Home Blog Page 460

टेस्लाचे देशातील पहिले शोरूम मुंबईत सुरू:अमेरिकेत ३२ लाखाला पण भारतात आयातकरामुळे ६०/७० लाखाला मिळेल

मुंबई-टेस्लाचे पहिले स्टोअर आज मुंबईत उघडले आहे.महाराष्ट्र राज्य हे जागतिक दर्जाच्या सर्व ईव्ही कंपन्यांसाठी फेव्हरेट डेस्टिनेशन झाले असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या सर्व कंपन्यांच्या गाड्या धावण्यासाठी राज्यातील महामार्ग हे जागतिक दर्जाचे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मुंबईमध्ये टेस्लाच्या देशातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

या कार्यक्रमात, कंपनीने त्यांची कॉम्पॅक्ट क्रॉसओवर इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल वाय देखील लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 575 किलोमीटरपर्यंत धावू शकते.जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या कंपनी टेस्लाचे पहिले शोरूम आज, म्हणजे 15 जुलै रोजी मुंबईतील पॉश वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडले आहे. टेस्ला शोरूमच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील पोहोचले होते.हे स्टोअर लोकांसाठी अनुभव केंद्र म्हणून काम करेल. म्हणजेच, येथे केवळ कार विकल्या जाणार नाहीत, तर लोकांना टेस्लाचे तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये देखील जवळून पाहता येतील.

विशेष पाहुणे, उद्योग भागीदार आणि मीडियाचे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर, शोरूम लवकरच सामान्य लोकांसाठी खुले केले जाईल. टेस्लाने प्रथम भारतात मॉडेल Y लाँच केले आहे.

ते चीनमधून आयात केले गेले आहे, म्हणून भारतात आयात शुल्कानंतर, सुरुवातीची किंमत 60 लाख रुपये आहे. अमेरिकेत त्याची किंमत 32 लाख रुपये आहे. म्हणजेच, भारतात ते 28 लाख रुपये महाग आहे.

येत्या काळात, कंपनी स्थानिक उत्पादन करण्याचा देखील विचार करू शकते, ज्यामुळे किंमती कमी होतील.मात्र, टेस्लाने अद्याप त्यांच्या उत्पादनाची योजना उघड केलेली नाही.
टेस्लाच्या वेब साइटनुसार, तुम्ही आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून मॉडेल वाय ऑर्डर करू शकता. ते दोन प्रकारांमध्ये लाँच केले गेले आहे. त्याची सुरुवातीची किंमत 60 लाख रुपये आहे आणि रेंज 500 किमी असेल. दुसऱ्या प्रकाराची किंमत 67.89 लाख रुपये आहे. त्याची रेंज 622 किमी असेल. त्याची डिलिव्हरी ऑगस्टपासून सुरू होऊ शकते.
टेस्ला सध्या भारतात फक्त मॉडेल वाय विकत आहे. हे कंपनीचे लोकप्रिय आणि परवडणारे पर्याय आहेत. भविष्यात मॉडेल 3, एस किंवा सायबर ट्रक सारखे इतर मॉडेल्स देखील आणले जाऊ शकतात.टेस्लाचे पहिला शोरूम मुंबईत सुरू झाले आहे. यानंतर, दिल्लीमध्ये लवकरच दुसरे शोरूम उघडण्याची शक्यता आहे. टेस्ला सध्या फक्त या दोन शहरांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि इतर शहरांमध्ये विस्ताराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. हे फक्त प्रदर्शनापुरते मर्यादित राहणार नाही तर विक्री, सेवा आणि सुटे भागांसाठी देखील संपूर्ण व्यवस्था असेल. टेस्ला हे स्वतः हाताळेल.

एलन मस्कची ईव्ही कंपनी टेस्लाने कॉम्पॅक्ट क्रॉसओवर इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल वाय लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 622 किलोमीटरपर्यंत धावू शकते. सुरक्षेसाठी, कारमध्ये लेव्हल-2 अडाससह 8 एअरबॅग्ज सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ही इलेक्ट्रिक कार दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे – लाँग रेंज ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) आणि लाँग रेंज रियर व्हील ड्राइव्ह (RWD). अमेरिकन बाजारात त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत $37,490 पासून सुरू होते. भारतात त्याची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 59,89,000 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

