पुणे , दि. १२: जागतिक आयात शुल्क बदलांचा राज्याच्या निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी विभागस्तरीय समिती आणि जिल्हा, विभागातील विविध उत्पादने निर्यात करणारे उपक्रम, औद्योगिक संघटना, उद्योजक यांचे चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी केंद्रीय संरक्षण विभागाचे प्रमूख सल्लागार अपूर्व चंद्रा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,विदेश व्यापार संचालनालयाचे सहसंचालक बी. एन. विश्वास, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक संदीप रोकडे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील उद्योजकांद्वारे निर्मित विविध उत्पादनांचे निर्यात उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, करसवलती आणि विविध शासकीय सवलती देण्याची मागणी उद्योग प्रतिनिधींनी केली आहे. दागिने तसेच इतर निर्यातदार युनिट्सना मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) सवलत मिळावी, किमान १५ वर्षांसाठी वीज करमाफी जाहीर करावी, मंजूर उपकरामुळे लहान उद्योगांवर पडणारा ताण कमी करावा, अग्निशमन विभागाकडून मिळणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता आकारले जाणारे शुल्क कमी करावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘Consent to Establish’ व ‘Consent to Operate’ या परवानग्यांसाठी मागविण्यात येणाऱ्या बँक हमीवरही पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. विद्यमान युनिट्सनादेखील एफआयईओमार्फत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा उद्योगांकडून व्यक्त झाली.
उद्योगांच्या वाढीसाठी हरित ऊर्जा धोरण राबविणे, निर्यात प्रोत्साहनासाठी विशेष सवलती जाहीर करणे, बहुविध वाहतूक उद्याने उभारणे, निर्यातदारांना कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व निर्यात प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई शासनाने करावी, या मागण्यांचाही बैठकीत समावेश होता.
मुंबई, दि. १२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील.
उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग
या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे.
तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा
नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे.
या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रूग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
पुणे-गणेशोत्सव झाला, नवरात्र येईल, नंतर दिवाळीतले फटाके, वर्षभर महापुरुषांच्या होणाऱ्या जयंती मिरवणुका, दांडगे विवाह सोहळे असे बरेच काही रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर सुरू असते. त्यात आपण सारे उत्साहाने, आनंदाने सहभागी होतो. फक्त आक्षेप येतो तो गोंगाट, कर्णकर्कश आवाजावर. कायदा आहे, नियम आहे, त्यावर न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही ध्वनी प्रदूषण प्रत्येक वर्षी होते, प्रत्येक गावात होते. यंत्रणा कारवाईसुद्धा करतात. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात तसेच सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरांत डीजे वाजला नाही. त्यामुळे या शहराचे कौतुक सर्वत्र होत आहे. दरम्यान, कलावंत ढोल ताशा पथकाने मोठी मागणी केली आहे. सर्व उत्सव डी जे मुक्त झाले पाहिजेत. असे कलावंत पथकाने म्हटले आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या वापरा विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. “डीजेवर बंदी घालावी” या मागणीसाठी रविवारी पुण्यात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली असून, या मोहिमेत अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत. या मोहिमेतून गोळा करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्या व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सौरभ गोखले यांनी दिली आहे. कलावंत ढोल पथकाच्या नेमक्य मागण्या काय? धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांतील मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त शोभायात्रांमध्ये डीजे/डॉल्बी व तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करावी. आवाजामुळे स्थानिक रहिवाश्यांना होणारा त्रास, शारीरिक हानी (जसे की बहिरेपणा) तसेच वाहतूक कोंडीस आळा घालावा. मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी.
कलावंत ट्रस्टकडून नागरिकांना आवाहन प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करून किंवा डिजिटल पिटीशन साइन करून या मोहिमेला पाठिंबा द्यावा. डिजिटल पिटीशनसाठीची लिंक कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. परंपरागत वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे जतन या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे कलावंतांनी स्पष्ट केले.
कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं… त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्यावेळी सायंकाळी 6 वाजता वादनासाठी तयार असून आणि मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करू नये टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री 9 वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबद्दल पथकाने पोस्ट करत चाहत्यांची माफी मागत खंत व्यक्त केली होती.
परवडणारी वाहने: दुचाकी, कार आणि बसवरील जीएसटी कमी करून 18% ; ट्रॅक्टरसाठी 5%
ऑटो-साहित्य लाभांमुळे बळकट पुरवठा साखळी आणि एमएसएमईत वाढ
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025-केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जीएसटी दरांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली. या सुधारणा दुचाकी, कार, ट्रॅक्टर, बस, व्यावसायिक वाहने आणि ऑटो-साहित्य यांना कर सवलत देत आहेत.
या सुधारणांमुळे वाहने अधिक परवडणारी ठरतील, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत मागणी वाढविण्यासाठी या सुधारणा महत्वाच्या ठरतील. यामुळे ऑटो-साहित्य पुरवठा साखळीत एमएसएमईंना बळकटी मिळेल, रोजगार निर्माण होईल आणि स्वच्छ, अधिक कार्यक्षम गतिशीलता वाढेल. करप्रणाली सुलभ आणि स्थिर केल्यामुळे, उत्पादन स्पर्धात्मकता वाढेल, शेतकऱ्यांना व वाहतूक ऑपरेटरांना सहाय्य करते आणि मेक इन इंडिया आणि पीएम गती शक्ती सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना बळकटी मिळेल.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढीला चालना
वाहने आणि ऑटो साहित्याच्या श्रेणींमध्ये जीएसटी दरांमध्ये अलिकडेच केलेली कपात ही एक परिवर्तनकारी पाऊल आहे, जी उत्पादक, सहाय्यक उद्योग, एमएसएमई, शेतकरी, वाहतूक ऑपरेटर आणि औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रातील लाखो कामगारांना लाभदायक ठरेल.
