Home Blog Page 3175

शेतकरी वाचवा देश वाचवा अन्न दाता गुढी

0
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी
पुण्यातील युवकांनी उभारली अन्नदाता गुढी
           पुणे- दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांबरोबरच सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यांच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी जाऊन पुण्यातील युवकांनी “अन्नदाता गुढी”उभारुन त्या कुटुंबियांचे अश्रू पुसले. तसेच शेतकर्‍यांच्या हक्कांबाबत समाज जागरणही केले.
            नगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील सोंदाळा गावातील शेतकरी सूर्यभान ज्ञानदेव अरगडे (वय – 32), तसेच उत्सव धुमाला गावातील शेतकरी दिलीप मदाजी काकडे (वय – 48) आणि शेतकरी पांडुरंग रामा कदम या व इतर शेतकर्‍यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. वरील तीन शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन पुण्यातील तरुण अमित बागुल व त्यांच्या तरुण सहकार्‍यांनी या दुःखी कुटुंबियांची भेट घेऊन ‘अन्नदाता गुढी” उभारली. कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच प्रत्येकी रु. 11,000/- चेकने कुटुंबियांना दिले. तसेच या कुटुंबियांच्या घरी शेतकर्‍यांचे व्यथा मांडणारी रांगोळी देखील काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमावेळी कुटुंबियांचे डोळे पाणावले. याप्रसंगी गावकरीदेखील मोठया संख्येने उपस्थित होते.
            यानिमित्त अमित बागुल म्हणाले की, “नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आला असताना केंद्र व राज्य सरकारांनी शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणे महत्वाचे असते. बँका, सोसायटी व खाजगी कर्ज काढून शेती जगवण्याचा प्रयत्न अन्नदाता शेतकरी करीत असतो. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारीपण येते.
             शेतीमालाला हमी भाव मिळत नाहीत. सरकार पुर्ण कर्ज माफी पण करीत नाही. सार्‍या जगाचा अन्नदाता आज उपाशी आणि हे सरकार तुपाशी अशी परिस्थिती संपूर्ण देशात झाली आहे. शेतकर्‍यांचे कोणतेही प्रश्न सरकार मार्गी लावत नसल्यामुळेे वैफल्यग्रस्त
झालेला शेतकरी आत्महत्या करतो हे महाराष्ट्राला भूषणास्पद नाही. आपला देश पूर्वी शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा. पण शेतकरीच टिकला नाही,शेतीही टिकली नाही तर इतर देशांकडून आपल्याला अन्नधान्य आयात करण्याची वेळ येईल. आता सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठीच  या दुःखी कुटुंबियांच्या घरी “अन्नदाता गुढी”उभारुन आम्ही त्या कुटुंबांना आधार देण्याचा  प्रयत्न केेला. तसेच अशा प्रातिनिधीक उपक्रमातून जागरण होवून सरकारचे डोळे उघडले जावेत अशीही अपेक्षा आहे असे ते म्हणाले.
            या उपक्रमाबदद्ल माहिती देताना अमित बागुल म्हणाले की, अशा या उपक्रमाचे हे 5 वे वर्ष असून यापूर्वी पुणे पत्रकार संघात ‘दर्पण गुढी त्याचबरोबर 26/11 या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद अशोक कामठे यांच्या घरी ‘शौर्य गुढी’ व सातारा येथील कर्नल शहीद संतोष महाडिक यांच्या घरी देखील गुढी उभारण्यात आली होती. धुळे येथेही आम्ही जाऊन पाकिस्तानच्या ताब्यातून 124 दिवसांनंतर सुटून आलेले शिपाई चंदू चव्हाण यांच्या धुळे येथील निवासस्थानी देखील गुढी उभारण्यात आली होती. सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून हा उपक्रम आम्ही राबवत असून  पुण्यातील नगरसेवक माजी उपमहापौर आबा बागुल यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही उपक्रम राबवित आहोत. या कार्यक्रमावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले. याबदद्लही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
            या उपक्रमाचे आयोजन अमित बागुल,सरचिटणीस, पुणे शहर जिल्हा काँगे्रस कमिटी यांनी केले होते.
            या अभिनव उपक्रमात पुण्यातील संतोष पवार,योगेश निकाळजे, धनंजय कांबळे, संतोष गेळे, गोरख मरळ, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, विक्रांत गायकवाड, उमाकांत गायकवाड, भरत तेलंग, सुयोग धाडवे, महेश ढवळे,प्रकाश आरणे, समीर शिंदे, अ‍ॅड.प्रताप डांगे, निवृत्ती काळे, बाबालाल पोळके, बद्रीशेठ चिंधे, संजयजी सुखदान, बाळासाहेब देवखिळे, वैशाली आरगडे,रेवणनाथ पवार, माधवराव काळे, संजय दवांडे, शिवाजी आरगडे, अशोक शिंदे, महेंद्र चव्हाण, अमर ससाणे हेसहभागीझाले