टेस्ला मॉडेल वाय: व्हेरिएंटची किंमत

प्रकारएक्स-शोरूम किंमत (मुंबई)ऑन रोड किंमतएक्स-शोरूम किंमत (यूएस)भारतात किती महाग आहे?
रियर व्हील ड्राइव्ह (RWD)₹५९,८९,०००₹६१,९५,६४०₹३२,००,०००₹२७,८९,०००
ऑल व्हील ड्राइव्ह (AWD)₹६७,८९,०००₹६९,१५,१९०₹३५,००,०००₹३२,८९,०००

मालवण मधील ‘उबाठा’ च्या चार माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई, 14 जुलै 2025

मालवण नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा हा विकासासाठी कटीबद्ध असून विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी योगदान देईल. या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळ सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. पक्षात प्रवेश केलेल्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आम्ही सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री.केणी म्हणाले. निष्ठेने भाजपा वाढीसाठी काम करेन असेही ते म्हणाले.

या माजी नगरसेवकांबरोबरच उबाठा शाखा प्रमुख भाई कासवकर, नितीन पवार, संजय कासवकर व सई वाघ, उपशहर प्रमुख नंदा सारंग, उपशहर प्रमुख युवासेना अमन घोडावले, अशोक कासवकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक्य -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. १४ : देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुणे येथे केले.

डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आयोजित “देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे अध्यक्ष शरद गडाख, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा, सहयोगी अधिष्ठाता महानंद माने, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने, आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, या उपक्रमाचे उद्दिष्ट देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती करणे हे असून, शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण, दुग्धव्यवसायाची उन्नती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू होता. भारतातील पारंपरिक गोवंश हे केवळ दुग्धोत्पादनासाठी नसून जैविक शेतीसाठी आवश्यक असणारे शेणखत, गोमूत्र तसेच अन्य कृषिपयोगी घटक उपलब्ध करुन देतात. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारे एक प्रभावी पाऊल आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देशी गोवंशाच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाची आवश्यकता अधिक वाढली असून, या सप्ताहाच्या माध्यमातून युवक, शेतकरी, संशोधक व अभ्यासक यांना एकत्र येऊन विचारमंथनाची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांमधून शेती क्षेत्रात नवे विचार, संशोधन व धोरणे आकार घेतील, असेल श्री. पाटील म्हणाले.

शेतीसाठी सरकारकडून भरीव अनुदान

शेतीसाठी शासनाकडून भरीव असे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
पुढे श्री कोकाटे म्हणाले, सरकारने शेतीसाठी वेगळे धोरण निर्माण केले असून दुधाचा शेतकऱ्यांना भरीव असा फायदा होणार आहे. दुग्धजन्य पदार्थासाठी सुद्धा अनुदानाची गरज असल्याचे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, दि. १४ : नागरिकांचे रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यादृष्टीने २०१३ च्या भूमिसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. ही मोबदल्याची प्रकरणे गतीने निकाली निघतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हवेली, मुळशी, वेल्हा आदी तालुक्यातील दरडग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, वस्त्या, पाड्यांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून आवश्यक तेथे पुनर्वसन, अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच हवेली तालुक्यातील जांभले या खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात असलेल्या गावातील नागरिकांना व शालेय मुलांना प्रवासासाठी बोट मिळावी या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाहीचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

कातकरी कुटुंबांना जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आलेल्या मागणीच्या अनषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यात ९ हजार २०० कातकरी कुटुंबे असून डिसेंबरपर्यंत केवळ १६ कुटुंबांकडे घरे होती. गेल्या सहा महिन्यात मोहीमस्तरावर काम करुन ९५० कातकरी कुटुंबांना जागा देण्यात आली असून त्यांना घरकुले, नियमानुसार सोयीसुविधांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. उर्वरित सर्व कातकरी कुटुंबांना येत्या ऑक्टोबरपर्यंत जमीन देण्याचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणात अधिकचा पाणीसाठा न ठेवता नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन राबविण्यात आल्यामुळे मोठ्या पावसानंतरही पूरस्थिती निर्माण झाली नाही, याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या खडकवासला कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून पाटबंधारे विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील. इंदापूर तालुक्यातील शेत रस्त्यांच्या मागणीबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर शिबीर घेऊन कार्यवाही करण्यात येईल. कालठण इत्यादी गावात बंदी असलेले मांगूर मासे पालनाबाबत गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागासोबत संयुक्त कार्यवाहीचे निर्देश पोलीस तसेच महसूल विभागाला देण्यात येतील.

