Home Blog Page 386

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात आगामी महानगर पालिका निवडणूक, सभासद नोंदणी या विषयावर नेत्यांचे मार्गदर्शन झाले व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, मंदार जोशी, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, विशाल शेवाळे, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, बसवराज गायकवाड, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, वीरेन साठे, निलेश आल्हाट, हबीब सैय्यद, विनोद टोपे, उमेश कांबळे, प्रवीण ओव्हाळ, अविनाश कदम, डॉ. कपिल जगताप, भारत भोसले, वसंत ओव्हाळ, संदीप धाडोरे, चिंतामन जगताप, सुगत धसाडे, गणेश जगताप, सज्जन कवडे, शशिकांत मोरे, मिलिंद पानसरे, सिदधू कांबळे, संतोष खरात, महादेव कांबळे, मिलिंद बनसोडे, रामभाऊ कर्वे, संग्राम रोहम, अंबादास कोतले, भीमराव वानखेडे, मंगल रासगे, शोभा झेंडे, चांदणी गायकवाड, संजय जाधव, अंकिता भालेराव, शंकर शेलार, शिवाजी गायकवाड, रामकृष्ण खिलारे, राजू कांबळे, यादव हरणे, सुनील जाधव, रोहित कांबळे, संजय पटणपल्लू, प्रमोद कदम, गोविंद साठे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, रमेश तेलवडे, हनुमंत गायकवाड, के. जी. पवळे, तुरुकमारे, वसंत वाघमारे, सुभाष शिंदे, बाळासाहेब खंकाळ, तानाजी तापकीरे, भीमराव वाघमारे, बाळासाहेब शेलार, अमित सोनवणे, शरनू गायछोडे, सशाक माने, प्रवीण येवले, शिवाजी उजागरे, खंडू शिंदे, अक्षय गायकवाड, अंबादास कोतले, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, शिवशरण गायकवाड, अमित सोनवणे, निखिल कांबळे, जाईल ऍंथोनी, मिलिंद चलवादी, शिवाजी वाल्हेकर, अनिकेत मोहिते, सचिन गायकवाड, संतोष कांबळे, विक्की वाळके, फक्कड शेळके, सुदर्शन कांबळे, सदा शिंगे, निखिल कांबळे, सागर सोनवणे व चारशे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिपाल वाघमारे व प्रास्ताविक शाम सदाफुले यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई, दि. 29:- पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. या उद्योग नगरीचा विस्तार सातत्याने वाढत आहे. येथील नागरिकांना आपल्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांसाठी पुणे येथील न्यायालयांपर्यंत धाव घ्यावी लागत होती. सोळा किलोमीटर अंतर, वाढलेली लोकसंख्या, वाहतुक कोंडी, औद्योगिकीकरण आणि सतत न्यायालयीन वाढत्या प्रकरणांची संख्या पाहता, स्थानिक न्यायालयांची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळा अधोरेखित केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणजेच 26 पदांसह जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, 24 पदांसह वरिष्ठस्तरीय दिवाणी न्यायालय व चार पदांसह शासकीय अभियोक्ता कार्यालयासाठी एकूण 54 नवीन पदांना मान्यता देण्यात आली असून, चार कोटी तीस लाख रुपये वार्षिक आवर्ती खर्च आणि 68 लाख रुपये अनावर्ती खर्च, असे एकूण मिळून चार कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत कनिष्ठ न्यायालये कार्यरत असून, त्याच ठिकाणी प्रस्तावित न्यायालयांसाठी कक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहेत. न्यायाधीशांच्या निवासासाठी अजमेरा शासकीय वसाहत, पिंपरी येथील 19 रिक्त घरांचा वापर होणार आहे.

“पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती. नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयांतूनच न्याय मिळेल, याचा अत्यंत आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.


पीसीसीओईआर ला स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र ओळख- ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची पहिली बैठक संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २९ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने नाव घेतले जाते. या ट्रस्ट अंतर्गत रावेत येथे २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वायत्तता मिळवली आहे. आता हे महाविद्यालय स्वतंत्र ओळख निर्माण करून आणखी तांत्रिक कुशल मनुष्यबळ करेल असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.
पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाची पहिली बैठक संपन्न झाली.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विशेष निमंत्रित शिक्षण तज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर तसेच प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, श्रीकांत पाटील, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.
लांडगे यांनी सांगितले की, या महाविद्यालयात कॉम्प्युटर, आयटी, इ अँड टीसी, मेकॅनिकल, सिव्हिल या अभियांत्रिकीच्या पदवीसह बीबीए आणि बीसीए एक कोर्स शिकवले जातात. आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त अभियंते येथे घडले आहेत आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशात कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी अध्यायावत उच्च तंत्रज्ञान नियुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच बहुतांशी प्राध्यापकांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी कृती अहवाल सादर केला. या अहवालात कॉलेजला मिळालेले “नॅक ए प्लस प्लस” मानांकन, युजीसीचे एनबीए मानांकन आणि आयएसओ प्रमाणपत्र, शैक्षणिक स्वायत्तता याचा समावेश होता. तसेच संशोधन प्रकाशन, उद्योग प्रायोजित प्रयोगशाळांना प्रोत्साहन, सल्लागार आणि निधी प्रकल्पांचे प्रमाण, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, उद्योजकता सुधारणे यासारख्या विषयांवर २०२५ – २०३० च्या धोरणात्मक सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीत नियामक मंडळाकडून स्वायत्तेखाली शैक्षणिक परिषद, अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळ, वित्त समिती, आयक्यूएसी इतर शैक्षणिक सुविधा व सुधारणा अशा वैधानिक समित्यांच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रादेशिक आव्हानांना सामोरे जावे असे प्रा. डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
उद्योग संस्थाच्या मदतीने आणि एआय वर आधारित नवीन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने नवनवीन विकास उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रा. डॉ. प्रफुल पवार यांनी समर्थन केले.
ट्रेन द ट्रेनर या कार्यक्रमाला श्रीकांत पाटील यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

उपसंचालक डॉ. राहुल मापारी यांनी स्वागत केले.

गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ? : अतुल लोंढे

हुर्रियत काँन्फरन्सबरोबर सर्वात जास्त चर्चा वाजपेयी सरकारकडून, देशाशी गद्दारी करण्याचे पाप भाजपाचे..

काँग्रेस सरकारने अफजल गुरु, कसाबला फाशी देऊन जेलमध्येच गाडले, पण भाजपा सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबाला दिला.

मुंबई, दि. २९ जुलै २०२५

ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात अतिरेक्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलवण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहत देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

अमित शाह यांच्या निवेदनाचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु व कसाबला फाशी दिली व जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबियांना देण्यात आला याची माहिती अमित शाह यांनी घ्यावी. हुर्रियत काँन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वात जास्त चर्चा केली आहे पण अमित शाह मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांचा जन्म पाकिस्तानातील, ते १० वर्षे पंतप्रधान होते पण ते पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. नरेंद्र मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता खरा सुत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शाह खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज: विश्वास उटगी.

0

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक.

मुंबई, दि. २९ जुलै..
इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला आज ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपह १ ऑगस्ट रोजी दादरच्या टिळक भवन येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी दिली आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, बँकांचे ताळेबंद सशक्त आहेत पण भारत सरकार व रिजर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील मेाठी बँक IDBI ची विक्री विदेशी बँकांना करीत आहे. अर्थ व्यवस्थेत बॅंकीग क्षेत्रात विदेशी भांडवलाचा प्रवेश हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे पण राष्ट्रीयकरण संपविणे ही या प्रक्रियेची सुरुवात आहे. १२ राष्ट्रीयकरण झालेल्या बॅंकांपैकी ५ बॅंकांना केंद्र सरकारच्या असेट मेानेटायझेशन पाइपलाइन मार्फत Disinvestment कार्यक्रम राबविण्यात येईल व या बॅंकांच्या खाजगीकरणाची सुरुवात होईल. यांची विक्री विदेशी भांडवलदारांना होणे हे जनतेला मान्य होणारे नाही. याला कडाडून विरेाध करणे आवश्यक आहे. बँक कामगार संघटना हे काम करीत आहेत. राजकीय पक्ष व पुरेागामी विचारांच्या संघटनांनी व्यापक भूमिका घेऊन बॅंक राष्ट्रीयकरण या संकल्पनेला सुरुवातीपासून विरोध करणारे आजच्या केंद्र सरकारमध्ये आहेत त्यामुळे बॅंकाविषयी काय कारस्थान व आंतरराष्ट्रीय भांडवलदारांशी काय साटेलेाटे आहेत हे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयकरणाने देशाचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. मागील १० वर्षांत मेादी सरकारने ही व्यवस्था खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. बॅंक राष्ट्रीयीकरण वाचविण्याचा प्रयत्न हा आता नागरिकांच्या व बॅंकांचे लाभार्थी यांची एकजुट करून मेादी सरकारचा डाव हाणून पाडता येईल. बँकातील कर्मचारी व अधिकारी आणि निवृत्त बँक कर्मचारी जर अग्रेसर असतील तर या लढयाला मेाठया चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने पहिली जाहीर सभा होत असून टिळक भवन येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ही सभा होत आहे. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, विश्वास उटगी, संजीव चांदोरकर यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहेत असेही विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई:परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, आ. तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवून, प्रत्येक क्षेत्रात राज्याला अव्वल बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या श्री. वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात भाजपा संघटना अधिक मजबूत होईल. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपामध्ये सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
यावेळी महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणारे श्री. वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल.
भाजपाच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री. वरपुडकर म्हणाले. सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्प श्री. वरपुडकर यांनी केला.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

मुंबई, दि. २९:- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेन असलेला हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेन रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

श्री पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.


रेव्ह पार्टी: पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकणार ? असीम सरोदे काय म्हणाले…

पुणे :खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केलीय. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. दरम्यान, या प्रकरणी खडसे कुटुंबियांनी खेवलकर यांना अडकवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.आता या प्रकरणावर वकील असीम सरोदे यांनी म्हटलं की, पोलिसांनी खेवलकर यांच्या खासगी जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन केलंय.

पुणे पोलिसांनी कोकेन, गांजाचे पुरावे प्लांट केले. पार्टी करणाऱ्या लोकांना समाजापुढे आरोपी असल्याचं दाखवण्यासाठी चित्र उभा केलं. त्यांचा व्हिडीओसुद्धा व्हायरल केला. यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून पुणे पोलिसांच्या अडचणी वाढू शकतात असा दावाही सरोदे यांनी केलाय.

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पुणे पोलिसांनी सात जणांना अटक केलीय. या प्रकरणात पोलिसांनी राजकीय उद्देश ठेवून दृश्यम चित्रपटासारखं खोटं चित्र रंगवलंय. घरात दारू पिणं गुन्हा नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाला रेव्ह पार्टीचं स्वरुप दिलं असल्याचंही सरोदे यांनी म्हटलं.

रेव्ह पार्टी वेगळी असते. तिथं मोठ्या आाजात संगीत, मोठ्या प्रमाणावर लोक, तोकडे कपडे, अफू, गांजा, नशिले पदार्थ यांचा समावेश असतो. पुणे पोलिसांनी कारवाई केली ते प्रकरण वेगळं आहे. एका ठिकाणी ते दारू, बिअर पित होते असं असीम सरोदे म्हणाले.

खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठरवण्यासाठी पुरावे पेरण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनीच हे कटकारस्थान रचलंय. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला. पण ७ मिलीग्रॅम कोकेन जास्त भरलं पाहिजे अशी व्यवस्था करत बेल न मिळण्यासाठी स्थिती निर्माण केली. पोलिसांनी एक चित्र निर्माण केलं. न्यायालयात जाण्याआधीच एक व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांना ही चूक भोवणार आहे असाही दावा असिम सरोदे यांनी केला.

खडसेंच्या घरात घुसले पोलिस,घराबाहेरही पाळत …एकनाथ खडसेंनी पोलिसांना केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभे..?

रेव्ह पार्टी…? पोलिसांनी बदनामी आणि राजकीय दबाव टाकण्यासाठी केलेली कृती आहे

पुणे:पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली व पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न व संशय उपस्थित केले आहे.एकनाथ खडसे म्हणाले, एकनाथ खडसे यांचे जावई यांना अटक करण्यात आली असल्याचे आपल्याला माहीत आहे. मुळात पोलिसांच्या विषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत, ते तुमच्या माध्यमातून विचारतो. पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी गोंधळ नाही, डान्स नाही काही नाही. एका घरात 7 जण बसले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे. तर रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे नेमकी? याला जर रेव्ह पार्टी म्हणत असाल तर महाराष्ट्रात, देशात कोणत्याही घरात असे 5-7 जण बसले तर त्याला रेव्ह पार्टीच म्हणावी लागेल. त्यामुळे पोलिसांना मला हे विचारायचे आहे की रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.


पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, दूसरा भाग असा आहे की पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई केली, त्या कारवाईचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की खासगी आयुष्यातील हे व्हिडिओ सगळ्या समोर दाखवावे? पोलिसांनी हे केवळ बदनामीसाठी केलेले कृत्य आहे. पोलिसांना असा कोणताच अधिकार नाही, महिलांचे देखील चेहरे दाखवण्याचा अधिकार तर मुळीच नाही. यात केवळ बदनामीचे सूत्र पोलिसांनी ठेवले होते, असा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच या सगळ्यात डॉ. खेवलकरांना पहिल्या नंबरचे आरोपी करण्याचे कारण काय? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.
प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जावयाने मला सांगितले की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी जात होतो, त्या-त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. सिविल ड्रेसमधील पोलिस पाळत ठेवत होते. त्याचे व्हिडिओ पण आहेत. पोलिसांना पाळत ठेवण्याचे काय कारण आहे. ज्या हॉटेलमध्ये हे गेले होते, पोलिस रात्री तिथे आले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही आहेत. जे पोलिस तिकडे होते तेच पोलिस इथे दिसले. एवढी तत्परता पोलिसांनी प्रफुल लोढा जो हनीट्रॅपमध्ये अडकला आहे, बलात्कारमध्ये अडकला आहे, ज्यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत, या संदर्भात पोलिस यंत्रणा किंवा सरकार पुढे येऊन माहिती का देत नाही? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.एकनाथ खडसे बदनाम झाला पाहिजे हे यांचे प्लॅन असल्याचे दिसते. वारंवार खडसेंचे जावई म्हणत बदनामी करत आहेत. ते दोषी असतील तर नक्कीच कारवाई करावी. पोलिसांनी व्हिडिओ काढले लगेच मीडियावर आले. फोटो काढले लगेच मीडियाकडे आले. लॅपटॉप जप्त केला, मोबाइल जप्त केले. त्यातले आमचे कौटुंबिक फोटो बाहेर कसे काय जातात? कोणी अधिकार दिला खासगी आयुष्यात डोकावण्याचा? पोलिसांच्या मागे कोणीतरी आहे. पोलिसांच्या मागे सूत्रधार कोण? असा प्रश्न खडसे यांनी विचारला आहे. याचा सखोल तपास केला जायला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात येऊन नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दीपक टिळक यांचा मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक अन्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दीपक टिळक यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग नोंदवला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, नाना भानगिरेआणि शहर संघटक आनंद गोयल, वैभव वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.दीपक टिळक हे ‘केसरी’ वृत्तपत्राचे संपादक होते आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घराण्याचे वंशज होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी एक मोठी हानी मानली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीमुळे टिळक कुटुंबियांना मोठा आधार मिळाल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्याच्या येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदुषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी पी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, पुणे महानगरपालिकेला पाणीपुरवठ्यासाठी पाणीवाटपापेक्षा अतिरिक्त पाणी महानगरपालिका उचलत असल्याने दौंड, इंदापूर, पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी पाणीवापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे. वितरणात जवळपास ४० टक्के पाणीगळती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल.

महानगरपालिकेने आपल्या हद्दीत तयार होणाऱ्यापैकी ८० टक्के सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेने पावले उचलावीत. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने तसेच अन्य बाबींसाठी वापरण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी मानकांप्रमाणे प्रक्रिया केलेले असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

एखादी त्रयस्थ यंत्रणा नेमूण नदीकाठावरील प्रदुषणाची ठिकाणे, अतिक्रमणे आदींच्या अनुषंगाने संपूर्ण नदीकाठाचे सर्वेक्षण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, पाणीपुरवठ्यातील गळती रोखण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुणे शहरातील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नाले आदींवरील अतिक्रमणे काढणे तसेच त्या ठिकाणी नागरिकांसाठी सायकल ट्रॅक आदी सार्वजनिक सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला परवानगी मिळणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मनपा आयुक्त श्री. राम यांनी महानगरपालिकेच्यावतीने पाण्याच्या गळतीचा लवकरात लवकर अभ्यास करू असे सांगितले. समान पाणीपुरवठा योजनेचे काही टाक्यांसह २० टक्के काम बाकी आहे. ३ लाख पाणीमीटर बसवले असून ५ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. पुणे महानरपालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट झाल्याने आकाराने महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रतिदिन ४७७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून जायकाचा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ३९६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नव्याने निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरण केले.

बैठकीस महानगरपालिका व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
000

पुण्याच्या पाण्यासाठीआगामी ३० वर्षांचा आराखडा तयार करावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहरासाठी आगामी ३० वर्षाचा पाण्यासाठीचा आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत केली.

राज्याचे जलसंपदा (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दि.२८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरासाठीचा आगामी ३० वर्षाचा पाण्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी केल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकारांना सांगितले.

बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, आमदार सुनिल कांबळे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शंकर मांडेकर, तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जलसंपदा खात्याचे कार्यकारी संचालक हणमंत गुनाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, पाणी पुरवठा मुख्य अभियंता नंदकुमार जगताप उपस्थित होते

मुठा नदीत २८ हजार ६६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग , पाण्याची पातळी वाढणार

पुणे-खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन संध्याकाळी ७ वाजता २८ हजार ६६२ क्यूसेक करण्यात आला आहे.यामुळे दुपारपेक्षा नदी पात्रातील पाण्याची पटली वाढणार असून नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी असे आवाहन मुठा कालवे पाटबंधारे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी केले आहे.

दरम्यान वरसगाव धरण ९२.३७ टक्के भरले असून पानशेत ९२.६९ टक्के भरले आहे तर खडकवासला धरण ७७.०७ टक्के भरलेले आहे.

डॉ. कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. अनंत देवगिरीकर यांना प्रदान 

 ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने सन्मान

पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वारजे (पुणे) येथे कार्यरत असलेले प्रा. अनंत मारुती देवगिरीकर यांना ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार प्रा. देवगिरीकर यांच्या अध्यापन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या संवेदनशील, जिव्हाळ्याच्या भूमिकेची दखल घेत प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रा. अनंत देवगिरीकर यांना शाल, सुवर्णपदक, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, तनिष्का फाउंडेशनचे अनिल जाहीर, ए. डी. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर, अध्यक्ष अशोक गोरड, अभिनेत्री ममता भोई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांच्या पत्नी दिपीका देवगिरीकर ह्या ही उपस्थित होत्या.

प्रा. अनंत देवगिरीकर यांनी अल्पवयातच शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला असून, अध्यापनातील निष्ठा, नवोपक्रमशीलता आणि समाजभान यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता, आत्मविश्वास आणि मूल्यसंस्कार निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक विकास साधला जातो. याच विविध अंगांनी समृद्ध असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल प्रा. देवगिरीकर यांचे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये सामंजस्य करार

पिंपरी, पुणे (दि. २८ जुलै २०२५) कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे भारतातील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रास उपयोग होईल. त्यातून सांस्कृतिक सहकार्याला देखील चालना मिळेल तसेच दोन्ही देशातील संशोधन आणि व्यावसायिक विकासात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील असे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. २५ जुलै) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. पीसीईटीच्या ट्रस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयसीसीकेचे चेअरमन आणि टीसीएस दक्षिण कोरिया चे प्रमुख रमेश अय्यर, क्रॉसकाउंटी इन्फोटेकच्या वैदेही कुलकर्णी, पीसीटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंध सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, विद्यार्थी विकास आणि कल्याण विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी आदी उपस्थित होते.
यावेळी पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, हा करार म्हणजे भारत आणि कोरिया या दोन देशांमधील शिक्षण, वाणिज्य, उद्योग, व्यापार, रोजगार, संशोधन या क्षेत्रात वाढ होण्यासाठी उपयुक्त आणि इतर विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल. आणि जागतिक पातळीवर या दोन्ही संस्थांना आणखी सक्षमपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी चालना मिळेल. पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना कोरियामध्ये आणि कोरिया मधील विद्यार्थ्यांना भारतामध्ये येऊन शिक्षण संशोधन करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल. यातून सांस्कृतिक देवाणघेवाण व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबवता येईल. नवउद्योजकांना संयुक्तपणे संशोधन करून आपले उद्योग प्रकल्प विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण होईल, यामुळे दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत. या ट्रस्ट अंतर्गत संचलित होणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व संशोधन केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यास पालक व विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. नव्याने स्थापन झालेल्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) देखील असेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उद्योजक व रोजगार सक्षम करण्यात येत आहे. पीसीईटीच्या हजारो विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल केले आहे याचा विश्वस्तांना व येथील प्राध्यापकांना अभिमान वाटतो.