Home Blog Page 1462

यश्वी, ईरा, नाव्या तिस-या फेरीत दाखल

सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत यश्वी पटेल, मनीषाकुमार, ईरा कुलकर्णी, नाव्या रांका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.

पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुस-या फेरीत पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या धून सांघवीला १५-६, १५-६ असे, पुण्याच्या मनीषा कुमारने साता-याच्या रिया सावंतला १५-१२, १२-१५, १५-१३ असे, तर ठाण्याच्या ईरा कुलकर्णीने रिशा परबला १५-६, १५-१२ असे पराभूत केले. पुण्याच्या नाव्या रांकाने नगरच्या पलक ढांगरला १५-४, १५-० असे, कोल्हापूरच्या हृदिका शिंदेने मुंबई उपनगरच्या गार्गी दाभोळकरला १५-६, १५-८ असे नमवून तिसरी फेरी गाठली.

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिस-या फेरीत पुण्याच्या ईशान लागूने आपलाच सहकारी रणवीर टेमघरेवर १५-३, १५-३ असा, मुंबई उपनगरच्या सानिध्य अगरवालने सोलापूरच्या महंमद झैन शेखवर १५-७, १५-८ असा, सांगलीच्या लौकिक ओस्तवालने अमरावतीच्या देवव्रत खांडेकरवर १५-७, १५-७ असा विजय मिळवला.

निकाल – १५ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – तन्वी घारपुरे (ठाणे) वि. वि. अनन्या बाबर (पुणे) १५-०, १५-३, पूर्वा मुंदडे (पुणे) वि. वि. स्वराली पाटील १५-४, १५-३, खुशी पाहवा (मुंबई उपनगर) वि. वि. द्विती शाह (पुणे) १५-९, १५-१२, मौसमी लिखार (नागपूर) वि. वि. पलक मिसाळ (पुणे) १५-११, २१-१९, दितिशा सोमकुवर (नागपूर) वि. वि. तेजस्वी भुतडा (पुणे) १५-१, १५-५, अन्वी कुलकर्णी (सांगली) वि. वि. पूर्वा तपाडिया (सोलापूर) १५-५, १५-९, ऋतिका कांबळे (कोल्हापूर) वि. वि. हृदया साळवी (पुणे) १५-१२, १४-१६, १५-४, जुई जाधव (पुणे) वि. वि. मायरा ओक (मुंबई उपनगर) १२-१५, १५-८, १५-१०, सारा साळुंके () वि. वि. रिषा नंदिवडेकर () १५-९, १५-१०.

१५ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – देव रुपरेला (पालघर) वि. वि. कृष्णनील गोरे (पुणे) १५-८, १५-२, आरव ठाकरे (नागपूर) वि. वि. शरव जाधव (पुणे) १५-६, १५-१, अन्वीत नेने (ठाणे) वि. वि. पृथ्वीराज नागरगोजे (बीड) १५-८, १५-७, संग्राम खराडे (बुलढाणा) वि. वि. स्वरूप सोमाणी (नगर) १५-६, १५-४, विहान मुर्ती (पुणे) वि. वि. अवनीश बांगर (पुणे) १५-१०, १५-७, ईशान वानखेडे (नाशिक) वि. वि. आदित येनगेरेड्डी (छत्रपती संभाजीनगर) १५-८, १५-७, अवधूत कदम (पुणे) वि. वि. अमोघ अदोनी (पुणे) १५-९, १५-५, राघवेंद्र यादव (पुणे) वि. वि. प्रसन्न मन्ना (सांगली) १८-१६, १२-१५, १६-१४.

ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे…जितेंद्र आव्हाड

मुंबई-आज मुंबईत सभेला संबोधित करताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडले. ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले, असा आरोप अजित पवारांनी केला. दुसरीकडे अजित पवारांच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मला जे बोलायचे ते बोला, पण साहेबांवर जे काही बोलला आहात, त्यांच्याविरोधात मी उभा आहे.शरद पवार तुम्हाला का लुळे-लंगडे, एका ठिकाणी बसलेला माणूस हवा होता का, त्यांच्याविषयी असलेली आस्था तुम्हाला संपवायची आहे. त्यासाठी तुम्ही लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. एवढाच त्यांच्याविषयी राग असेल तर त्यांचे कशाला फोटो वापरता.?ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला?ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केले आहे.

