Home Blog Page 319

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा.

बंगळुरुतील मेट्रो स्टेशनच्या नावाबद्दल मुख्यमंत्री फडणविसांचे अज्ञान; जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी.

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना..

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी असेही सपकाळ म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नाही ‘दरोडेखोर’…
पावसामुळे मुंबईतली रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरु आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी जाहीर माफी मागावी..

बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणविस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणविसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो….
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिली, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्वाचे पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे रोजगार मेळावा..
राज्यात २.५ लाख सरकारी जागा रिक्त जागा असतानाही सरकार मात्र नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा 17 सप्टेंबरला शुभारंभ

पुणे, दि. 15 –
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरावर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती अभियान, कार्यशाळा, ग्रामसभा, पत्रके, भित्तीपत्रके, चित्ररथ, कलापथक, सोशल मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

अभियानाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कक्ष (War Room) स्थापन करण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांना तालुकानिहाय संपर्क अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावर विभाग प्रमुखांना प्रत्येकी 20 गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जिल्हा स्तरावर शुभारंभ माननीय पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय शुभारंभाचे आयोजन माननीय स्थानिक आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शुभारंभाच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसभेसाठी तालुकास्तरीय अधिकारी गावागावात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सक्षम व विकासाभिमुख बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे ग्रामविकास प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास व लोकसहभाग वाढून पुणे जिल्हा “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”च्या अंमलबजावणीत आघाडीवर राहील, असा विश्वास असून, यासाठी सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, दि. 15 :
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 17 सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरावर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती अभियान, कार्यशाळा, ग्रामसभा, पत्रके, भित्तीपत्रके, चित्ररथ, कलापथक, सोशल मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

अभियानाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कक्ष (War Room) स्थापन करण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांना तालुकानिहाय संपर्क अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावर विभाग प्रमुखांना प्रत्येकी 20 गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जिल्हा स्तरावर शुभारंभ माननीय पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय शुभारंभाचे आयोजन माननीय स्थानिक आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शुभारंभाच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसभेसाठी तालुकास्तरीय अधिकारी गावागावात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सक्षम व विकासाभिमुख बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे ग्रामविकास प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास व लोकसहभाग वाढून पुणे जिल्हा “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”च्या अंमलबजावणीत आघाडीवर राहील, असा विश्वास असून, यासाठी सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे,हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण..

महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या अन पार्दर्शकता राखा

निवडणूक आयोग व उच्च न्यायालयच राजकीय आरक्षणाची रचना ठरवतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावाने एससी आरक्षण बदलणे शक्य नाही. तरीही एससी आरक्षणाच्या वादावर महाविकास आघाडीतील काही नेते जाणूनबुजून दलित समाजात संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवत असल्याचा आरोप रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे.

पुणे : महापालिका प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल – रस्ता पेठ संदर्भात हेतुपुरस्सर माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना बदनाम करण्यासाठी लक्ष्य केले जात असल्याचा दावा रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे.त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सर्व निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात. निवडणूक प्रक्रियेवर निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे आगामी महापालिका निवडणूक ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. कर्नाटक सरकारने नुकताच घेतलेला निर्णय आदर्श म्हणून दाखवत, महाराष्ट्रातही हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच पुणे शहरात सुरू असणाऱ्या एसी आरक्षणाच्या वादावर देखील डंबाळे यांनी परखड भूमिका मांडली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करणे प्रत्येक शासकीय यंत्रणेसाठी बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी देखील पुणे शहरात प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, महाविकास आघाडीचा काही नेत्यांकडून पुण्यातील दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवण्याचे काम होत आहे, अशी टीका रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केली आहे.

डंबाळे म्हणाले की, “निवडणुकीसाठी राजकीय आरक्षणाची तांत्रिक रचना निवडणूक आयोग व उच्च न्यायालय ठरवते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाने अनुसूचित जातींचे आरक्षण बदलणे कोणालाही शक्य नाही. याची जाणीव असूनही खोटा प्रचार करून समाजात जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न मविआकडून सुरू आहे. रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने शहरातील सर्व प्रभाग रचनेतील अन्यायकारक तरतुदींवर आक्षेप घेतले असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.”

