Home Blog Page 1962

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

0

दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्या आधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागताच गावकऱ्यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

दरड कोसळ्यापूर्वी दिसून येणारी सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. डोंगर उतारांना तडे जाणे, तडे गेलेला भूभाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे, नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे मोठे होणे, त्यातून गढूळ पाणी येणे, विहीरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये दिसलेली लक्षणे. अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी क्षमता वाढणे, भात खाचरांना भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे, संपर्क साधणे निकामी होणे, घरांना तडे जाणे, भिंत कोसळणे, घरांच्या जमिनीखालून पाणी येणे, विहीर वाहू लागणे, बोअरिंगमधून पाणी उसळणे. अशी ही लक्षणे दरड कोसळण्यापूर्वी दिसून येतात.

अशी लक्षणे दिसून आल्यास गावकऱ्यांनी काय करावे?

दरड कोसळण्याची लक्षणे दिसू लागल्यास गावकऱ्यांनी तातडीने धोक्यापासून दूर होण्याचा विचार करावा. जीव वाचवणे महत्वाचे आहे. हा एकमेव विचार ठेवावा. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरास सज्ज व्हा. त्याची तयारी म्हणून शेती, बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसा, औषधे यांची जोडणी करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले तसेच जनावरांना हवलण्यास प्राधान्य द्या.

दरड कोसळण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. सह्याद्री परिसर म्हणजे पर्वतमय, भूकंपप्रवण आणि भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि खडकांमधील सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमध्ये पाणी जाऊन नवीन झरे निर्माण होतात. अखेरीस अतिवृष्टीमध्ये या तड्यांपासून दरडी कोसळतात. तसेच नवीन रस्ते, रेल्वेसाठीचे खोदकाम, बोगद्यांची कामे, खाणकामासाठीचे सुरुंग, शेतीसाठी, घर बांधणीसाठीचे सपाटीकरण, जंगलतोड यामुळेही दरडी कोसळतात.

दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, ती रोखण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. दरडी थांबण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. डोंगर भागात अतिक्रमण करू नका, सापटीकरण टाळावे. डोंगर उतारावर बांबू सारख्या वृक्षांची लागवड करणे. पाण्याचा निचरा लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे.

विद्यार्थ्यांनो तुम्हीही सहभागी व्हा!

शिक्षकांच्या मदतीने गावाचा नकाशा प्राप्त करून डोंगर उतारावर दिसलेली दरडींची लक्षणे आणि त्यावर अधारित धोकादायक परिसराचे नकाशे तयार करु शकता. पुररेषा आखू शकता. गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत निबंध, पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून जनजागृती करा, तसेच धोकादायक परिसराचे चित्रीकरण करून पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना पाठवू शकता.

जिल्ह्यात एकूण 25 गावे दरडग्रस्त आहेत. त्यामध्ये वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 6 गावांचा समावेश आहे. दोडामार्ग तालुक्यात 4, देवगड तालुक्यात 4, सावंतवाडी तालुक्यात 3 आणि मालवण, कणकवली तालुक्यात प्रत्येकी 1 अशी दरड ग्रस्त गावे आहेत.

लक्षात ठेवा निसर्गाने दिलेला इशारा वेळीच ओळखून त्यास दिलेला प्रतिसाद हा तुमच्यासह तुमच्या कुटुंबियांचेही प्राण वाचवू शकतो. वाड वडिलांपासून रहात असलेले घर कसे सोडू असा विचार न करता आपले व आपल्या कुटुंबियांचे प्राण लाख मोलाचे आहेत ही बाब लक्षात ठेवा. दरडीच्या दुर्घटनांमधील जीवित हानी टाळण्यासाठी सजग रहा, सज्ज व्हा.

– हेमंतकुमार चव्हाण, 

माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग.

स्पर्धा,कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

पुणे: महावितरणच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये क्रिकेट, रांगोळी स्पर्धा  तसेच स्नेहमेळा व शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आयोजनामुळे नवी ऊर्जा मिळाली.

महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहमेळा-२०२२ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाद्वारे स्नेहमेळ्याचे उद्घाटन झाले.

