Home Blog Page 452

रंगावलीतून साकारले शिवचरित्र

श्री गजानन मंडळातर्फे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा : श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन च्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शन
पुणे : राजमाता जिजाऊंचे तुळजाभवानी मातेला साकडे… शिवबांचा जन्म… शिवरायांचे पहिले सूर्यदर्शन… शिवरायांचे शस्त्र शिक्षण… अफजल खान वध… बाजीप्रभूंचे शौर्य… भक्ती शक्ती संगम अशा विविध रंगावलीतून कलाकारांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी शिवचरित्र साकारले. पुण्यात पहिल्यांदाच रंगावलीतून शिवचरित्र साकारण्यात आले आहे.


लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, अध्यक्ष राकेश गाडे, हर्षद पाचंगे, महेश जाधव, स्वप्निल पगारिया, शुभम जैन, सारंग भिरंगी, अमेय गाडे, ओमकार भोसले, प्रतीक जाधव, आकाश पाचंगे, निनाद पाचंगे, मयूर भिरंगी, प्रितेश चव्हाण उपस्थित होते.
स्वराज्याची शपथ, रांझ्याच्या पाटलाला कठोर शिक्षा, सुरत स्वारी, पुरंदरचा तह, जिजाऊंना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रसंग, आग्रा दरबारातील सिंहगर्जना, आग्र्याहून गरुडभरारी, गड आला पण सिंह गेला, आरमाराचे बळकटीकरण, समर्थ रामदास आणि शिवराय, शिवराज्याभिषेक या कथा प्रसंगावर रांगोळ्या पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
पाण्यावरील आणि पाण्याखालील रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी यांसह ३ डी रांगोळी अशा विविध माध्यमातील रांगोळी पाहण्याची संधी प्रदर्शनात मिळत आहे. दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत दिवसभर पुणेकरांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात मेघना झुझम यांचा माँसाहेब जिजाऊ व मी तुमची सावित्रीबाई फुले या विषयावर एकपात्री प्रयोग झाला. लेखक व शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे शिवरायांचे राष्ट्रीयत्व या विषयावर व्याख्यान देखील झाले.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, नानासाहेब जाधव, रविंद्र वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्ये, उत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला. त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केली, असे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे २१ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने शिवसृष्टीला ‘मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये ३६ मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणाले, देशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचना, पाण्याच व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, किल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालन, गंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाटा एआयएने विम्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पुण्यामध्ये ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ उपक्रमाचे केले आयोजन

पुणे, 19 फेब्रुवारी 2025:  टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स या भारतातील एका आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने पुण्यामध्ये ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ या उपक्रमाचे आयोजन करून जीवनांचे रक्षण करण्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा हा एक भाग आहे.

टाटा एआयएने आयोजित केलेल्या एक रोडशोमध्ये २८० सल्लागार, लीडर्स आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर वॉकथॉनचे आयोजन करून विम्याविषयी जागरूकता वाढवण्याचा संदेश दिला गेला. ‘सर्व भारतीयांसाठी विमा’ ही घोषणा देत सहभागींनी वॉकथॉन पूर्ण केली.  टाटा एआयएच्या चार शाखांमध्ये चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये १२६ पिशव्या रक्त जमा झाले. ५० पेक्षा जास्त कर्मचारी आणि सल्लागारांनी पुणे स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंडला भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. १८० कर्मचारी आणि सल्लागारांनी निवारा ओल्ड इज होमला भेट दिली, तिथे खुर्च्या, धान्य, साखर व इतर वाणसामान दान केले.

टाटा एआयएचे प्रोप्रायटरी बिझनेसचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री अमित दवे यांनी सांगितले, जीवन विमा लोकांना, समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना हवी असलेली आर्थिक सुरक्षा पुरवतो. त्यामुळे जीवन विम्याविषयी जागरूकता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. टाटा एआयए आपल्या ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ उपक्रमातून भारतीयांसाठी आर्थिक समावेश आणि आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देत आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना विमा सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टाटा एआयए अथक प्रयत्नशील राहील.”

‘प्लेज टू प्रोटेक्ट’ मोहिमेंतर्गत टाटा एआयएने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांच्या भारतभरातील ५९९ शाखा व १.४३ लाख एजंट्स व कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहेत. रोडशो, जॉगर्स पार्कमधील ऍक्टिव्हिटीज, गृहसंकुलांमधील विविध कार्यक्रम, आरोग्य शिबिरे यांचा त्यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर संपर्क साधण्याबरोबरीनेच ही कंपनी स्थानिक स्वयंसेवी संस्था, पंचायत आणि स्वयंसहायता समूहांच्या सहयोगाने ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील लोकांना विम्याविषयी माहिती देईल.