ठळक परिणाम:
• दुचाकी, लहान कार, ट्रॅक्टर, बस आणि ट्रक यांचे कमी दर • मागणी वाढून उत्पादन, विक्री, लॉजिस्टिक्स आणि सेवांमध्ये रोजगार निर्मिती • एनबीएफसी, बँका व फिनटेक्सद्वारे क्रेडिटवर आधारित वाहन खरेदीत वाढ • मेक इन इंडिया मध्ये प्रोत्साहन, स्पर्धात्मकता सुधारणा आणि स्वच्छ गतिशीलता
क्षेत्रनिहाय जीएसटी दरात बदल
वाहन/उत्पादन श्रेणी
पूर्वीचा GST दर
नवा GST दर
प्रमुख फायदे
दुचाकी (<350 cc)
28%
18%
युवक, ग्रामीण कुटुंबे व गिग कामगारांसाठी सहज उपलब्ध गतिशीलता
लहान कार
28%
18%
प्रथमच खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन, छोट्या शहरांतील विक्रीत वाढ
मोठ्या कार
28% + उपकर
40% (Flat)
करप्रणाली सोपी, पूर्ण आयटीसी पात्रता, आकांक्षी खरेदीदारांसाठी परवडणारी किंमत
ट्रॅक्टर (<1800 cc)
12%
5%
भारताच्या जागतिक ट्रॅक्टर हब दर्जाला बळकटी, शेती यांत्रिकीकरणाला चालना
बस (10+ आसन)
28%
18%
परवडणारी सार्वजनिक वाहतूक, फ्लीट विस्तारास सहाय्य
व्यावसायिक मालवाहतूक
28%
18%
वाहतूक खर्चात घट, महागाईचा भार कमी, पुरवठा साखळी अधिक सक्षम
ऑटो साहित्य
28%
18%
पूरक एमएसएमई चालना, देशांतर्गत उत्पादन वाढ
मालवाहतूक विमा
12%
5% (आयटीसी सह)
लॉजिस्टिक्सला सहाय्य, वाहतूकदारांचा खर्च कमी
परिसंस्थेतील फायदे 1. रोजगार आणि एमएसएमई • ऑटो आणि संबंधित क्षेत्रातील 3.5 कोटींहून अधिक जास्त रोजगार निर्मिती • टायर, बॅटरी, काच, स्टील, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक्समधील लहान व्यवसायांवर बहुगुणित परिणाम • चालक, मेकॅनिक, गिग वर्कर्स व सेवा प्रदात्यांसाठी अधिक संधी
2. स्वच्छ व सुरक्षित वाहतूक • जुन्या, प्रदूषित वाहनांच्या जागी इंधन कार्यक्षम मॉडेल्स वापरण्यास प्रोत्साहन • बस व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास चालना, गर्दी व प्रदूषण कमी
3. लॉजिस्टिक्स व निर्यात वाढ • कमी भाडे दरामुळे शेती, एफएमसीजी, ई-कॉमर्स व औद्योगिक पुरवठा साखळी बळकट • पी एम गती शक्ती व राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणांतर्गत भारताची निर्यात स्पर्धात्मकता सुधारते
ही जीएसटी सुधारणा भारताला परवडणारी, कार्यक्षम व टिकाऊ गतिशीलतेच्या दिशेतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. वाहन व ऑटो-साहित्यावर कर भार कमी झाल्याने ग्राहकांना फायदा, ऑटो परिसंस्था बळकट, एमएसएमई ला सहाय्य व शहर व ग्रामीण भागात रोजगार वाढणार आहे.
22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारे जीएसटी सुधार नागरिकांचे जीवनमान आणि उद्योगांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासोबतच भारताच्या अधिक सोप्या, न्याय्य आणि विकासाभिमुख जीएसटी आराखड्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करतात.
पुणे- २ देशी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या आंबेगाव पठारावर राहणाऱ्या २२ वर्षीय ओमकार जाधवला पोलिसांनी पकडले,तो दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्टल बाळगून फिरत होता . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १०/०९/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन सापळा रचुन आरोपी ओंमकार दिपक जाधव वय २२ वर्षे रा. साई सिध्दी चौक स.नं. १६, दुसरा मजला आंबेगाव पठार पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ७१,४००/-रु.किं.चे २ देशी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, सुर्या जाधव, अमित चिव्हे, अमोल दबडे, श्रीकांत शिंदे, मनोज बनसोडे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे व किर्ती भोसले यांनी केली आहे.
शक्तिशाली सिनेमॅटिक फीचर्स, सहज वापरता येणारी डिझाईन रचना आणि वाजवी किंमत यामुळे प्रत्येकासाठी वापरायला सुलभ कॅमेरा
· 33MP फुल फ्रेम बॅक इल्यूमिनीटेड CMOS सेन्सर, QFHD 4K 60p (S35mm) पर्यंत, FX2 मुळे उच्च दर्जाचे सिनेमॅटिक व्ह्यूज सादर
·15 हून अधिक स्टॉप वाईड लॅटीट्युड आणि ड्युअल बेस ISO (800/4000), यामुळे कमी उजेडात देखील अप्रतिम दर्जाचे पिक्चर मिळते
·16 User LUTs मुळे प्रॉडक्शन दरम्यान क्रिएटिव्ह लुक्सचा रिअल-टाईम प्रीव्ह्यू करता येतो
· S-Cinetone™ फीचरमुळे, तो सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्यांच्या टोनशी जुळतो आणि प्रत्येक कथेसाठी हाय-एंड व्हिज्युअल्स सुनिश्चित करतो
·स्लो अँड क्विक मोशन फीचर वापरकर्त्यांना 4K मध्ये 60 fps आणि Full HD मध्ये 120 fps पर्यंत रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. त्यामुळे नाट्यपूर्ण स्लो-मोशन इफेक्ट्स तयार होतात.
