIzu4lIXP3VRXySBy%2F%2Bwg%3D%3D