२०१७ च्या अपवाद वगळता, गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात रास्तापेठ – सोमवार पेठ या प्रभागात एससी आरक्षण लागू झालेले नाही. या भागात समाविष्ट असणारी अनुसूचित समाजाची लोकवस्ती दुसऱ्या प्रभागात गेल्याने हे आरक्षण आता संबंधित प्रभागात कायम आहे. तरीही तथ्यांचा आधार न घेता गणेश बिडकर यांच्यावर आरोप करणे हा जाणूनबुजून केलेला खोटारडेपणा आहे. कोणत्याही नेत्याविषयी खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणाला अनुसूचित जाती समाज आणि आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल व कधीही थारा देणार नाही, असं राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा २०२५’

पुण्यातून होणार राज्यस्तरीय सुरुवात ; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत राबविला जाणार तीन टप्यातील अभियान

पुणे, दि. १५ – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘सेवा पंधरवाडा २०२५’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होणार असून त्याची राज्यस्तरीय सुरुवात पुण्यातून होत आहे. राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल विभाग थेट जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडित असल्याने, लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव नागरिकांना मिळावा या उद्देशाने या पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढून ‘सेवा पंधरवाडा’ युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.

🔹 पहिला टप्पा – १७ ते २२ सप्टेंबर : पाणंद रस्ते विषयक मोहीम

पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे

सर्वेक्षण करून नोंद न झालेल्या रस्त्यांची नोंद घेणे

शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन

शेतरस्त्यांवरील वाद मार्गी लावण्यासाठी रस्ता अदालतांचे आयोजन

🔹 दुसरा टप्पा – २३ ते २७ सप्टेंबर : ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम

सरकारी जमीन कब्जहक्काने घरकुलांसाठी उपलब्ध करून देणे

झोपडपट्टी किंवा अतिक्रमणांना नियमांनुसार नियमित करणे

पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम

🔹 तिसरा टप्पा – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : नावीन्यपूर्ण उपक्रम
जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नवनवीन कल्पना राबवणार.

या उपक्रमातून जनतेचे प्रश्न प्रत्यक्षात सोडवले जातील आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

रोजगाराची सुवर्णसंधी 17 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे दि. 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व लॉनिंग एज्युकेशन इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था,सासवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 17 सप्टेंबर 2025 रोजी लॉगिन पॅरामेडिकल कॉलेज आदित्य कॉम्प्लेक्स, हडको रोड,सासवड येथे सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

पुरंदर तालुका परिसरातील विविध उद्योजकांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १०वी,१२ वी, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्श, क्लर्क, ओटी टेक्निशियन, मामा, मावशी, नर्स, ब्रदर्स, रेसेपनिस्ट, ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२० २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सु. रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

महिंद्रातर्फे साजरी करण्यात आली NOVO ट्रॅक्टर मालिकेची 11 वर्षे

संपूर्ण मालिकेत प्रीमियम नवीन वैशिष्ट्यांचे सादरीकरण

·         लो-स्पीड ऑपरेशन्ससाठी क्रिपर मोड

·         50HP पासून सुरु होणारा आकर्षक मेटॅलिक रेड कलर

·         mBoost तंत्रज्ञान – 1 ट्रॅक्टर, 3 ड्रायव्हिंग मोड्स

·         ‘QLift’ सह महालिफ्ट हायड्रोलिक – 2900 किलो हाय लिफ्ट क्षमता

·         डीजीसेन्स 4G – कनेक्टेड ट्रॅक्टर टेक

·         अधिक मूल्य मिळवून देणाऱ्या इतर फॅक्टरी फिटेड अॅक्सेसरीज

·         संपूर्ण मालिकेत स्टँडर्ड 6-वर्षांची वॉरंटी

मुंबई, 15 सप्टेंबर 2025: भारतातील प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टर आपल्या महत्वपूर्ण ‘महिंद्रा NOVO ट्रॅक्टर सिरीज’ चा 11 वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा करत आहे.