फर्ग्युसन महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न

0
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. एन. जे. पवार यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. प्रकाश पवार, डॉ. सचिन खेडकर, डॉ. तनुजा मराठे, डॉ. सिध्दार्थ आगळे, परीक्षा विभागाचे नियंत्रक विजय तडके, विद्यार्थी प्रतिनिधी संध्या सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. पवार म्हणाले, ‘आपल्याला चारित्र्यसंपन्न, बुध्दिवंत, स्वावलंबी पीढी निर्माण करायची आहे. त्यासाठी शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. व्यावसायिकता, विषयावर प्रभुत्व, आधुनिक तंत्रज्ञानाची जाण, कौशल्य असे बहुआयामी व्यक्तिमत्व शिक्षकांनी घडविणे गरजेचे आहे.’
बायोटेक्नॉलॉजीमध्ये विद्यापीठात पहिल्या आलेल्या मोनिका हर्षवाल, संगणकशास्त्रात पहिल्या आलेल्या नर्मदा अगरवाल यांच्यासह ऍनिमेशन, बॉटनी, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, पॉलिटिकल सायन्स आदी विज्ञान व कला शाखेतील ४८ विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

टिळक अभिरुप न्यायालय स्पर्धेत आयएलएस विजयी

0

पुणे, ता. १९ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस श्री. नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक अभिरुप न्यायालय स्पर्धेत आयएलएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. अनहिता के, समर्थ सक्सेना, आयुष अभिनव यांनी प्रतिनिधित्व केले. चौदा महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
बेंगलोरच्या स्कूल ऑफ लॉ, ख्रिस्ट यूनिव्हर्सिटीने दुसरा क्रमांक मिळविला. लुईस उन्नी, प्रियांका देशमुख, अंकिता होरो यांनी प्रतिनिधित्व केले. आयएलएसच्या समर्थ सक्सेनाला बेस्ट ऍडव्होकेट आणि केईएस लॉ कॉलेज, मुंबईच्या स्वेजत दाहो, राहुल मिश्रा, किंजल यांना बेस्ट मेमोरियलने गौरविण्यात आले.
न्यायमूर्ती हॉसबेट सुरेश यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विधी क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायद्याचे सखोल ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची क्षमता आवश्यक असल्याचे मत ऍड. कर्णिक यांनी व्यक्त केले. प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रताप साळुंके, स्वरुप वाघमारे, पलटक अरोरा, रोहन निकजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

पुण्यात प्रथमच दंतोपचारासाठी नेव्हीडेंट-‘नेव्हीगेशन इंप्लांटोलॉजी’ तंत्र

0

पुणे: नवीन दात बसविण्यासाठी अचूक नेव्हीगेशन करून डॉक्टरांना मदत करणारे ‘नेव्हीगेशन इंप्लांटोलॉजी’ (नेव्हीडेंट) तंत्र प्रथमच पुण्यात आल्याची माहिती डॉ. संजय जैन (दंत चिकित्सक, पीरियोडोंटिस्ट आणि इम्प्लॉँटोलॉजीस्ट) यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

जुन्या पद्धतीनुसार दंत चिकित्सक दात बसविताना डॉक्टरांचे कौशल्य आणि अंदाज महत्वाचा ठरत असतो. प्रत्येक रुग्णाच्या जबड्याचा, दातांचा आकार, ठेवण, खोली, कोन वेगळी असते. त्याप्रमाणे नवे दात बसवावे लागतात. त्यात काही प्रमाणात माप आणि जागेच्या चुका होऊ शकतात.

मात्र, ‘रियल टाईम डायनॅमिक नेव्हीगेशन’ तंत्राने इंप्लांट बसविताना दात अचूकपणे बसवता येतो.

तपासणीसाठी तोंडात ‘थर्मोप्लास्टिक स्टेंट’ टाकून तपासणी केली जाते. त्यामुळे जबडा, दात या बद्दलच्या सर्व गोष्टी सिटी स्कॅन केल्याप्रमाणे संगणकावर दिसतात.

या तंत्राद्वारे इंप्लांट उपचार करताना प्रथम तपासणी केली जाते. त्याठी रुग्णाच्या जबड्यात ‘नेव्हीस्टेंट’ बसवला जातो. त्याद्वारे सीटी स्कॅन होते, आणि जबड्याची रचना, दात, ठेवण यांचे अचूक मोजमाप उपलब्ध होते. ही माहिती संगणकावर दिसते आणि उपलब्ध होते. त्या माहितीनुसार नवे दात करणे, बसवणे सुलभ होते.

हे तंत्र आणि नेव्हीगेशन मशिन भारतात प्रथमच पुण्यात आणले असून, डॉ. संजय जैन त्याद्वारे उपचार करीत आहेत. तसेच डेंटल इंप्लांट शस्त्रक्रियेत सॅटेलाईट आणि जीपीआरएस (GPRS) ची मदत होणार आहे, त्यामुळे कोणतेही रेडिएशन आणि एक्स रे काढावा लागणार नाही.

आत्तापर्यंत या नेव्हीगेशन तंत्राने त्यांनी 25 रुग्णांवर इंप्लांट उपचार केले आहेत. या क्रांतीकारक तंत्राने ’इंप्लांट डेन्टीस्ट्री’ ही उपचारपद्धती पूर्णपणे बदलणार असल्याची माहिती डॉ. संजय जैन यांनी दिली.

या तंत्राचे उपचार तुलनेने महाग नाहीत. वेळेतही बचत होते, असे त्यांनी सांगितले. ‘क्लॅरॅनॉव’ कंपनीचेे हे नेव्हीगेशन मशिन  आहे. ‘नेव्हीडेंट’ असे या मशिनचे नाव आहे.

हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे पाचपीर दर्गाह ४३८ वा उरूस

0

पुणे- लष्कर भागातील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे पाचपीर दर्गाह ४३८ वा उरूस सर्वधर्मियांनी एकत्रित येउन उत्साहात साजरा करण्यात आला . या उरुसामध्ये संदल शरीफ , उर्स शरीफ , जियारत आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले . यावेळी शाहिद अजमेरी व मेहमूद निजामी यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला . त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला . यावेळी शेरा चढविण्यास भाविकांनी गर्दी केली होती .

या उरुसाचे आयोजन करण्यासाठी दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , अमर शेख पुणेकर , गणेश  राघवाचारी , रोहित चिंडालिया , नासिर शेख , निजाम शेख , विजयन जोजफ , रविंद्र वाल्मिकी , सुरेश वर्मा , सोमेश खरात , महेश मोरे , हुसेन शेख , निलेश जाधव , स्वप्नील सकट आदींनी केले होते. 

या उरुसामध्ये प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रशांत जगताप , नगरसेवक अविनाश बागवे , शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विभागप्रमुख अमोल देवळेकर , अर्शद अक्कलकोटकर , प्रकाश बहिरट , पोपट गायकवाड , मन्नू कागडा , पप्पू सलुजा , तुषार त्रिवेदी , कैलाशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपा नगरसेवकांचा ,खरा सामना प्रशासनाशी ..