अजित पवारांच्या टीकेबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी तुमच्याविरोधात उभा राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार गटाकडून मुंबईतील एमईटी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर शरद पवार गटाकडून वाय बी चव्हाण सेंटर सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं होते. या मेळाव्यातून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन घरी बसावं आणि आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते अजिबात घरात बसणार नाही.

आव्हाड म्हणाले की, कायद्याच्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशाकडे घेऊन जात आहात. ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे. त्यांचे ते छोटेसे घरटे होते. त्यातून बाहेर काढायचं. साहेबांनी तुमची कुठलीच महत्त्वकांक्षा रोखली नाही. त्याच व्यक्तीला तुम्ही लोक घरी जा, बाय बाय करू लागला आहात. यात काही माणुसकी असते का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

स्वतःचे मन असते. आपल्यासाठी कोणी कोणी कधी काय काय केले आहे. शरद पवारांनी त्यांच्यासाठी काय काय केले आहे. त्यांना माहित नाही का, त्यांनी अजिबात सत्ता भोगली नाही. तुम्हा सर्वांना सत्ता दिली. ज्या आईने खायला वाढले, त्या आईच्या हातातून भांडे ओढून घेण्यासाठी तयार झालात, असे सांगत आव्हाडांनी अजित गटावर निशाणा साधला.

शेवटी नारळ कोणावर फोडावे लागते. माझ्या मागे बाप-आई नाही. माझी कंपनी नाही, कारखाना नाही. कोणाचीही साथ नाही. माझ्यामागे फक्त शरद पवार ही एकमेव ताकद आहे. तरी देखील हा बोलतो. म्हणून काही लोकांचे दुखणं असू शकते. माझ्याविरूद्ध बोलणे सोपे आहे. पण मी कायम साहेबांसोबत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार आहे.

आज मुंबईतील आमदार निवासातून एक आमदार घेऊन गेले. जे फेसबुक पेजवर पवारसाहेबांच्या समर्थनार्थ लिहतात. त्यांना धमक्या येत आहेत. परंतू अशा लोकांची घुसमट केली जात आहे. पण ते अजिबात घाबरणार नाहीत. आम्ही लढत राहणार आहोत.

पवार साहेबांवर कशा पद्धतीने जबरदस्ती केली जात होती. पण शरद पवार त्यांना नकोसे झाले होते. काही लोक म्हणतात माझ्याकडे वय आहे. ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला. त्यामुळे अशा पद्धतीने बोलून तुम्ही आम्हाला हरवू शकत नाही. असा घणाघात आव्हाडांनी केला.

भाजपचे हिंदुत्व मनूवादी, विषारी, विभाजन करणारे त्यांच्यासोबत जाणे मला कदापी मान्य नाही

अजित पवार गटाच्या प्रत्येक आक्षेपाला शरद पवारांनी दिले उत्तर

शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात काय फरक आहे ते सांगितले

नागालंड मध्ये बाहेरून पाठींबा का दिला ते स्पष्ट केले.

मी त्यांचा दैवत आहे ,सांगून फोटो लावतात … आणि …

मुंबई- शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वांना घेऊन जाणारे आहे म्हणून त्यांच्याबरोबर गेलो पण भाजपचे हिंदुत्व मनूवादी, विषारी, विभाजन करणारे जो विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यासोबत जाणे योग्य नाही, हे मला कदापी मान्य नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