मजबूत बांधणी असलेली, महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका टिकाऊपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली तरीही इंधन कार्यक्षम इंजिनसाठी डिझाईन करण्यात आली आहे. उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्कमुळे ही मालिका विविध शेती उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करते. 49 HP ते 74 HP पर्यंतच्या विविध हॉर्सपॉवर पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिका नांगरणी, भुईसपाटीकरण, पेरणी आणि वाहतूक अशा विविध कृषी कामांसाठी आदर्श आहे.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत NOVO 605 DI PS, NOVO 605 DI PP, NOVO 655 DI PP आणि NOVO 755 DI PP या 2WD आणि 4WD मधील प्रकार समाविष्ट आहेत. प्रत्येक मॉडेल भारतीय शेतीच्या विविध परिस्थितींनुसार तयार केले गेले असून कार्यक्षमता, सोय आणि बहुपयोग यानुसार नवे मापदंड निश्चित करते.

या महत्त्वाच्या टप्प्याचे औचित्य साधत, महिंद्रा ट्रॅक्टर्सने भारतीय शेतीसाठी खास तयार केलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह NOVO ट्रॅक्टर मालिकेचे उन्नतीकरण केले आहे. यात क्रिपर मोड. mBoost तंत्रज्ञान, स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी आणि ‘QLift’ सह महालिफ्ट हायड्रोलिक यंत्रणा यांचा समावेश आहे. या सुधारणा 50HP च्या वर असलेल्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि आता ही मालिका प्रीमियम मेटॅलिक रेड रंगात देखील उपलब्ध आहे. तसेच, महिंद्रा ने NOVO मालिकेत 6-वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी सुद्धा सादर केली आहे.

क्रिपर गियर मोड 0.3 ते 0.4 km/h इतक्या कमी गतीने काम करण्यास सक्षम करते. त्यामुळे रोटाव्हेटर्स सारखी यंत्रणा वापरून कांदा लावणी आणि केळी मल्चिंगसारखी अचूक कामे सहज केली जातात. यामुळे नुकसान कमी होते आणि उत्पादन वाढते.

महिंद्रा ट्रॅक्टर्सचे क्रांतिकारी, भविष्यवेधी तंत्रज्ञान CRDe इंजिनसह, NOVO मालिकेत प्रथमच mBoost तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. यामुळे ऑपरेटर्सना विविध कृषी आणि व्यावसायिक कामांसाठी उपयुक्त असणाऱ्या डीझेल सेव्हर, नॉर्मल आणि पॉवर अशा 3 वेगवेगळ्या ड्राईव्ह मोड्समध्ये काम करता येते.

स्मार्ट बॅलन्सर टेकनॉलॉजी इंजिनचा आवाज आणि कंपन कमी करते. त्यामुळे दीर्घकाळ वापरातही शांत आणि आरामदायी अनुभव मिळतो. फॉरवर्ड रिव्हर्स FR शटलसह स्मूथ गिअर शिफ्टिंग हे वैशिष्ट्य आणखी सोयीस्कर करते. त्यामुळे बांधकाम, खाणकाम आणि इतर उद्योगांमध्ये लोडर आणि डोझर वापरासाठी हा ट्रॅक्टर आदर्श ठरतो.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेतील अत्याधुनिक महालिफ्ट हायड्रोलिक प्रणाली 2700 – 2900 किलोची सर्वोत्तम लिफ्ट क्षमता देते. ‘QLift’ बटणाद्वारे ही हायड्रोलिक यंत्रणा सहज चालवता येते. उच्च पंप फ्लोमुळे सुपर सिडर्स, बटाटा प्लांटर्स सारखी जड उपकरणे सहज उचलता येतात. QLift मुळे PTO पॉवरचा पूर्ण उपयोग होतो आणि रोटाव्हेटर, सर्व प्रकारचे नांगर, TMCH (ट्रॅक्टर माउंटेड कम्बाईन हार्वेस्टर), मल्चर आणि पॉवर हॅरोज यांचा वापर सोपा होतो.

महिंद्रा NOVO ट्रॅक्टर मालिकेत अत्याधुनिक डीजीसेन्स तंत्रज्ञानही दिले गेले आहे. त्याद्वारे शेतकरी आपले ट्रॅक्टर मोबाईलवरून रिमोटली मॉनिटर करू शकतात. डीजीसेन्स इंधन वापर, व्यापलेले क्षेत्र, केलेल्या ट्रिप्स आणि ट्रॅक्टर परफॉर्मन्स याबाबत माहिती देते. जिओफेन्सिंग वैशिष्ट्यामुळे ट्रॅक्टर पूर्वनिर्धारित म्हणजेच आपण आखून दिलेल्या क्षेत्रातच राहतो.

NOVO ट्रॅक्टर मालिकेचे फ्लॅट प्लॅटफॉर्म ऑपरेटरसाठी हालचाल सुलभ करते. 8-इंच एअर क्लीनर आणि मोठे रेडिएटर्स इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवतात. त्यामुळे जास्त काळ वापर शक्य होतो.

वैशिष्ट्यपूर्ण NOVO ट्रॅक्टर मालिकेने 11 वर्षांचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने, महिंद्रा ट्रॅक्टर्सने तरुण वाहकांसाठी टफ ट्रॅक्टरचे स्केल रेप्लिका असलेले एक रायड-ऑन टॉय ट्रॅक्टर सुद्धा सादर केले आहे.

कंपनी पुढील फॅक्टरी-फिटेड वैशिष्ट्ये पर्यायी स्वरूपात देणार आहे:

·         फॅक्टरी-फिटेड फायबर कॅनोपी: दीर्घकाळ उन्हात काम करताना ऑपरेटरला संरक्षण देते.

·         फॅक्टरी-फिटेड अॅक्सेसरीज: वाढीव सुरक्षा आणि टिकावूपणा यासाठी जेरिकेन वजन, पुढील टायर मडगार्ड आणि ROPS (रोल ओव्हर प्रोटेक्शन स्ट्रक्चर) यांचा समावेश आहे.

·         फॅक्टरी-फिटेड Aux Valve: अधिक उत्पादकतेसाठी विविध हायड्रॉलिक उपकरणांचा वापर सुलभ करते.

·         4-वे अॅडजस्टेबल कॅप्टन सीट विथ आर्म रेस्ट: अप्रतिम सोय देते आणि दीर्घ वापरात थकवा कमी करते.

सर्वोच्च न्यायालयाची वनताराला क्लीनचिट:म्हणाले- प्राण्यांची खरेदी-विक्री कायदेशीर

0

नवी दिल्ली-अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवल्या जामनगरमधील वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रात प्राण्यांची खरेदी आणि विक्री नियमांच्या चौकटीतच झाली, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले.विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात कोणतीही अनियमितता आढळली नाही, असे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती पी.बी. वरळे यांच्या खंडपीठाने म्हटले की,


यापूर्वी, २६ ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाने दोन जनहित याचिकांवर (पीआयएल) एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूरमधील एका मंदिरातून ‘माधुरी’ हत्ती वनतारा येथे हलवल्याच्या वादानंतर जुलैमध्ये वकील सीआर जया सुकिन यांनी एक आणि देव शर्मा यांनी दुसरी याचिका दाखल केली होती.वनताराचे वकील हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, तपास अहवाल सार्वजनिक करू नये. त्यांनी असा युक्तिवाद केला की जर अहवाल बाहेर आला तर न्यूयॉर्क टाईम्स सारखी वर्तमानपत्रे त्याचा फक्त एक भाग छापून खोटी कथन तयार करतील. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही.

४ सदस्यीय एसआयटीचे नेतृत्व माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी केले होते आणि या पथकात न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान (माजी मुख्य न्यायाधीश, उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालय), मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नागराळे आणि कस्टम अधिकारी अनिश गुप्ता यांचा समावेश होता.एसआयटीने १२ सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर केला. न्यायालयाने एसआयटीचे कौतुक केले आणि समितीला मानधनही दिले पाहिजे असे म्हटले.

एसआयटीने ५ मुद्द्यांवर चौकशी केली

विशेषतः भारत आणि परदेशातून हत्तींच्या खरेदीमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा, प्राणीसंग्रहालय नियम, आंतरराष्ट्रीय प्रजातींच्या व्यापारावरील करार (CITES), आयात-निर्यात कायदे आणि इतर वैधानिक आवश्यकतांचे पालन केले गेले का?
पशुसंवर्धन मानके, पशुवैद्यकीय काळजी, प्राणी कल्याण, मृत्युदर आणि त्यांची कारणे, हवामान आणि स्थान यासंबंधी तक्रारी.
खाजगी संग्रह तयार करणे, प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रम, जैवविविधता संसाधनांचा वापर, कायदेशीर उल्लंघन, वन्यजीव तस्करी आणि प्राणी उत्पादनांचा व्यापार इत्यादी आरोप.
आर्थिक अनुपालन, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर संबंधित समस्यांबद्दल तक्रारी.
याशिवाय, आवश्यकतेनुसार, याचिकाकर्ते, अधिकारी, नियामक, हस्तक्षेप करणारे आणि पत्रकारांकडून देखील माहिती घेण्यात आली.
पेटा इंडियाने हत्तीणीच्या आरोग्याबद्दल, संधिवाताबद्दल आणि मानसिक ताणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर, १६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणी माधुरीला वनतारा येथे हलवण्याचा आदेश दिला.

