Home Blog Page 374

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर

0

जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

नागपूर, : लग्नसंस्था ही आपल्या भारतीय समाजाचा पाया आहे. ती टिकवण्यासाठी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर गंभीरपणे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लग्नानंतर वाद झाल्यास होणाऱ्या समुपदेशनाबरोबरच लग्नाच्याआधी, तरुण वर्गाचे विवाहपूर्व समुपदेशन यावर भर देणे आवश्यक आहे.  येत्या काळात राज्य महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन केंद्राबाबत अग्रक्रमाने काम करणार असल्याचे  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले

राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ॲड. प्रवीण उन्हाळे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, समुपदेशक, तक्रारदार, पॅनलमध्ये समाविष्ट विधीतज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाचे मुख्यालय मुंबईत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातल्या महिलांना आर्थिक, सामाजिक तसेच विविध कारणांमुळे मुंबईत येणे शक्य होत नाही. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी, मदत करण्यासाठी आयोगच जिल्हास्तरावर जात असतो. जिल्हास्तरावरच महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात  महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. जनसुनावणीमुळे वेळ वाचून खर्चाची बचत होण्यासोबतच महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचाराला न्याय मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गडचिरोलीपासून जनसुनावणीला सुरुवात करण्यात आली. गेल्या चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात अनेकदा सुनावणी घेण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक चांगले कायदे तयार केले आहेत. महिलांना भक्कमपणे साथ देत देण्याची तसेच महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचाराला न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. यात महिलांचाही सहभाग महत्वाचा असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यावेळी म्हणाल्या.

आजच्या जनसुनावणीदरम्यान एकूण 68 तक्रारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदवण्यात आल्या. ज्यामध्ये कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक होते. महिलांच्या तक्रारी निवारणाकरीता आयोजित जनसुनावणीसाठी चार पॅनल तयार करण्यात आले होते. पहिल्या पॅनलमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ॲड. प्रवीण उन्हाळे, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांचा समावेश होता. अन्य पॅनलमध्ये विधीज्ञ, पोलिस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या तक्रारींवर आजच कार्यवाही पूर्ण झाली नाही त्यांना योग्य त्या संबंधित यंत्रणांकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली असून त्याबाबत आयोग आढावा घेणार आहेत.

जनसुनावनीत महिलांच्या 68 तक्रारी

जनसुनावनीत एकूण 68 तक्रारी दाखल झाल्या. त्यात वैवाहिक व कौटुंबिक स्वरुपाच्या 37 तक्रारींचा समावेश आहे. तसेच सामाजिक स्वरुपाच्या 14, आर्थिक आणि मालमत्ता विषयक 7, कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास 8 व इतर स्वरुपाच्या २ तक्रारींचा समावेश आहे. सर्वांची आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पॅनेलच्या सदस्यांनी आस्थेने विचारपूस केली.

जनसुनावणीस महिलांचा प्रतिसाद

आयोगाच्या या जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांनी उपस्थिती दर्शवित चांगला प्रतिसाद दिला. बाहेरून आलेल्या प्रत्येक महिलेस सुरुवातीस कक्षाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून टोकन नंबर देण्यात आले. त्यानंतर देण्यात आलेल्या पॅनलसमोर उपस्थित राहून महिलांनी आपल्या लेखी तक्रारी, समस्या सादर केल्या. प्रत्येक महिलेचे म्हणणे पॅनल सदस्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर कार्यवाही केली.

जनसुनावणीसाठी चार पॅनेल

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता आयोजित जनसुनावणीसाठी चार पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये विधी तज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.

माध्यमांशी साधला संवाद

जनसुनावणीपुर्वी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व कार्यालयांमध्ये पॉश ऑडिट अनिवार्य करावे अशी मागणी राज्य महिला आयोगाने शासनाकडे केली होती. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन २२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. यानुसार सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामासाठी बाहेर पडणाऱ्या ‘ वर्किंग वुमन फोर्स’ ला सुरक्षित वातावरण देणे ही आपली जबाबदारी असल्याचे अध्यक्ष चाकणकर यांनी सांगितले.

रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा

0

मुंबई, : रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा पुढे चालू ठेवावी, अशी अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी  व्यक्त केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन यांना आवाहन करताना मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, विधी व न्याय विभाग व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायास अनुसरुन, आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) उत्तीर्ण करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील अनुसूचीच्या नोंद २८ करिता महाराष्ट्र वैद्य‌कीय परिषदेने स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवून दि. २५.०६.२०१४ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये केलेल्या सुधारणेची अंमलबजावणी, रिट याचिका क्र.७८४६,७८४७/२०१४ मधील दि.१४.०३.२०१६ चे अंतरिम आदेश व याचिकेच्या अंतिम निर्णयांच्या अधीन राहून करण्याबाबत दि.०५.०९.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत उच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईल त्याप्रमाणे राज्य शासन पुढील कार्यवाही करेल. यावास्तव राज्यातील सर्व आरोग्य सेवा सुरळीत चालु राहण्यासाठी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री  मुश्रीफ यांनी केले आहे.

होम लोन: आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक,दोघांवर गुन्हा दाखल

पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज घेऊन आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अर्जुन अथोली (वय ३९) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार मोहम्मद युनुस शरीफ शेख आणि दरिऊस सोलोमन राफत या दोन आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजांचा वापर करणे) आणि १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला. आरोपी मोहम्मद शेख आणि दरिऊस राफत यांनी आयसीआयसीआय बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवले आणि बँक अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.

मोहम्मद शेखने मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र आणि जमीन खरेदीबाबतची बनावट कागदपत्रे बँकेला दिली होती. या आधारे बँकेने त्याला १४ जुलै २०२३ रोजी पाच कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ही रक्कम पुण्यातील सोपानबाग येथील मालमत्तेचे मालक दरिऊस राफत यांच्या नावाने चेकद्वारे देण्यात आली. मात्र, नंतर ही मालमत्ता प्रेम फतेचंद वजरानी यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.

सुरुवातीला काही महिने युनुस शेखने कर्जाचे हप्ते भरले, परंतु मार्च २०२४ पासून त्याने हप्ते भरणे बंद केले. बँकेचे वसुली अधिकारी तपासणीसाठी गेले असता, त्यांना संबंधित मालमत्ता दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे आढळले. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचे भासवून कर्ज घेतल्याचे समोर आले.

सदर मालमत्तेची मालकी प्रेम फतेचंद वजरानी यांची असून, त्यात दोन्ही आरोपींचा कोणताही हक्क नाही. चौकशीदरम्यान, शेखने १९८७ सालातील एका डीडच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून हा आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. फरासखाना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीची किंमत मर्यादा निश्चित…

0

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना किंमतीची मर्यादा नाही
मुंबई-सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. अर्थ विभागाने 17 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारा एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार आता मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीचे सर्व संबंधित आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या खरेदीवर कोणतीही किंमत मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

वाहन उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि बीएस-6 (BS-VI) मानकांची नवीन वाहने यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या नवीन नियमांमुळे सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्यास मदत होणार असून, वाहनांच्या खरेदी प्रक्रियेत अधिक स्पष्टता येणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार, सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. या मर्यादेमध्ये जीएसटी, वाहन कर आणि नोंदणी शुल्क यांचा समावेश नाही. या नियमानुसार, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या वाहनांसाठी कोणतीही किंमत मर्यादा नाही, तर मंत्री आणि मुख्य सचिवांना 30 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना 25 लाख, तर राज्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना 20 लाखांपर्यंतच्या गाड्या घेता येतील. राज्यस्तरीय विभागप्रमुख, आयुक्त, महानिदेशक आणि विभागीय आयुक्त यांच्यासाठी 17 लाखांची मर्यादा असून, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना 15 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. इतर अधिकाऱ्यांसाठी ही मर्यादा 12 लाख निश्चित करण्यात आली आहे, पण यासाठी राज्य वाहन पुनरावलोकन समितीची मंजुरी आवश्यक असेल.

महाराष्ट्र शासनाच्या ईव्ही पॉलिसी-2025 नुसार, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 20 टक्के अधिक किमतीचे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 12 लाख रुपयांपर्यंतचे मल्टी-युटिलिटी व्हेईकल (MUV) खरेदी करण्याची परवानगी असेल, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारी वाहने खरेदी करण्यापूर्वी जुन्या वाहनाला ‘महावाहन’ प्रणालीत अधिकृतपणे स्क्रॅप घोषित करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हा नवीन नियम केवळ शासकीय विभागांपुरता मर्यादित नसून, सर्व स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या, मंडळे आणि महामंडळांनाही लागू असेल. सर्व विभागप्रमुखांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून वाहन खरेदी आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येईल.

नवीन धोरणानुसार, राज्यपाल यांच्यासारख्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी त्यांच्या ताफ्यात लक्झरी गाड्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या रँकनुसार एसयूव्ही किंवा मध्यम आकाराची वाहने वापरतील, ही आधीपासून असलेली पद्धत नव्या नियमावलीतही कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेतील वाहन खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि वाढत्या तांत्रिक व पर्यावरणीय निकषांशी सुसंगत वाहनांची खरेदी करणे शक्य होईल.

पुण्यात रंगणार भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा- रोबोटेक्स इंडिया स्पर्धेचे आयोजन

पुणे, : तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा भव्य उत्सव म्हणून रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियन येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी पुण्यातील MIT-ADT विद्यापीठ, लोणी काळभोर येथे रंगणार आहे. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे.

दोन दिवसीय या महोत्सवात लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर, मिनी सुमो, ड्रोन एव्हिएशन, फोल्क रेस तसेच बहुचर्चित एंटरप्रेन्युअरशिप चॅलेंज अशा विविध रोमहर्षक स्पर्धांचा समावेश आहे. १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिक निधी असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना केवळ पदक आणि ट्रॉफीच नव्हे, तर युरोपातील एस्टोनियामध्ये होणाऱ्या २०२५ च्या रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

रोबोटेक्स इंडिया ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. गाव, शहर, खेड्यातील मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ‘विकसित भारत’ घडण्याचे दर्शन घडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, ही स्पर्धा भारताच्या तरुण नवोन्मेषकांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे काम करते,” असे रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल यांनी सांगितले.

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Girls Who Build Robots” या उपक्रमाद्वारे हजारो मुलींना STEM क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

वीजग्राहकांचे समाधान हे महावितरणच्या अभियंत्यांचे कर्तव्य अन् परमार्थ; राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात

0

मुंबई,: मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रामध्ये महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासह अंधारलेल्या वाटा, घरे प्रकाशाने उजळण्याचे भाग्य महावितरणचे अभियंत्यांना मिळाले आहे. वीजजोडणीद्वारे विजेचा लखलखाट झाल्यावर घरगुती, शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व इतर ग्राहकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला सुरवात होते. या सेवेचा ग्राहकांना जो आनंद व समाधान मिळतो तोच खरा परमार्थ आहे आणि ग्राहकांना कायम समाधान देणारी सेवा देणे आपले कर्तव्य आहे असे मार्गदर्शन महावितरणच्या संचालकांनी मनोगतांमधून केले.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्ताने महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी (दि. १८) राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार (प्रकल्प/संचालन), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन), सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (कोकण विभाग), कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

संचालक श्री. सचिन तालेवार म्हणाले, महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी डोंगरदऱ्या, अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून राज्याच्या प्रगतीला वेग दिला आहे. वीजग्राहकांशी प्रकाशाचे नाते जोडले आहे. हे नाते ग्राहकसेवेतून भक्कम व अतूट राहावे यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने अभियंता म्हणून कार्यरत राहावे.

संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा किंवा प्रदेशाचा सामाजिक व आर्थिक विकास हा विजेअभावी शक्य नाही. वीज क्षेत्र अनन्यसाधारण महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करताना कंपनीहित व ग्राहकहितासाठी योगदान देत राहणे, ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचारी वीज सेवा देण्यासाठी ज्या धैर्याने, गतीने, सांघिकतेने काम करतात त्याचाही राज्यात नावलौकिक आहे.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, अभियंत्याचा वारसा हा प्राचीन काळातील विश्वकर्मा यांच्यापासून ते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यापर्यंतचा आहे. नव तंत्रज्ञानातून हा वारसा सध्याच्या अभियंता पिढीकडूनही आणखी समृद्ध होत आहे. यावेळी कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमाला क्षेत्रीय मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते तसेच मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