· न्यू लॉग शुटींग मोड सारखी नवीन वैशिष्ट्ये स्थिर चित्रे कॅप्चर करण्यासाठी समाविष्ट केली गेली आहेत आणि NEW Tiltable 3.68M-dot EVF फीचर हायब्रिड बहुउपयोगिता खुली करते
·अनोखे BIG6 (Home) Screen वैशिष्ट्य सर्वाधिक वापरले जाणारे सेटिंग्ज सहज उपलब्ध करून देते
· समान फॉर्म फॅक्टर आणि सोपे कंट्रोल्स यामुळे तो सोलो शूटर्ससाठी परिपूर्ण पर्याय ठरतो
·पर्यायी XLR Handle आणि मल्टी- ॲप्लिकेशन सपोर्टमुळे FX2 कोणत्याही प्रॉडक्शन स्टाईलसाठी तयार आहे
नवी दिल्ली – सोनी इंडियाने नव्या पिढीतील निर्मात्यांसाठी डिझाईन करण्यात आलेला आटोपशीर फुल-फ्रेम सिनेमा लाईन हायब्रिड नवीन FX2 कॅमेरा सादर केला आहे. प्रगत सिनेमॅटिक तंत्रज्ञानासह FX2 कॅमेरा उदयोन्मुख चित्रपट निर्माते, विद्यार्थी, स्वतंत्र व्हिडिओग्राफर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना म्हणजेच आशय निर्मात्यांना त्यांचा अनुभव किंवा क्रू साईज काहीही असला तरी त्यांची सर्जनशील दृष्टी वाढवण्यासाठी सक्षम करतो. FX2 प्रगत वैशिष्ट्ये आणि सोनीच्या अद्वितीय कलर सायन्स यांचे मिश्रण करून, वापरकर्त्यांना त्यांचा प्रकल्प आकाराने लहान किंवा गुंतागुंतीचा असला तरी त्यांची सर्जनशील क्षमता मुक्त करण्यास सक्षम करतो.
सोनी इंडियाच्या इमेजिंग बिझनेसचे प्रमुख श्री. मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “FX2 कॅमेरा पुढील पिढीच्या स्टोरीटेलर्ससाठी म्हणजेच विशेषतः विद्यार्थी आणि सोलो क्रिएटर्ससाठी त्यांना त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. हा केवळ एक कॅमेरा नाही; तर एक क्रिएटिव्ह पार्टनर आहे. तो त्यांच्या फिल्ममेकिंग प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत वाढेल आणि आम्ही या कॅमेर्यामुळे तयार होणाऱ्या अप्रतिम कथांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.”
· 33MP फुल फ्रेम बॅक इल्यूमिनीटेड CMOS सेन्सर, QFHD 4K 60p (S35mm) पर्यंत, FX2 मुळे उच्च दर्जाचे सिनेमॅटिक व्ह्यूज सादर
सोनी FX2 कॅमेरा हा हाय-परफॉर्मन्स सिनेमा लाईन कॅमेरा असून तो फुल-फ्रेम 33.0MP बॅक-इल्युमिनेटेड CMOS सेन्सरद्वारे अप्रतिम सिनेमॅटिक इमेजरी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कॅमेरा QFHD 4K 60p पर्यंत ऑफर करतो ज्यामुळे उच्च रिझोल्यूशन आणि बोकेह इफेक्टसह अप्रतिम सिनेमॅटिक इमेजेस मिळतात. यामध्ये नवीन सिस्टम आर्किटेक्चर, BIONZ XR इमेज प्रोसेसिंग आणि एआय प्रोसेसिंग युनिट आहे. त्यामुळे FX2 बारीकसारीक समृद्ध तपशीलांसह प्रतिमा कॅप्चर करू शकतो आणि ऑब्जेक्टला स्पष्टपणे उठाव देतो.
· 15 हून अधिक स्टॉप वाईड लॅटीट्युड आणि ड्युअल बेस ISO (800/4000), यामुळे कमी उजेडात देखील अप्रतिम दर्जाचे पिक्चर मिळते
हा कॅमेरा 15 हून अधिक स्टॉप्सपर्यंत वाइड डायनॅमिक रेंज, Dual Base ISO (800/4000) आणि ISO 102400 पर्यंत विस्तारित सेंसिटिव्हिटी सादर करतो. त्यायोगे उच्च दर्जाचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेता येतो. या वैशिष्ट्यामुळे FX2 मधून अप्रतिम चांगल्या प्रतिमा घेता येतात, अगदी कमी उजेड असतानाही दृश्य अचूकपणे टिपता येते. त्यामुळे तो व्हिडिओग्राफीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.
· 16 User LUTs मुळे प्रॉडक्शन दरम्यान क्रिएटिव्ह लुक्सचा रिअल-टाईम प्रीव्ह्यू करता येतो
16 User LUTs सह हा कॅमेरा इमेजेस आणि व्हिडिओ सहजपणे इम्पोर्ट करण्याची खात्री देतो. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर्स आणि DOPs त्यांचा क्रिएटिव्ह ग्रेड सेटवर लाईव्ह प्रीव्ह्यू करू शकतात. त्यातून अंतिम लुकवर अचूक नियंत्रण मिळते.
· S-Cinetone™ फीचरमुळे, तो सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्यांच्या टोनशी जुळतो आणि प्रत्येक कथेसाठी हाय-एंड व्हिज्युअल्स सुनिश्चित करतो
सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्यांचा सिग्नेचर टोनशी सुसंगत हे उत्पादन सोनीच्या प्रसिद्ध S-Cinetone™ कलर तंत्रज्ञानासह येते. या वैशिष्ट्यामुळे FX2 प्रत्येकासाठी हाय-एंड सिनेमॅटिक व्हिज्युअल्स देण्यासाठी डिझाईन केला आहे. जोडीला या वैशिष्ट्यामुळे DOPs शूटिंग दरम्यानच कलर अॅडजस्टमेंट करू शकतात.
· स्लो अँड क्विक मोशन फीचर वापरकर्त्यांना 4K मध्ये 60 fps आणि Full HD मध्ये 120 fps पर्यंत रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. त्यामुळे नाट्यपूर्ण स्लो-मोशन इफेक्ट्स तयार होतात.
या कॅमेर्यामध्ये प्रगत स्लो आणि क्विक मोशन फीचर आहे. त्यामुळे वापरकर्ते 4K मध्ये प्रति सेकंद 60 फ्रेम्स आणि Full HD मध्ये प्रति सेकंद 120 फ्रेम्स शूट करू शकतात. यामुळे नाट्यमय स्टोरीटेलिंग आणि क्रिएटिव्ह फ्लेक्सिबिलिटीसाठी अप्रतिम स्लो-मोशन इफेक्ट्स मिळतात.
· सखोल रंग आणि स्पष्टता सुनिश्चित करत 4:2:2 10-bit रेकॉर्डिंग सिनेमा लुक
FX2 4K व्हिडिओ 4:2:2 10-bit मध्ये कॅप्चर करून अप्रतिम डिटेल, कलर डेप्थ आणि टोनल रेंज सुनिश्चित करतो. त्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये निर्दोष परिणाम मिळतात.
· न्यू लॉग शुटींग मोड सारखी नवीन वैशिष्ट्ये स्थिर चित्रे कॅप्चर करण्यासाठी समाविष्ट केली गेली आहेत आणि NEW Tiltable 3.68M-dot EVF फीचर हायब्रिड बहुउपयोगिता खुली करते
नवीन लॉग शुटींग मोड मेन्यूद्वारे पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेत कलर ग्रेडिंगसाठी 33MP रिझोल्यूशनपर्यंत स्टिल्स शूट करता येतात. यामुळे वापरकर्ते रेकॉर्ड केलेल्या चित्रपटांमधूनच कॅमेरा मध्येच स्टिल इमेजेस (स्थिर प्रतिमा) कॅप्चर करू शकतात. याशिवाय, उच्च-परिभाषा Tiltable EVF कोणत्याही शूटिंग परिस्थितीशी जुळवून घेतो. त्यामुळे पाहणे सोपे होते. या दोन्ही वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते सर्वोत्तम सिनेमॅटिक इमेजेस तयार करू शकतात.
· अनोखे BIG6 (Home) Screen वैशिष्ट्य सर्वाधिक वापरले जाणारे सेटिंग्ज सहज उपलब्ध करून देते
सोनी FX2 वरील BIG6 (Home) Screen हे एक अनोखे, सुलभ युजर इंटरफेस असून मुव्ही मोड मध्ये एका सिंगल पेजवर फ्रेम रेट (FPS), ISO, शटर स्पीड किंवा अँगल, ॲपेचर किंवा एनडी फिल्टर, लुक प्रेसेंट आणि व्हाईट बॅलन्स अशा सहा महत्त्वाच्या शूटिंग पॅरामिटर्स यांना जलद ॲक्सेस देते. हे स्क्रीन फिल्ममेकर्सना हे सेटिंग्ज त्वरित मॉनिटर आणि अॅडजस्ट करण्यास सक्षम करते. त्यामुळे व्हेरीएबल आणि फिक्स्ड कॉन्फिगरेशन दोन्हीला सपोर्ट मिळतो. यामुळे कार्यक्षमता वाढते आणि ऑन-सेट उत्पादकता सुधारते. सतत वापरल्या जाणाऱ्या या कंट्रोल्सच्या केंद्रीकरणामुळे सोलो शूटर्स तसेच प्रोफेशनल्ससाठी सर्जनशील नियंत्रण राखणे आणि वेळ वाचवणे अधिक सुलभ होते.
· समान फॉर्म फॅक्टर आणि सोपे कंट्रोल्स यामुळे तो सोलो शूटर्ससाठी परिपूर्ण पर्याय ठरतो
FX2 चे एर्गोनॉमिक डिझाईन विशेषतः सोलो शूटर्ससाठी तयार केले आहे. यात आटोपशीर, हलक्या वजनाचे बॉडी स्टाईल आणि intuitive कंट्रोल लेआउट असून सोनीच्या प्रसिद्ध FX3 आणि FX30 कॅमेर्यांमधून घेतले गेले आहे.
· पर्यायी XLR Handle आणि मल्टी- ॲप्लिकेशन सपोर्टमुळे FX2 कोणत्याही प्रॉडक्शन स्टाईलसाठी तयार आहे
FX2 मध्ये प्रगत ऑडिओसाठी पर्यायो XLR Handle सपोर्ट आहे आणि विविध सोनी ॲप्लिकेशन्ससाठी सपोर्ट आहे. त्यामध्ये रिमोट मॉनीटरिंग आणि नियंत्रण यांचा समावेश आहे. त्यामुळे तो प्रत्येक प्रॉडक्शन स्टाईल आणि आवश्यकतेशी जुळवून घेण्यास सक्षम आहे.
किंमत आणि उपलब्धता
FX2 फुल-फ्रेम सिनेमा लाईन कॅमेरा 11 सप्टेंबर 2025 पासून भारतभरातील सर्व सोनी अधिकृत रिटेल आउटलेट्स, सोनी कॅमेरा लाऊंज, अल्फा फ्लॅगशिप स्टोअर्स, सोनी सेंटर, www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाईट्स (ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट) वर उपलब्ध असेल. FX2 आणि FX2B सोबत मर्यादित कालावधीसाठी 5,890/-रु. किमतीची अतिरिक्त रिचार्जेबल बॅटरी मोफत मिळेल.
पुणे-भारतीय सैन्याचे माजी अधिकारी, पुण्याचे लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय (वय 77 वर्षे) यांनी एक ऐतिहासिक पराक्रम गाठला आहे. त्यांनी एकट्याने बाईकवर बसून 19,024 फूट उंचीवर असलेल्या उमलिंगला पासपर्यंत (लेह, लडाख) प्रवास केला, जो जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता आहे. 20 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान त्यांनी आपल्या विश्वासू रॉयल एनफील्ड क्लासिक 500 (विझार्ड) वर हा कठीण प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अखंड पाऊस, भूस्खलन, वीज खंडित होणे आणि संपर्क खंडित होणे अशा अनेक अडचणींवर मात केली. त्यांची ही कामगिरी सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायी संदेश देते की चिकाटी, शिस्त आणि आवड कधीही वृद्ध होत नाही.