तालुक्यात अंत्योदय योजनेतून दिव्यांग नागरिकांना धान्य मिळावे यासाठी इष्टांक वाढविण्याच्या मागणीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, आदी निर्देश त्यांनी दिले. सन २०१९-२० मध्ये झालेल्या गारपीठिने नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून गतीने कार्यवाही करण्यात येईल.

दौंड शहरातील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया आदींबाबत गांभिर्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील जलप्रदूषण, वायूप्रदुषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने आवश्यक ती तपासणी करून कार्यवाही करावी. शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील काटेरी झुडपे काढण्याच्या अनुषंगाने राज्य राखीव पोलीस दलाला कळविण्यात येईल, आदी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे पिण्याचे पाणी प्रदुषित होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पाणी गुणवत्ता तपासून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. अतिवृष्टीमुळे कऱ्हा नदीवरील वाहून गेलेल्या ठिकाणी नवीन बंधारे बांधणे, दुरुस्ती करणे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. डूडी यांनी सांगितले.

भोर तालुक्यातील रस्त्यांचे भूमिसंपादन, मोबदला तसेच रस्त्यांच्या कामांची गती वाढविणे आदींच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांसमवेत पुढील आठवडाभरात बैठक लावण्यात येईल.

बारामती तालुक्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना सुरू करताना करण्यात आलेल्या भूसंपादन मोबदल्याच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने नियमानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मुळशी, वेल्हा, मावळ आदी तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करण्यात आला असून लवकरच अंमलबजावणीला गती देण्यात येईल. पर्यटनस्थळांना रस्त्यांची जोडणीसह पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वप्नील मोरे यांच्यासह पाटबंधारे, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी, संबंधित तालुक्यातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. १४ जुलै २०२५ : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरविंदर कल्याण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. या सौजन्य भेटीप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील उपस्थित होते.

या भेटीत दोन्ही राज्यांच्या संसदीय परंपरा, विधीमंडळातील कामकाज यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद झाला. संसदीय सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या कार्याची हरियाणाचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी प्रशंसा केली.

ही भेट सौहार्द, सन्मान व सहकार्य यांचे प्रतीक ठरली असून, दोन्ही राज्यांतील विधिमंडळांमधील संबंध अधिक दृढ करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्यातील सर्वच बालगृहांमध्ये मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी नव्याने कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबत विभागास उपसभापती डॉ.गो-हे यांनी दिल्या सूचना

मुंबई, दि. १४ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकपार पडली.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार श्री. श्रीकांत भारतीय, आमदार श्रीमती चित्रा वाघ, आमदार श्रीमती प्रज्ञा सातव, महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे , सहआयुक्त श्री. राहुल मोरे उपस्थित होते.

संस्थांच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करणे,तपासणीसाठी भरारी पथके नियुक्त करणे व बालगृहातील मुलींचा त्यांच्या पार्श्वभूमी व आवडीनुसार बालगृहात सामावून घेणेबाबत विचार करणेबाबत डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत संबंधित विभागाला सूचना दिल्या. राज्यातील बालगृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करणे, देखरेख यंत्रणा अधिक बळकट करणे, बालकांचे हक्क संरक्षित राहावेत यासाठी स्वतंत्र निरीक्षण समित्या स्थापन करणे, तसेच बालगृह व्यवस्थापनात पारदर्शकता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.या महत्त्वपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने लवकरच ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे मंत्री महोदयांनी आश्वस्त केले.

“ससून डॉकमधील मासेमार कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज”

मंत्री मत्स्यव्यवसाय यांनी तत्काळ संघटना व आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन समन्वयाने धोरण तयार करावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १४ जुलै २०२५ : विधान परिषदेच्या सभागृहात आमदार श्री. राजेश राठोड यांच्या लक्षवेधीवर कुलाबा ससून डॉक परिसरातील मासेमारी व्यवसायाशी संबंधित महिला व कामगारांच्या समस्यांवर आज चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक महिन्याच्या आत संबंधित आमदार, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना समवेत घेऊन बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मासेमार संघटनांमधील काही गटांना जाणीवपूर्वक डावलून त्यातील महिलांना धमकावून त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे “

त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, “मासळी सोलण्याच्या प्रक्रियेत महिलांचे हात रक्तबंबाळ होतात. हा एक गंभीर प्रश्न असून, त्यावर तांत्रिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महिलांना रोजगार गमावू न देता, त्यांचा त्रास कमी होईल अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरता येईल का, याचा विचार व्हावा.”