टाटा एआयएच्या ५५० पेक्षा जास्त शाखांनी ही मोहीम आधीच सुरु केली आहे, यामध्ये ७०,००० एजंट्स, कर्मचारी आणि ग्राहक सहभागी झाले आहेत.

विम्याबरोबरीनेच, ‘जागृती’ या आपल्या आर्थिक साक्षरता उपक्रमामार्फत टाटा एआयए आर्थिक सक्षमतेला देखील प्रोत्साहन देत आहे. यामध्ये टाटा एआयएचे कर्मचारी वंचित समुदायांना अत्यावश्यक आर्थिक उपाययोजनांची, साधनांची माहिती देतात. एक संरचनाबध्द प्रशिक्षण मोड्यूल हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या नेटवर्कमधील कमीत कमी चार व्यक्तींना आत्मविश्वास मिळवून द्यावा जेणेकरून त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यात मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. ३३०० पेक्षा जास्त टाटा एआयए कर्मचाऱ्यांनी याआधीच या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे.

गावठी दारूचे आगर:लोणी काळभोरमध्ये दारू भट्टीवर कारवाई:१२ लाखाचा माल पकडला;हातभट्टीकिंग मुकेश कर्णावत पळाला

पुणे-लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्टीचे आगर बनलेल्या भागातील एका दारू भट्टीवर छापा मारून पोलिसांनी सुमारे १२ लाखाचा ऐवज हस्तगत केला . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१८/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे स्टाफ असे कोंबिंग ऑपरेशन करत असताना स.पो.नि.मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओढयाचे बाजुला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात इसम नामे मुकेश कर्णावत हा हातभट्टीची गावठी दारू तयार करत असले बाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुशंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव व स्टाफसह शोध घेतला असता खालील नमुद मुददेमाल मिळुन आला मात्र मुकेश कर्णावत अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळून गेला. सदर ठिकाणी १५०० लिटर तयार दारू १०० रु प्रति लिटर प्रमाणे एकूण १,५०,०००/- रू.ची तसेच २०,००० लिटर रसायन ५० रुपये प्रति लिटर प्रमाणे असे एकूण १०,००,०००/-रू. चे तसेच सदर ठिकाणी दारू करण्याचे साहित्य मोटार, ड्रम, एअर ब्लोअर, सरपण व इतर साहित्य असे एकुण ११,६०,०००/- रू.चा माल मिळून आला असून सदर बाबत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपी विरुद्ध लोणी काळभोर पो.स्टे.गु.र. नं.९८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ई) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पो.स्टे. कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव, गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलास अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलास अमंलदार सातपुते, वनवे, वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.

पुरावे दिले तरीही धनंजय मुंडे यांच्यावर अपेक्षित कारवाई का नाही ? अंजली दमानियांचा सवाल

मुंबई-मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अपेक्षित कारवाई केली जात नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी कसे घोटाळे केले आहेत यावर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत या हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही. मी सुरुवातीला कराड आणि मुंडे यांचा कसा संबंध आहे हे मी दाखवले. कराड आणि धनंजय मुंडे हे कंपन्यांमध्ये एकत्र कसे आहेत ते मी दाखवले, त्यांचे आर्थिक व्यवहार असो, मिळालेला नफा असो, दहशत असो मग ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मी दाखवले राज्याच्या मंत्र्याला राज्याच्या कंपनीकडून थेट नफा मिळत आहे. बॅलन्स शिटच्या बॅलन्स शिट भरले जात आहेत. त्यानंतर मी कृषी घोटाळा बाहेर काढला, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, कृषी घोटाळ्यात मी दाखवले की 80-90 रुपयांचे नॅनो युरियाला 220 रुपयांनी खरेदी केली गेली. या सगळ्या गोष्टींचे डीटेल्स दिले. त्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल मागवल्या देखील आणि त्याचा इनव्हॉईस मी ट्विट केला. तर त्याचा जर आपण क्रम पहिला तर 4 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि 5 तारखेला मी या बॉटल मागवल्या आणि त्यानंतर 7 तारखेला कंपनीकडून बंदी घालण्यात आली आणि असे सांगण्यात आले आहे की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रॉडक्ट विकू शकत नाही. धनंजय मुंडे यांचे पीए जोशी म्हणून आहेत कोणीतरी त्यांनी सगळ्या माध्यमांना पाठवून दिले की इफकोचे प्रॉडक्ट विकता येत नाही असे जाहीर केले. मात्र अनेक वेबसाइटवरून प्रॉडक्ट विकले जातात.

इफकोचे घोटाळे अनेकवेळा झाले आहेत. तसेच एक सीबीआयचा एफआयआर देखील आहे. किती मोठ्या प्रमाणात इफकोमध्ये भ्रष्टाचार होतात, तेथील अधिकारी कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात याचे डेटेल्स मी दिले आहेत. धनंजय मुंडे तर काय काय करतात यावर मला आता बोलावे वाटत नाही.

कृषी घोटाळा नंबर 2 मध्ये धनंजय मुंडे कुठल्याही पद्धतीने वाचत नाहीत. हे एक पत्र आहे या पत्रावर तारीख नाही. मंत्री लिहितात पण तारीख लिहिलेली नाही. या पत्रात लिहिले आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारात ठेवलेल्या मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो, याचे हे धडधडीत उदाहरण आहे. मी या दोन्ही तारखांच्या बैठकांचे अटॅचमेंट पाठवले आहेत. कुठेही निर्णय झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनूदेशनमधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी, मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेलाच नाहीये. किती खोटे आहे हे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित, एकतर हे काही उत्पादित करत नाहीत. त्यांनी एक टेक्नॉलजी डेवलप केली होती आणि ती टेक्नॉलजी त्यांनी ट्रान्सफर केली होती. पंजाबराव देशमुख विद्यापीठाला त्याची रॉयलटी आहे, बाकी काही नाही. पण हे काय लिहितात, पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासननिर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एमईआरडीसी आणि पीडीकेव्ही अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असे हे लिहितात. आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून यांची कारवाई तातडीने म्हणजे आजच करा, असे हे लिहितात.

18 ऑक्टोबरला जीआर काढण्यात आला त्यात त्यांनी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते जे मी जेव्हा घोटाळा काढला होता तेव्हा मी म्हटले होते की 200 कोटीचे बॅटरी, पंप आणि सोलार लाईट घेतले होते, ते वेगळे असे हे दोन्ही सॅन्कशन या जीआरमधून करण्यात आले होते. पण हे कधी नव्हतेच. दोन्ही कॅबिनेट बैठकी बघा, त्यात बॅटरीबद्दल एक शब्दही बोलण्यात आला नाही.

धनंजय मुंडे खोटे बोलून हे असे पत्र पाठवतात शासन मान्यता असल्याचे खोटे सांगून जीआर मिळवतात आणि ते करून घेत आहेत. इतकी जर यांची लिमिट होत असेल तर त्यांना कुठल्याच मंत्री पदावर कधीही बसता कामा नये, यांची तितकी पात्रताच नाही. कारण इतका भ्रष्ट माणूस मंत्रिमंडळाचे निर्णय झाले आहेत असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री कधीही नाही झाला पाहिजे, कृषिमंत्री तर कधीच नाही, अशी माझी थेट मागणी आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी आता तरी कारवाई करावी.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणतात, आता माझी पत्रकार परिषद झाल्यावर ते लगेच पत्रकार परिषद घेऊन काहीही बोलतील. आता माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते कागदोपत्री बोला. 23 तारखेच्या कॅबिनेट बैठकीचे मिनिट्स मांडा, 30 तारखेच्या बैठकीचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा हा निर्णय कोणत्या कॅबिनेट बैठकीमध्ये आणि कधी झाला होता. तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले आहे 23 आणि 30 दोन्हीमध्ये हा निर्णय झालेला नाही.

राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीनेसातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत
येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माॅं जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे;  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने
किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करुया, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असे श्री. पवार म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

विकिपीडिया, राहुल सोलापूरकरसह पुतळा कोसळण्याचे प्रकरण:शाहू छत्रपतींकडून कानउघडणी

0

कोल्हापूर-कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी विकिपीडिया, राहुल सोलापूरकरसह रत्नागिरी मधील छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात चांगलीच कानउघडणी केली आहे .विकिपीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून शाहू महाराज यांनी टीका केली आहे. विकिपीडियावर ज्याला जे वाटते, तो ते टाकत आहे. पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली, त्याचा निषेध करायला हवा. या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲक्शन घेण्यात आली आहे. मात्र, ती कमी असल्याचे शाहू महाराजांनी म्हटले आहे.

करवीर संस्थानच्या वतीने पारंपारिक पद्धतीप्रमाणे आज शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची पालखीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी शाहू महाराजांनी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. तसेच विकिपीडियावरील मजकुरावरून देखील त्यांनी टीका केली.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होत आहे याचा आनंद आहे. आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे निष्ठून बाहेर आले होते. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे ते उदाहरण आहे. मात्र शिवाजी महाराज आग्र्यातून परत कसे आले? हे कोणालाच माहिती नाही. या संदर्भात संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे देखील शाहू महाराजांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज हे देशातील सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण एकत्र होऊन देश पुढे नेऊ शकतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्वच पुतळ्यांची दखल घेतली गेली पाहिजे. राज्यांमध्ये पुतळे उभे केले जात आहेत. मात्र ते पुतळे परवानगी प्रमाणे होऊन बांधले जात आहेत का? हे तापायला हवे, असा सल्ला देखील शाहू महाराजांनी दिला आहे. पुतळा तयार करताना त्यामध्ये कोणता धातू वापरला गेला आहे? सिमेंट तसेच स्टीलचा दर्जा काय आहे? याचा रिपोर्ट तपासला गेला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी शाहू महाराज यांनी केली आहे. रत्नागिरी येथील किल्ल्यावर बसवण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून शाहू महाराजांनी ही मागणी केली आहे.

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना

शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे आयोजन : सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिगांची ललकारी… नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीआण्णा मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते. तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १३ वे वर्ष आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.
शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी
ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हैलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली.
ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १४ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचे आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाल आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभार ईशानने यावेळी मानले.
या हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.

मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुन लुटमार करणा-या टोळीतील कोथरूडच्या दोघांना अटक, दोघे फरार .

पुणे-मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चो-या करणा-या १९ ते २२ वयोगटातील तरुणांच्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य २ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.२४/१२/२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील डी.पी. रोड येथे मॉर्निंग वॉक करीता आलेले फिर्यादी हे आयोध्या हॉटेल समोर आले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन घेऊन मोटार सायकलवर उभ्या असलेल्या तिस-या साथीदारासह निघुन गेले बाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. २११/२०२४ मा.न्या.सं. कलम ३०९ (४),३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्याबाबत मॉर्निंग वॉकला जाणारे वेगवेगळ्या व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्ह्याची माहिती प्रसारीत झाल्याने मॉर्निंग वॉक करीता जाणारे नागरिकांचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस उप आयुक्त परी. ३ पुणे शहर संभाजी कदम व सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभागअजय परमार यांनी तपासा बाबत मार्गदर्शन करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरु करुन घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासुन यातील अनोळखी अनो आरोपीचा माग काढुन पोलीस अंमलदार पवार यांना गोपनीय बातमीदाराव्दारे सदरचा गुन्हा हा १) सुमित ऊर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजु आसवरे वय १९ वर्षे रा. किष्कीदानगर पाण्याचे टाकीजवळ, कोथरुड पुणे २) अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे वय-२२ वर्षे रा. किष्कींदानगर, कोथरुड पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने किष्कीदानगर, कोथरुड पुणे येथे सापळा रचुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे तपास करता त्यांनी त्यांचे इतर दोन फरार साथीदारांसह अशाच प्रकारे १) अलंकार पो.स्टे. गु.र.न. ३०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (५), १२६ (२), ३५१ (३),३(५) शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महा. पो. अधि. ३७(१) १३५ २) चतुःश्रृंगी पो. स्टे. पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन एक सोन्याचे पेंडट, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल, एक तलवार असा एकुण २,८६,२५०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीं कडुन शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरीचे अलंकार पोलीस स्टेशनकडील ०२ च चतुःश्रंगी पोलीस स्टेशनकडील ०१ असे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत दोन फरार आरोपीचा शोध चालु आहे.
सदरची कामगीरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि.२ संभाजी कदम,सहा. पोलीस आयुक्त, सिहगड रोड विभाग अजय परमार, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. अनिल माने यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश दिक्षीत,महेश निबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शंभवी माने, यांनी केली.

महिंद्रा लाइफस्पेसतर्फे मुंबईतील महालक्ष्मी येथे 1,650 कोटी रु. चा GDV असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा

मुंबई, 19 फेब्रुवारी 2024 – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (MLDL) ने लिव्हिंगस्टोन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (LS) सोबत महालक्ष्मी येथील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पासाठी भागीदारी केली असून त्याचे एकूण विकास मूल्य (GDV) 1,650 कोटी रु. आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित कुमार सिन्हा म्हणाले, “ही विकास योजना महिंद्रा लाइफस्पेसच्या दक्षिण मुंबईच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमधील धोरणात्मक विस्ताराचे प्रतीक आहे. हा प्रकल्प मुंबईच्या नागरी नूतनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये अत्याधुनिक डिझाईन, शाश्वत घटक आणि प्रीमियम सुविधांचा समावेश असेल आणि त्यामुळे शहराच्या स्काय लाईनमध्ये भरीव बदल घडेल.”

उच्चभ्रू महालक्ष्मी भागात स्थित असलेला हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरांपैकी एका प्रमुख ठिकाणी आहे. या स्थानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या भागातून सगळीकडे जाण्यासाठी असलेली उत्कृष्ट कनेक्टीव्हीटी. दक्षिण मुंबईतील प्रमुख व्यावसायिक ठिकाणे, अत्यावश्यक सेवा आणि करमणुकीसाठीच्या ठिकाणांपर्यंत येथून सहजी जाता येऊ शकते.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक

पुणे : तब्बल ३५० वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीत अडकलेला आपला देश, संस्कृती आणि समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्त केले. जिजाऊंनी शिवरायांसारखे आदर्श निर्माण केले. कोणत्याही एका धर्म आणि पंथांसाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांसारखे आदर्श व्यक्ती हे राष्ट्र आणि समाजाचा पाया असतात. असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. 

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपारिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात,  सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, कमल व्यवहारे उपस्थित होते. 

पांडुरंग बलकवडे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांध, अत्याचार आणि अन्यायाविरोधात लढा दिला. त्यांनी जगाला गनिमी कावा शिकवला. हजारोंच्या फौजांना अगदी थोड्या सैनिकांसोबत लढा देऊन पराभूत केले. कोणत्याही लोकशाही राष्ट्राला आजही आदर्श ठरतील असे राज्य शिवरायांनी स्थापन केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला. 

 छत्रपती शिवराय असलेला रथ मिरवणूकीत होता यासोबतच नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन मिरवणूकीत झाले.  श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी महिला सबलीकरण पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत आदी संदेश विद्यार्थ्यांनी दिले. 

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शिवजयंती जल्लोषात

पुणेः सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ ‘जय भवानी, जय शिवराय!’, ‘नमो पार्वती पते, हर…हर.. महादेव’… या घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी ‘एडीटी’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, परीक्षा विभाग संचालक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.    याप्रसंगी, लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, ‘एमआयटी-एडीटी’चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील कविता व पोवाडा आणि पाहाडी आवाजातील शिवगर्जना यामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. शिवरायांची पालखीसह मिरवणूक व त्यानंतर अश्वारूढी पुतळ्याला क्रेनद्वारे पुश्वहार अर्पण केल्यानंतर महाराजांची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.         यावेळी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, माझ्या ऑफिस मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होऊन दिनक्रम सुरू करतो. कारण छत्रपती शिवराय हे उर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या, संकटे आली तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. त्यामुळे शिवराय आपल्यातच आहेत व ते आज ३९५ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती असेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  
रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद-शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल २१६+ दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. ‘एमआयटी-एडीटी’च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी २०२५ ;

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केले. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात,
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी.एम. संदीप, कुणाल चौधरी, बी. व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, ”सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली, ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपा सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसने विधानसभेला ४२ जागी विजय मिळवला तर २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो, २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू, असे वडेट्टीवार म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करू व पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदा-या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले. मध्य प्रदेशातही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. सर्वोदयी तत्वज्ञान, गांधी विचाराने ते काम करतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावात शिबीरे घेऊन विचाराचे वादळ उठवू आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नव्याने काँग्रेस संघटन उभे करू.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले, पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. अफवांना बळी फडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, नसीम खान, वर्षा गायकवाड यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केले.

त्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. मणिभवनला भेट दिली व त्यांनतर दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच सिद्धीविनायक मंदीराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. दुपारी त्यांनी काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

शहराचे बजेट विधानभवनात करणे हा स्वातंत्र्यावर हल्ला

आयुक्तांनी हा बेकायदा कृत्याचा प्रयत्न हाणून पाडावा_स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशा प्रकारचा घाला प्रथमच

पुणे- शहराचे बजेट नागरिकांच्या सूचना मागवून ,जनसभा बोलावून महापालिका आयुक्तांनी सादर करणे आवश्यक असताना ते भाजपच्या प्रभावाखाली विधानभवनात विशिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात सादर करणे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वातंत्र्यावर केलेला थेट हल्ला ठरणार असून हा प्रयत्न महापालिका आयुक्त यांनी हाणून पडला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी चे शरद पवार गटाचे नेते माजी महापौर प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.आणि अशा प्रकारे विधानभवनात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,.गजानन थरकुडे, वसंत मोरे,सचिन दोडके, अशोक हरणावळ,किशोर कांबळे व महाविकास आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संदर्भात जगताप यांनी सांगितले कि,’ पुणे महानगरपालिकेने नियमानुसार शहरातील, समाविष्ट गावातील,विविध भागातील आवश्यकतेनुसार व शहरातील सर्व पक्षाच्या नागरी सूचनेनुसार अर्थसंकल्प केल्यास आमची काहीही हरकत नसेल पण भाजपाच्या प्रभावाखाली व मोठ मोठे बिल्डर्स यांच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प तयार झाल्यास उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू,याबाबत महाविकास आघाडीच्यावतीने पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.

१४ मार्च २०२१ रोजी पुणे महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील 3 वर्ष अर्थसंकल्प सादर करीत आहेत, त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियमानुसार शहरातील विविध भागातील गरजेनुसार अत्यावश्यक बाबींची तरतूद होणे आवश्यक आहे.असे असताना मागील ४ दिवसांपूर्वी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर बजेट त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मागण्या मान्य करीत आगामी बजेट आपल्या प्रभावाचे असणार आहे, अशा प्रकारची वक्तव्य केले. हे त्यांचे वक्तव्य धक्कादायक आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नियम व संकेत मोडणारे आहे असे आमचे मत आहे. पुणे महानगरपालिकेचे आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत तयार होत नसून पुणे विधानभवनात होत आहे, ही बेकायदेशीर कृती आहे हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.

बहुजन विरोधी कॉंग्रेस नेतृत्वाला धडा शिकवण्याची वेळ-डॉ.हुलगेश चलवादी 

उदित राज च्या वक्तव्याचा जाहिर निषेध 

पुणे:-

देशातील बहुजनांचा विरोध करण्याचे कार्य कॉंग्रेस सुरूवातीपासून करीत आली आहे. कॉंग्रेस मध्ये गेलेला प्रत्येक व्यक्ती त्यामुळे बहुजनविरोधी मानसिकतेने ग्रासलेला आहे. उदित राज सारख्या व्यक्तीने उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहीलेल्या, बहुजनांचा आधारस्तंभ, देशाच्या आयरन लेडी सुश्री बहन मायावती जीं बद्दल केलेले वक्तव्य कॉंग्रेसची बहुजनांविरोधी मानसिकता दाखवणारी असल्याचे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज,मंगळवारी (दि.१८) व्यक्त केले.बहुजन विरोधी कॉंग्रेस नेतृत्वाला आता वैचारिक आंदोलनातून धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी केले. त्यांनी उदित राज यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना तसेच त्यांच्या मृत्यूनंतर कोट्यवधी शोषित-पीडित, दलित, बहुजनांचा आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या मानवतावादी संषर्घाचा इतर पक्षासह विशेषत: कॉंग्रेसने प्रत्येक स्तरावर तिरस्कार केला आहे. कॉंग्रेस कधीही बहुजनांच्या विचाराधारेवर आणि ध्येयधोरणावर खरी उतरू शकणार नाही, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने ‘जय बापू, जय भीम, जय मंडल, जय संविधान’ अशा नावावर कितीही कार्यक्रम केले तरी डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या मोहात पडणार नाही, असे मत सुश्री बहन मायावती जी यांनी व्यक्त केले असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

आंबेडकरी जनता जागरूक तसेच सतर्क असून ते स्वत:च्या पायावर उभे राहयासाठी संघर्षरत आहेत.पंरतु, काही पक्षबदलू, संधीसाधू आणि स्वार्थी दलित लोक त्यांच्या ‘आकां’ना खुश करण्यासाठी काहीही वक्तव्य करीत आहेत. त्यांच्यापासून बहुजन समाजाला सतर्क राहण्याची गरज आहे. असे वक्तव्य आणि लोकांना गांर्भियाने घेण्याची आवश्यकता नाही. ही मंडळी सामाजिक परिर्वतनाच्या आंदोलनापासून अनभिज्ञ आहेत, असे मत व्यक्त करीत मायावती जी यांनी त्यांच्या विरोधातील वक्तव्याचा समाचार घेतल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.