 मुंबईत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर पक्षातून उभी फुट पाडत बाहेर पडलेल्या अजित पवार गटावर देखील त्यांनी टीका केली. ते म्आहणाले,’जची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे. २४ वर्षांपूर्वी मुंबई शहरामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोंची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज २४ वर्षे झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कोणी आमदार, खासदार तर कोणी मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य सरकार चालवू शकतो, हे राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी देशाला दाखवले. अनेक नवीन नेते तयार केले. यात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा ही एकच भावना होती. राज्यातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामात तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत. ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्रं आहेत. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा म्हणाव्या तशी कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलंय. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. त्यावेळी एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे, त्यातून मार्ग काढणे, हे सूत्र या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज चित्र बदललं आहे. संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद हवा. मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत असायची की एखादा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयासंबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद ठेवायचा. अयोग्य असेल ते दुरुस्त करण्याची मानसिकता ठेवायची. आज देशात हा संवाद नाही. आम्ही सत्ताधारी पक्षात नाही पण लोकांमध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी सामान्य माणसाच्या दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण राज्यकर्त्यांचा संवादच नसेल तर त्या गोष्टींवर मर्यादा येतात. आज देशातील जनतेमध्ये अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवण्यासाठी संसदीय पद्धतीला शक्ती देण्यासाठी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पहिल्या संवादात सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्या सगळ्यांना संघटीत करण्यास सुरुवात केली. यासाठी बैठका घेत आहोत. हे जसे घडायला लागले तशी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते अस्वस्थ होऊ लागले. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींचा आरोप केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विधानं आधार नसताना करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना बोलण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरंच जर कोणी चुकीचे काम केले असेल त्यावर कारवाई केली पाहिजे. पण त्यांनी तेवढी धमक दाखवली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये त्याच पक्षाला बरोबर का घेतले? याचा अर्थ हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलून जनमानसात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. आमदारांना दमदाटी, नवी पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यात अडथळे, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. राज्यात काहींनी बाजूला जायची भूमिका घेतली त्याचे दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. ज्या कार्यकर्त्यांमुळे हे दिवस आणले त्यांना किंवा पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसायचे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. काल नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काही गडबड करण्यात आली. काही लोक पोलिसांच्या मदतीने कार्यालयाचा ताबा घेतात आणि सांगतात हा पक्ष आमचा, ही घड्याळाची खूण आमची आहे. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कोणाला दिली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. खूण कुठेही जाणार नाही. ही गोष्ट खरी असली तरी खूण हे देशाचे राजकारण करत नाही. मी अनेक निवडणुका लढलो. त्यात घड्याळ, हात, चरखा, गाय-वासरू अशा चिन्हांवर लढलो आहे. जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंत:करणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे तोपर्यंत काही चिंता करण्याची गरज नाही. आज काही लोकांनी भाषणं केली, त्यात माझ्याबद्दल बोलताना मी त्यांचा गुरु आहे असे सांगत होते. आज त्या सहकाऱ्यांच्या मेळाव्यात मागे असलेला फोटो पाहिला तर त्यावर सर्वात मोठा फोटो माझा होता. अनेक पोस्टरमध्ये माझा फोटो लावला. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही, खण्णकन वाजत नाही हे लोक ओळखतील. पांडुरंगाच्या भेटीमध्ये बडवे येऊ देत नाहीत असा उल्लेख काहींनी केला. पांडुरंगाच्या दर्शनाला येणं देशात कोणी थांबवू शकत नाही. मला पांडुरंग, गुरु असे म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे. जेव्हा निवडणूक आली तेव्हा दिड-दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्यांना संधी देऊ नका असे काहींनी मला सांगितले. पण त्यांच्यावर अन्याय झाला असे मला वाटले. अशावेळी सहकाऱ्याला तोंडावर पडू न देण्याची भूमिका घेतली. माझा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. तिकीट दिले, सरकार आले तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या नावांमध्ये पहिले नाव त्यांचे देण्यात आले, ही भूमिका आपण घेतली.राज्यकर्त्यांनी राज्य एकत्रित ठेवायची भूमिका घेतली पाहिजे. भाजपच्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा भाषणात हे राज्य तोडण्याची, वेगळा विदर्भ करण्याची वक्तव्यं केली. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे. आपले काही सहकारी गेले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मात्र आठ-दहा दिवसांपूर्वी भाषण ऐकले तर राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री आला नाही असे त्यांचे भाषण होते. आता असल्या मुख्यमंत्र्यांसमोर नमस्कार करून काम करणार. आम्ही भाजपसोबत गेलो त्यात काय चुकलं असे सांगण्यात आले. नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली हे सांगितले. ते खरं आहे. प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी राज्यं आहेत तिथे अतिशय बारकाईने निर्णय घ्यावे लागतात. तिथे उद्रेक झाला आणि त्याचा गैरफायदा शेजारील देशाने घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागेल. त्यामुळे त्याठिकाणी बाहेरुन पाठिंबा दिला. इथे आतच जाऊन बसले. त्यामुळे त्यांनी दिलेले उदाहरण माझ्या मते योग्य नाही. जे जे लोक देशात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले तिथे काही कालावधीनंतर जो सहकारी आहे तो उद्ध्वस्त करणे, त्याची मोडतोड करणे हे भाजपचे सूत्र आहे. त्यांनी पक्षात बसून, चर्चा करून निकाल घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. जे इतर राज्यात घडलंय त्याशिवाय वेगळे काही घडणार नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात स्व. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केले की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात पाठिंबा दिला पाहिजे. सहकार्याची भूमिका घेताना विधानसभेला राज्यात एकही उमेदवार शिवसेनेने उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळात अजून कटुता वाढू नये यासाठी त्यांनी हा निकाल घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणारे हिंदुत्व भाजपकडून केले जाते. जो समाजाच्या ऐक्याला तडा देतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही. आज देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर हल्ले असे प्रश्न आहेत. राज्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चार हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. ज्या राजवटीत महिलांना संरक्षण मिळत नाही त्यांना राज्य चालवण्याचा काय अधिकार आहे? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यामुळे या लोकांवर विश्वास योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम आपल्या सर्वांना करायचे आहे. आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करू या.असे ते म्हणाले.