दरम्यान दि. ४ ते ५ जून रोजी पुणे परिमंडल अंतर्गत विभागस्तरीय पुरुष व मंडलस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत मंचर विभागाच्या पुरुष संघाने व रास्तापेठ मंडलाच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले तर बंडगार्डन विभागाचा पुरुष संघ व गणेशखिंड मंडलाचा महिला संघ उपविजेता पदाचे मानकरी ठरले. तसेच परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत उज्ज्वला सोनार- प्रथम, काजल लिंबोळे- द्वितीय तर अपर्णा मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

उच्च शिक्षणासाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणारे शिवम अंकुश नाळे, हेमंत सुरेश वानखडे, ऋषिकेश रवींद्र कारंडे, डेलिया तुषार काळे, सृष्टी श्रीकांत गंगावणे, मयांक देविदत्त जोशी, आर्यन माणिक राठोड तसेच शैक्षणिकसह कला व क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे आदित्य राजेश काळे, प्रद्युम्न्य संजय जगनाडे, सोनल चंद्रकांत कानडे, यश सतीश उंडे आणि एमपीएससी स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी झालेले श्री. नीलेश कृष्णाजी सस्ते यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, श्री. संतोष गहेरवार, भक्ती जोशी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब हळनोर यांनी आभार मानले. वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मृद्गंधाच्या वास अत्तर पेक्षाही सुंदर – उल्हास पवार

पुणे -उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तर यापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे  आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाला होते अशी भावना ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी आज काढले. तनया–ईशा प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्य संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी तनया–ईशा प्रकाशनचे प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले ‘सध्या वाढत्या शहरीकरणामुळे बेसुमार जंगलतोड होत आहे. त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंगचे संकट सर्वांनाच भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मृद्गंधा हा निसर्गविषयक महत्व वाढवणारा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण म्हणाल्या कि वृक्ष, वेली, फुले, शेती, नदी, पक्षी, आकाश, वारा हा सारा निसर्ग असल्यामुळेच आपले जीवन समृद्ध होत असते. निसर्गाची नासाडी न करता निसर्गाचे संवर्धन व्हावे हिच भावना या काव्य संग्रहात प्रतिबिंबित होत आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर बाबर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रुति तिवारी यांनी केले.

कल्याणी ग्रुपने सादर केले भारत १५० मल्टी-पेलोड ड्रोन

पुणे७ जून २०२२: पुणे-स्थित भारतीय उद्योगसमूह कल्याणी ग्रुपची संरक्षण उद्योगक्षेत्रातील कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडने भारत १५० हे मल्टी-पेलोडव्हेरिएबल मिशन ड्रोन सादर केले असून हे अनोखे ड्रोन या समूहाने भारतात विकसित केले आहे. एक्स-८ कॉन्फिगरेशन ड्रोनची भारतीय सैन्याकडून लेह-लडाखमधील अतिउंचीवरील प्रदेशांमध्ये आधीच चाचणी घेतली जात असून याने २० किलो पेलोडसह ८.५ किमी कामगिरी बजावली आहे.

हे ड्रोन उभ्या लंब स्थितीत टेक-ऑफ व लॅन्डिंग करणारे (व्हीओटीएल) मनुष्यरहित हवाई वाहन (युएएस) आहे ज्याचे कमाल टेक-ऑफ वजन १५० किलो व रिकामे असताना टेक-ऑफ वजन ५८ किलो आहे.  या क्राफ्टमध्ये भारतात विकसित करण्यात आलेली रेडिओ कम्युनिकेशन व्यवस्था आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम (आयएनएस) आहे ज्यामध्ये अँटी-जॅमिंग आणि अँटी-स्पूफिंग क्षमता आहेत. या क्षमतांनी परिपूर्ण असल्यामुळे हे क्राफ्ट जॅमिंग आणि जीपीएस-नाकारले जाते अशा वातावरणात देखील चालवले जाऊ शकते.

या ड्रोनच्या बॅटरीज ५० किमी ते २०० किमीसाठी कम्युनिकेशन लिंक एन्क्रिप्शन (१२८ एईएस) सह किमान ३० मिनिटे टिकू शकतात.  वापर जसा असेल त्यानुसार टिकून राहण्याची शक्ती वाढवली जाऊ शकते. 

हे ड्रोन जल व धूळ रोधक भारत १५० -३० अंश सेल्सियस ते ६५ अंश सेल्सियस या तापमान श्रेणीमध्येप्रति तास ५० किमीच्या सरासरी वेगासह व वायू झोताला प्रतिकार करण्याच्या १५ एम/एस क्षमतेसह वापरले जाऊ शकते.  टेक-ऑफ जमिनीच्या १००० मीटर वर चालवले जाऊ शकते आणि ५५०० एम एएसएलला काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

याची रचना स्वायत्त (ऑटोनॉमस) आणि इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या स्थिर असल्यामुळे ते लॉजिस्टिकशोध आणि बचावसिग्नल इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटेलिजन्सआयएसआरवॉरहेड ड्रॉपिंगसाठी लॉइटरिंग म्युनिशन इत्यादींसाठी वापरण्यास सुयोग्य आहे.

