मुंबई-
एखाद्या शिष्याने गुरूचा धडा गिरवला तर त्यात गैर काय, हे तर चांगलेच आहे, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांच्यावर अनेकदा आरोप करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी टीका केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम केले. पहिल्या वर्षांतच सत्ता आली त्यावेळी स्वाभिमानासाठी शरद पवार यांनी निर्णय घेतला होता. मात्र, 3 ते 4 बडव्यांमुळे हा सर्वांना निर्णय घ्यावा लागला, असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली.
धनंजय मुंडे म्हणाले की, कठीण प्रसंगामध्ये अतिशय वाईट काळात सर्व नेत्यांनी शरद पवार यांची साथ दिली. तटकेर यांनी 40 वरुण 54 पर्यंत संख्या नेली, कारण अजितदादांनी अनेक वेदना सहन केल्या. मात्र, आमच्या विठ्ठल असेलेल्या शरद पवारांचा शब्द आम्ही तोडला नाही,आणि आज हा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा किती वेदना सहन कराव्या लागत असतील हे समजून घेणे घेण्यासारखे आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की,अजितदादांनी अनेकदा त्यांना मिळणारे पद इतर लोकांना दिले आहे.घरातून आणि पक्षातून काढलेल्या माणसाला अजित पवार यांनी मोठे केले आणि ही संधी मला दिली आहे.अजित पवार यांनी त्यांच्या सवालीला देखील आपला अपमान आणि समजू दिला नाही. अजित पवार यांच्यावर अनेकदा अजितदादांना बदनाम करण्यात येत आहे. अजित पवार यांनी सर्व काही सहन करूनही काहीच केले नाही, असे म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे.आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज हे आहे. हसन मुश्रीफ यांनी राम मंदिर उभे केले आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतो.