Home Blog Page 387

पुणे मनपा कंत्राटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा – न्यायासाठी पाच ऑगस्टला मनपाच्या गेटवर मोर्चा

पुणे, ता. 28 जुलै – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना अनेक वर्षांपासून पगार व इतर मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असून, या गंभीर समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आता राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार कायद्याप्रमाणे दिला जात नाही, पेमेंट स्लिप दिली जात नाही, ESIC चे कार्ड मिळत नाही, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे व २ ऑक्टोबर यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सुट्ट्या दिल्या जात नाहीत. कायदेशीर हक्क असलेली पगारी रजा आणि बोनस देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. या सर्व मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली आहेत.

परंतु आजतागायत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मनपा आयुक्तांनी आजपर्यंत कधीच या मुद्द्यांवर बैठक बोलावलेली नाही, हे विशेष.

या सगळ्या परिस्थितीमुळे कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुणे मनपाच्या मुख्य गेटवर जोरदार आंदोलन व मोर्चा धरण्याचा निर्णय राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.

या आंदोलनात मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, कंत्राटी चालक, स्मशानभूमीतील कर्मचारी, NUHM अंतर्गत काम करणारे सिस्टर्स, डॉक्टर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स, सफाई कर्मचारी व झाडू विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली आहे.

डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का; मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते ?

भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेस बद्दल बोलण्याआधी माहिती घ्यावी; डान्सबार बंदी काँग्रेस आघाडी सरकारनेच केली.

मुंबई, दि. २८ जुलै २०२५

भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळा’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपा युती सरकार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये ‘सावली’ नावाचा डान्सबार सुरु होता, या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला, या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद केलेले आहे. हा डान्सबार आपल्या पत्नीचा नावाने आहे याची कबुली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबार मध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे? यावरही प्रकाश टाकावा.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी डान्सबर बोलू नये’, असे म्हणणारे एकनाथ शिंदेच भाजपाच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचत आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारला बंदी केली होती याची एकनाथ शिंदे यांनी माहिती घ्यावी आणि मगच काँग्रेसवर बोलावे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त करणारी डान्सबार संस्कृती हवीच कशाला?, एकीकडे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिरवता आणि त्याच बहिणींचे संसार मोडीत काढणाऱ्या डान्सबारचे समर्थन कोणत्या तोंडाने करता? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विधानावर खुलासा करावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर रस्त्याची दुरुस्ती होणार; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

“भाविकांची गैरसोय नको – रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या” : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक, दि. २८ जुलै २०२५ : चांदवड (जि. नाशिक) येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणारे दोन्ही अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असल्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

ही बाब लक्षात घेत विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, “मी स्वतः या मंदिराशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असून, या ठिकाणी आवश्यक ती कामे करण्यासाठी भक्तगण व कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा करत असतात. सध्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून, याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक जिल्ह्यात विविध रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत त्याच धर्तीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ते रेणुकादेवी मंदिर या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण करणे, तसेच महामार्गावरून मंदिराच्या दिशेने येणाऱ्या प्रवेश रस्त्यावर गतिरोधकांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून संबंधित यंत्रणांना त्वरित आदेश देण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमण हटवून नव्याने थांबे सुरू करा – शिवसेना

पुणे:- रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमण हटविणे व नव्याने अधिकृत रिक्षा थांबे निर्माण करण्याबाबत आज शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे परिवहन विभाग च्या प्रादेशिक अधिकारी अर्चना गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

पुणे शहर आता पुणे महानगर म्हणून वेगाने विस्तारत आहे. या महानगरात अंदाजे १,३०,००० ऑटो रिक्षा परिवहन विभागाच्या मान्यतेने कार्यरत आहेत. मात्र, या प्रमाणात अधिकृत ऑटो रिक्षा थांबे उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या केवळ सुमारे ६०० अधिकृत रिक्षा थांबे अस्तित्वात आहेत, त्यातही बहुतांश थांब्यांवर खासगी अतिक्रमण, फेरीवाले, वाहनं व अवैध व्यवसायामुळे अडथळा निर्माण झालेला आहे. परिणामी, रिक्षाचालक व प्रवासी यांना असुविधा होत असून वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन होत आहे, त्याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले पुणेकर आधीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहेत, शहरातील मध्यवस्तीत वाहतूक प्रश्न गंभीर बनला आहे त्यांना रिक्षा हा चांगला पर्याय आहे पण थांबे नसल्याने रिक्षा चालक आणि पुणेकर प्रवाश्यांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनाने सदर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

शिवसेना वाहतुक सेनेच्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. सर्व विद्यमान रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे.
२. शहराच्या वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात नवीन रिक्षा थांबे निर्माण करण्यात यावेत.
३. नवीन व जुन्या थांब्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी PMC/PMRDA यांच्यामार्फत अधिसूचना काढण्यात याव्यात.
४. रिक्षाचालक संघटनांशी चर्चा करून स्थानिक गरजा ओळखून योग्य ठिकाणी थांब्यांची योजना करावी.