या चर्चेला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “इंडोनेशिया या देशाने मासेमारीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर आम्हीही ससून डॉक येथे इंडोनेशियन तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचा अभ्यास सुरू केला आहे. महिलांना दिलासा देण्यासाठी योग्य उपाय निश्चितच राबवले जातील.”

लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत आ.राजेश राठोड यांचे सोबत आ.सुधाकर आडबाले ,आ.चित्रा वाघ,आ.सचिन अहिर यांनी सहभाग घेतला होता. डॉ. गोऱ्हे यांनी या संपूर्ण विषयाची गांभीर्याने दखल घेत तातडीने संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले असून, मासेमारी करणारे कामगार विशेषतः महिलांच्या समस्या आणि त्यांचा रोजगार न बुडवता तंत्रज्ञानांचा वापर हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचे स्पष्ट केले आहे.

‘अहिरभैरव‌’, ‌‘ललत‌’, ‌‘परमेश्वरी‌’, ‌बिलासखानी ‘सारंग‌’चे सुमधुर सादरीकरण

पंडित हेमंत पेंडसे शिष्य परिवारातर्फे मैफलीचे आयोजन…

पुणे : सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित प्रात:कालीन रागांच्या मैफलीत अहिरभैरव, ललत, परमेश्वरी, बिलासखानी तोडी आणि सारंग यांचे सुमधुर सादरीकरण झाले.

वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात रविवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराने युवा तबलावादक प्रणव मिलिंद गुरव यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मानपत्र, अकरा हजार रुपये रोख, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मैफलीची सुरुवात अनुराधा लेले यांनी राग अहिरभैरवमधील ‌‘हे लाल अलसाने’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत लयीत पं. हेमंत पेंडसे रचित ‌‘करम तुही करतार तु‌’ ही बंदिश सादर करून ‌‘मान रे मोरा मनवा तुम‌’ ही रचना सादर केली. संदिप देशमुख यांनी राग ललतमधील ‌‘रैन का सपना‌’ ही पारंपरिक रचना आपल्या मधूर आवाजात सादर केली तर ‌‘मारी घुंगरवा खेलनवा‌’ ही दृत लयीत सादर केलेली रचना रसिकांना विशेष भावली. पंडित अभिषेकीबुवा यांनी गायलेली राग परमेश्वरीमधील ‌‘मातेश्वरी परमेश्वरी‌’ ही बंदिश राधिका ताम्हनकर यांनी प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून पंडित हेमंत पेंडसे यांनी रचलेला ‌‘दिर दिर तानुम्‌‍ त देरे ना‌’ हा तराणा सादर केला.
विशेष निमंत्रित गायक पंडित सचिन नेवपूकर (संभाजीनगर) यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील ‌‘श्री कामेश्वरी‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. दृत लयीत ‌‘जा जारे जा जा रे’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. त्यानंतर सारंग रागातील ‌‘तुम रब तुम साहिब‌’ ही पारंपरिक तसेच ‌‘गगरी फोडी मोरी कान्हाने‌’ ही स्वरचित रचना सादर केली.
कार्यक्रमाची सांगता पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‌‘सब सखिया समझाए‌’ या भैरवीने झाली. कलाकारांना अभिजित बारटक्के (तबला), आदिती गराडे (संवादिनी), रोहन देशपांडे, श्रावणी कुलकर्णी, यश कोल्हापुरे, संदिप देशमुख (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्राची बाब्रस यांनी केले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्या गडकिल्ले मोहिमेला रायरेश्वरापासून सुरूवात

पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोहीम रायरेश्वराची’ हा ऐतिहासिक उपक्रम रविवारी (ता. १३ जुलै) यशस्वीरित्या पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडाच्या पावन भूमीत ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. मोहिमेला लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत ६३५ जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी प्रत्येकाच्या मनात शिवप्रेम जागवले. रायरेश्वरावरील ऐतिहासिक वास्तू, निसर्गसौंदर्य व शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास यामुळे सहभागींचे मन भारावून गेले. यावेळी स्वच्छता मोहीमदेखील राबवण्यात आली.