भारत फोर्ज डिफेन्सचे अध्यक्ष व सीईओ श्री. राजिंदर भाटिया म्हणालेभारत १५० हे अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहन विकसित केल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. स्वदेशात अशी यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे आपल्या देशाला स्वावलंबी बनवण्याची आमची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.  हे ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी वापरले जाऊ शकते.  आम्हाला आशा आहे की हे ड्रोन खूप चांगली कामगिरी बजावेल आणि लवकरच त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जाऊ लागेल.”   

कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड हा प्लॅटफॉर्म पुढे अजून जास्त विकसित करेलत्याच्या टिकून राहण्याच्यापेलोड क्षमतांमध्ये आयएसआर क्षमतांमार्फत सुधारणा घडवून आणेल. 

खेलो इंडिया युथ गेम्स:बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीची सुवर्ण कामगिरी,तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला हरवून पटकावले पदक

0

पंचकुला, ७
बॅटमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवून सुवर्ण पदकास गवसणी घातली. पहिला गेम त्याने २१ विरूद्ध १५ असा तर दुसरा गेम २२ विरूद्ध २० या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या तालिकेत सुवर्ण पदकांच्या संख्येत भर पडली आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचा अंतिम सामना रंगला. दर्शनच्या आक्रमक फटक्याचा ऋत्विकने तितक्याच लीलया प्रतिकार केला. पहिला गेम हरल्यानंतर त्याने दुसऱ्या गेममध्ये आघाडी घेतली होती. परंतु दर्शनने त्याचा प्रतिकार भेदत सुवर्ण पदक पटकावले.
पहिल्या गेममध्ये सुरूवातीला दर्शनने दोन गुण घेऊन आघाडी घेत खाते उघडले. ऋत्विकने तीन-तीन गुण बरोबरी झाली. मग मात्र, दर्शनने अकरा गुणांपर्यंत आघाडी घेतली. तेव्हा ऋत्त्विक होता ९ गुणांवर. पुढेही आघाडी कायम (१७ विरूद्ध १३) राहिली. हीच गती कायम ठेवत दर्शनने पहिला गेम २१ विरूद्ध १५ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये ऋत्विकने गुण घेऊन शुभारंभ केला. दर्शननेही सलग दोन घेतले. परंतु पुन्हा ऋत्विक आघाडीवर गेला. तो ४ गुणांनी आघाडीवर पोहचला. दर्शनने चांगले फटके मारून बरोबरी साधली. नेट पॉईंट घेण्याच्या नादात त्याने ऋत्विकला तीन पॉईंट दिले. हे कमी म्हणून की काय त्याने मारलेले काही फटकेही नेटमध्ये अडकले. परिणामी दर्शन ९ विरूद्ध १३ असा पिछाडीवर पडला. मात्र, सलग गुण घेत १३-१३ अशी बरोबरी केली.
दर्शनने सलग दोन घेतल्याने स्कोअर १५ झाला. ही आघाडी त्याने मॅच पॉईंटवर आणली. मागून ऋत्विकही २० गुणांवर आला. दर्शनने एक गुण घेतला. त्यानंतर ऋत्विकने मारला फटका फाऊल झाला. आणि दुसरा गेमही दर्शनने २२ विरूद्ध २० असा जिंकून सुवर्ण पदकास गवसणी घातली. दर्शन हा गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करतो. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तो ऋत्विककडून हरला होता. खेलो इंडियात त्याला हरवून सुवर्ण जिंकले.