पुणे-

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१७ वर्षे मुले व मुली) दिनांक १८ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन सोहळ्यास पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, उपाध्यक्ष कृष्णदेव क्षीरसागर, कुणाल राजगुरू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अजित ओसवाल, पुणे शहर संघटनेचे उपाध्यक्ष जीवनलाल निंदाने, पुणे शहर बॉक्सिंग संघटना सचिव विजय गुजर, तसेच पुरंदर तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष विनोद कुंजीर, राष्ट्रीय खेळाडू विशाल गव्हाणे, ऑफिशियल मनोज यादव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सुर्यवंशी यांनी केले.

या स्पर्धेत पुणे ग्रामीण भागातील तब्बल ७६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी नुकतीच नोएडा येथे झालेल्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल अजित ओसवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या जिल्हास्तर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड येत्या २२ ते २३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा (जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ) साठी करण्यात येणार आहे.

फडणवीसांच्या बंगल्यात किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाखाचा सरकारी खर्च

राज्यावर 9.5 लाख कोटींचे कर्ज -रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यात तब्बल 20.47 लाख रुपयांचा सोफा खरेदी करण्यात येणार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे हा दावा केला आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींवर गेला असताना सरकार अशी उधळपट्टी करत आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना हे माहिती नसेल, पण हे असेच सुरू राहिले तर ‘रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता’ असाच याचा अर्थ निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी शिफ्ट झाले. त्यानंतर आता या बंगल्यात काही डागडुजी केली जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने एक ई-निविदा काढली आहे. त्यात मलबार हील मुंबई येथील वर्षा बंगला येथे डबल बेड मॅटर्स, सोफा व इतर कामे करण्यासाठी 20.47 लाख रुपयांची अंदाजित रक्कम ठरवण्यात आली आहे. याशिवाय इतरही काही ठिकाणच्या कामांचा उल्लेख निविदेवर आहे.

आमदार रोहित पवार यांनी एका सोफ्यासारख्या तत्सम गोष्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्यावर आक्षेप घेतला आहे. ते या प्रकरणी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?

मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असे ते म्हणाले.

बेकायदा बांधकामांवरील महापालिकेच्या कारवाई नोटिशींना कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? हायकोर्टाची एकनाथ शिंदेंना विचारणा

0

मुंबई-नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या नोटिशींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिका कायद्यानुसार कारवाई करत असताना, नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी नोटिशींना स्थगिती कोणत्या अधिकारात दिली, असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे. तसेच, या प्रकरणावर 20 सप्टेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

वाशीमधील अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन कंडोमिनियम नंबर-14 आणि नैवेद्य को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कंडोमिनियम नंबर-3 या सिडकोच्या इमारतींचे बांधकाम 2003 मध्ये विनापरवानगी पाडण्यात आले. असोसिएशनने स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्याशी हातमिळवणी करून हा प्रकार केला. सिडकोने याची गंभीर दखल घेत असोसिएशन व संबंधितांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर हे क्षेत्र नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित गेले.

महापालिकेने नवीन इमारतींच्या बांधकामाला तात्पुरती परवानगी दिली, परंतु बांधकाम आराखड्यानुसार झाले नाही. त्यामुळे पालिकेने इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचे व निवासी प्रमाणपत्र (OC) दिले नाही. यानंतरही, असोसिएशनने नियमांचे पालन केले नाही, म्हणून महापालिकेने 3 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश शहर नियोजन (MRTP) कायद्याच्या कलम 53-अ अंतर्गत बेकायदा बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली.

महापालिकेने नोटीस पाठवल्यानंतर, त्याविरोधात सोसायट्यांनी थेट नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी लगेचच या नोटिशींना स्थगिती दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला ‘कॉन्शस सिटीझन्स फोरम’ या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असून, तो रद्द करावा आणि महापालिकेने बजावलेल्या नोटिशीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संस्थेने केली.

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी प्रकरणाच्या सर्व बाबी तपासल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली. नवी मुंबई महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? याची विचारणा उच्च न्यायालयाने केली. जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले? असा प्रश्न विचारत न्यायालयाने सरकारी वकिलांना यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर आता 20 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि ह्युडांई मोटर्स मध्ये नौकरीची खोटी आश्वासने देऊन बेरोजगारांची फसवणूक

बेरोजगार युवकांनी फसवणुकीपासून सतर्क राहावे-सहाय्यक कामगार आयुक्तांचे आवाहन

पुणे, दि. 18: पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाही काही बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि ह्युडांई मोटर्स आदी नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन युवकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींनी अशा आमिषाला बळी न पडता स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक रक्कम कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागार किंवा कंत्राटदारांनी देवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे जिल्हा यांनी केले आहे.

नवरात्रीच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद, अश्विनी कदम संतापल्या …म्हणाल्या,पाणीपुरवठा प्रमुखांना समज देण्याची गरज

पुणे- नवरात्री सारख्या सणाच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद ठेवणे योग्य आहे का? असा सवाल करत माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे , त्या म्हणाल्या पाणीपुरवठा प्रमुखांना महिलांनी आता समज देण्याची गरज आहे असे वाटते पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे… नदी-नाले ओसंडून वाहत आहेत…तरीही महापालिकेने पाणी बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रशासनाचा दृष्टीहीन व असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे.इतक्या पावसात पाणीटंचाईचा प्रश्न नसताना नागरिकांना पाणीपुरवठा बंद करून अडचणीत टाकणे हा सरळसरळ प्रशासनाचा अपयश व निष्काळजीपणा आहे.

  • नवरात्रमध्ये प्रत्येक घरात स्वच्छता, नवे-जुने कपडे धुणे, उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते.
  • पण ! महापालिकेने या काळातच पाणी बंद करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांच्या भावनांशी खेळ केला आहे.
– विशेषतः महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
  • नगरसेवक / लोकप्रतिनिधी निवडून आले असते तर, प्रशासनाला सणासुदीच्या काळातील संवेदनशीलता समजली असती.
  • चुकीच्या वेळेस पाणीपुरवठा बंद करून PMC प्रशासनाने स्वतःचं दुर्बल आणि असंवेदनशील व्यवस्थापन चव्हाट्यावर आणलं आहे.

पुणेकरांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून उत्सवाच्या काळात अन् भर पावसात पाणी बंद करून नागरिकांना अडचणीत टाकणाऱ्या या निर्णयाचा निषेध करत त्यांनी महिलांनी याबद्दल जाब विचारायलाच हवा असेही म्हटले आहे

अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्हा दौरा : विविध विभागांच्या कामांचा घेतला आढावा

पुणे दि. १८ सप्टेंबर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा आज पुणे जिल्ह्यात झाला. या समितीच्या अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

या वेळी आमदार भीमराव रामजी केराम, नानाजी सखारामजी मुटकुळे, डॉ. अशोक माने , शाम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सचिन पाटील, गजानन लवटे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, डॉ. प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर आणि संजय मेश्राम उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव सुभाष नलावडे, अवर सचिव श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी श्री. राहुल लिंगरवार, समिती प्रमुख यांचे स्वीय सहाय्यक रणजित गमरे, सहाय्यक कक्ष अधिकारी संदीप माने तसेच जिल्हा प्रशासनातील नगर परिषद, नगर पंचायत, वन विभाग, महावितरण, महापारेषण, समाजकल्याण विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण, आरोग्य, निवासस्थान, वसतिगृह सुविधा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर समिती सदस्यांनी विशेष चर्चा केली. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर निधीचा वापर, दुरुस्ती आणि सोयीसुविधा याबाबत विचारणा करण्यात आली.

महावितरण आणि महापारेषण अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती बहुल वस्त्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगर परिषद आणि नगर पंचायत अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेसाठी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले. तसेच वन विभागाकडून अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वैयक्तिक व सामूहिक वनहक्क योजनांची अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यात आली.

समितीने जिल्हा प्रशासनाला अनुसूचित जाती कल्याणाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढून त्याचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

कोंढव्यात बेकायदा इमारतींवर कारवाईचा धडाका सुरूच …

पुणे- महापालिकेच्या वतीने बेकायदा बांधकामांच्या वरती कोंढव्यात कारवाईचा धडाका सुरूच आहे. आज कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.18/9/2025 रोजी कोंढवा खुर्द , संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, s.no 44 मध्ये P+7 मजल्याच्या एक इमारत सुमारे 4500 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात येत आहे.

पुणे,पेठ बालेवाडी गावठाण शाळेलगत इलियट सोसायटी समोरील अनधिकृत शॉप टपऱ्या ,दसरा चौक, बालेवाडी हाय स्ट्रीट येथील लेन्स कार्ड, हिप्पी अँड हॉट, लॅक्मे सलून, हिडन प्लेस हँगाउट ,हबीबस, हॉटेल इंडिपेंडेंस, बालेवाडी सर्वे न 17 चौपाटी, मोझे कॉलेज परिसर व अष्टविनायक चौक येथे अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर तसेच बाणेर येथील कॅफे बडीज एक्सप्रेस या हॉटेलच्या फ्रंट मार्जिन मधील पत्रा शेड वर

बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई मध्ये सुमारे 54375 चौ.फूट विनापरवाना अनधिकृत क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व तीन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

समाजवादी आंदोलनाची ९० वर्षे : पुण्यात समाजवादी एकजूट परिषदेचे उद्घाटन

पुणे : समाजवादी आंदोलनाला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात भव्य समाजवादी एकजूट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज (दि. १९ सप्टेंबर) सायं. ४ वाजता सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे होणार आहे. ही परिषद १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.या परिषदेचे आयोजन राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, युसुफ मेहेरअली सेंटर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व समाजवादी समागम यांनी संयुक्तपणे केले आहे.

उद्घाटन समारंभात उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व अध्यक्ष माता प्रसाद पांडेय उद्घाटन करतील. १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी व माजी खासदार पंडित रामकिशन ध्वजारोहण करतील. समाजवादी आंदोलनावरील विशेष प्रदर्शनाचे लोकार्पण राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होणार आहे.

या उद्घाटन सत्रात प्रा. आनंद कुमार प्रमुख वक्ते असतील. सुभाष वारे संविधानाची प्रस्तावना वाचतील, तर स्वागतपर भाषण ॲड. सविता शिंदे करतील. अध्यक्षस्थानी रमाशंकर सिंह (कुलपती, आयटीएम विद्यापीठ) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून हरभजनसिंग सिद्धू (महामंत्री, हिंद मजदूर सभा) उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी आयोजक संस्था आपली मते मांडतील. स्मारिका व पुस्तकांचे प्रकाशन होणार असून पंडित रामकिशन शर्मा, पन्नालाल सुराणा, प्रा. राजकुमार जैन, हिम्मत सेठ, चंद्रा अय्यर, भीमराव पाटोले, रावसाहेब पवार, वर्षा गुप्ते, प्रमिला ठाकूर फुले, उमाकांत भावसार या ज्येष्ठ समाजवाद्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेतील विविध सत्रांमध्ये समाजवादी विचारांची चिकित्सा व आव्हानांवर चर्चा होणार असून देशभरातून समाजवादी कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.

भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी प्रतिष्ठित ‘ पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ने सन्मानित

पुणे, 18 सप्टेंबर 2025: भारत फोर्ज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा
कल्याणी यांना ‘माननीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सन्मान
आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
कराड (सातारा) येथील माननीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान यांनी २०११ मध्ये या पुरस्काराची
सुरुवात केली. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेतो. बाबा कल्याणी यांचे
औद्योगिक क्षेत्रातील काम आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानित
करण्यात आले.
या सत्कार समारंभाला महाराष्ट्रातील मान्यवर नेते उल्हास दादा पवार आणि माननीय
बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
देशाच्या प्रगतीसाठी उद्योगांची शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञानाशी सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे
यावेळी बाबा कल्याणी यांनी सांगितले. भारतातील तरुणांनी केवळ तयार उपायांवरच अवलंबून न राहता
नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला कल्याणी यांनी यावेळी तरुणांना दिला. केवळ नफ्यासाठीच
नव्हे तर गाव, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी देखील काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
आपल्या मातृभूमीशी जोडलेला सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.