तुम्ही थांबणार आहात की नाही? राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? मला व्हिलन करू नका,अजित पवारांचे थेट शरद पवारांना आव्हान

शरद पवारांनी सभा घेतल्या तर मला बोलावे लागेल;

मुंबई : एक वय असतं. त्या वयात थांबावं लागतं. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबालयाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा होतीये. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांनी भाषणं केल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवारांवर जोरदार टीका करणारे भाषण केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची त्यांनी एकप्रकारे चिरफाडच केली.

अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मुशीत मी घडलो, त्यांच्या छत्रछायेखाली माझी जडण घडण झाली. ते आपले श्रद्धास्थान आहे. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर राजकारण चाललंय ते पाहता काही निर्णय गरजेचे आहेत. एखादा पक्ष कशासाठी काम करतो तर लोकांच्या विकासासाठी….

आपल्या वरिष्ठ नेत्यांनी १९६२ ला राजकारणाची सुरुवात केली, ६७ साली आमदार झाले, पुढे मंत्री झाले, १९७८ ला वसंतदादांचं सरकार पाडून साहेब मुख्यमंत्री झाले, १९८० ला पुलोदचा प्रयोग झाला. जेव्हाचा जनसंघ आताचा भाजप साहेबांच्यासोबत होता. १९८० ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट झाली. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास बघितला तर या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. १९७७ ला देशपातळीवर असणारा जनसंघ कुठेय? तर तो शोधावा लागतोय. कारण करिश्मा असणारं नेतृत्व नव्हतं. १९८६ साली समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलिन झाली. पवारसाहेबांना देशाने गेली ५५ वर्ष साथ दिली, असं सांगतानाच अजित पवार यांनी विलिनिकरणाचा इतिहास मांडला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी सुप्रीया सुळे यांना म्हटले होतो की शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांनी थांबायला हवे आणि आपल्याला मार्गदर्शन करायला हवे. पण सुप्रीया सुळे यांनी ते हट्टी आहेत ते ऐकणार नाही असे तिने स्पष्ट सांगितले. सुप्रीया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासही मी तयार होतो. मात्र, हे ठरवूननंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली. आम्ही शरद पवार यांना विठ्ठल मानतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची भूमिका स्वीकारायला हवी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला अनेकदा पुढे करत राजकीय टीका करण्यात आली. मला मिळणार असलेली संधी दुसऱ्यांना देण्यात आली. मात्र, मी कधीच काही म्हणालो नाही, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. केवळ मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे का असा सवालही अजितदादांनी उपस्थित केला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ठाण्यात तर अशा पठ्याला नेतृत्व देण्यात आले आहे, ज्याने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ते पक्षात मनमानी करतात म्हणून पक्षाला रामराम ठोकला. त्यांना संध देऊ नका असे मला अनेकदा लोकांनी सांगितले पण त्यांच्या हातात धुरा देण्यात आली. नेता होताना आपल्यासह ३ ते ४ आमदार निवडून आणावे लागतात. बेरजेचे राजकारण करता आले पाहिजे. त्सांना कधी ते जमलेच नाही अशा व्यक्तीच्या हातात पक्षाची धुरा दिली आहे असा टोलाही लगावला आहे.

बापाचा नाद करायचा नाय, पदर खोचून उभी राहीन, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा; पवारांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई-माझ्या बापाचा व आईचा नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला. माझ्याबद्दल बोला. पण माझ्या बापाचा नाद करायचा नाही. मी महिला आहे. कुणी बोललं तर टचकण डोळ्यात पाणी येतं. पण संघर्षाची वेळ आली की, हीच महिला पदर खोचून मैदानात उभी राहते. तीच अहिल्या होते व जिजाऊही होते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांना दिला. काही जण पक्षातील वडिलधाऱ्यांना सांगतात की, तुमचे वय झाले, आता थांबा, अरे यांच्या पेक्षा आम्ही मुली बऱ्या, असेही त्या यावेळी अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या.

काही जण पक्षातील ज्येष्ठांना घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे माझे मन अधिक घट्ट झाले आहे. वय केवळ आकडा असतो. आपल्यात जिद्द असली पाहिजे, असेही सुप्रिया यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. भाजप हा देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्ट पक्ष असल्याचा दावा करणाऱ्यांनीच आज राष्ट्रवादीत फूट पाडून संपूर्ण पक्षच तिकडे नेला, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर हल्लाबोल करताना केला. यावेळी त्यांनी शरद पवारांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांचाही तिखट समाचार घेतला. बापाला घरी बस म्हणणाऱ्या मुलापेक्षा मुलगीच बरी, असे त्या यासंबंधी म्हणाल्या.

पक्ष पुन्हा बांधू त्यात काही होणार नाही, 2019 मध्ये राष्ट्रवादीला 11 जागा मिळणार होत्या, पण तेव्हा शरद पवार बाहेर पडले आणि 54 आमदार निवडून आले. आजपासून भाजपच्या खोटारडेपणाविरुद्ध लढायचे, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही, फैजल आणि अलिल देशमुख यांच्यावर केस केल्या तरी ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. वय हा फक्त आकडा आहे, भाजपच्या विरोधात आता जिद्दीने लढणार. स्टेजवरील 8 ते 9 खूर्च्या रिकाम्या झाल्या आहेत तिथे नव्या उमेदवारांना संधी मिळणार असे म्हणत सुप्रीया सुळेंनी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

शरद पवारांचीच केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार नवे अध्यक्ष; पक्षाच्या नाव व चिन्हावरही सांगितला दावा

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे, अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रावर 30 जूनची तारीख

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या प्रस्तावाचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर 30 जून ही तारीख आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

शिवसेनेच्या मार्गाने जाणार लढा

उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी सादर करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण सध्या या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहेत.

दुसरीकडे, शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.

पवार गटाचे कॅव्हेट दाखल

आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष शिवसेनेच्याच वाटेने जात असल्याचे दिसून येत आहे.

बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अजित पवारांच्या गटाच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 15 हून अधिक आमदारांची हजेरी होती.

शिष्याने गुरूचा धडा गिरवला तर त्यात गैर काय? बंडखोरीवरून धनंजय मुंडे यांचा शरद पवार यांना खोचक टोला

मुंबई-

एखाद्या शिष्याने गुरूचा धडा गिरवला तर त्यात गैर काय, हे तर चांगलेच आहे, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांच्यावर अनेकदा आरोप करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी टीका केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम केले. पहिल्या वर्षांतच सत्ता आली त्यावेळी स्वाभिमानासाठी शरद पवार यांनी निर्णय घेतला होता. मात्र, 3 ते 4 बडव्यांमुळे हा सर्वांना निर्णय घ्यावा लागला, असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली.