या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अन्यथा आम्हाला रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांसाठी व पुणेकरांच्या वाहतूक समस्यांसाठी आपल्या कार्यालयाबाहेर शिवसेना पद्धतीने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले .
यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुले, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, सूरज खंडागळे, बाळासाहेब मोडक, जगदीश रेड्डी, योगेश जगदाळे, उपस्थित होते .

राज्य सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी:लाडकी बहिण योजना आणि एक रुपयात पीक विमा योजने वरून रोहित पवार आक्रमक

लाडकी बहिण सुद्धा भ्रष्टाचारातून सोडली नाही -लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये -सोशल मिडिया आणि डिजिटल मिडिया ला ३ कोटीच्या जाहिराती

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर धोकेबाज आणि विश्वासघातकी असल्याची टीका केली आहे. लाडकी बहिण योजना आणि एक रुपयात पीक विमा योजने वरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारने लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना धोका दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने कोणालाही लाडकी बहिण योजनातून वगळण्यात येणार नसल्याचे या आधी झालेल्या दोन अधिवेशनामध्ये सांगितले होते. या संदर्भात रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तरीही 26 लाखावर अधिक लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारने एका झटक्यात या बहिणींना सावत्र वागणूक दिली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

कुठलीही पडताळणी न करता केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या लाडकी बहिण योजनेचा राज्यात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. महिलांच्या योजनेचा पुरुषांनी लाभ घेणं चुकीचंच आहे, पण लाडक्या बहिणींच्या मतांनी या सरकारने आधी आपली सत्तेची पोळी शेकून घेतली आणि आता गरज संपताच याच बहिणींना योजनेतून वगळण्याचा सपाटा लावलाय..

सरकारच्या या कारस्थानाचा अंदाज आल्याने ही बाब मी गेल्या दोन अधिवेशनांमध्ये मांडली होती, त्यावेळी कुणालाही वगळण्यात येणार नसल्याचं सरकारकडून सांगितलं खरं पण तरीही सुमारे 26 लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारने एका झटक्यात त्यांना सावत्र बहिणीची वागणूक दिलीच. आधी 1 रुपयांत पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना ‘टोपी’ घालणारं आणि आता अटी-शर्तीची चाळणी लावून लाडक्या बहिणींनाही फसवणारं हे सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी आहे.

या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी असाही म्हटले आहे कि,’हे सरकार #दलालीच्या_दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की #लाडकी_बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहिण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी २०० कोटी रुपये खर्चाचा #GR काढला होता आणि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी ३ कोटींची मान्यता दिली. १५ ऑगस्ट २०२४ रोजच्या जीआर मधील २०० कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जीआर मध्ये नमूद असले तरी २३ नोव्हेंबर २०२३ च्या जीआरमध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे. माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी पहिली भेट
महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर
पंतप्रधान मोदींकडून पुढील कार्यासाठी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा
नवी दिल्ली
-भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती श्री. चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या पक्षकार्य अहवालात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून श्री. रविंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन लाभले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री. चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तब्बल १२५ ढोल-ताशा पथकातील वादकांची तुळशीबाग गणपतीला मानवंदना

श्री तुळशीबाग गणपतीच्या उत्सव मंडपाचे वासा पूजन संपन्न ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
पुणे : तब्बल १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीला वादनाच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष आणि ढोल ताशांचा निनाद यावेळी तुळशीबागेत घुमला. इतिहासात प्रथमच १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत बाप्पाला वादनातून वंदन केले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन थाटात पार पडले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने आणि पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते. परिसरातील व्यापारी व महिला कार्यकर्त्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. 

मंडळाचे यंदा  शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मामंडळाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. अरुण बबन भुकन यांच्या सहकुटुंबातर्फे श्रीं चरणी पालखी अर्पण करण्यात आली. ही पालखी ही राजस्थानमध्ये पुखराज मिस्त्री यांनी सागवान लाकडामध्ये घडवलेली आहे

कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे.  सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.