या प्रवासात ते जम्मू, श्रीनगर, द्रास, कारगिल, लेह, न्योमा आणि हनले येथून जात उमलिंगला पर्यंत पोहोचले. वाटेत त्यांनी कारगिल वॉर मेमोरियल आणि 194748 च्या बडगाम युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्यांचे सहकारी माजी सैनिक आणि देशभरातील रायडर समुदायांनी केले.
लेफ्टनंटकर्नल रॉय यांचा प्रवास हा केवळ साहसासाठी नसून उद्देशासाठी आहे. कुमाऊं रेजिमेंटच्या 15व्या बटालियनमध्ये (इंदूर) त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि जवळपास तीन दशके भारतीय सैन्यात सेवा दिली. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या एलओसीवर, आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि ईशान्य भारतातील दहशतवादविरोधी मोहिमेत काम केले. त्यांच्या तरुणपणी ते फुटबॉलपटू, बॉक्सर आणि मॅरेथॉन धावपटू होते. 2000 मध्ये गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला तरी त्यांनी तो नाकारून मोटरसायकलिंगला आपले ध्येय बनवले. आजवर त्यांनी भारत आणि विदेशांमध्ये मिळून 2,50,000 किमीपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. ते या प्रवासाला केवळ वैयक्तिक आनंद मानत नाहीत, तर त्याला ते “पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी” (PSR) असे संबोधतात.
आपल्या राईड्सच्या माध्यमातून ले. कर्नल रॉय बेटीबचाओ अभियानाचा संदेश देतात, ग्रामीण तरुणांना शिक्षण घेण्यासाठी व सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि भारत तसेच विदेशातील युद्धस्मारकांवर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. ते खारदुंगला गाठणारे सर्वात ज्येष्ठ रायडर म्हणून लिम्काबुकऑफरेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहेत. तसेच त्यांनी इंडियाबुकऑफरेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळवले असून, त्यांना बुद्ध आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला 1 सर्किटसह अनेक प्रतिष्ठित मंचांवर गौरविण्यात आले आहे.
सोहन यांनी पुणे ते नवी दिल्ली नॅशनलसेफ्टीरॅली चे नेतृत्व केले आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा मोहिमा राबवल्या.
इतकेच नाही, तर त्यांच्या मनाजवळ असलेल्या आणखी एका कार्यात त्यांनी सहभाग घेतला – ऊटी येथे फील्ड मार्शल व श्रीमती एस.एच.एफ.जे. माणेकशॉ यांच्या समाधींचे जतन व दुरुस्ती. दक्षिण कमांड मुख्यालय, पुणे यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तत्काळ कारवाई करण्यात आली आणि समाधीला आवश्यक असलेली प्रतिष्ठा परत मिळवून दिली.
त्यांच्या राईडिंगच्या प्रवासात सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्प, रेजांगला, तवांग, वलॉंग, लोंगेवाला, दिल्लीतील अमर जवान ज्योति आणि मलेशियातील नॅशनल वॉर मेमोरियल अशा ठिकाणांचा समावेश आहे. 2025 मध्ये त्यांनी थायलंडचा मेहॉन्गसोनलूप जिंकला आणि त्यानंतर उमलिंगला पर्यंतचा हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला.
आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना ले. कर्नल रॉय म्हणाले: “वयवाढल्यावरतुम्हीबाइकचालवणंथांबवतनाही. तुम्हीबाइकचालवणंथांबवतातेव्हातुम्हीवृद्धहोता. 77 व्यावर्षीउमलिंगलानेमलाआठवणकरूनदिलीकीसैनिकाचीजिद्दकधीहीसंपतनाही.”
लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय आजही तरुण, रायडर्स आणि माजी सैनिकांना प्रेरणा देत आहेत. त्यांचे प्रवास हे शहीदांना श्रद्धांजली आहेत, सामाजिक जबाबदारीची आठवण आहेत आणि हे जिवंत उदाहरण आहे की धैर्याला कधीही निवृत्ती नसते.
रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन यांचे उद्गार
पुणे – आरोग्यविमा प्रीमियम करमुक्त ठेवण्याचा आणि विमा कंपन्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट वापरण्याची मुभा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय हा ग्राहकांचे हित साधणारा आहे, तसेच विमा उद्योगाच्या वाढीला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या सुधारणेमुळे लाखो कुटुंबांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान व्यवसायांना आरोग्य संरक्षण घेणे अधिक परवडणारे होईल, याचे कारण प्रीमियमची रक्कम भरणे हे अनेकदा त्यांच्यासाठी ओझे ठरते.
विम्याचा खर्च कमी झाल्यामुळे अधिकाधिक लोकांना विमा संरक्षण लवकर घ्यायला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे जोखीम समानपणे पसरून लोकांवरील आर्थिक भार कमी होईल (रिस्क पूल अधिक बळकट होईल) आणि विमा क्षेत्राची दीर्घकालीन स्थिरता वाढेल. विमा हे केवळ एक आर्थिक उत्पादन नसून ते वाढता आरोग्य खर्च आणि अनपेक्षित संकटांपासून सुरक्षा देणारे कवच आहे. जीएसटी करमुक्तीच्या सरकारच्या निर्णयामुळे कुटुंबांच्या आर्थिक नियोजनात विमा अधिक ठामपणे समाविष्ट होईल.
करकपातीचा निर्णय हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय असून, ग्राहक आणि विमा कंपन्या दोघांनाही तो लाभदायी ठरणारा आहे. निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भारत घडविण्याच्या प्रवासातही ही सुधारणा मोलाचे योगदान देईल.