0
पुणे- कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांशी लढत करायची तेव्हा करतील ..पण भाजपच्या नवीन नगरसेवकांवर ,किंवा सरळमार्गी चालू पाहणाऱ्या नगरसेवकांवर सध्या तरी खरा सामना प्रशासनाबरोबरच करण्यात जास्त वेळ घालवावा लागतो आहे . याची अनेक उदाहरणे महापालिकेत देता येतील . त्यातील एक येथे देत आहोत , बालेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे …
भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी  बालेवाडी गाव मुख्य चौकात जिल्हा परिषदने सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत होती व या ठिकाणी बाजूला नवीन टाकीचे बांधकाम झाल्याने हि टाकी वापरात हि नव्हती. या टाकीखाली गावातील अनेक वृद्ध व्यक्ती व महिला बसत आल्याने या टाकी पडण्याचा धोका अधिक वाटतो म्हणून .
हि टाकी पाडण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व भवन विभागाला ३.दि.५ मे २०१७ रोजी आणि दि.१७ मे २०१७ रोजी पत्राद्वारे कळविले.पत्र दिल्यानंतर ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून देखील संबंधित विभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नगसेवक अमोल बालवडकर यांनी म.न.पा.मुख्य सभेत याबाबत आवाज उठविला आणि  १ महिन्यांच्या आत हि टाकी पडण्याचे आश्वासन मिळविले , पण पुढे पुन्हा सुरु झाला .. हे आश्वासन पाळा म्हणून पुन्हा पाठपुराव्याचा प्रवास ..अखेर  १ महिन्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून हि टाकी पाडण्यात आली. परंतु पाडलेल्या टाकीचा राडारोडा न उचलता जागेवरच सोडण्यात आला.आता तो उचलावा म्हणून अमोल बालवडकर गेली १ महिना पाठपुरावा करत आहेत …
आणि यातच त्यांची आमची भेट झाली ..
आणि म्हणाले ,’एका छोट्या कामासाठी एवढा पाठपुरावा करूनही एवढी टाळाटाळ करणारे पुणे म.न.पा.चे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अत्यंत मुजोर व कामचुकार आहेत
पुणे शहरात भा.ज.प.सत्ताधाऱ्यांना विरोधकांपेक्षा अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांकडून जास्त धोका आहे .
……… बालवडकरांची हि एकट्याची व्यथा निश्चित नाही , पण एकीकडे अधिकाऱ्यांना धमकावून , त्यांना लाथा घालून कामे करवून घेणारे च नाही तर बेकायदा कामांवर कारवाई करू नये म्हणून धाक ठेवणारे काही महाभाग नगरसेवक ही याच महापालिकेत आहेत … मग या सर्वांनी असेच महाभाग बनण्याची वाट प्रशासनातील कदाचित काही धेंडं पाहत असावीत असेच अशा घटनांनी दिसून येते .
 