डिसेंबर २०२४ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणीच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी तिला गुजरातमधील वनतारा प्राणी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला. हा खटला २०२३ पासून सुरू आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात माधुरीला वनतारा येथे हलवण्यात आले तेव्हा कोल्हापुरात निदर्शने झाली. तिला परत आणण्यासाठी लोकांनी सह्या गोळा केल्या. धार्मिक परंपरा आणि भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

१४ ऑगस्ट: न्यायालयाने वनताराला याचिकेत पक्षकार बनवण्यास सांगितले

माधुरीला परत आणण्याच्या याचिकेवरील पहिली सुनावणी १४ ऑगस्ट रोजी झाली. यादरम्यान, न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचे वकील सी.आर. जया सुकिन यांना सांगितले की, ते वनतारा यांच्यावर आरोप करत आहेत. तर याचिकेत त्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात आलेले नाही.

न्यायालयाने त्यांना वनताराला दोषी ठरवून पुन्हा खटल्यात सहभागी होण्यास सांगितले आणि २५ ऑगस्ट ही सुनावणीची तारीख निश्चित केली. यापूर्वी, सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी हत्तीला वनताराला पाठविण्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले होते.

अनेक गावात शिरले पाणी, ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने केले एअरलिफ्ट

0

ग्रामस्थांना एअरलिफ्ट करण्याचे शिंदेंचे निर्देश

अहिल्यानगर | बीड- अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकले. बीड जिल्ह्यातील कडा येथे पूरस्थिती गंभीर बनल्याने लष्काराला पाचारण करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर बनली आहे. कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून, ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते आणि मदतीची वाट पाहत होते. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. स्थानिक आपत्ती निवारण पथकेही जेसीबी आणि इतर साधनांच्या सहाय्याने बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक शेतकऱ्यांची जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दुपारी पाऊस थांबल्याने बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. लष्करी पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांना ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः करंजी आणि जवखेडे येथे सुमारे 70 ते 80 लोक पुरात अडकले होते, ज्यांना स्थानिक आणि आपत्ती निवारण पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. या भागातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांनंतर असा पूर पाहिल्याचे सांगितले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी येथील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचबरोबर, कडा येथेही पूर आल्यामुळे नगर ते जामखेड वाहतूक थांबली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात 40 गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा:उघड्या मॅनहोलजवळ बसले कर्मचारी

0

हवामान खात्याने पुढील तीन तास मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासूनच तुफान पावसाने जोर धरला असून आज पहाटेपासून त्याचा तीव्रतेने जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून वाहनचालकांसाठी दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाकरमान्यांसाठी घराबाहेर पडणे अवघड झाले असून ‘कामावर जायचे की नाही’ या संभ्रमात अनेकजण अडकले आहेत.


बीड तालुक्यातील नागझरी बेलखंडी बिंदुसरा नदीवर खूप पाणी आले आहे, दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसाने आता बिंदुसरा नदी पात्रात पाणी आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

नागपुरात आज मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने यापूर्वी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला होता. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावस पडला आहे. मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहेत.

थेऊरमध्ये पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले

रूपे वस्तीतील घटना : पीडीआरएफ पथकाकडूनही शर्तीचे प्रयत्न

पुणे (दि.१५) : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती उद्भवत आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता थेऊर (ता. हवेली) गावातील रुपे वस्ती परिसरातील ओढ्याला पूर आल्याने यात अडकलेल्या ग्रामस्थांना पीएमआरडीए व पीडीआरएफ पथकातील जवानांनी मदतकार्य करून सुमारे ७० पेक्षा अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले.

हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आल्याने जवळपास १५० लोकांच्या वस्तीत सोमवारी पहाटे ३ वाजता पाणी शिरले होते. या घटनेची माहिती मिळतात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून घरांमध्ये अडकलेल्या सुमारे ७० पेक्षा अधिक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलव‍िण्यात आले.

या पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले. तर काही वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. या बचाव पथकात अग्निशमन केंद्र आध‍िकारी विजय महाजन, जितेंद्र तळेले, महेश आव्हाड, शुभम बढे, शुभम चौधरी, उमेश फाळके, सुरज इंगवले, साईनाथ मोरे, किरण राठोड, अभिषेक पावर, प्रकाश मदने, तेजस डांगरे, सिद्धांत जाधव, शुभम पोटे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, करण पाडुळे, राजेंद्र फुंदे, प्राणिल दराडे, लहू मुंडे, राहुल शिंदे आदी जवानांचा समावेश होता.

  • डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

केरळच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेच्या भावनेचे भव्य प्रदर्शन.

पुणे-रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांनी आयोजित केलेला ‘‘पुणे ओणम महोत्सव २०२५’’ आज कोरेगाव पार्क येथील रोही व्हिला पॅलेस येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाने केरळच्या सर्वात प्रिय उत्सवाच्या उत्साही भावनेचा अनुभव घेण्यासाठी पुण्यातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणले.  हा कार्यक्रम रोटरी क्लब, कोरेगाव पार्क अध्यक्षा श्रीमती. शानी नौशाद आणि रोटरी क्लब, पुणे सेंट्रल अध्यक्षा श्रीमती. लेखा नायर यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बिशप नरेश अंबाला, गुरूजी बाळकृष्ण जोशी, ज्ञानी अमरजीत सिंग, मौलाना डॉ. शबीह अहसान काझमी, पुजारी बालचंद बठीजा या पाच वेगवेगळ्या समुदायातील मान्यवर धार्मिक प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले. जे धर्मनिरपेक्षता, सौहार्द आणि परस्पर आदराचे प्रतीक आहेत. विशेष म्हणजे रोटरीच्या शांतीच्या प्रोत्साहनाच्या मार्गावर वाढत्या विभाजनाचा सामना करत असलेल्या जगात, या उत्सहाच्या उद्घाटनाने एकता आणि सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

दिवसभर, पाहुण्यांनी केरळच्या समृद्ध वारशाचे सुंदरपणे प्रदर्शन करणाऱ्या रंगीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला – ज्यामध्ये पारंपारिक नृत्य प्रकार, संगीत आणि पूकलम प्रदर्शनांचा समावेश होता. केरळच्या शेफनी विचारपूर्वक तयार केलेला प्रामाणिक ओणम साध्या हा मुख्य आकर्षण होता, ज्यामध्ये सर्व उपस्थितांना आनंद झाला.

 या कार्यक्रमाने केवळ ओणमच्या परंपरा यशस्वीरित्या साजरे केल्या नाहीत तर हा सण एकता आणि समावेशकतेचे एक अद्वितीय प्रतीक आहे हा संदेशही बळकट केला. उपस्थितांनी उबदार वातावरण, उत्सवाची भावना आणि समुदायांमध्ये जोडण्याची संधी यांचे कौतुक केले.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. १५ : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे, तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत. या माध्यमातून कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई-वाहन धोरणाबाबत चर्चा केली. भविष्यात कंपनीने ई-वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

कालच्या मॅच फिक्सिंग मधून 25000 कोटी रुपये पाकिस्तानात गेले,दीड लाख कोटींचा जुगार, सरकारवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाकिस्तानला हरवल्यामुळे 26 महिलांचे कुंकू परत आले का?:संजय राऊत संतापले