क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दर्शनला दिल्या होत्या शुभेच्छा
हरियानाच्या मैदानावर महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) बॅटमिंटनच्या अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सकाळी व्हिडिओ कॉल करून सुवर्णपदकासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. चांगला खेळून सुवर्णपदक घेऊन ये. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मनावर कोणतेही दडपण घेऊ नको, पदक तुझेच आहे. बिनधास्त खेळ, अशा शब्दांत क्रीडामंत्री केदार यांनी दर्शनचे मनोबल वाढवले. दर्शननेही अप्रतिम खेळ करीत पदक जिंकून क्रीडा विभाग व महाराष्ट्राची मान उंचावली. क्रीडा विभागासह मंत्र्यांचे त्याने आभार मानले. या विजयानंतर आपले लक्ष्य सुवर्णपदक असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
सामन्यानंतर भगवा फेटा
सामन्यानंतर तीनही पदकविजेत्या खेळाडूंना भगवे फेटे बांधण्यात आले. या महाराष्ट्रीय आदरातिथ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

जिल्हास्तरीय तांदुळ व डाळ महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ७:- जिल्हातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे व उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय तांदुळ व डाळ महोत्सव २०२२-२३ चे नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मोठ्याप्रमाणात या प्रदर्शनास भेट देऊन महोत्सवात तांदूळ, डाळ आदींची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे  ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालक शालिनी कडू यांनी कळविले आहे.

जाहिरातीत वाढतेय अश्लीलता ,संस्कृतीचे भान का विसरावे -खर्डेकरांची प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार

पुणे- हल्ली चर्चेत राहावे , लक्षात राहावे , चटकन पाहावे ,किंवा ऐकावे म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून जाहिराती केल्या जातात ,पण या जाहिराती करताना संस्कृतीचे भान विसरून अश्लीलतेकडे वळलेल्या जाहिरातींना तातडीने बंदी घातली पाहिजे अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे . त्यांनी म्हटले आहे कि,’काही टीव्ही चॅनल्स वर टायटन रागा ह्या घड्याळाची जाहिरात प्रसारित होत आहे. सदर जाहिरातीत एका विवाह सोहोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सर्वजण नियोजित वधू सोबत लग्नाच्या विविध समारंभात ती काय घालणार यावर चर्चा करत आहेत.यात नियोजित वधू आपल्या बॅचलर पार्टीचा ड्रेस व घड्याळ, कॉकटेल पार्टीचा ड्रेस व घड्याळ, लग्नाच्या दिवशीचे ड्रेस वगैरा दाखवत आहे. यावेळी तिची मावशी तिला विचारते की हनिमून ला काय घालणार आहेस ? यावर एक क्षण थांबून नियोजित वधू
थांबून म्हणते – मावशी “हनिमून ला कोणी कपडे घालते का ?”
माझ्या मते कोणत्याही भारतीय कुटुंबात नियोजित वधू अश्या प्रकारचे वक्तव्य करणार नाही. कदाचित काही पुरोगामी मंडळींना यात काही वावगे वाटणार नाही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ही याकडे पहिले जाईल, मात्र माझ्या मते याला बंधन घालणे गरजेचे असून योग्य कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी करत आहे. तसेच अनेक जाहिरातींमध्ये स्त्री देहाचे प्रदर्शन केले जाते, याबाबत ही आचारसंहिता तयार केली जावी अशी ही मागणी यनिमित्ताने करत आहे.

या सोबत BRUMEX FORTE च्या सूचक जाहिराती कडे हि खर्डेकर यांनी लक्ष वेधले आहे.ज्यात विजय पाटकर यांनी काम केलेले आहे. टीव्ही वर जाहिराती दाखविताना कौटुंबिक वातावरण लक्षात घेऊन संस्कृती जपूनच अश्लील नसतील अशा जाहिराती करायला हव्यात .असे ते म्हणाले.

शाळा भरली बंद्यांची इच्छा नसताना त्यांची..

0

कारागृहातच वसली पंढरी
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित अभंग-भजन स्पर्धेत ठाणे कारागृहातील बंदीजनांचे सादरीकरण
ठाणे : भजन-अभंग स्पर्धेमुळे पांडुरंगाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली असून ठाणे कारागृहातच पंढरपूर वसले आहे, अशा भावना स्पर्धेत सहभागी बंदी गणेश सूर्यवंशी याने व्यक्त केल्या.तर नमाज असो वा भजन; परमेश्वराचे चिंतन करण्याचे ते एक साधन आहे. जगात माणुसकी सारखा दुसरा धर्म नाही, असे युसुफ अन्सारी म्हणाला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ठाणे जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचनांसह ‘शाळा भरली बंद्यांची इच्छा नसताना त्यांची..’ ही रचना सादर केली.

जिल्हा कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव, तरुंग अधिकारी अविनाश गावित, लहू कानदकर, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक दर्शन नाईक, शिक्षक गणेश मुटकुळे, एम. डी. भदाने, हमादेव शहाबादकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक बंदी वाल्याचा वाल्मिकी होऊ दे-हर्षद अहिरराव, अधीक्षक, ठाणे कारागृह
परमेश्वराच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे. परमेश्वराचे नामस्मरण केल्यामुळे वाल्याचा वाल्मिकी होतो, हे आपण ऐकले आहे. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभंग-भजन स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक बंदीजनाला मिळू दे आणि कारागृहातून बाहेर जाताना प्रत्येक बंदी वाल्मिकी होऊ दे.
बंदीजनांच्या हाताल काम मिळावे -लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख
तळोजा कारागृहाचा परिसर बघितल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवते की, येरवडा कारागृहातील बंदीजनांना वेगवेगळी कामे करण्याची आणि त्यातून अर्थार्जन करण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तळोजा कारागृहातील बंदीजनांच्या हाताला काम मिळाल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल. हातांना काम करण्याची सवय राहिल्यामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठलीही अडचण येणार नाही असे वाटते.
विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

राहुल गांधी सिद्धू मुसेवालाचे घरी,भेटले नातलगांना ..

0

चंदीगड-काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी मानसा येथे पोहोचले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांना भेटून शोक व्यक्त केला.

यानंतर राहुल गांधींनी ट्विट केले की, मुसेवालाचे आई-वडील ज्या दु:खातून जात आहेत ते वर्णन करणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यांना न्याय देऊ. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये शांतता राखणे हे आप सरकारच्या आवाक्याबाहेर आहे.

सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.सिद्धू मुसेवाला पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या जवळचे होते. मुसेवाला यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी मानसा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र, आम आदमी पक्षाचे डॉ.विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर आप सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली. दुसऱ्याच दिवशी मुसेवाला यांची हत्या झाली.पंजाबमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकून सरकार स्थापन केले. येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेमुळे आता सरकार गोत्यात आले आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर जनता आणि विरोधी पक्ष सवाल करत आहेत. धमकी मिळाल्यानंतरही मूसेवाला यांची सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा सवालही केला जात आहे.

असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली

मुंबई- एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.

ओवेसी यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय समाजवादी पक्षही आमच्यासोबत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.पटोले म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांना प्रशिक्षणाची काहीच गरज नाही. फक्त मतदानाची थोडी पद्धत सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचे दोन दिवसाचे अधिवेशन झाले. त्याचा शंभर दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. काँग्रेस विचारधारेची चळवळ महाराष्ट्रात उभी करायची आहे. त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्व आमदार हे पटोलेंच्या निवासस्थानी थांबणार असल्याचे समजते.राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सध्या मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस आमदारांना देखील बॅग भरून मुंबई येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने इम्रान प्रतापगडींना उमेदवारी दिली आहे.विधान परिषदेबाबत काँग्रेस उद्या निर्णय घेण्यात येणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. आज शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.

असदुद्दीन ओवेसींची खुली ऑफर,महाविकास आघाडीने संपर्क साधल्यास मदत करू

हैदराबाद- महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आलेला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता एमआयएमने एंट्री केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले, राज्यसभेसाठी 10 तारखेला निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही आणखी 2 दिवस मविआकडून काही प्रतिसाद मिळतो का, याची वाट पाहू. त्यानंतर आम्ही निवडणुकीबाबत निर्णय घेऊ, असे ओवेसी यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी मविआला आमची गरज आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. तसेच, मविआला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांशीही बोलणे झाले आहे. राज्यात धुळे आणि मालेगाव येथे एमआयएमचे 2 आमदार आहेत. या 2 आमदारांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय आपण 2 दिवसानंतर घेणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला 8 जूनला जाहीर सभा होत आहे. त्यावर ओवेसी म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मीदेखील लवकरच औरंगाबादला जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधणार आहे.

पुणे महानगरपालिकेस माझी वसुंधरा पुरस्कार

पुणे-पुणे महानगरपालिकेस माझी वसुंधरा पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने नुकताच देण्यात आला.जागतिक पर्यावरण दिननिमित्त माझी वसुंधरा अभियान, महाराष्ट्र शासन अंतर्गत ५ जून २०२२ रोजी मुंबई येथे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  पर्यटन व राजशिष्ठाचार तथा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे
व इतर मान्यवर उपस्थित होते.पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान २.०, २०२१-२२ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिका, नगर पालिका, ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. विविध गटांपैकी अमृत शहरे या गटामध्ये राज्यस्तरावर
पुणे महानगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले.या प्रसंगी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या EV (इलेक्ट्रिक व्हेकल) सेल साठी विशेष ओळख म्हणून पुणे शहराला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून सन्मानित करण्यात आले. पुणे शहर हे EV  सेल स्थापन करणारे भारतातील पहिले शहर आहे. महाराष्ट्र राज्याची EV  पोलिसीचे उद्दिष्टे साधण्यासाठी व शहरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या हेतूने EV  प्रयत्नशील आहे. सन २०२१ मध्ये पुणे शहरात ६२०५ इतकी वाहने नोंदविली गेली, तसेच जानेवारी २०२२ पासून मे २०२२ पर्यंत ५ महिन्याच्या कालावधीतच पुणे शहरात ८०५३ इतकी वाहने नोंदविली गेली. पुणे शहराच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भारतातील इतर शहरे सुद्धा EV  सेल स्थापन करण्यास उत्सुक आहेत.

लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा – संभाजी ब्रिगेड

पुणे-लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या समूहशिल्पा मध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेला पाहिजे. पुणे महानगरपालिकेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेली दहा-बारा वर्षं झाली मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला जात नाही. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि आत्ता भाजपची सत्ता असताना सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त मतांसाठी वापर करून त्यांच्या विचारांचा मात्र जागर करत नाहीत. महापौर आणि खासदार यांच्या पुढच्या राजकारणामुळे लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला नाही. ही शिवप्रेमी म्हणून फार मोठी खंत आहे. महापालिका आयुक्त यांनी पुतळ्याच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन लालमहालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

ते म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाल महाल येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. पाच नद्यांचे पाणी आणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. माजी उपमहापौर दिपक मानकर, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माजी जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

कोथरूड मध्ये शिवसृष्टी होणार होती. मात्र स्थानिक भागातील घाणेरडे राजकारणामुळे कोथरूड येथील ऐतिहासिक शिवसृष्टी चांदणी चौक मध्ये हलवण्यात आली. हे घाणेरडे राजकारण पुण्यात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणारे शिवाजी महाराजांच्या विचारांशी मात्र गद्दारी करत आहे, हे सहन होणार नाही. शिवसृष्टी चे काम का थांबवले गेले ते तात्काळ सुरू करावे.अशीही मागणी यावेळी करण्यात आली .

सौ. अप्सरी कासीम शेख संभाजी ब्रिगेड महिला आघाडी विभाग अध्यक्ष येरवडा,संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर, कुमार पवार, अविनाश घोडके, कीर्तिकुमार घोरपडे, राजेश आडसूळ, शंकर तात्या कुटे, सौ. अप्सरी कासीम शेख, जनता वसाहत चे अध्यक्ष मनपल्ली सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सनी निम्हण आयोजीत शिबिरात ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सोमेश्वरवाडी :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आम्ही केलेल्या आवाहनाला परिसरातील युवकांनी नागरिकांनी आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले हे फार आनंददायी आहे. परिसरातील तरुणांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी, निरोगी समाजासाठी, शिवविचारांना जागत, मोठ्या प्रमाणात सर्वांनी येऊन रक्तदान केले त्याबद्दल मी रक्तदात्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत त्यास देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देत रहाल असा विश्वास आहे.

यावेळी सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बाळोबा सुतार दिंडी अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, RPI चे रमेश ठोसर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे, आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांनी केले होते.

पालखी सोहळ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या – विशाल धनवडे

पुणे- पावसाळा,कोरोना, आणि त्यानंतर आता तिसऱ्या वर्षी होऊ घातलेला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यासाठी महापालिका हद्दीतील संपूर्ण पालखी मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील अवस्था याबाबत अडीअडचणी ,समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही होण्यासाठी अगोदर एक सर्वपक्षीय बैठक महापालिका प्रशासनाने घेऊन नियोजन करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी येथे केली आहे.

सोहळ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मंडप व्यवस्था, पालखी मार्गांवरील रस्त्यांची झालेली दुरावस्था , वृक्ष छाटणी , तसेच पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक विशाल धनवडे, गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, स्वातीताई कथलकर, भाऊ शिंदे, योगेश खेंगरे , अनिकेत थोरात , अनिल ठोंबरे, सनी मुसळे यादी शिवसैनिक उपस्थित होते.