वय-२० ते २४ गुन्हे २९: चोरी, घरफोडी करणा-या ३ सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेडया

पुणे- वय अवघे २० ते २४ अन त्यांच्यावर चोऱ्या घरफोड्यांचे तब्बल २९ गुन्हे दाखल अशा ३ सराईत आरोपींना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि, दिनांक २५/०६/२०२५ रोजी अज्ञात आरोपीनी फिर्यादी यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील ४,५७,६९८/-रु. रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४३/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१ (३),३०५ (अ), ३ (५) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल आहेसदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच पुणे शहर परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन दाखल गुन्हयातील चोरट्या इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणाऱ्या इसमांपर्यत पोहचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपींनी त्यांची नावे १) रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे वय-२१ वर्षे रा. लक्ष्मीनगर, सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ, भोलेनाथ मंदीर शेजारी, येरवडा पुणे २) रोहीत उर्फ रावन नानाभाऊ लंके वय-२४ वर्षे रा. कस्तुरबा हाऊसिंग सोसायटी अनिरूध्द अपार्टमेन्ट प्लॅट नं.०१ विश्रांतवाडी पुणे. ३) निखील परशुराम खांडेकर वय-२० वर्षे रा. लक्ष्मीनगर सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ भोलेनाथ मंदीर शेजारी येरवडा पुणे असे सांगुन त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना दिनांक २४/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी १०,०००/-रू रोख रक्कम तसेच दाखल गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन व हत्यार जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
अटक आरोपींबाबत आधिक माहिती काढली असता सदर आरोपीवर पुणे शहर परीसरात चोरी, घरफोडी, शरीराविरुध्दचे अपराध यासारखे २९ गंभीर गुन्हे दाखल असुन अटक आरोपी नामे रोहीत नानाभाऊ लंके यास दि.०३/०५/२०२४ रोजी पोलीस उप आयुक्त परिमडंळ-०४ यांनी तडीपार आदेश क्र.२७/२०२४ नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम-५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिचंवड हद्दीतुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले असताना देखील सदर आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करून पुणे शहरात प्रवेश करून सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१ रुषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे),. चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या

शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क

शनी शिंगणापूर-शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागिल काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.

वास्तविक नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? या बाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, विश्वस्त मंडळाने केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने या अपहाराशी याचा संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते संस्थानमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, अनियमितता समोर आल्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आता शेटे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी देखील यासंदर्भात शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सध्या पोलिसांच्या वतीने शेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून यामध्ये काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चौकशीत काय समोर येणार? हे पहावे लागेल.

पुण्यात भर रस्त्यात धावत्या दुचाकीवर जोडप्याचे चाळे:सोशल मीडियावर VIDEO व्हायरल


पुणे-पुण्यात एका जोडप्याचे चक्क सार्वजनिक रस्त्यावर प्रेम प्रदर्शन करत वाहतूक नियमांना आणि सामाजिक संकेतांना धाब्यावर बसवले. या तरुण-तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड शिवापूरजवळील शिंदेवाडी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि त्याच्या पेट्रोल टँकवर एक तरुणी उलटी बसलेली दिसते. विशेष म्हणजे, ती तरुणी धावत्या दुचाकीवर तरुणाला मिठी मारताना, जवळीक साधताना स्पष्टपणे दिसते. या धक्कादायक प्रकाराकडे आसपासचे अनेकजण आश्चर्याने पाहत होते, तर काहींनी आपापल्या मोबाईलमध्ये या दृश्याचे चित्रीकरणही केले. पण या प्रेमीयुगलाला ना इतरांची पर्वा होती, ना वाहतुकीच्या नियमांची फिकीर.

तरुणीने स्कार्फने चेहरा झाकलेला असला तरी तिचे आणि दुचाकीस्वाराचे वर्तन अत्यंत बिनधास्त होते. रस्त्यावर वाहनांचा वेग असतानाही त्यांनी अशा पद्धतीने प्रेमाचे प्रदर्शन केल्याने ना फक्त अपघाताचा धोका वाढतो, तर इतर वाहनचालकांची एकाग्रताही भंग होते.या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर चांगलीच खळबळ उडाली आहे.अशा धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनामुळे रस्त्यावरील इतर वाहनधारकांचे प्राणही संकटात येऊ शकतात, हे विसरून चालणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

जुन्नरच्या आमदार शरद सोनवणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याने! पारधी-रामोशी समाजात संतापाची लाट,अट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी –

पुणे – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद भिमाजी सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह आणि जातीयवादी वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजाला उद्देशून खालच्या पातळीचे वक्तव्य केले, ज्यामध्ये त्यांनी या समाजांना थेट चोरीसारख्या गुन्ह्यांशी जोडले. हे वक्तव्य केवळ सामाजिक सलोख्याला बाधा आणणारे नाही, तर वंचित समाजाच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. या वक्तव्यमुळे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीसाठी झटणाऱ्या या समाजांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “आमदार शरद सोनवणे यांचे वक्तव्य निंदनीय आणि लोकशाहीच्या मूल्यांविरुद्ध आहे. संपूर्ण समाजाला गुन्हेगार ठरवणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होत आहे.