मुंबई-भारत – पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फिक्सिंग मॅच असून यातून दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळाला गेला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातील किमान 25000 कोटी रुपये पाकिस्तानत गेले आहेत. हा पैसा आता पाकिस्तान भारताविरुद्ध वापरणार आहे. हे नरेंद्र मोदी, अमित शहा, जय शहा आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही का? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पाकिस्तान सोबत विजय किंवा पराजय हा मुद्दाच नाही. कोणी जर असे म्हणत असेल तर तो मूर्खपणा आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच न खेळण्याचा मुद्दा आहे. पाकिस्तानला हरवल्यामुळे पहलगाम मधील 26 महिलांचे कुंकू परत आले का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची संधी असताना देखील भारताने माघार घेतली. बलुचिस्तान पर्यंत जाणार होते, त्यांचे कंबरडे मोडणार होते ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कालच्या मॅचवर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. यातील काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी रुपये कालच्या मॅचने मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, आयएमएफ, आशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये, म्हणून आपण प्रयत्न करत होतात. कारण हा पैसा पाकिस्तानला मिळाला असता तर तो पैसा पाक दहशतवादामध्ये गुंतवणूक करेल. ही भारताची भूमिका होती. ही मोदींची भूमिका होती. तर दुसरीकडे काल भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला 1000 कोटी रुपये मिळवून दिले. हे पैसे कुठे जाणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट लढण्यासाठी आणि भारतीय महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सरकार मदत करत आहे. अशा मॅचवर आम्ही थुंकतो. 26 महिलांचे कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत त्यांनी तब्बल चार वेळा चर्चा केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याने ही युती शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी मोठे विधान केले आहे. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास पवारांना काहीच अडचण नाही. महाराष्ट्राच्या भावना त्यांना ठाऊक आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार अडथळा ठरणार नाहीत, उलट त्यांनी अशा युतीला अनुकूलतेची भूमिका घेतल्याचे संकेत राऊत यांनी दिले.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच या विषयावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल, असे सांगितले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात काय चाललं आहे याची माहिती आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला देत असतो. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना असते.” त्यामुळे शिवसेना-मनसे युतीवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आडकाठी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल शपथविधी प्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांचे सत्कार करून व्यक्त केल्या सदिच्छा

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज राजभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये पार पडला. सकाळी ११.०० वाजता झालेल्या या शपथविधी प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू छत्रपती पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. नव्या जबाबदारीसाठी त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे कार्य फलदायी ठरो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

राज्यपाल शपथविधी सोहळा ही घटना लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाची पायरी असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या शासनव्यवस्थेत नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांचा प्रतिष्ठेचे हॉले मेडल देऊन सन्मान

पुणे-भारत फोर्ज लिमिटेड अभिमानाने जाहीर करत आहे की त्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा कल्याणी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (ASME) कडून अत्यंत प्रतिष्ठेचे हॉले मेडल प्रदान करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी अभियांत्रिकी नाविन्यपूर्णता क्षेत्रातील सर्वाधिक सन्माननीय जागतिक मान्यतापैकी एक असा हा सन्मान आहे.

ASME हॉले अवार्डला 1924 मध्ये सुरुवात झाली. या सन्मानाद्वारे एक किंवा अधिक व्यक्तींनी एकाच कामगिरीतून लक्षणीय आणि समयोचित अशा सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी केलेल्या उत्कृष्ट आणि अद्वितीय अभियांत्रिकी कार्याची दखल घेतली जाते.

सध्याच्या वाढलेल्या अमेरिकन टॅरीफच्या परिस्थितीत या सन्मानाला विशेष महत्त्व आहे. भारत फोर्ज अमेरिकेत आणि जागतिक स्तरावर अभियांत्रिकी-आधारित मूल्यनिर्मितीद्वारे व्यापारातील बदलत्या घडामोडींना कसे सामोरे जात आहे हे यातून अधोरेखित होते. प्रगत उत्पादनाचे स्थानिकीकरण करून आणि स्थानिक उद्योगांच्या गरजा पूर्ण करून भारत फोर्ज श्री. कल्याणी यांचा  मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय कार्यक्षमतेत योगदान देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबीत करत आहे.

हा सन्मान केवळ श्री. कल्याणींच्या नेतृत्वाचा गौरव करत नाही तर अमेरिकेच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्यात मूळच्या भारतीय अभियांत्रिकी उत्कृष्टतेची भूमिकाही अधोरेखित करतो. यातून भारत फोर्जच्या अमेरिकेशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांना अधोरेखित केले जात असून आव्हानात्मक कठीण व्यापारचक्रात देखील सीमापार सहयोग कसा फुलू शकतो याचे हे द्योतक आहे.