वर्षपूर्ती होत असताना वचननाम्यातील बहुतांश कामांची पूर्तता -महापौर मुक्ता टिळक

0
पुणे-पुणेकरांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पुणे मनपा ची सत्ता सोपविली त्यास आमचे नगरसेवक वचननाम्याची पूर्तता करून आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करत आहेत,त्याच कडीतील आजचा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा कार्यक्रम असून प्रभागातील नागरिकांना जे अपेक्षित आहे तेच काम करण्यावर आम्ही भर दिला आहे,आज गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी आपल्याला ग्वाही देते कि आमचे काम हे नागरिकांना केंद्रबिंदू मानून सुरु आहे व आम्ही आपल्या सर्व अपेक्षा निश्चितच पूर्ण करू.असा दावा  महापौर मुक्ता टिळकयांनी येथे केला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या बजेट तरतुदीतून योग केंद्र व लहान मुलांसाठी वाचनालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.” आम्ही पारदर्शी कारभारावर भर दिला असून त्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक आमच्यावर टीका करत आहेत,मात्र आम्ही सर्वांगाने विचार करून ऑनलाईन खरेदी सह,सुरक्षा रक्षकांमध्ये कपात करणे,सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करणे,नागरिकांना बहुतांश सुविधा ऑनलाईन उपलब्ध करणे यासारखे निर्णय घेतले आहेत असे ही त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मी माझ्या वचननाम्यात योग केंद्र उभारणार असे म्हंटले होते,भाजप च्या शहराच्या वचननाम्यात देखील याचा अंतर्भाव होता,त्यामुळेच गत ८ महिने सातत्याने पाठपुरावा करून करिष्मा सोसायटी शेजारील ह्या अमेनिटी स्पेस च्या जागेत आता टुमदार योग केंद्र व लहान मुलांसाठीचे वाचनालय उभे राहणार आहे,योग केल्याने आपले शरीर तर तंदरुस्त राहतेच पण मन ही आनंदी व प्रफुल्लित होते याचा अनुभव असल्याने प्रभागात योग केंद्र उभारण्यास प्राधान्य दिले,तसेच लहान मुले खूपच मोबाईलच्या आहारी गेली आहेत त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथे एका भागात बाल वाचनालय देखील असणार आहे,वर्षपूर्ती होत असताना मी माझ्या जाहीरनाम्यातील बहुतांश वचने पूर्णत्वास आणली आहेत असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यावेळी प्रभागातील नगरसेवक दीपक पोटे,माधुरीताई सहस्रबुद्धे,जयंत भावे,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,राजेंद्र येडे,सुवर्णाताई काकडे,राज तांबोळी,अनुराधा एडके,सुलभाताई जगताप,निलेश घोडके,निलेश गरुडकर,माणिकताई दीक्षित,सुमित दिकोंडा,यांच्यासह संगम प्रेस चे समीर शाह,आर्किटेकट अतुल दिवाने, सुधीर नाईक (पुष्पकांत सोसायटी)मा किशोर भट्ट्ड ( चिनार सोसायटी) , हेमंत चक्रदेव (करिश्मा सोसायटी) जयंत जोशी (अवंतिका सोसायटी) शांतप्पा एंडिगिरी शीलाताई वरखेडकर (तेजलकुंज )  दीपक आशर (गौरव सोसायटी)  सुरेश कुलकर्णी (संगमश्री )  रवी जोशी (रेल्वे म्युझिअम)नानिवडेकर,श्रीरंग उमराणी(सिद्धार्थ टॉवर्स) जगदीश खेर (अनुशा ) गणेशवाडे(श्रीकृष्ण इंजिनिअरिंग) श्री ढोणसाळे (ऐश्वर्या )सौ शोभा काळे सौ.वीणा चव्हाण (पुष्पकांत ) श्री. अनिल काळे (सदाफुली १) असे विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांशी महापौर मुक्ता टिळक,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर व सर्व नगरसेवकांनी मुक्त संवाद साधला.यावेळी विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर महापौर व प्रभागातील चार ही नगरसेवकांनी एकत्र कुदळ मारून या वास्तूच्या उभारणीचा श्रीगणेशा केला.यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भाजपचे हडपसर मतदारसंघाचे विस्तारक कुलदीप सावळकर व कोथरूड मतदारसंघाचे विस्तारक पुनीत जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला,तसेच संगम प्रेस चे समीर शाह,आर्किटेकट अतुल दिवाने,मनपाचे अभियंता सुनील मोहिते,मनपाच्या रुचिता बावनकर,कंत्राटदार सुदर्शन थोरात,तसेच वैष्णवी घोडके यांचा ही सत्कार करण्यात आला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.