धनंजय मुंडे म्हणाले की, कठीण प्रसंगामध्ये अतिशय वाईट काळात सर्व नेत्यांनी शरद पवार यांची साथ दिली. तटकेर यांनी 40 वरुण 54 पर्यंत संख्या नेली, कारण अजितदादांनी अनेक वेदना सहन केल्या. मात्र, आमच्या विठ्ठल असेलेल्या शरद पवारांचा शब्द आम्ही तोडला नाही,आणि आज हा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा किती वेदना सहन कराव्या लागत असतील हे समजून घेणे घेण्यासारखे आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की,अजितदादांनी अनेकदा त्यांना मिळणारे पद इतर लोकांना दिले आहे.घरातून आणि पक्षातून काढलेल्या माणसाला अजित पवार यांनी मोठे केले आणि ही संधी मला दिली आहे.अजित पवार यांनी त्यांच्या सवालीला देखील आपला अपमान आणि समजू दिला नाही. अजित पवार यांच्यावर अनेकदा अजितदादांना बदनाम करण्यात येत आहे. अजित पवार यांनी सर्व काही सहन करूनही काहीच केले नाही, असे म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे.आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज हे आहे. हसन मुश्रीफ यांनी राम मंदिर उभे केले आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतो.

साहेब,वसंतदादा पाटलांनाही असेच वाईट वाटले असेल , छगन भुजबळांनी शरद पवारांना मारले टोमणे

मुंबई- आम्ही सत्तेत गेलो , साहेबांना वाईट वाटले असेल पण साहेब असेच वसंतदादा पाटलांनाही वाईट वाटले असेल अशा शब्दात काही मागच्या राजकारणाचे उल्लेख करत छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना टोमणे मारले ते म्हणाले तुमच्या भोवतालच्या बडव्यांना बाजूला करा , आम्ही येतो सारे … जसा नागालँड मध्ये सत्तेत सहभागी होणाऱ्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार केला ,तसा साहेब आम्हालाही परवानगी देऊन आमचाही सत्कार करा असे छगन भुजबळ म्हणाले .

अजित पवार आणि त्यांच्या मातब्बर सहकाऱ्यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पद घेऊन भाजपा बरोबर सत्तेत सहभागी झाल्यावर आज मुंबईत अजित पवार गटाची बैठक होत आहे सुरुवातीलाच भुजबळ यांनी भाषण केले ते म्हणाले ,’

मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांनी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपला अध्यक्ष नियुक्त करण्याचा आग्रह धरला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळेच आम्ही वेगळी वाट निवडली, असा दावा छगन भुजबळ यांनी बुधवारी शरद पवार व जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. आम्ही सत्तासंघर्षाच्या निकालाचा अभ्यास करूनच वेगळी वाट निवडली. त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत व्यक्त केला.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

“मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषं दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणं स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविक आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे

शरद पवार आमचे विठ्ठल
“आम्हाला विचारलं जातं की शरद पवारांचा फोटो का वापरला? अरे, साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे. मला एक सांगा ही सगळी मंडळी वेडी आहेत का? जी आमच्याबरोबर आली आहेत. आमच्या बरोबर आलेले काही लोक तर आमदार किंवा नामदारही नाहीत. पण तिथे (शरद पवार गट) काम करणारे पदाधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही.
आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे. पण आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंत दादांनीही असंच वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरेंसह होतो. मी त्यांना आई वडिलांच्या ठिकाणी मानत होतो. पण ३६ लोक तुमच्याकडे आले होते. तेव्हा मलाही येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा. मी तुमच्याबरोबर आलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतलं तेव्हा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटलं. या सगळ्याची पुनरावृत्ती झाली आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी, ओबीसींसाठी, दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत.” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत आणि त्यांना बडव्यांनी घेरलं आहे असं वक्तव्य करताच राष्ट्रवादीतले बडवे कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यामध्ये येतात का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार होणार मुख्यमंत्री, तारीखही ठरली! दिल्लीश्वरांचा पाठिंबा

मुंबई-अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम दावा एका इंग्रजी न्यूज पोर्टलने केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र घोषित ठरतील. त्यानतंर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देतील. यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

अजित पवार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर येत्या 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असे रेडिफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. रेडिफच्या या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात केला आहे.

अजित पवार मार्च 2022 पासून अमित शहांच्या नियमित संपर्कात होते. शिंदेंच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती, तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

रोहित पवारांची जळजळीत फोटोपोस्टअन कविता ..अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?

https://twitter.com/RRPSpeaks/status/1676473043730993152

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सध्याच्या राष्ट्रवादीच्या बंडावर अत्यंत जळजळीत पोस्ट सोशल मिडिया वर करून आपला संताप व्यक्त केला आहे त्यांची कविता विखार ओकत आहे ..फोटोत देखील त्यांनी चारही बाजूंनी कुत्र्यांचे फोटो टाकले आहेत . आणि मध्ये महाराष्ट्राच्या नकाशात मध्यभागी शरद पवारांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला गर्दी जमलेली आहे. त्यांची कविता त्यांच्याच शब्दात …

आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात.

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

****

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये नजरकैदेत

अजित पवार गटाच्या बैठकीचे निमंत्रण देताना रुपाली चाकणकर यांनी केला शरद पवारांच्या फोटोचा वापर , कार्यकर्ते संभ्रमात

अजितदादांसह ९ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर २/३ म्हणजे ३६ आमदार असतील तरच या ९ जणांचा बचाव होईल. अन्यथा फुटीर आमदारांची हकालपट्टी होऊ शकते. त्यामुळे बुधवारी ३६ आमदार जमवण्याचे दादांसमोर आव्हान असेल.तर ८३ वर्षीय योद्धा तुमची वाट पाहतोय.. खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांना परत येण्यासाठी असे भावनिक आवाहन केले आहे.

‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणे बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा दादा गटाकडून केला जात आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा पवार गटाचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पवार गटाची यशवंतराव चव्हाण सभागृहात तर दादा गटाची भुजबळ नॉलेज सिटीत बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजंूच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते.

अजित पवार गटाने मंगळवारी ‘प्रतापगड’ नावाने नवीन संपर्क कार्यालय सुरू केले. तिथे शरद पवार यांचे फोटो असलेले बोर्ड लावलेत. त्यावर पवार यांनी ठणकावले. ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत त्यांनी फोटो वापरू नये. जिवंतपणी फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे.दरम्यान अजित पवार गटात गेलेल्या रुपाली चाकणकर यांनी मात्र फेसबुक पोस्ट वर अजित पवार गटाचे निमंत्रण देताना शरद पवार यांचाच फोटो देऊन दिशाभूल चालविली आहे असा आरोप होतो आहे .

रुपाली चाकणकरांनंतर रुपाली पाटील ही अजित पवार गटात …

दरम्यान पुण्यातील आणखी एक आक्रमक महिला कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या माणसे तून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रुपाली पाटील देखील आता अजित पवार गोटात सामील झाल्या आहेत त्यांनी सोशल मिडिया तून हे स्पष्ट करत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबाबतचे फोटो शेअर करत शरद पवार आमचे दैवत नक्कीच पण आम्ही अजित पवारांसोबत असा दावा केला आहे.

शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. शरद पवार गटाची दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता, तर अजित पवार गटाची वांद्रे उपनगरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.

एकूण 53 आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. आज बैठकांमधून कोणत्या गटाकडे किती आमदार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी व्हीपही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाला 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.

0000

शरद पवारांबरोबर आहेत कोण कोण ? उद्याच्या बैठकीतून चित्र होणार स्पष्ट

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या, दि.५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला त्यांनी माझा फोटो वापरू नये ! शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी आतापर्यंत अनेकदा आपले नेते शरद पवारच असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थक आमदारांनीही त्यांचीच री ओढली आहे आणि या अजित पवारांच्या अभिनंदनाच्या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो लावले जातआहेत. यामुळे या सर्वामागे शरद पवार यांचा हि हात असल्याचे चित्र रंगविले जाऊ लागले आहे.यामुळे आता शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे.माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.