सदर मोहिमेमागील प्रमुख हेतू ट्रेकिंगच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास जाणून घेत पुढच्या पिढ्यांपर्यंत तो नेणे हा होता. “इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचायचा नसतो, तो असा अनुभवायचाही असतो,” असे आयोजकांनी यावेळी सांगितले.

सदर उपक्रम सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या गडकिल्ले मोहिमांच्या मालिकेतील हे पहिले पुष्प होते. येणाऱ्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर अशा मोहिमा राबवण्याचे नियोजन आहे.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे म्हणाले, “गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि हे वैभव जपणे आपले कर्तव्य आहे. या उपक्रमातून हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समृद्ध वारसा पुढे नेण्याचे काम करायचे आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या भूमीत येऊन एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आपला इतिहास हा आपला अभिमान आहे आणि तो अभिमान आपण कायम बाळगला पाहिजे, ही जाणीव अजून घट्ट झाली. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटने सुरू केलेला हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. आपल्या इतिहासाशी पुन्हा एकदा नव्याने जोडले जात आहोत”, अशा उत्स्फूर्त भावना मोहिमेतील सहभागार्थींनी व्यक्त केल्या.

विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

पुणे,दि. १४: विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी घेतली.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक वारस प्रमाणपत्र मिळण्याबाबत व खरेदी खत दस्त करुन मिळणे आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात 1500 कोटींचा टेंडर घोटाळा:आरटीआय कार्यकर्त्याचा दावा

पुणे -कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय खात्यात तब्बल 1500 कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे. या आरोपामुळे अगोदरच व्हिडिओ कांडामुळे अडचणीत सापडलेल्या संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ गत आठवड्यात व्हायरल झाला होता. त्यात ते आपल्या खोलीत कॉटवर सिगारेट ओढत बसल्याचे दिसून येत आहेत. यावेळी त्यांच्या अंगावर बनियन व चड्डीच होती. तसेच त्यांच्या शेजारी एक पैशांचे बंडल असणारी बॅगही पडलेली होती. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने हा पैसा त्यांना मिळालेल्या 50 खोक्यांपैकी 1 खोका असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात 1500 कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार या कथित घोटाळ्याचा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आधीच अनेक गंभीर आरोप आहेत. आता टेंडर क्र. 374 द्वारे सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या 1,500 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. या टेंडरमध्ये अनियमितता आहे. या टेंडरसाठी स्मार्ट सर्व्हिसेस (पूर्वीची ब्रिस्क इंडिया), बीव्हीजी इंडिया आणि क्रीस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस फक्त याच तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या तिन्ही कंपन्यांनी 19.50 टक्के इतकाच सर्व्हिस चार्ज दिला आहे, म्हणजे स्पष्ट रिंग (Collusion) आहे. हे बेकायदेशीर असून पूर्वी ब्रिस्क इंडियाला ब्लॅकलिस्ट करा असे पत्र आपणच दिले होते.

या कंपनीवर ईडीची कारवाई सुरु आहे. या टेंडरमध्ये एकूण खर्चाचा उल्लेख नाही. यामध्ये सहा वर्षांसाठी 3,634 कामगार दाखवण्यात आले आहेत, पण कोणत्या पदासाठी किती वेतन दिले हेच दिलेले नाही. केवळ सर्व्हिस चार्जच्या आधारावर हजारो कोटी रुपयांचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 वर्षे (2013) झाले हेच ठेकेदार आहेत, याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. गेल्या 10 वर्षात कोणतेही नवीन टेंडर न काढता काम सुरू आहे. यात एकाच टेंडरवर 1,500 कोटींचे पेमेंट झाले आहे.

विजय कुंभार यांनी हा घोटाळा असल्याचा दावा करताना याची चौकशी करण्यासह इतरही काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे 1500 कोटींचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे. रिंग करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. जिल्हानिहाय टेंडर प्रणाली लागू करुन त्यात स्थानिक महिला गट, युवक, संस्थांना संधी मिळावी. मागील 13 वर्षांचा गैरव्यवहार आणि विना-टेंडर काम याची देखील चौकशी करण्यात यावी. ही बाब सामाजिक न्याय विभागातील पारदर्शकतेचा आणि सार्वजनिक निधी वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. कृपया मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोहगावातील अपूर्ण डीपी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार; आमदार बापूसाहेब पठारे