रस्तारुंदीकरणसाठी खा. शिरोळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

0

पुणे-जुन्या पुणे मुंबई मार्गावरील “पुणे मेट्रो आणि बीआरटी” मार्गाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित विस्तारीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी संरक्षण खात्याच्या जमिनीवरील कामास (संपादन आणि विस्तारीकरण) तातडीने मंजुरी मिळावी याकरिता  केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच संरक्षण सचिव बरून मित्रा ह्यांची आज दिल्लीत संसदीय अधिवेशन दरम्यान भेट घेऊन ह्यासंबंधी विनंती करणारे पत्र दिल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. ” शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी  उपयुक्त अशा  पुणे मेट्रो आणि बीआरटी ह्या कामांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शहरी विकास विभागाकडून ह्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाकडेवाडी ते हरीस पूल ह्या मार्गावरील एकूण ५.७ किलोमीटर अंतरामधील २.२ किलोमीटर अंतर हे संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीत येत आहे. त्यामुळे ह्या कामाची पूर्तता लवकरात लवकर होण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना आज भेटून पत्रासाहित विनंती केली असल्याचे शिरोळे ह्याप्रसंगी बोलताना म्हणाले.

जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाजवळ ‘गंगाजल ‘ पुण्यात निवडणूक उधळली (व्हिडीओ)

0

पुणे-जिल्हाधिकारी, आणि पोलीस आयुक्तालय अगदी हाकेच्या अंतरावर , सीआयडी , विधान भवन अशी नामांकीत कार्यालये जवळ जवळ असताना … येथील सहकार भवन मध्ये होणारी राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची अवघ्या २१ संचालकांमध्ये होणारी निवडणूक चक्क कायदा सुव्यवस्थेचे कारण देत आज स्थगित कार्यात आली . सहकार संघाचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी हि निवडणूक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे . बहुमत भाजपकडे नव्हते म्हणून 2 आमदारांसह काहींनी या ठिकाणी धुमाकूळ घालवून हि निवडणूक पराक्रीया उधळवून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे .अजय देवगण याच्या गंगाजल चित्रपटात ठेका सुंदर यादव ला मिळविण्यासाठी फार मोठी हाणामारी करावी लागते असे कथानक आहे . पण येथे केवळ खुर्च्या उचलून फेकल्या , टेबल आडवे तिडवे केले कि दहशत पसरते आणि अधिकारी ,पोलीस गाशा गुंडाळतात कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती झाल्याचे समजते आहे .

(दरम्यान निवडणूक प्रक्रिया दरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने निवडणुकीस गालबोट लागले आहे. या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले यांनी रिव्हॉल्व्हर दाखवण्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील, तसेच विद्यमान संचालिका सुनीता माळी यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला, असा आरोप पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्याठिकाणी खुर्च्या आणि टेबल तोडण्यात आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला. )

तर राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज (सोमवारी) निवडणूक होती. मात्र, निवडणूक सुरु झाल्यावर आमदार दरेकर, लाड तसेच नलावडे यांनी मतपेट्या फेकत खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. बहुमत नसल्याने निवडणूक हरल्याच्या भीतीने निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आज कॉंग्रेस भवन मध्ये आलेल्या 11 सदस्यांनी केला.आमच्याकडे 11 सदस्य होते तर आमदारांच्या कडे १० सदस्य होते. आता निवडणूक उधळून लावून आमच्या वर दबाव आणून आमचे संख्याबळ कमी करण्यासाठी हे डावपेच करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलिसांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष मोडतोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर निवडणूक अधिकारी यांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत हि निवडणूक स्थगित करून पोबारा केला . असे हि त्यांनी सांगितले …पहा कॉंग्रेस भवनात येवून या 11 जणांनी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय सांगितले …

मिलिंद एकबोटेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणा-यास अटक

0
पुणे-
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलींद एकबोटे यांना पुणे कोर्टाच्या परिसरात काळे फासण्याच्या प्रयत्न करणा-या तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. संजय हरिदास वाघमारे (रा.अप्पर इंदिरा नगर) असे त्याचे नाव असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिलींद एकबोटे यांना यापुर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायलयीन प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना बाहेर घेऊन जात असताना संजय वाघमारे याने काळे फासण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेमुळे न्यायालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुप्रिम कोर्टाने जामिन अर्ज फेटाळल्याने पुणे ग्रामिण पोलिसांनी मिलींद एकबोटेंना 14 मार्च रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यापुर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.
कोरेगाव – भीमा येथे 1 जानेवारी रोजी दोन गटात जातीय तणाव निर्माण होऊन कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या जातीय तणावाच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे दाखल असून त्यामध्ये एका अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा समावेष आहे.