आम्ही सरकार ला मागणी करतो की, त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी.”त्यांनी पुढे सांगितले, “पारधी आणि रामोशी समाज हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आम्ही या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देऊ.”या वक्तव्यमुळे पारधी आणि रामोशी समाजासह अनेक आदिवासी पारधी विकास परिषद, आदी समाजातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी एकजुटीने कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी सोनवणे यांच्या वक्तव्याविरुद्ध आंदोलने आणि निषेध मोर्चांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे.या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ (अट्रॉसिटी कायदा) हा सामाजिक भेदभाव आणि अत्याचार रोखण्यासाठी लागू आहे. याअंतर्गत कोणत्याही समाजाला अपमानित करणारी वक्तव्ये किंवा कृती गंभीर गुन्हा मानली जातात. दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी सर्व समाजाला एकजुटीने या अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. “आमदारांनी जबाबदारीने बोलावे आणि समाजात सलोखा राखावा. आम्ही कोणत्याही समाजाविरुद्ध भेदभाव सहन करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

पुणे : – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’

पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

पुणे : – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’

वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
*‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

पुणे : प्रतिनिधी – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’

वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.

कोट
*‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’

पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.

दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गाथा जाधव-आयगोळे यांचा गौरव

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे स्व. दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने आज (दि. २७) गझलकारा गाथा जाधव-आयगोळे (कल्याण) यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते.
सातत्य आणि यश हातात घालून चालत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील सातत्य आम्ही कायम ठेवत आलो आहोत. रंगत-संगत प्रतिष्ठानला ३३ वर्षे झाली. दीड हजाराच्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दीपक करंदीकर यांच्यासारखे गझलप्रेमी कायम स्मृतीत राहावेत यासाठी गझलकारास पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार युवा पिढीच्या साहित्यक्षेत्रातील कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ते करत असलेल्या कार्यासाठी कौतुकाची थाप म्हणून देण्यात येतो, असे प्रमोद आडकर यांनी या प्रसंगी सांगीतले.
सत्काराला उत्तर देताना गाथा जाधव-आयगोळे म्हणाल्या, लिहिण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला. शाळेत असताना पहिल्यांदा लिहायला घेतले. जेव्हा जसे सुचले तसे लिहित गेले आणि लिहीत राहिले. लग्नाआधी वडिलांनी आणि नंतर पतीने माझ्यासोबत माझ्या लिखाणालाही पाठिंबा दिला. घरातूनच आधार मिळाला की स्त्री काहीही करू शकते. त्यामुळे अशी साथ प्रत्येक स्त्रीला मिळायला हवी. गझल लिखाणासोबतच सध्या गझलांवर सुरू असलेल्या संशोधनाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रज्ञा महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि स्वरचित गझल सादर केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्राजक्ता पटवर्धन, प्रभा सोनवणे, अजय जोशी, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी शउर, रेखा कुलकर्णी, शीला टाकळकर, कविता क्षीरसागर, चंचल काळे, अमिता पैठणकर, डॉ. मृदुला कुलकर्णी खैरनार या निमंत्रितांनी गझल सादर केली.
वासंती वैद्य, ऋचा कर्वे, प्राजक्ता वेदपाठक उपस्थित होते. शिल्पा देशपांडे आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. २७ जुलै २०२५: घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने शनिवारी (दि. २६) फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘विकसित भारत’चे उद्दिष्ट व भविष्यातील भक्कम अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सुमारे १५० खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रमाच्या कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींसाठी फुकेत येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते श्री. बोमन इराणी यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्विकारला.

देशातील १ कोटी घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. सुमारे ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून स्वतःची वीज निर्मिती करण्यासाठी निवासी कुटुंबांना सक्षम करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात तसेच अपर मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात २ लाख ४२ हजार ७१४ घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्याची क्षमता ९१९ मेगावॅट आहे. तर या योजनेत सहभागी ग्राहकांना आतापर्यंत तब्बल १६८५ कोटी ४२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीची दखल घेत महावितरणचा गौरव करण्यात आला.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती ग्राहकांना छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी आहे. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.