येरवडा: लोहगावमधील भारतमाता रस्त्यावर विकास आराखड्यातील (डीपी) अपूर्ण रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार असून येत्या आठवड्यात या रस्त्यासाठी मार्किंगचे (चिन्हांकन) काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व उघड्यावर सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भूसंपादन न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडले असून स्थानिक जागा मालकांनाही अद्याप मोबदला मिळालेला नाही. सुविधा न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या विरोधात लोहगावकरांनी मागील आठवड्यात आंदोलन करून संताप व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी रविवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह डीपी रस्त्याची पाहणी केली. पावसाचे पाणी व सांडपाण्यामुळे तयार झालेल्या डबक्यांची पाहणी करत त्यांनी स्थानिक जागा मालकांशी संवाद साधला. तातडीने खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकण्यात आला.

“गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव-धानोरी परिसरातील डीपी रस्त्याचे काम रखडले आहे. पालिकेला रस्त्यासाठी आवश्यक जागेचे चिन्हांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले असून जागा मालकांशी चर्चा करून रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

या रस्त्यासाठी हद्द निश्चित झाल्यानंतर संपूर्ण काम नियोजनबद्धपणे मार्गी लावले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; बापूसाहेब पठारे यांचा अधिवेशनात प्रश्न

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तर सत्रात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिकेतील अपुऱ्या कर्मचारी संख्येचा व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित केला.

बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात बोलताना सांगितले, की “सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किमी आहे, तर मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ४३७ चौरस किमी आहे. क्षेत्रफळ मोठे असूनही पुणे महापालिकेत फक्त ८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत, तर मुंबई महापालिकेत तब्बल २८ हजार कर्मचारी आहेत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “ठेकेदारांकडून पुरवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचारी रोज गैरहजर असतात. त्यामुळे पुणे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर थेट परिणाम होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.”

“या एकूण परिस्थितीला जबाबदार कोण?” असा थेट सवालही पठारे यांनी सभागृहात उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका व तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे.

बापूसाहेब पठारे यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, वाढत्या नागरी गरजांसाठी पुरेशी मनुष्यबळ व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी नवीन ३२८ दारू दुकानांना परवानगी दिली जात आहे का?

मुंबई-सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी नवीन ३२८ दारू दुकानांना परवानगी दिली जात आहे का? असा सवाल आज विधानपरिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला.

ते म्हणाले, राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वतीने राज्यामध्ये ३२८ नवीन दारूचे परवाने देण्यात येत आहे.८ महसूली विभागात हे परवाने दिले जाणार आहे. १९७२ पासून असे परवाने राज्यात बंद होते. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मद्य धोरण आखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीतील लोकं दारूचे वितरण व पुरवठा व्यवस्था नियंत्रित करत असते. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी अशाप्रकारे दारूच्या ३२८ नवीन दुकानांना परवाने दिले जात असतील तर ते राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.माता – भगिनी यांचा या धोरणाला कठोर विरोध आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी हे नवीन ३२८ दुकानांना परवानगी दिली जात आहे का? अशी स्थिती असेल तर या धोरणाला आमचा विरोध असणार आहे. राज्याचे जनजीवन या धोरणामुळे विस्कळीत होऊ शकते या हेतूने आज विधान परिषद सभागृहात २८९ अन्वये चर्चेची मागणी त्यांनी यावेळी केली.

स्थानिक स्वराज्य संथांचे स्वराज्य हिरावून घेऊन ते स्ववर्चस्वा खालील अधिकारी शासित केले- आदित्य ठाकरे

मुंबई-आदित्य ठाकरे म्हणाले, शहरांमध्ये प्रशासक बसवले आहेत, नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी नेमके जायचे कोणाकडे? अनेक कामे अशी काढली जातात की कुठे तरी गफलत झालेली आहे. लोकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने यांना काही पडलेली नाही. नद्यांच्या विषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक नदी वेगळी असते. पुण्यातील नद्या दूषित झाल्या आहेत. पंधरा मिनिटांच्या पावसात पूर परिस्थिती निर्माण होते. नद्यांचे नियोजन व्यवस्थित केले गेले पाहिजे. पुणे शहर बुडून जात आहे. झाडांच्या कत्तली केल्या जात आहेत. माझी मागणी हीच आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात बैठक घ्यावी आणि पुण्यातील नद्यांचा प्रश्न मार्गी लावावा.