सुरक्षिततेची..स्वयंशिस्तीची,सतर्कतेची,नियमांची..गुढी

0
पुणे: गुढी सुरक्षिततेची…गुढी स्वयंशिस्तीची…गुढी सतर्कतेची…गुढी नियमांची…असा सुरक्षित वाहतुकीचा संदेश देत  सुरक्षित वाहतुकीची गुढी पुण्यातील वाहतुक पोलिस आणि तरुणाईने एकत्रित येऊन उभारली. वाहतुकीचे सर्व नियम पाळत स्मार्ट पुण्याची वाहतूक व्यवस्था देखील स्मार्ट करु अशी ग्वाही तरुणांनी यावेळी वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलीस व अधिकाऱ्यांनी हातामध्ये गुढी घेऊन सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती देखील यावेळी केली.
वाढती वाहने आणि बेशिस्त वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्याकरीता पुणे शहर वाहतूक आणि मैत्र युवा फाऊंडेशनने सुरक्षित वाहतुकीची गुढी उभारली.  गुढीपाडव्यानिमित्त टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील, मैत्र युवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे उपस्थित होते.
प्रभाकर ढमाले म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी सगळ््यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यात ५२ लाख वाहने आहेत, त्याप्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्वयंशिस्तीने प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करायला हवे. वाहतुकीची शिस्त पाळणे हि देखील समाजसेवा आहे, असेही त्यांनी सांगितले.
संकेत देशपांडे, पुण्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जर तरुणाईने पुढाकार घेतला, तर निश्चितच मोठा बदल दिसू शकतो. त्यामुळे तरुणाईला सोबत घेऊन सुरक्षित वाहतुकीची गुढी उभारण्यात आली आहे. मैत्र युवा फाऊंडेशनच्या २७ शाखा पुण्यात आहेत. या शाखेतील मुले-मुली प्रत्येक शनिवार आणि रविवार २ तास वाहतूक पोलिसांसोबत काम करुन त्यांना वाहतूक नियंत्रणाकरीता मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.

फिनीक्स मॉल मध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आंदोलनानंतर मॉल व्यवस्थापनाने मागितली माफी

0
पुणे-फिनिक्स माॅल प्रशासनाने तृतीयपंथी नागरिकाला माॅलमधे प्रवेश नाकारल्याबद्दल वडगाव शेरी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज माॅलबाहेर आंदोलन करण्यात आले.
ट्रान्सजेंडर्स या समाजाचाच एक घटक आहेत. त्यांना त्यांचे मुलभूत हक्क मिळालेच पाहिजे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी देखील प्रवेश नाकारणे ही आधुनिक काळातील ‘लैंगिक अस्पृश्यता’ आहे. यांच्या विरोधातील लढ्यास माझा पाठींबा आहे असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कालच ट्विट केले होते.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कडून आंदोलन करण्यात आले. माॅल प्रशासनाने झालेल्या घटनेबद्दल माफी मागीतल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नारायण गलांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव यांच्यासोबत भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, सोमनाथ साबळे, मयूर गलांडे, सदाशिव गायकवाड, संजय गलांडे, मायकल मिरपगार, नितीन राठोड, दादा कांबळे, कृष्णा नायर, महेंद्र कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

रक्तदानाने गुढी पाडव्याला नव वर्षाचे स्वागत !