·हे केंद्र ग्रामीण युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण देईल तसेच नोकरीवर प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देईल ·भारताच्या लोकसंख्यात्मक वैविध्याचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कौशल्य विकासावर जो भर देत आहेत त्याच्याशी सुसंगत
गडचिरोली: भारताचा प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या महिन्द्रा ट्रॅक्टर्सने महाराष्ट्र शासनाबरोबर गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी करार केला आहे. हा करार मुंबई येथे महिन्द्रा ट्रॅक्टर्स, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग विभाग (DVET) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS)यांच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
हे कौशल्य विकास केंद्र महिन्द्रा ट्रॅक्टर्स, DVET आणि MSSDS यांचा एकत्रित उपक्रम असून गडचिरोलीतील ग्रामीण युवकांमध्ये कौशल्य विकास वाढवण्यावर याचा भर आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण युवकांना उद्योगसिद्ध कौशल्यांनी सक्षम करणे तसेच स्थानिक जीवनमानाला चालना देणे आहे. हा उपक्रम भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्य विकास या राष्ट्रीय प्राधान्याशी पूर्णतः अनुरूप आहे.
या प्रसंगी महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, “महाराष्ट्र हे केवळ एक अग्रगण्य औद्योगिक केंद्र नाही, तर कृषी क्षेत्राच्या विकास प्रवासाशी घट्ट जोडलेले राज्य आहे. गडचिरोलीतील ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिथे ग्रामीण समाज उन्नत होईल आणि ग्रामीण समृद्धी अधिक बळकट होईल असा भविष्यकाळ एकत्रितपणे आपण घडवूयात.”
कौशल्य विकासात उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी जपत गडचिरोलीतील ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राद्वारे महिन्द्रा ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्रीमध्ये अतुलनीय उद्योग कौशल्य आणेल. हे केंद्र उत्पादन कारखान्यातील असेंब्लीची भूमिका तसेच डीलरशिप ठिकाणांवरील विक्री आणि सेवा भूमिकांसह संपूर्ण परिसंस्थेत करिअरच्या अनेक संधी खुल्या करेल. सुसूत्र अभ्यासक्रमाद्वारे हे शक्य झाले असून, उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे व ट्रॅक्टर-संबंधित कौशल्यांच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
‘प्रोजेक्ट मन’अंतर्गत २१ शहरांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती; त्यामुळे ‘सीआयएसएफ’चे जवान व त्यांच्या कुटुंबियांना अधिक व्यापक लाभ
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम असलेल्या एमपॉवर या संस्थेसोबत असलेला सामंजस्य करार (एमओयू) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आणखी तीन वर्षांसाठी वाढविला आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी या कराराचे नूतनीकरण करण्यात आले. ‘एमपॉवर’च्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट मन’ या मानसिक आरोग्य उपक्रमाचा आतापर्यंत आलेला यशस्वी अनुभव या निर्णयामागे आहे.
‘प्रोजेक्ट मन’साठीचा पहिला करार नोव्हेंबर २०२४मध्ये एमपॉवर व सीआयएसएफ यांच्यात एका वर्षासाठी झाला होता. त्या कालावधीत तब्बल ७५,०००पेक्षा अधिक जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना व्यावसायिक समुपदेशनाचा लाभ मिळाला. या काळात ‘सीआयएसएफ’मधील आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालेले आढळले.
सध्या देशात असलेल्या ‘सीआयएसएफ’च्या १३ क्षेत्रांमध्ये ‘एमपॉवर’चे २३ समुपदेशक व क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ सेवा देत आहेत. आताच्या या करारवाढीमुळे समुपदेशकांची ही संख्या ३०वर नेण्यात येणार असून पाटणा, अहमदाबाद, प्रयागराज, भोपाळ / इंदौर, जम्मू, चंदीगड, जयपूर व कोची या नव्या केंद्रांमध्येही सेवा उपलब्ध होणार आहेत.
‘प्रोजेक्ट मन’च्या फायद्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली आहे. मानसिक आरोग्याविषयीची कलंकित दृष्टी कमी होणे, वेळेवर मदत घेण्याची प्रवृत्ती वाढणे, भावनिक प्रतिकारशक्ती आणि समस्यांचा सामना करण्याची क्षमता बळकट होणे, दुर्गम किंवा उच्च सुरक्षा क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण सेवा उपलब्ध होणे तसेच अनुपस्थिती, मानसिक थकवा व दीर्घकालीन मानसिक समस्यांमध्ये घट होणे यांचा या फायद्यांमध्ये समावेश आहे.
कराराच्या नूतनीकरणप्रसंगी ‘सीआयएसएफ’चेमहासंचालकआर. एस. भट्टी म्हणाले, “आमच्या जवानांचे आरोग्य आणि एकंदरीत कल्याण हा आमच्या कार्यक्षमततेचा मूळ आधार आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टसोबतच्या भागीदारीमुळे आमचे दल मानसिकदृष्ट्या सक्षम, भावनिकदृष्ट्या खंबीर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांसाठी सदैव तयार राहील.”
‘एमपॉवर’च्यासंस्थापिकावअध्यक्षानीरजाबिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्य हे एकूणच जीवनाच्या आरोग्याचे केंद्र आहे असे आम्ही एमपॉवरमध्ये मानतो. सीआयएसएफसोबतची आमची भागीदारी अतिशय परिणामकारक ठरली आहे. आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करून प्रत्येक जवान व त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यास आणि त्याची काळजी घेत त्याला आधार देण्यास कटिबद्ध आहोत.”
मानसिकदृष्ट्या सुदृढ असे सुरक्षा दल घडविण्याचा सीआयएसएफ व एमपॉवर या दोन्ही संस्थांचा समान दृष्टीकोन या करारवाढीद्वारे अधोरेखित होत आहे. भारत सरकारच्या ‘टुगेदर फॉर मेंटल हेल्थ’ या कार्यक्रमाशी हा उपक्रम सुसंगत आहे.
लंडन (युके) – भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) हा भारतातील सर्वात मोठा फोर्जिंग व प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रातील समूह, आणि विंडरेसर्स लिमिटेड ही जड भार वाहू शकणाऱ्या, दुहेरी वापरण्यायोग्य अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती करणारी युनायटेड किंगडममधील कंपनी, या दोघांनी विंडरेसर्स अल्ट्रा हे मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) भारतात सादर करण्यासंदर्भात आपसांत एक सामंजस्य करार केला आहे. ‘यूएव्ही’चे तैनातीकरण, स्थानिकीकरण व वापर यांवर एकमेकांशी सहकार्य करण्यासाठी हा करार झाला आहे. लंडन येथे झालेल्या ‘डीएसईआय यूके २०२५’ या प्रदर्शनात या करारावर शिक्कामोर्तब झाले.
भारत व युके यांच्यातील मुक्त व्यापार करारान्वये दोन्ही देशांमध्ये एअरोस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान हस्तांतरण व नवोन्मेष वाढविण्याच्या हेतूने ही भागीदारी दोन्ही कंपन्यांनी केली. ‘इंडिया-यूके व्हिजन २०३५’ या धोरणाशी ही भागीदारी सुसंगत आहे. हा करार सध्या तरी दोन वर्षांच्या कालावधीसाठीचा असून, त्याअंतर्गत स्थानिकीकरण वाढविणे, संयुक्त चाचण्या घेणे आणि भारतातील प्रत्यक्ष तैनातीसाठी अंतिम कराराची रूपरेषा तयार करणे याची संधी दोन्ही कंपन्यांना मिळेल.
‘अल्ट्रा’च्या क्षमतांचा वापर करून भारताच्या लष्करी तसेच नागरी क्षेत्रातील नव्या गरजा पूर्ण करण्याचा भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांचा मानस आहे. भारतीय नौदलासाठी कॅरिअर ऑन बोर्ड डिलिव्हरी (सीओडी) मोहिमा, लष्कर व वायुदलासाठी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था आणि विविध कार्यस्थितींमध्ये इतर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ‘अल्ट्रा’च्या सहाय्याने पार पाडता येतील, असा विश्वास या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘भारत फोर्ज’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी या भागीदारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “भारत-युके मुक्त व्यापार करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणात ‘विंडरेसर्स’सोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद वाटतो. भारताच्या स्वदेशी मानवरहित विमान (यूएव्ही) क्षमतेला ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ हे अधिक बळकट तर करतेच, पण अत्यंत कठीण भूभागांमध्ये उच्चस्तरीय लॉजिस्टिक्ससाठी ठोस उपाययोजना उपलब्ध करून देते. आपल्या उद्योग क्षेत्रात अल्ट्राची वहनक्षमता सर्वात जास्त आहे. त्याची खरी कार्यक्षमता जास्त उंचीवरील भूभाग, समुद्री आणि दुर्गम भागांत सिद्ध झालेली आहे. त्यामुळे अल्ट्रा हे वाहन नौदल, वायुदल आणि लष्कर या तिन्ही सैन्यदलांच्या गरजांसाठी अगदी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला तिन्ही दलांमध्ये सेवा उपलब्ध करून देता येईल, तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आखलेल्या १५ वर्षांच्या आराखड्याशीही सांगड घालता येईल. या आराखड्यात मानवरहित लॉजिस्टिक्स, नौदल मोहिमा, उंचावरील पुरवठा साखळी व दुहेरी उपयोगाच्या तंत्रज्ञान यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.”
आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये, विशेषतः अंटार्क्टिक संशोधन मोहिमांना सातत्याने दिलेल्या मदतीतून ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ने आपली बहुउद्देशीय क्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे. भारतातही धोकादायक व दुर्गम प्रदेशांमध्ये हे तंत्रज्ञान सुरक्षित व कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करून तितकेच महत्त्वाचे लाभ देईल, अशी अपेक्षा आहे.
‘विंडरेसर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सायमन मडेरॅक या प्रसंगी म्हणाले, “विंडरेसर्स अल्ट्राच्या दुहेरी वापराच्या कार्यपद्धतीचा विस्तार करण्यामध्ये भारत फोर्जसोबतची भागीदारी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सहकार्यामुळे ‘अल्ट्रा’च्या संशोधन, विकास, चाचण्या व प्रत्यक्ष संचालनातील अनेक वर्षांचा अनुभव उपयोगात आणता येईल आणि भारताच्या संरक्षण व नागरी क्षेत्रासाठी धोरणात्मक फायदे तसेच कार्यात्मक स्वायत्तता मिळेल.”
‘विंडरेसर्स अल्ट्रा’मध्ये अत्याधुनिक मिशन कंट्रोल व ऑटोपायलट प्रणालीचा वापर करण्यात आला असून ते सलग सहा ते सात तासांच्या दीर्घ मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे. भारताच्या समुद्री व बेटांवरील प्रदेशांपासून हिमालयातील उंच डोंगराळ भागापर्यंत आणि ईशान्य भारतातील दुर्गम क्षेत्रांपर्यंत विविध वातावरणात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी त्याची रचना व निर्मिती करण्यात आली आहे.
भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांच्या व्यापक एअरोस्पेस वृद्धी धोरणाशी हा करार सुसंगत आहे. भारतात यूएव्ही क्षमतांचा, नवनवीन कल्पनांचा विकास करणे, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून संरक्षण क्षेत्रात एअरोस्पेसचा उपयोग होऊ देणे, यांस चालना देण्याचा या कराराचा उद्देश आहे.
कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजनांचा मंत्री भरणे यांनी घेतला आढावा
पुणे : इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बांधकाम विभाग, पंचायत समिती इंदापूर, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी, दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजना याविषयी माहिती जाणून घेत कामांच्या गुणवत्तेवर भर देऊन विकासकामे वेळेत आणि पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर कामे जलदगतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच, इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंते तसेच पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
▪️ कामाची गुणवत्ता राखून जलद काम तातडीने करण्याची दिली सूचना
पुणे:स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू बु. येथील समाधीस्थळ येथे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. स्मारकाच्या विकासकामांची गुणवत्ता, टिकाऊपणा व गती राखून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक पायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, विश्वस्त बाळासाहेब चांदेकर, युवराज पाटील, पंकज जगताप, राहूल वागसकर आदी उपस्थित होते.
मंत्री भोसले म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन एक वेगळी ऊर्जा व शक्ती लाभते. महाराजांनी धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे दर्शन घडविणाऱ्या या स्थळी स्मारक विकासाची विविध कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. विभागाचा मंत्री म्हणून या विकासकामांद्वारे पूर्वजांच्या कार्याला न्याय देण्याचे कार्य होत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर व वढू बु. येथील स्थळ पर्यटन स्थळ न ठरता तीर्थस्थळ म्हणून नागरिकांनी पाहावे. या पवित्र स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा आहे.”
जिल्हा प्रशासनाच्यावतीने वढू येथील केईएम हॉस्पिटल ची जागा स्मारकच्या विकास कामासाठी हस्तांतरणासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुढील आठवड्यात चर्चा करून या बाबतीत मार्ग काढण्यात येईल. संपूर्ण समाधीस्थळाचा सुशोभीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि ईश्वरपुरम् वसतीगृहाला भेट
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या पुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देऊन सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक पाहिले. लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे ६ फूट x ६ फूट आकाराचे चित्र पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
त्यानंतर ‘ईश्वरपुरम्’ या भारताच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहाला भेट दिली. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर आणि संदीप पूरकर परिसरातील बांधकामाची माहिती दिली. मंत्री भोसले यांनी चीन म्यानमारच्या सरहद्दीवरील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुंबई-गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या लँडिंग गिअरचे एक चाक निखळल्याने मुंबई विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप आहेत. विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे, विमानाचे चाक हे कांडला धावपट्टीवर आढळून आले आहे. त्यानंतरही ते उड्डाण करत मुंबईत आले.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर Q400 विमानाने कांडला विमानतळावरून मुंबईसाकडे उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर विमानाचे एक चाक पडलेले आढळून आले. याबाबत तात्काळ माहिती मिळाल्यानंतरही, वैमानिकाने विमानाचा प्रवास सुरू ठेवला. तातडीने मुंबई विमानतळ प्रशासनाला सूचित करण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर ‘पूर्ण आपत्कालीन स्थिती’ घोषित करण्यात आली. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सर्व यंत्रणांना ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. मुंबईतील इतर सर्व विमानांचे उड्डाण आणि लँडिंग तात्पुरते थांबवण्यात आले.
या काळात विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी धावपट्टीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने अतिशय कौशल्याने हे विमान धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरवले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि प्रवाशांना कोणताही धोका पोहोचला नाही. या घटनेची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय पुढील तपास करत आहे.
“व्यावसायिकांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभारखे -सचिन जोशी अध्यक्ष स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन पुणे- पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश प्रभुणे यांना या वर्षीचा स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुण्यातील शुक्रवार पेठेतील नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री” सभागृहात आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी झालेल्या वार्षिक सभेमध्ये सुरेश प्रभुणे यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी सुरेश प्रभुणे व सौ स्नेहल प्रभुणे यांचा सन्मानचिन्ह,शाल,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.व त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.संजय जोशी पुढे म्हणाले, “पुण्यातील नॅशनल केमिकल्स लॅबोरेटरी मधून २९ वर्षे सेवा केल्यानंतर प्रभुणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे संघ कार्य चालू आहे.माणसे जोडणारे,सतत कार्यरत,स्पष्ट बोलणारे,असे सुरेश प्रभुणे यांचे व्यक्तिमत्व.अहिल्यादेवी शाळेजवळ छोटेसे दुकाना द्वारे त्यांनी व्यवसाय सुरू केला.मुलांना शिकवले.निवृत्त झाल्यावर अखेरचे वेतन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यास अर्पण केले. पुण्यातील स्टेशनरी,कटलरी,अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन च्या कार्यास सुरवातीपासून ते आज पर्यंत सर्व व्यापारी बांधवांना,समाजातील सर्व घटकातील नागरिकांना ते मदत करत असतात.त्यांनी २०१३ व २०१४ ह्या वर्षी संस्थेचे अध्यक्षपद ही भूषविले.गेले ४०- ४५ वर्ष ह्या संस्थेबरोबर कार्यरत असून त्यांच्या अध्यक्षकाळामध्ये सभासदांना गुढी पाडवा निमित्ताने शुभेच्छा पत्र तसेच मकरसंक्रांती निमित्त सभासदांना प्रत्यक्ष तिळगुळ देणे,स्नेह मेळावा घेणे,असे उपक्रम लोकप्रिय झाले होते.दिवाळी संपर्क पत्रिका जास्तीत जास्त पानामध्ये काढण्याचा विक्रम करून संस्थेला उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम अजूनही चालू आहे.” सत्काराला उत्तर देतांना सुरेश प्रभुणे म्हणाले,” या संस्थेच्या कार्यास मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा मिळाली.कै रामभाऊ म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने मी घडलो.त्यांनी सांगितलेल्या ” कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बर्फ,जिभेवर साखर व पायाला भिंगरी” त्रिसूत्री मंत्राने मी आयुष्यभर कार्य केले.१९६० पासून संघाच्या कामात आहे. पू .गोळवलकर गुरुजी,तात्या बापट,बाबाराव भिडे,जगन्नाथराव जोशी,रामभाऊ म्हाळगी यांचे मार्गदर्शन लाभले.बँक ऑफ महाराष्ट्र मधील वरिष्ठ अधिकारी सदानंद भागवत यांच्या मदतीमुळे व्यवसाय यशस्वी करू शकलो.तळजाई शिबिर,हिंजवडी शिबिर,मोतीबाग प्रकल्प अशा अनेक संघाच्या सेवा कार्यात मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”