0
साई प्रतिष्ठान आणि शिव राजमुद्रा प्रतिष्ठान   उपक्रम 
पुणे;
रक्तदानाने गुढी पाडव्याला  नव वर्षाचे स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम साई प्रतिष्ठान आणि शिव राजमुद्रा प्रतिष्ठान(रामनगर ,येरवडा ) यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता . मंदिरात गुढी उभारल्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला .  ३४ फूट उंच गुढी उभारण्यात आली .  सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत हा उपक्रम पार पडला . सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्यात सहभाग घेतला . एकूण ५४ जणांनी रक्तदान केले .सुरज कदम ,किशोर कांबळे ,महेंद्र चव्हाण यांनी संयोजन केले

चंदुभाई शहा यांना जीवनगौरव देणार

0

अॅड. एस. के. जैन, प्रमिला साकला, इंदर जैन व विशाल चोरडिया यांना पुरस्कार जाहीर

पुणे : जीतो पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार चंदुभाई शहा यांना देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अॅड. एस. के. जैन, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रमिला साकला, उद्योग क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल इंदर जैन व तरुण उद्योजक म्हणून विशाल चोरडिया यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी व मुख्य सचिव नरेंद्र छाजेड यांनी याविषयी माहिती दिली. येत्या 29 मार्चला (गुरुवार) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा समारंभ सायंकाळी 6 वाजता होणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून कार्यक्रमास आमदार माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नवीन पिढीला आपली परंपरा व आपले संस्कार माहिती व्हावेत यादृष्टीकोनातून शास्त्राला अनुसरुन असलेला राहुल कपूर यांचा चरण स्पर्श कार्यक्रम यावेळी होणार आहे. तसेच, समाजाने समाजासाठी उभारत असलेल्या जीतो नगर प्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ यावेळी होणार आहे, असेही विजय भंडारी व नरेंद्र छाजेड यांनी सांगितले.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे मुर्खांचा बाजार – चेतन तुपे पाटील

पुणे-

पैसे कमी असल्याचे कारण पुढे करून विकास कामांना कात्री लावण्याचा प्रकार सुरू असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 337.50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 21 प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांना प्रशासनानेच फसवले असून, ही महापालिका एक  सर्कस, बनली असून सत्ताधारी नगरसेवक जोकर आणि आयुक्त रिंगमास्तर बाले आहेट. या नगरसेवकाचे हेडमास्तर यांचाही अभ्यास कमी पडतो आहे . पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे मुर्खांचा बाजार झाल्याची जहरी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केली आहे .

25 कोटी रुपये नाहीत, म्हणून गरीबांच्या योजनांना कात्री लावली जाते. दुजाभाव करत विरोधकांना कमी तरतूद दिली गेली. कायमच पैसे कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. अशावेळी 337.50 कोटी रुपयांची गुंतवणूक महापालिका करत आहे. महापालिकेकडे गुंतवणूक करण्यासाठी  पैसे असताना त्यांनी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे का काढले? असा प्रश्‍नही तुपे यांनी उपस्थित केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असून, ते सुधारण्याला तयार नाहीत, तर आम्हांलाच आता यांची लाज वाटत आहे, अशी टीकाही तुपे यांनी केली. 337 कोटी रुपयांचा वापर अनेक ठिकाणी करता आला असता, अंदाजपत्रकाला कात्री लावण्याची गरजच पडली नसती. सत्ताधाऱ्यांनी विकासाचा नवा फंडा काढला असून, सावकरी धंदा करताना कर्ज काढून गुंतवणूक केली जात आहे. या मूर्खपणाला ते शाश्‍वत विकास म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे, असेही तुपे म्हणाले.

सत्ताधारी हे गोंधळलेले आणि भांबावलेले आहेत. ही महापालिका आहे, की सर्कस सुरू आहे तेच कळत नाही. सत्ताधारी हे सर्कशीतील जोकर वाटत आहेत. भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी  100 कोटी रुपये पीएमपीएमला देण्याविषयी बोलले होते. त्यामुळे त्यांनी हे 300 कोटी रुपये आता पीएमपीएमएलसाठी वापरावेत, असेही तुपे यांनी सूचवले आहे. याबाबत गोगावलेंचा अभ्यास कमी पडत असेल तर त्यांनी विरोधकांचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोमणाही तुपे यांनी मारला आहे. त्यामुळे कोणालाही निवडून द्या परंतु या मुर्खांना नको, असे आवाहनही तुपे यांनी पुणेकर नागरिकांना केले आहे.

नेमके पहा आणि ऐका ..तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ……